Skip to main content

मला पडणारे काही प्रश्न

लेखक एमी यांनी बुधवार, 29/09/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का? काही उदाहरणे
  1. मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो. मी ऐकलेल्या काही प्रतिक्रिया "मुलीने घर तोडल", "मुलगा म्हातारया आई वडिला ना सोडुन गेला बायकोच्या मागे, आता ते बिचारे एकटेच राहतात", "या वयात किती हाल बिचारयांचे" हेच विचार मुलीच्या आई वडिला ना लागू होत नाहीत का?
  2. मुलगा म्हातारया आई वडिला सोबत रहतो तर तो कर्तव्यदक्ष, पण मुलगी तिच्या आई वडिला कडे लक्ष देत असेल तर "तीला अजुनही माहेरचेच कौतुक आता सासरी लक्ष द्यावे की थोडे"
  3. सासू-सासरे, मुलगा-सुन ला काहि सल्ला दिला तर "ते आपल्या अनुभवाचे फायदे देतात/ त्या घरातले संस्कार्/रुढी सांगतात." पण तेच मुली च्या आई वडिलानी काही सांगितले तर "ते यांच्या संसारात लुडबुड करतात"
  4. वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
  5. मुलगा जन्माला आला म्हणजे "चला आता तुमच्या म्हातारपणा ची काठी झाली". मुल future investment म्हणुन जन्माला घालता का? की तुम्हाला पालकत्वा चा आनंद घ्यायचा आहे म्हणुन?
  6. लग्न केवळ एक परंपरा आहे म्हणुन चेकलिस्ट बनवून मुलगा/मुलगी शोधावी का? कि तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्हाला त्या माणसा सोबत आयुष्य घालवायला आवडेल म्हणून?
  7. housewife = free of cost (maid+prostitute+surrogate mother)?
  8. मुली financially independant झाल्याने आजकाल प्रोब्लेम्स खुप वाढले? की आता पर्यन्त मुली ना समाज फुकट राबवून घेत होता?
  9. जावई मुलिला घरकामात मदत करतो तर तो चांगला. पण मुलाने सुनेला मदत केली तर तो "बायकोचा गुलाम्/हातातले बाहुले"?
  10. मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?
  11. मुलगा खाण्यापिण्या चा षौकिन. पण बनवून देणार बायकोच?

वाचने 14780
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

पाहुणे, तुम्ही टाइम ट्रॅवल करून २०१०-११ मध्ये आलात तर यातील अनेक प्रश्न सुटलेले दिसतील. सुटलेले प्रश्न बाजूला टाकून मग नवीन प्रश्न घालून ही यादी अपडेट करता येईल. मग त्यावर चर्चा करता येईल. (सुधारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

छ्या! बेलाजींनी आमचं गुपित फोडलं! चांगली गरमागरम चर्चा झडली असती..... ती बघून झाडावर बसलेल्या आमच्यासारख्यांची करमणूक झाली असती.... फांद्या मोडून चार दोन जण जमिनीवर घसरले असते....

In reply to by रेवती

सध्याच्या यादीतील पाहुण्यांचे काही प्रश्न टाइम ट्रॅवल ने सुटले की मीच नवीन काही प्रश्न सुचवून यादीची सुधारीत आवृत्ती देतो. म्हणजे तर मग झाडावर चढायची शर्यतच लागेल ;) (वृक्षवल्लीप्रेमी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

त्यांचे प्रश्न सुटो वा न सुटो , तुम्ही सुधारीत यादी द्याच ही विनंती.

In reply to by बेसनलाडू

हे टाइम ट्रॅवल कसे करतात हो? किती तिकिट असेल ? मला माझ्या काही 'विशिष्ट' नातेवाईकांना पाठवायचे आहे ! त्याना जुना काळ वापरुन वापरुन 'ऑर्थोडोक्सोसिस' हा विकार झाला आहे.

हे प्रश्न मध्ययुगीन वाटतात, प्रतिसाद म्हणजे खरडवही वाटते.

सगळेच प्रश्न विचार करण्यासारखे आहेत पाहुणेताई. त्यातही:
वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
हा प्रश्न मला विशेष आवडला. "आपल्या" भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलगा लग्न करून संसाराला लागला की पालकांनी वानप्रस्थाश्रमात जायचे असते. म्हणजे इतके वर्ष घरच्या जबाबदारीमुळे स्वतःच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करता आल्या नसतील त्याकडे लक्ष देणे, घरातील प्रत्येक गोष्टीत स्वतःचे नाक न खुपसता विचारल्यासच सल्ला देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. पण अनेकदा आपली इतक्या वर्षांपासूनची सत्ता जाईल या भितीने असे पालक मुलाचे लग्न झाले की अजूनच स्वतःचाच हेका लावतात. एकदा मुलाचे लग्न झाल्यानंतर तो मुलगा आणि घरचे स्वयंपाकघर या दोन्हींवर त्या मुलाच्या नव्या बायकोचाही हक्क असतो ही गोष्ट आया जितक्या लवकर समजतील तितके चांगले. महिन्याचा पगार झाल्यानंतर तो माझ्या हातात द्यायला हवा ही पालकांची अपेक्षा असणे हा प्रकार फार जुना नाही (ही अपेक्षा माझ्याबद्दलही होती. पण आता सॅलरी अकाऊंटमध्ये पगार डायरेक्ट जमा होतो त्यामुळे हा प्रकार करता यायची शक्यता कमी झाली आहे) . म्हणजे काय की आपल्याला सोयीस्कर असेल तिथे भारतीय संस्कृतीचा उदो-उदो करायचा आणि अंगाशी आले की वानप्रस्थाश्रमासारख्या कल्पनांना पायदळी तुडवायचे आणि "आम्ही तुझ्या हितासाठी सांगत आहोत" चे प्रोटेक्शन कायम आहेच!! वानप्रस्थाश्रम सोयीस्करपणे का विसरला जातो हा प्रश्न मलाही अनेकदा पडतो.

हम्म... प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहेत... भारतात लग्न सुरत, सीरत, दौलत, ताकत (power/position) पाहुन केले जाते. सेक्स, मुलं, आईवडीलांची सेवा, घरकाम इ उद्देश त्यामागे असतात. आणि पैसा, शारिरिक, मानसिक, सामाजिक गरज म्हणुन टिकवले जाते. बिझनेस डिल प्रमाणेच असते ते पण उगाच परंपरा संस्कृती असा मुलामा चढवला जातो. सध्यातरी त्यातल्यात्यात फक्त TomKat marriage contract रोचक वाटतेय. करुणा गोखलेँचा एक लेख सापडला http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=59… बाकी मुलगा/मुलगी कोणालाही future investment समजु नयेच आणि त्यांनीही पालकांकडुन मालमत्ता मिळण्याची अपेक्षा ठेउ नये...