विड्या एक फुंकणे
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या)
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..!
पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो विड्या ...... आमचा जीव की प्राण . त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा विचार करायला तरी वेळ कुठे असायचा ? आधीच सहामाही परीक्षा दसर्याच्या वगैरे सुट्यांमुळे खूप लांबायची. त्यामुळे, परीक्षा संपायच्या आधीच विड्या फुंकण्याची तयारी सुरू व्हायची. जागा, कोण कोण येणार, कोण कधी गावाला जाणार आहे याची चर्चा व्हायची. आणि मग शेवटचा पेपर देऊन झाला की, हुर्रे! मग फक्त आम्ही पोरं आणि विड्या-काड्या!
पेपर झाला ,की दप्तर टाकायचे आणि बाहेर पळायचे, सगळे वाट पाहत असायचेच. मग काय, मिशन विड्या आणि काड्या! मिळेल तिथून मिळेल तसली थोटकं आणायची, मोठी, छोटी, गुलाबी धाग्याची, जळलेली, विझलेली, सगळी. मग ती विडी पेटवता येईल का, याचा विचार पण करायचा नाही. खोबणीत अडकलेली विडी काढता येत नसेल तर, ''ये, इकडे या रे बाकीचे ..'' म्हणून बाकीच्यांना हाक मारायची. मग समुद्रमंथनातून रत्नं काढल्यासारखे आम्ही चार पाच स्वघोषित देव दानव ती विडी करकटकाचा वासुकी करून बाहेर काढायचो. अर्थात यात एक दोघांना खरचटायचं वगैरे. पण कोणाला कुठे लागलंय याच भानच नसायचं! उलट स्वातंत्र्यसैनिकासारख्या त्या खुणा आम्ही सार्या ग्रुपभर दाखवीत फिरायचो. पण याहून बोंब व्हायची ती जागा ठरविताना. चांगल्या जागेवर नजर असायचीच, पण आम्हा सगळ्या दोस्तांची एक आमसभा व्हायची. आणि त्यात दोन तीन जागांवर अणुकरारावर झाली तशी चर्चा व्हायची. ''अरे त्या जोशीकाकूंच्या बाजूच्या खोपटात नको तिथून धूर बाहेर येताना दिसतो.आपली सगळी मेहनत वाया जाईल.'' ''अरे, ते पवारासमोर नको रे, खाली राख पडलेली दिसली तर कॉलनी डोक्यावर घेतील ते.'' शेवटी सगळयांनुमते जागा ठरायची आणि आम्ही तिथे ही रत्नं आणून लपवून ठेवायचो. पुरेशा विड्या झाल्या वाटले की, थांबायचे.
मग आता पुढची पायरी काड्यापेट्या आणणे, त्या जवळ कुठे मिळायच्या नाही. घरची पळवलेली आईच्या लक्षात आली की बाप रे बाप! मग चलो पानाची गादी! मिळतील त्या सबबी सांगून पानाच्या गादीवर जायचे. आणि एक एक करत खंडीभर काड्या पळवून आणायच्या, त्या आल्या की थांबणे नाही ,त्याच गंधकाच्या वासाच्या हाताने गँग कामाला लागायची ती विड्या पेटवायला ..
इथं सगळं दंगा व्हायचा, कोंडाळं करून, थोटकं हातात घेऊन ''अरे, मोठं थोटुक आधी पेटव रे'' ''ही काडी पेटव'', ''अरे ठसका लागू देऊ नको रे.'' हजार सूचना, कोणाच्या पायावर ठिणगी पडते, खोपटातला एखादा कागद जळतो आणि साधारणता; एक तास, दोन तासाने विड्या ओढून व्हायच्या. मग राहिलेल्या खजिन्यावर गोणपाट टाकायचा. एखादं दुसर्याने एखाद्या वाण्याकडून तो आणलेला असतोच. हा, आता सगळे एका मजेशीर कामात बुडलेले असतात. एक्स्ट्रास्ट्रांगच्या गोळ्या वाटणे, एक गोळ्यांच पाकीट मिळालं की, साधारणता: दहा मिनिटात सगळ्यांच्या जिभा आपसूक लाल झालेल्या असतात, ''अभ्यास करा'' सारखे जिभा लाल करा असे इथे सांगायला लागत नाही, वास घालवण्यासाठी ते करावं लागतं हे आपसुकच ठाऊक असतं. विड्या लपवलेला खड्डा चिखल लावून सपाट बिपाट केला जातो. थोटकं बुजविली जातात. मग काय, थोडं सेंट शिंपडलं की, खोपट पुन्हा रेडी! एकदम फिट!
पण हे विड्या पुराण इथेच थांबत नाही. यानंतर गँग बाहेर पडते ते पानं आणायला. चुना लावायचा, तंबाखु घालायची मग कोणत्या तरी शेजारच्या बिल्डिंगमधल्यांशी पिंक टाकण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला असतो त्यांची वाट पाहायची. बहुतेकदा ते येत नाहीतच. पण पाळीपाळीने सगळ्या खोपटापाशी थांबलेले असतात,आत्ता येतील ,मग येतीत म्हणून.. या सगळ्यात दिवाळी कशी संपली कळतंच नाही.
या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या, घडतात. जेवणखाणं तर आपण विसरलेलो असतोच. मग, घरातून आईचा ओरडा ''अरे, काही खाणार आहेस की नाही, का रात्रीच घरी येणार आहेस?'' मग रंगलेलं तोंड घेऊन घरी आल्यावर बाबाचा ओरडा ठरलेला. पोरापोरामध्ये भांडणे ठरलेली. कोणतरी रुसत, त्याला शांत करायचे. आणि जय संभाजी छाप म्हणत दिवाळी घालवायची. शेवटच्या दिवशी सगळी उरलेली थोटकं सुतळी बाँबमध्ये भरून पेटवला तर ढूम्म! स्वतः:च विड्यांची शकलं आसमंतात उधळायची.
पण तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय? आम्ही पण असंच करायचो.आता सगळ आठवतय ते आम्हाला , बरोबर आहे, कारण तीच आपली परंपरा आहे. पण आजकाल परिस्थिती बदलत आहे. सगळी पोरं ''मार्लबोरो, गुदांगरम'' सिगरेटी वापरत आहेत आणि यांच्यापुढे विड्या मागे पडत चालल्या आहेत. आणि काही पालक देखाल मुलांना वेगवेगळ्या बंधनांत अडकवून ठेवत आहे आणि हा आनंद हिरावत आहेत .. त्यामुळेच सगळे तज्ञ ,लेखक ओरडून सांगत आहेत, असं करु नका म्हणुन .. नेहमी सांगतात, पण तसा फारसा फरक पडत नाही.च महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असं सांगावं का लागतं? आपणच आपल्या मुलांना यापासून का परावृत्त करतो? काही पालकांना एवढी काळजी, की विडीने तुला त्रास होईल म्हणून साखरेच्या सिगारेटी देणार, मग म्हणणार ओढ. हे काय नविनच?
आजकाल मुलांचा आयक्यू चेक करतात. तो कमी आल्यावर चिडतात. मला एक सांगा, कसा वाढेल आयक्यू? विड्या फुंकण्यासारख्या उपक्रमामुळे जी मुलांची वाढ होते ती इतरवेळी होतच नाही. नकळतपणे मुले हुशार होतात, हरहुन्नरी होतात, एकत्र काम करायला शिकतात. अचानक आलेल्या संकटांना तोंड द्यायला शिकतात हे शिक्षण इतर कुठे मिळते बरे? निदान मी तरी शिकलेलो .. आपण त्यांना मदत केली , बंधन घातले तर तेच या शिक्षणाला मुकतात, त्यामुळे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन विड्या ओढू देणं हेच चांगलं!
त्यांचे काय झालंय, असतंय तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. या म्हणीप्रमाणे आपण आपल्या मराठी परंपरांना विसरलोय. पारंपरिक गोष्टी सोडायच्या ..आणि नव्या गोष्टींनी आयक्यू वाढत नाही म्हणून ओरडायचं! लेख लिहायचे! मग असे प्रश्न आमच्या इंग्लिशच्या पुस्तकात येत आहेत. वाईट वाटत ते आपल्या करंटेपणाचं! सगळं असताना मॉडर्न व्हायच्या नादात आपण हे घालवतोय. आणि, संस्कृती मरतेय म्हणून गप्पा मारतोय, असो, सगळेच तसे आहेत असे मुळीच नाही ,पण आपण त्यात जाऊ नये एवढी काळजी घेउया ना ?काय म्हणता ? आणि ते सगळं राहु दे , आपली संस्कृती जपण्यासाठी म्हणून नव्हे, तर या स्पर्धेच्या जगात तुम्हाला तुमच्या पोराचा आयक्यू, इक्यू वाढवायचा आहे, म्हणून तरी, त्याला विड्या फुंकू दे, तुम्ही खूश आणि तो ही! बस्स, या दिवाळीला एवढंच सांगणं!
सर्व मिपाकराना दिवाळीच्या (उशीरा का होईना) खुप खुप शुभेच्छा व ही भेट !!!! गेल्या डिसेंबर महिन्यात लिहिलेला हा अप्रकाशित लेख परवा सहज सापडला , तो आधीच उशीर झाल्याने इथे तसाच देत आहे . त्यामुळे वाक्यरचनेतल्या चुका, नसलेल्या म्हणी, काळाचे गोंधळ, स्वल्पविरामाच्या अथवा पूर्णविरामाच्या अलिकडे पलिकडे स्पेस ठेवण्याची विविधता, आणि सर्वसाधारण अशुद्धलेखन वगैरे गोष्टी बदलण्याच्या भानगडीत पडलेलो नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम
(विषय दिलेला नाही)
उत्स्फुर्त अन ओढुन ताणुन
अपर्णाताईंशी सहमत. फालतू
:)
प्रिय राजेश 'काका' सुंदर
:-)
छान लेख
छान लेखन, लहानपण च्या स्मृती जाग्या झाल्या
आम्ही बरिच वर्षं बीड्या
फालतू
+१
धन्यवाद
प्रामाणिक आणि उत्कृष्ट
मिपावर विडंबन हा overused
काहीही लिहिलय.
टारूभाऊंच्या जालनिर्वाणानंतर
एका चांगल्या, मनापासून
विडंबन छान पण .... काहीही ब्रांड निवडले आहेत.
हे विडंबन वाचून एकदम ४-५
गुर्जी जमलं नाही एवढेच
hit wicket
मी मिपाचा सभासद
कृपया
व्यक्तिगत
या प्रतिक्रियेचा आणि सदरचा
निरनिराळे अर्थ
जबरद! मुक्तसुनीत यांची
श्री इंटरनेट्स्नेही, नुस्ते
शऽशशऽशशऽशशऽशशऽश!!
आपले मा. संपादक मुक्तसुनीत
बरेचसे प्रतिसाद वाचले .. हे
रोचक
विड्या आवडल्या.
नीट जमवलेला नाही :-(
काही खुलासे
वैचारिक भाबडेपणा
निषेध
आम्हाला ज्ञानेश्वरांची आठवण
आम्हाला
श्री. पाचलग यांची भडभडून
ते फक्त पुण्यातच
हेच म्हणतो
एक पक्षी जो झाडावर गाणे गातो , त्या गाण्यात आहे एक झाड , ज्या झा
अरारा
मेलो वारलो खपलो
क्षमस्व
क्षमस्व
पिक समवन युवर ओन साईझ!
बदडा