Skip to main content

पुढचे पाऊल

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 17/11/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.107/esakal/20101116/5396894299098665752.htm वरील बातमी बघा. मुस्लिम पुरुषाने मोबाईलवर तीन वेळा तलाक म्हटले तर इस्लामी कायद्याप्रमाणे तो तलाक ग्राह्य धरला जाईल. पत्नीची ऐकूच आले नाही वगैरे सबब चालणार नाही. इस्लाम हा नव्या तंत्रज्ञानापासून अलिप्त आहे असे समजणार्‍यांना ही एक जोरदार चपराक आहे. इस्लामही नव्या युगाच्या नव्या तंत्रांचा आपल्या धर्माच्या रुढींमधे समावेश करतो. किती किती छान! असे कळते की फेसबुकवर बायकोच्या वॉलवर तलाक तलाक तलाक असे लिहिल्यास ते ग्राह्य आहे का याविषयी मौलवी चर्चा करत आहेत. म्हणजे तीन वेळा वेगवेगळे लिहायचे का एकाच लिखाणात तीनदा लिहायचे याविषयी वाद आहे. तीच गोष्ट ट्वीटरची. कुणी बायकोला तलाक तलाक तलाक लिहिलेला ट्वीट धाडला तर काय? एकंदरीत कित्ती कित्ती सोपे झाले आहे नाही तलाक देणे. हो पण फक्त शोहरला. बिवीला नाही बरं का! मिसळपाववरील तमाम सेक्युलर कंपू आनंदाने हुरळून गेला असेल यात शंका नाही. असो.

वाचने 2253
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

काल समस sms करा असे सुचविले होते, आनि डिलिव्हरि रिपोर्ट सेव्ह करा हे पन सन्गितले होते, ते उडाले. पन परत सन्गतो चान्गला मोबायिल वापारा. चान्गला मोबायिल वापारा. बायाकोला निदान कळुन तरि दे. कि तिला तलाक मिळाला . http://www.thehindu.com/news/national/article888417.ece माझा प्रतिसाद उडवु नका, उडवु नका, उडवु नका. (तिन वेळा, ओके)

चपला घाल, आणि निघ. मा. संपादक, मिसळपावासारख्या कंपूबाज संकेतस्थळावर हा हुप्प्या धार्मिक तणाव आणू इच्छितो, त्यामुळे त्याला चपला दिल्या जाव्यात.

म्हणजे आता जगातले बहुतांशी मुस्लिम पुरुष हा फतवा शिरसावंद्य मानतील असा आपला समज आहे का? समाजात फिरताना तरुणींनी अमूक प्रकारचे कपडे घालू नयेत, व्हॅलेंटाईन साजरा करु नये असेही फतवे अनेक जण काढतात्. जगभरात तथाकथित धार्मिक संघटना बातमी बनवण्यासाठी असे अधून मधून बरळत असतात.

सोय आहे म्हणुन जगातले सगळे मुसलमान ४ लग्ने करत नाहीत तसेच आहे हे. इस्लामने फक्त सोय करुन ठेवली आहे. वापरायची की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. पण लग्नासारख्या पवित्र नात्यामध्ये कॉर्टकचेरीची भानगड नको आणि तलाक देणे सोपे जावे म्हणुन काही फतवे काढले तर बिघडले कुठे? ही फक्त सात्विक जळजळ आहे काही मुस्लीम्द्वेष्ट्या लोकांची. इस्लामचे फायदे बघवत नाहीत या लोकांना.

In reply to by मृत्युन्जय

तर मग ही सोय बायकांना का उपलब्ध नसावी? निव्वळ पुरुषालाच ही सोय का? आधुनिक युगात स्त्रीला असा अधिकार नसणे हे स्त्रीला दुय्यम स्थान देणे आहे. भारतीय कायद्याने इस्लामी पद्धतीची तलाक द्यायची अन्यायी पद्धत स्वीकारली आहे. हे लाजिरवाणे आहे. पवित्र नात्यात कोर्ट कचेर्‍या नकोत म्हणणे सोपे आहे. पण लग्न हे कायद्याच्या कक्षेत येणारे बंधन आहे. तेव्हा कोर्ट कचेर्‍या येणारच. इस्लाममधेही लग्न लावायला काझी लागतोच. तशी म्हण असली तरी नुसते मिया बिबी राजी असून पुरत नाही.

फायदा होउ दे हो, बक्कळ फायदे होउ दे. अगदि चन्द्रावर पन जौन्दे. ओके ? पन बायकोला बोल्लेले कळलेच नाहि तर ति घरि वाट बघत बसेल ना वेड्या सारखि, म्हनुन परत सन्गतो चान्गला मोबायिल वापारा. बायाकोला निदान कळुन तरि दे. कि तिला तलाक मिळाला . कल्ला ?

संपादकमंदळाला विनंति आहे की मिपावर जे फेरीवाले घुसले आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा.