Skip to main content

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी रविवार, 08/08/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
शाकाहारी विरुद्ध मांसाहारी शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद पेटला तेव्हा त्यातून उपवाद निर्माण झाला तो शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ असा. आणि उप उपवाद निर्माण असा झालाय कि माणूस निसर्गत: शाकाहारी की मांसाहारी असा. माणूस निसर्गत: शाकाहारीच आहे, मानवाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या काळात तो द्विपाद व वानरसदृश असताना झाडावर राहणारा व मुख्यत: झाडांची पाने व फळे खाणारा होता. माझ्या मते भूतदयेचा संबंध मांसाहाराशी जोडणे चुकीचे ठरेल ; सोवळं पाळण्यासाठी माणसांचा द्वेष करून पशुपक्ष्यांवर प्रेम दाखविणाऱ्या शाकाहारींपेक्षा , सर्वांशी मिळून-मिसळून वागून पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींची ' भूतदया ' च अधिक श्रेयस्कर ठरेल. माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल. हे विधान कुठल्या हि एका संप्रदायाला अनुसरून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या योग्य व सिद्ध आहे. प्राचीन काळात चातुर्वर्णाप्रमाणे समाजाची रचना होती. आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वेगळा जातीयवाद निर्माण होऊ पाहतोय. मांसाहार ठीक आहे पण त्याचे अधिक सेवन फायदेशीर नाही. शारीरिक व मानसिक दृष्ट्या हि.... just take a look through- No deficiencies. There is no nutrient necessary for optimal human functioning which cannot be obtained from plant food. High fat plus cholesterol. Animal foods are higher in fat than most plant foods, particularly saturated fats. Plants do not contain cholesterol. "Carb" deficient. Meat is deficient in carbohydrates, particularly the starches which are so essential to proper health. Vitamin deficient. Except for the b-complex, meat is largely deficient in vitamins. Agricultural Chemicals. Being higher on the food chain, animal foods contain far higher concentrations of agricultural chemicals than plant foods, including pesticides, herbicides, etc. Disease Inducing. The correlation between meat consumption and a wide range of degenerative diseases is well founded and includes..... Osteoporosis Kidney Stones and Gallstones Diabetes Multiple Sclerosis Arthritis Gum disease Acne. Aggravated by animal food. Obesity. Studies confirm that vegetarians tend to be thinner than meat eaters. Obesity is considered by doctors to be a disease within itself. Intestinal Toxemia. The condition of the intestinal flora is critical to overall health. Animal products putrefy the colon. Transit time. Wholesome food travels quickly through the "G.I" tract, leaving little time to spoil and incite disease within the body. Fiber deficient. Fiber absorbs unwanted, excess fats; cleans the intestines; provides bulk and aids in peristalsis. Plant food is high in fiber content; meat, poultry and dairy products have none. Body wastes. Food from animals contain their waste, including adrenaline, uric and lactic acid, etc., Before adding ketchup, the biggest contributors to the "flavor profile" of a hamburger are the leftover blood and urine.

वाचने 24642
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं भांडण आहे का शाकाहार विरूद्ध मांसाहार अशी चर्चा हवी आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या दोहोंमध्ये (म्हणजे या दोन प्रकारच्या चर्चांमध्ये. शाकाहार आणि मांसाहार किंवा शाकाहारी आणि मांसाहारी यांच्यात नव्हे. ते वेगळ्या चर्चांचे विषय होऊ शकतील. ही आणखी एक काडी किंवा अग्निशामक यांपैकी काहीही मानण्यास माझी हरकत नाही.) नेमका काय फरक आहे, ते कृपया समजावून सांगू शकाल काय?

In reply to by पंगा

शाकाहारी आणि मांसाहारी हे माणूस आणि इतर प्राण्यांचं विशेषण असतं; शाकाहार आणि मांसाहार हे आहाराचं! चर्चा आहार चांगला याबद्दल करायची आहे का कोणत्या प्रकारची माणसं अथवा प्राणी चांगले यावर? चांगला/ले या शब्दांचे अर्थ श्रेयस्कर, सोयीचे, इ.इ. लावण्यास हरकत नाही. आता (निष्कारण) माझं वरातीमागून घोडं: शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या माणसांशी माझी चांगली मैत्री आहे. चांगली (आणि वाईटही) माणसं दोन्ही (शाकाहारी आणि मांसाहारी) प्रकारची असू शकतात. क्लिशे उदाहरण म्हणजे अ‍ॅडॉल्फ हिटलर शाकाहारी होता, आणि बर्ट्रांड रसल मांसाहारी! मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी आहे. वयाच्या १६-१७व्या वर्षी कोंबडी, मासे खाऊन पाहिले, आवडले नाहीत, माझ्यासाठी हा प्रयोग शिक्षणापुरताच मर्यादित राहिला. लहानपणापासून अंडं खाल्ल्यामुळे ते मात्र चालतं. अगदीच काही मिळालं नाही तेव्हा बीफबर्गर, बेकन सँडविच, इ. खाऊन क्षुधाशांती करून झालेली आहे. उपाशी मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं .. अर्थात बीफ, पोर्क आणि सॅल्मन खाऊन मी मेले नाही हा आणखी एक (वादाचा!) मुद्दा! माझ्या लेखी सध्याच्या जगात शाकाहार उत्तम, कारण समान ऊर्जा मिळण्यासाठी शाकाहारी जिन्नस उगवण्यासाठी कमी पाणी (+जमीन+काळ) पुरतात. अर्थात मांसाहारापेक्षा शाकाहार पाणी, जमीन आणि वेळ या बाबतीत जास्त एफिशियण्ट (मराठी शब्द?) आहे. एका दिवसांत सगळे मांसाहारी शाकाहाराकडे वळले तर तात्पुरता प्रश्न उद्भवू शकेल पण कालांतराने बरेच मांसाहारी शाकाहाराकडे वळले तर अन्नासाठी लागणारा पाणी हा मौल्यवान घटक वाचेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या लेखी सध्याच्या जगात शाकाहार उत्तम, कारण समान ऊर्जा मिळण्यासाठी शाकाहारी जिन्नस उगवण्यासाठी कमी पाणी (+जमीन+काळ) पुरतात.
हा शाकाहार जगासाठी चांगला की तो स्वीकारणाऱ्यांसाठी? 'चांगला'ची व्याख्या इथे अन्नधान्याचा तुटवडा टाळण्यासाठी चांगला, एफिशियंट, कमी संसाधनं वापरणारा अशी वाटते. हा युक्तीवाद वरवर बरोबर वाटला तरी तो एकांगी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जेवण (इथे जेवण हे रूपक म्हणून वापरतो आहे, आहारविषयक चर्चा म्हणून नाही) तयार करताना प्रत्येक किलो गव्हाला जितका खर्च येतो त्यापेक्षा किती तरी अधिक खर्च प्रत्येक किलो तुपाला येतो. म्हणून पोळीला थोडंसं तूप लावून खाण्यापेक्षा त्या सर्व पैशाचं गव्हाचं पीठ घेऊन, फारतर मीठ घालून पोळी करून खावी. त्याबरोबर भाज्या मसाले न घालता नुसत्या उकडून घ्याव्यात... वगैरे वगैरे. सांगायचा मुद्दा असा की एक चलन (व्हेरिएबल) ऑप्टिमाइज करणाऱ्या योजना, या कठोर, कर्मठ वाटतात. आहाराचा विचार करताना सध्या अस्तित्वात असलेल्या संसाधनांचा वापर करून किती लोकांचं पोट भरता येईल असा एकच प्रश्न नसतो. पोट भरण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवणं, खाल्ल्याचं समाधान मिळवणं, जेवण मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर घेऊन त्यातून आनंद मिळवणं, नवनवीन कृती करून त्या कलेचा विकास करणं... या सगळ्यांचा विचार केला तर मांसाहार अनिवार्य ठरतो. त्यापोटीच अधिक संसाधनं वापरणारं व त्यामुळे अधिक किंमत असलेलं मांस विकत घेऊन खाणारे लोक आहेत. जर प्रत्येकानेच फक्त पोट भरायचा विचार केला असता तर ही जास्तीची किंमत कोणी दिली नसती.

In reply to by राजेश घासकडवी

पोट भरण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवणं, खाल्ल्याचं समाधान मिळवणं, जेवण मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर घेऊन त्यातून आनंद मिळवणं, नवनवीन कृती करून त्या कलेचा विकास करणं... या सगळ्यांचा विचार केला तर मांसाहार अनिवार्य ठरतो.
अनिवार्य नेमका कोणासाठी? जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा मांसाहाराची गरज नसणारे असू शकतात. मला ष्टेक, सॉसेज आणि सुशी भले आवडत असतील. आणखी कोणाला गोगलगायी आवडत असतील. (एस्कार्गो हा प्रकार चवीला अतिशय रुचकर लागू शकतो. खिशाला अतिशय जडही लागू शकतो ही गोष्ट वेगळी.) तिसर्‍याला बेडकाची तंगडी आवडत असतील. पण म्हणून हे पदार्थ अनिवार्य म्हणता येतील काय? उद्या मला ष्टेक, सॉसेज, सुशी किंवा एस्कार्गो जर मिळालेच नाहीत - किंवा जर हे पदार्थ मी कधी खाल्लेलेच नसतील - तर माझे अडू नक्कीच काही नये. (बेडकाची तंगडी मला प्रयोगाअंती आवडलेली नसल्याने त्यांचा मी विचार करत नाही.) जिभेचे चोचले पुरवायला मला इतर हजारो गोष्टी मिळू शकतात. अमेरिकेत अण्णा बेडेकराची मिसळ आणि पुण्यात चांगली सुशी, इटालियन किंवा मेक्सिकन पद्धतीचे जेवण न मिळाल्याने मला हळहळावेसे वाटत नाही. कारण अमेरिकेत काय किंवा पुण्यात काय, मला माझ्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर अनेक चांगले आणि स्थानिकरीत्या उपलब्ध पर्याय मिळू शकतात. (अवांतरः सुशीचे माहीत नाही, पण पुण्यामुंबईत इटालियन किंवा मेक्सिकनच्या नावाखाली खपवलेले काहीतरी मिळू शकते असे वाटते. एकदा मी पुण्यात भरमसाट नूडल्स घातलेले मिनेस्ट्रोनी सूप आणि पार्ल्यात पनीर घातलेली काहीतरी तथाकथित मेक्सिकन डिश खाल्लेली आहे. उलटपक्षी अटलांटातील एका बांग्लादेशी लोकांनी चालवलेल्या तथाकथित भारतीय रेष्टॉरंटात पनीर टिक्का मसाल्याच्या नावाखाली जे काही खाल्लेले आहे, तेच जर मला त्याने साबूदाण्याची खिचडी किंवा पुरणपोळी म्हणून खपवले असते, तरीही चालले असते. मुंबईला मात्र खारच्या बाजूला एकदा एक थाई रेष्टारंट बरे सापडले होते. अकरा वर्षांपूर्वी. असो.) एखाद्या एस्किमोला जर पुरणपोळी खाऊ घातली, तर त्याला ती आवडेलच, असे नाही. चुकून आवडलीच, तर एखादे दिवशी न मिळाल्याने त्याला कसेनुसे होईल, असेही वाटत नाही. त्याच्याकरिता ती अनिवार्य होणार नाही. उलटपक्षी तो जे काही खातो ते तुम्हाआम्हाला जरी आवडले, तरी अनिवार्य होईलच, असे सांगता येणार नाही. (आणखी एक अवांतरः एक जुना अनुभव आहे. फारा वर्षांपूर्वी पुण्यात आमचा एक जपानी भाषा शिकू पाहणार्‍यांचा - किंवा जपानी भाषा शिकण्याच्या नावाखाली टवाळक्या करू पाहणार्‍यांचा - एक ग्रूप होता. सर्वांनी एका रविवारी सिंहगडावर जायचे ठरवले. नेमक्या त्याच वेळी जपानी विद्यार्थिनींचा एक ग्रूप पुण्यात आलेला असल्याची कोणालातरी खबर लागली. काहीतरी करून त्यांनाही सामील करून घेतले. वरती चढून गेल्यावर जेवायचा प्लान वगैरे. जेवणाचा प्लान कोणी आणि कसा आणि काय ठरवला होता ते आता आठवत नाही, पण त्यात एकाच वेळी श्रीखंडपुरी आणि ब्रेड या दोन्ही चिजा होत्या असे आठवते. बहुधा ब्रेडबरोबर काही भाजी, कोंबडी वगैरे असावे. या सगळ्या जपानी पोरींनी ते श्रीखंड ब्रेडच्या स्लाईसला फासून सँडविचसारखे खाल्ले. अर्थातच एकीलाही ते आवडले नाही. असो.) शिवाय, माणसाच्या चवी, आवडीनिवडी कालपरत्वे किंवा परिस्थितीनुसार बदलू शकतात, हा आणखी एक मुद्दा आहेच. तर सांगण्याचा मुद्दा, जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा कोणतीही एक गोष्ट पूर्णपणे अनिवार्य आहेच, असे वाटत नाही. जगात खाण्याच्या लायकीच्या इतक्या गोष्टी आहेत, की त्यातली एखादी जरी अनुपलब्ध झाली, तरी हजारो इतर सापडतील. जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा. जे जे काही उपलब्ध आहे त्याच्याशी प्रयोग करून पाहण्याची - आणि त्यात मजा करण्याची - तयारी मात्र पाहिजे. किंवा थोडक्यात, मजा करण्याची तयारी पाहिजे. मग काहीही चालते. मग कशानेही जिभेचे चोचले पुरवता येतात. अर्थात, बिघडत नाही म्हणून कोणताही एक पर्याय जाणूनबुजून अनुपलब्ध करावा असे माझे म्हणणे नाही. केवळ, जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा सगळे पर्याय अनिवार्य आहेतच, असे वाटत नाही, एवढेच मांडण्याचा उद्देश. (किंबहुना, समोर मांडून आलेल्या बफेमध्ये नको तितके अधिक पर्याय आले तरी जमणार नाही असे वाटते.)

