हा विषय माझ्या डोक्यात बरेच दिवस होता फक्त लिहायचे रहात होते... महाराष्ट्रातील आत्ताचा मुख्यमंत्रीबदल हे तात्कालीक कारण आहे.
आपण नागरीकशास्त्रात शिकतो की सज्ञान नागरीकाला मतदानाचा हक्क असतो. तो हक्क बजावत कायद्याने सज्ञान असलेली तमाम जनता मतदान करते. मग बहुमतवाला पक्ष राज्य करण्यासाठी हक्क सांगतो. तो हक्क, राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती, राज्यपातळीवर राज्यपाल आणि स्थानिक पातळीवर (मला नक्की माहीत नाही पण) कदाचीत भारतीय नागरी सेवेतील अधिकारी अर्थात आयएएस अधिकारी जो राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली काम करतो, अशांच्या समोर बजावला जातो. अथवा घटनेने दिलेल्या अधिकारात ही विशिष्ठ पदे, बहुमतवाल्या पक्षास सत्तासंपादनासाठी पाचारण करतात. त्यातील नेतृत्व हे पक्षातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी ठरवतात. थोडक्यात जरी एखादा पक्ष निवडून आला असला तरी लोकप्रतिनिधी हे ज्या जनतेने निवडून दिलेले आहेत त्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून एकत्रीत निर्णय घेतात. किमान तशी अपेक्षा आहे.
आता आपण वर उल्लेखलेले तात्कालीक कारण पाहूया. त्यात काय दिसते? तर आधी अशोक चव्हाण हे राजीनामा राज्यपालांकडे देण्याऐवजी पक्षश्रेष्ठींकडे देतात. मग पक्षश्रेष्ठी मान्य करतात मग तो राज्यपालांकडे जातो आणि मग राजीनामा दिला हे अधिकृत होते. नंतर सर्व निर्वाचीत लोकप्रतिनिधी सभा घेतात आणि सर्वाधिकार हे पक्षश्रेष्ठींना देतात. मग पक्षश्रेष्ठी नेतृत्व ठरवते आणि अधिकृतपणे जाहीर करते.
पुर्वी किमान लुटूपुटीच्या बैठका येत त्याला पक्षश्रेष्ठी निरीक्षक म्हणून येत आणि मग त्यांच्या निरीक्षणाखाली नेता निवड लोकप्रतिनिधी करत. पण आता जे घडते आहे, त्यात वास्तवीक पक्षश्रेष्ठी हे जनतेचे प्रतिनिधी नाहीत आणि त्या अर्थाने घटनेने त्यांना हक्कही दिलेला नाही. मग अशी कृती जाहीरपणे घटनाबाह्य ठरते का? ठरत असल्यास त्याला लोकमान्यता आणि माध्यममान्यता देत असताना आपण देखील कळून अथवा अज्ञानाने घटनेचे महत्व कमी तर करत नाही ना? जर जाहीरपने घटनाबाह्य कृती असेल तर आपले चळवळे सामाजीक नेते या विरुद्ध काही का बोलत नाहीत? का "चलता है" असे वाटते आणि त्यापेक्षा अधिक गंभिर प्रश्न महत्वाचे वाटतात? तेच राष्ट्रपती/राज्यपाल/अधिकारी यांच्यासंदर्भात म्हणता येईल असे वाटते...
सुरवातीस म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्रीबदल हे तात्कालीक कारण आहे पण हा मुद्दा केवळ एकाच पक्षाविषयी नसून आपण घटनेचे पालन करतो का नाही हे समजून घेण्यासाठीचा आहे. तेंव्हा येथे चर्चा ही पक्षीय राजकारणापेक्षा भारतीय घटना आणि त्यात असलेले नेतृत्व निवडीचे नियम या संदर्भात आहे... आपली मते समजून घेयला आवडतील, तसेच जर काही मुद्दे मांडताना घटने संदर्भात मी चुकीचे विश्लेषण केले असले तर तसे देखील अवश्य सांगावे. जर मुद्दे बरोबर असले तर सरळ घटनाच बदलून असे वागणे अधिकृतच का करू नये ह्यावरही टिपण्णी ऐकायला आवडेल...
वाचने
9263
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
निवडणूक आणि प्रत्यक्ष राजकारणातील फरक
तुम्ही सांगितलेली घटना हा
घटनाबाह्य नाही
कळलं नाही...
बरोबर आहे तुमच. पण आदर्श
In reply to कळलं नाही... by राजेश घासकडवी
राजेशशी सहमत आहे ! एक
In reply to कळलं नाही... by राजेश घासकडवी
+१
In reply to राजेशशी सहमत आहे ! एक by शाहरुख
घटनाबाह्य म्हणले कारण
In reply to कळलं नाही... by राजेश घासकडवी
सहमत
घटनाबाह्य काही नसावे असे वाटते
धन्यवाद
In reply to घटनाबाह्य काही नसावे असे वाटते by बेसनलाडू
नेता निवड
नितीन, राजेश घासकडवी
In reply to नेता निवड by नितिन थत्ते
कसबी
कारण
In reply to कसबी by तिमा
लोकशाही लोकांची की ................