Skip to main content

गुजरातच्या प्रगती§

Published on गुरुवार, 11/11/2010
गुजरातच्या प्रगतीची ही बातमी वाचून आनंद झाला अशी प्रगती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का

याद्या 2926
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

डोके ताळ्यावर ठेवून जात्,धर्म,भाषा,पैसा ह्यांच्या पलिकडे लोकांनी आणि पुढार्‍यांनी विचार केला तर शक्य आहे.नाहीतर तर युपी/बिहारपेक्षा आपण बरे ह्यात सामाधान मानुया.

कामगार कल्याण क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी केली आहे. एंप्लॉयमेंट एक्सचेंज मधुन नोक-या देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे राज्य

In reply to by अवलिया

ऐहिक प्रगती काही खरी नाही असे माझे मत सध्या झाले आहे. ;) शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत. :)

In reply to by नितिन थत्ते

शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत. का ठेविले नरेन्द्रे तैसेची रहावे असे म्हणायचे आहे? ;) बाकी महाराष्ट् ही संतांची भूमी आहे का संथांची? :(

In reply to by विकास

बिट्स पिलानी + बर्कली वाले आता आले आहेत. महाराष्ट्र लवकरच टेक्नोभूमी म्हणून ओळखली जाईल.

जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रीत होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. आज प्रत्येक नेत्याला हे माहित असून सुद्धा कोणी त्या साठी कायदा करण्याचा ठोस विचार करताना दिसून येत नाही. आजकालचे राजकारण पाहता कोणालाही दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात रस नाही असेच दिसते, कोणत्याही समस्येला तात्पुरती मलमपट्टी करून पुढचे पुढे बघु हेच कामचलाऊ धोरण अवलंबून वेळ मारून नेली जाते. इथे एक बाब नमूद करुशी वाटते कि महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.)

In reply to by गांधीवादी

हॅ हॅ हॅ महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.) फक्त शेतकरी नव्हेत तर अल्पसंख्यांकानादेखिल वगळले आहे! आता, आहे तयारी (अल्पसंख्यांकाना वगळून) ही पॉलिसी भारतात राबवण्याची??? असो, ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच!

In reply to by सुनील

अगदी अगदी . करावीच पॉलिसी इंप्लिमेंट. आणि त्याआधी अप्लसंख्यांकांची व्याख्या पण बदलावी. म्हणजे एकदम बॅलन्स होईल.

In reply to by सुनील

>>ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच! ह्या बद्दल जास्त काही माहित नाही, माहिती दिल्यास आभारी राहील. मला केवळ 'आपली लोकसंख्या नियंत्रित ठेवावी' एवढेच म्हणायचे होते.

In reply to by नितिन थत्ते

आणि सोनिया गांधींवर खालच्या पातळीवर जाऊन आचरट आरोप केले आहेत.

In reply to by नितिन थत्ते

आहे त्यांनाच पुरेस अन्न, वस्त्र, निवारा नाही, अजून खाणारी तोंडे आणून काय करायचं. :-( 'हम दो, हमारा एक' हेच यशस्वी भारताचे सूत्र होईल.

महाराष्ट्रालाही एका नरेंद्र मोदींची गरज आहे.. काँग्रेसेतर पक्षातच नरेंद्र मोदी तयार होऊ शकतो, पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय हे कोंग्रेसवाले आंघोळही करीत नाहीत, हे काय महाराष्ट्राला तारणार ?