In reply to by पंगा

अनिवार्य नेमका कोणासाठी? जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा मांसाहाराची गरज नसणारे असू शकतात.
व्यक्तिगत दृष्टीकोनातून काय अनिवार्य व काय निवार्य या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? मुळात अदितीचा युक्तीवाद होता तो समाजाच्या गरजांविषयी. त्यात तिनेही मांसाहार वर्ज्य केल्यावर प्रत्येकाने हुबेहुब सारखंच खाल्लं पाहिजे असं म्हटलं नसावं. मनुष्यसमाजाची अन्नाची (विशिष्ट क्यालऱ्या मिळवण्याची) जशी भूक आहे तशीच जिभेला आवडेल असं खाण्याची भूक आहे, खाण्याचा उपयोग आनंद घेण्यासाठी वापरण्याचीही भूक आहे. यातली एकच भूक (क्यालऱ्यांची) भागवायची असेल तर शाकाहार जास्त एफिशियंट, याबद्दल वाद नाही. मात्र इतर भुका भागवायच्या असतील तर मांसाहार अनिवार्य होतो असा माझा युक्तीवाद आहे.
की त्यातली एखादी जरी अनुपलब्ध झाली, तरी हजारो इतर सापडतील.
मांसाहार ही कोबी किंवा घेवडा यांसारखी 'एक वस्तू' नाही. जगभरच्या खाद्यसंस्कृतींचं ते अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. ते टाकून देण्यासाठी जितके कष्ट होतील, त्यापेक्षा कमी कष्टात सर्व लोकांना पुरेल इतकं मुबलक अन्न पिकवणं सहज शक्य आहे. (सध्या किती कमतरता आहे, सहा अब्जांपैकी किती लोक भूकबळी पडतात याचा विचार करा...)
एस्किमोला जर पुरणपोळी खाऊ घातली, तर त्याला ती आवडेलच, असे नाही.
या उदाहरणामागचं प्रयोजन कळलं नाही. मुळात त्याला ज्याबद्दल आसक्ती नाही असं अन्न द्यायचं, मग ते अनिवार्य होणार नाही हे सिद्ध करायचं...एस्किमोने मांस खायचं बंद केलं तर त्याच्यावर त्याला सवय नसलेल्या इतर गोष्टी - उदा. पुरणपोळी वगैरे खायची पाळी येईल.
मजा करण्याची तयारी पाहिजे. मग काहीही चालते. मग कशानेही जिभेचे चोचले पुरवता येतात.
हे वाक्य थोडंसं - आपलंच पोर कशाला पाहिजे, जगात इतकी पोरं आहेत, प्रेम करण्याची तयारी पाहिजे, मग मातृत्वभावना भरून काढता येते - असं म्हणण्यासारखं आहे. आपल्या विशिष्ट अन्नावर अगदी पोटच्या पोराइतकं नाही पण तत्सम प्रेम लोक करतात. म्हणूनच बहुधा तुमचा एस्किमो मांस टाकून पुरणपोळीच्या मागे जाणार नाही. दक्षिण भारतीय लोकांना इडली, सांबार, डोसे, उत्तप्पे व भात खायचा नाही असं सांगून बघा (हे शाकाहार की मांसाहार असं नसून निवार्य व अनिवार्य चं उदाहरण आहे) मग त्यातले जे 'मग आम्ही खायचं काय' विचारतील त्यांना त्यांच्या वर्षानुवर्षांच्या सवयी बदलण्यासाठी तुमचे इतर पर्याय सांगा. जगातल्या अब्जावधी लोकांची त्यांचं खाणं सोडून देण्याची त्यांची 'तयारी' नसेल तर हा त्यांचा दोष की तुमच्या गृहितकांमधली कमतरता?

In reply to by राजेश घासकडवी

भद्रलोक, मी फक्त पुस्तकी व्याख्येचा विचार करून एफिशियन्सीबद्दल लिहीलं होतं. जेवणासंदर्भात पुस्तकी व्याख्या म्हणजे दिवसाला २२००/२५००* किलोकॅलरीज**. पाण्याचे असमान वाटप, भारत या (आकार आणि लोकसंख्येने) प्रचंड मोठ्या देशात वर्षातले काही महिनेच काहीशे तासच पाऊस पडणं, जगभर येणारे पूर, इ.इ. अनेक कारणांंमुळे तिसरं महायुद्ध पाण्यावरूनही होऊ शकतं अशी शंका व्यक्त केली जाते. मी त्या संदर्भात पाण्याच्या एफिशियन्सीचा मुद्दा मांडला होता. पाण्याच्या बाबतीत श्रीमंत (भरपूर उपलब्धता आणि उत्तम व्यवस्थापन) असणार्‍या देशांना, भागांना या गोष्टीची गरज नसावी. त्यातून पाण्याची एफिशियन्सी या आणि याच कारणासाठी जगातले किती मांसाहारी लोकं खरोखर शाकाहाराकडे वळतील? * दिवसभर खुर्चीत बसून कीबोर्ड बडवणार्‍यांना दोन हजार कॅलरीजही पुरेशा असाव्यात. (स्वतःवरून जग पारखणे). ** या प्रतिसादात किलोकॅलरीज आणि कॅलरीज एकच आहेत. इंग्लीशमधे कॅपिटल सी लिहून किलो हा शब्द टाळता येतो.

आम्हि तब्येत सुधारण्यासाठि मांस खातो....फ्राइड क्यालामरि हा आमचा आवडता पदार्थ

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी?? निसर्गातील प्रत्येक जीव हा दुसर्‍या जिवावर अवलंबून असतो. 'जीवो जिवस्य जीवनम्".. प्राणी असो वा वनस्पती, दोन्हींमध्ये जीव असतो. त्यामुळे कोणताही सजीव खाल्ला तर तो मांसाहार समजायला हवा. प्राण्यांना जशा भावना असतात, तशा वनस्पतींनाही असतात, हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवले आहे. वनस्पती-शास्त्रज्ञ "बोस" यांनी ते सर्व जगासमोर प्रयोग करून सिद्ध देखील करून दाखवले आहे. प्राण्यांना चाकू कापल्यावर जशा वेदना होतात, अगदी तशाच वेदना फळे, भाजी ह्यांना देखील चाकू कापल्यावर होतात हा प्रयोग त्यांनी सर्व जगासमोर दाखवला होता. आता एवढे सर्व माहीत असून सुद्धा शाकाहारी लोकांना मांसाहार म्हणजे वेगळे असे का वाटते? दररोज स्वयंपाक करताना, भाज्यांना क्रूरपणे चिरताना, त्या भाज्यांना होणार्‍या वेदनांचा विचार करत का नाहीत हे शाकाहारी लोक?

In reply to by Arun Powar

भाज्यांना क्रूरपणे चिरताना, त्या भाज्यांना होणार्‍या वेदनांचा विचार करत का नाहीत हे शाकाहारी लोक? त्याचे कारण कदाचित असे असु शकेल की भाज्या कापत असताना त्या कापणार्‍यासमोर फडफड तडफड करत नाहीत.

In reply to by मृत्युन्जय

भाज्यांना क्रूरपणे चिरताना, त्या भाज्यांना होणार्‍या वेदनांचा विचार करत का नाहीत हे शाकाहारी लोक? नॉटींग हील नामक ज्युलीया रॉबर्ट आणि ह्यू ग्रँटच्या चित्रपटातील एक अभिनेत्री स्वतःची ओळख, फ्रुटेरीयन म्हणून करून देते. म्हणजे केवळ झाडावरून पडलेली फळेच खाणार कारण ती आधीच मेलेली असतात. फळ तोडले तर तो खून! :-)

माणसाची शरीररचना शाकाहारासाठी आहे हे मान्य, पण ज्यावेळी मानव उत्क्रांतीच्या मार्गावर होता, त्यावेळी तो मांसाहारकडे वळला होता. कारण दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीविषयाचे अल्पज्ञान ह्यांसारख्या गोष्टींमुळे मांसाहार करणे गरजेचे बनले. त्यावेळच्या मानवाने, उपलब्ध असलेल्या प्राण्यांचा उपयोग अन्न म्हणून केला होता आणि मानव "मिश्राहारी" बनला. मिश्राहारी बनल्यामुळे जगण्यासाठी लागणारा अन्नाचा पुष्कळ साठा त्याला मिळाला. त्याकाळी जर माणूस मांसाहारी बनला नसता तर मानवजात निसर्गात जास्त काळ टिकली नसती. आणि आत्ताचा मानव 'शाकाहारी विरुद्ध मांसाहारी' असा वाद घालायला जन्मलाच नसता.

आता ह्या धाग्याचा जिर्णोद्धार झालाच आहे तर हे देखील करमणूक म्हणून वाचून पहा. ;)
From Temp

In reply to by विकास

दगडू लई भारी दिसतोय! किस्सा जाम आवडला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हॅ हॅ हॅ!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा

In reply to by गणपा

आम्ही आता चवळीची उसळ खाताना तिला "कुक्कुट" म्हणतो!! सगळ्यानीच हा उपाय केला तर "शाकाहार की मांसाहार" भांडणाचं कारणच राहू नये!

In reply to by गणपा

खीखीखी! लय भारी.

In reply to by प्रियाली

लै भारी किस्सा!

हाण्ण तिच्यायला. खपलो. =)) =)) =))

आग्गाग्गाग्गाग्गाग्गा!!!!!!!!!!! काय त्यो गूळ पाडलाय शाकाहारी मांसाहारींनी... ! अत्यंतिक समांतरः- पांडु...........ये रे ये! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif तुझा अत्यंत आवडता इषय आहे. हो ना??? http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif