मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का?
मलाही वाटत नाही असा काही नियम असावा.
मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना!
सहमत.
व.पु. च्या लेखनाला मध्यमवर्गीय संकुचित म्हणणा-या ... जे अनाकलनीय ते भारी म्हणणा-या लोकांसारखेच या प्रतिसादाला फाट्यावर मारण्यात आले आहे.
अवांतर : तुमचा तो अंडा बिर्याणी,शेठ वाला लेख आवडला.... सुरवातीच्या खजूर, स्त्रिया इ. बद्दलच्या काही "डेस्परेट" ओळी सोडता. त्या वेळी लॉगिन नव्हते त्यामुळे तिकडे प्रतिसाद द्यायचा राहून गेला!!
पहील्यांदा आपण माझी प्रतिक्रीया स्वःताला का लावुन घेतेलीत??????????????????????????
मी मला जे माझ्या लेखांवर विचारतात त्यांना विचारल होत.लेख आपला आहे,मला त्यात काहीच उद्देश नाही दीसला म्हणुन तस लिहल.आपण आमच्या प्रतिसादास कशेही व काहीही करु शकता.आपण खवमधे जे लिहलत म्हणुन मी हा प्रतिसाद लिहला नव्हता,तसले विचार मी ठेवत नाही.
now something serious,
१.मी रोज खजुर खातो कारण मला लोहाची कमतरता होती/आहे.
२.I had a gorgeous,well-mannered,highly educated girlfriend,I left her just because she was not hindu!
desperate??????????????
To hell with that all beauties man!!!
आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली.
परखड आणि स्पष्ट मत बघुन अमंळ भावुक झालो.
स्वतंत्र बुद्धीने वेगळ्या धाटणीचा विचार करणे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे जी तुम्ही करता असं वाटतंय. जे रुढ आहे ते योग्य असेलच असे नाही आणि जे योग्य आहे ते रुढ नाहीच असेही मानण्याचे कारण नाही.
सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे,
तुम्ही खरोखर खूप बुद्धिमान आहात असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर तसं सरळ लिहा. कोणी तुम्हाला आडकाठी करणार नाही. असे नथीतून तीर मारण्याचे कारण कळले नाही.
चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.
तर्हेवाईकपणा.
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद......
नथीतून तीर मारला नाही.... आपण काय आहोत याबद्दल वयाच्या १८-१९ व्या वर्षी ला केलेले चिंतन आहे.
आणि मी बुद्धीमान तर आहेच यात मला संशय नाही :) ..पण माझ्यापेक्षा खूप बुद्धीमान खूप माणसे पण पाहिली आहेत त्यामुळे "मी लय भारी..माझ्यासारखे कुणी नाही" असे स्वतःबद्दल मत बनवलेले नाही.
जोपर्यंत तुम्ही स्वत: बद्दल कायम वेडेपणाचा संशय घेत राहात नाही तोपर्यंत सबकुछ ओके !
सीमारेषा वगैरे झूठ.
आणि नेमाडे भिकार लेखक आहेत/भिकार लिहीतात याबद्दल सहमत!
हुश्श. कोसला वाचली नसल्याबद्दल वाटणारा अपराधीपणा थोडा कमी झाला आज. असे नेहेमी वाटायचे की अश्या काही अजरामर कलाकृती आपण वाचत नाही आणि स्वत:ला वाचनप्रेमी म्हणुन कसे काय घेउ शकतो. पण आज मनावरचे दडपण कमी झाले. माझ्यासारखे बरेच लोक आहेत हे पाहुन बरे वाटले.
बाकी एवढेच म्हणेन की एवढ्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेली कादंबरी अगदीच फुटकळ नसेल. कुछ तो बात होगी. कदाचित धागाप्रवर्तिकेला आवडली नसेल ही गोष्ट वेगळी. पण म्हणुन एकदम फुटकळ?
मलाही नारायण सुर्व्यांच्या कविता फारश्या आवडत नाहीत. काही डोक्यावरुन जातात आणि काही डोक्यात. पण म्हणुन सुर्व्यांना फुटकळ म्हणावे का? आणि तश्याही कवी ग्रेसांच्या तरी सगळ्या कविता कुठे पुर्णपणे झेपल्या आहेत.
अवांतर: ग्रेसांचा उल्लेख खटकला असेल तर कृपया "वस्त्रांत द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता" या ओळीचा अर्थ समजावुन द्या. (आणि नसेल खटकला तरी कृपया माहिती असेल तर समजावुन द्या) :)
व.पु. आणि अवचट ( नक्की कोणते अनिल की सुभाष?) एकाच ओळीत, एकाच कप्प्यात टाकून तुम्ही तुमच्या अमाप विद्वत्तेची साक्षच दिलीत की.
सॉलिड परखड मतं हो...
कोसला मला खूप आवडलेले नाही पण ते आलं तेव्हाचा काळ बघता कोसला महत्वाचं, माईलस्टोन म्हणावं असं पुस्तक आहे याबद्दल मला शंका नाही. नेमाड्यांचं बाकीचं थोडंसंच वाचलंय आणि नक्कीच आदर आहे. आणि काही झालं तरी समृद्ध अडगळ वाचणारच आहे.
नेमाडे नक्कीच मोठे लेखक असतील... पण मला वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे लेखन झेपले नाही.
असो.... कोणाला मी विद्वान किंवा उथळ, ढ किंवा अजून काही वाटले म्हणुन मी अनुक्रमे फुशरून गेले, मी तशी नाही याचे पुरावे देत बसले, निराश झाले तर मग माझे काय होईल?
तुम्हाला माझी विद्वत्ता(?) अमाप वाटते...तर वाटू दे बापडी!!!!
>>कोसला मला खूप आवडलेले नाही पण ते आलं तेव्हाचा काळ बघता कोसला महत्वाचं, माईलस्टोन म्हणावं असं पुस्तक आहे
सध्याचा काळ बघता आणखी काही तरी (सध्याच्या परिमाणाने) विचित्र लिहून भविष्यकाळात 'माईलस्टोन म्हणावं असं' मानले जाणारे पुस्तक लिहून ठेवावे असा माझा विचार चालला आहे. ;-)
(फेसबुकावरचे स्टेटस अपडेट्स संकलित करून लिहील्यास भविष्यात त्याला सद्यस्थितीचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा महान ग्रंथ अशी विद्वज्जनांची मान्यता मिळण्याची शक्यता आहे असं मला वाटतं ).
सहमत आहे रे नगरी. :) असे करून अनेक वेगवेगळ्या परिस्थितींवर भाष्य करता येईल आपल्याला. वेगवेगळ्या लोकांचे ट्वीट गोळा करूनही हे करता येईल. आताच सुचलेला विषय : ट्विटरवरील युद्धे.
त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला.
ह्या दोन ओळींचा अर्थ समजला आणि पुढचे वाचणे बंद केले.
कित्ती कित्ती बरं वाटतंय म्हणून सांगु ? मला थेंबभर, कणभर, नखाएवढीही न आवडलेली कादंबरी म्हणजे "कोसला"... मी वारंवार त्यावर मतप्रदर्शन केलंच आहे.. इथे रिपीट करतो. माझ्यामते कोसला म्हणजे "ढकोसला".. नुस्ती हुल आहे.
कलावंत आणि संशोधक यांच्यात संशोधक जास्त सुखी कारण त्याचं म्हणणं जर आपल्याला कळलं नाही तर लोक आपली बुद्धी कमी आहे म्हणून गप्प बसतात्,पण कलावंताच अस नाही जर त्याची एखादी गोष्ट जर आपल्याला कळाली नाही तर आपण लोक त्याला भिकार ठरवून मोकळे होतात असं व्यंकटेश माडगुळकर म्हणतात.
(कोसलाप्रेमी)जिप्सी
कोसला मला आवडली असली तरी तुमच्या भावना मी समजु शकतो. मला जी.ए. फारसे आवडत नाहीत म्हटल्यावर मंडळी अशीच धावून येतात ;)
बाकी माझ्या स्वाक्षरीत खास पुस्तकप्रेमींसाठी असलेल्या साईटची युआरएल आहे. तिथेही तुमच्या विविध पुस्तकांच्या मताबद्दल वाचायला आवडेल
लै लै ऐकुन उदाहरणार्थ फार थोर वगैरे म्हणुन पदरमोड करुन घेतलं होतं पुस्तक.
वाचुन संपल्यावर आम्ही स्वतःलाच 'कोसला'. काही काही उतारे चांगले आहेत,पण टोट्टलमध्ये आपल्याला सालं भंकस वाटलं.
आनंद झाला, सोबत आणखी कोणी आहे हे पाहुन.
माझाही पास! :)
मी नेमाड्यांचं कुठलंच लेखन वाचलेलं नाही, आणि बहुधा नेमाड्यांनीही माझं कुठलंच लेखन वाचलेलं नाही! :)
आपल्या वासरीचं पान बाकी आवडलं.. अजूनही येऊ द्यात अशीच काही पानं..
तात्या.
कोसलाच्या सुरुवातीला अर्पणपत्रिकेतच नेमाडे म्हणतात, शंभरातील नव्याण्णवास !. त्यातलेच आम्ही त्यामुळे आम्हाला आवडलं. बाकी अपवादातले एवढे सगळे एकदम भेटल्याचा आनंद झाला.
अवांतर :- माझी आई मी लहान असताना मला नेहमी सांगायची की,कुठलाही पदार्थ आवडला नाही म्हणून अजिबात खायचा नाही किंवा त्याला वाईट म्हणायचं असं करायचं नाही.
(कोसला हौसेन विकत घेतलेला आणि पारायणप्रेमी)जिप्सी
खरे सांगायचे तर "कोसला" मलाही फार लै भारी आहे असे नाही वाटले.
( इनफॅक्ट त्या तुलनेत ( जी मी कधीच करत नाही ) "बाकी शुन्य" जरा उजवे वाटले ).
अर्थात नेमाड्यांची इतर पुस्तके चांगली असली तर हे 'कोसला' मी 'बरे आहे' असेच म्हणेन.
पुस्तकातला काही काही भाग, काही प्रसंग आणि एकुणच भाषाशैली मस्त असली तरी टोटलमध्ये पुस्तक 'ठिक' ह्या कॅटेगिरीत येते.
बाकी कोसलावर लोकांनी एवढे भरभरुन लिहले आहे की ते वाचुन नेमाड्यांनीच डोक्याला हात लावला असेल
( पुस्तकाच्या प्रस्तावनेत / अभिप्रायात ( जो त्यावर छापला आहे ) खुद्द भाईकाकाच म्हणतात "कोसलावर खरे तर कोसलाएवढेच लिहता येईल ..." , असेल बाबा, मला ती कादंबरी एकुणातच ठिक वाटली )
संग्रही असावी का ?
जरुर असावी, जरा हटके भाषाशैली आणि काही खास प्रसंगांसाठी कोसला विकत घ्यायला हरकत नसावी.
बाकी पुस्तकवेडे असाल तर नेमाड्यांची इतर पुस्तकेही वाचु शकता, आवडतीलच आणि झेपतीलच असे नाही, मात्र काही वेगळे नक्कीच वाचायला मिळेल.
बाकी असो.
- छोटा डॉन
आता व पु मध्यमवर्गीय , संकुचित आणि भंपक लेखक नाहीत म्हणुन जगातल्या सर्वच लेखकांना महान लेखक म्हणावे की काय? नाही आवडत एकेकाचे लेखन. काय चुकीचे आहेत त्यात. तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर नाही आवडत म्हणा ना. पण वपू भंपक असे म्हणाल तर फटके पडणारच ना.
कधीच आवडले नाहीत, अगदी पहिल्यांदा (सत्तरीच्या दशकात त्यांचे 'वहीदा रेहमान' इत्यादी जे काही वाचले तेव्हापासून). ते अत्यंत भंपक आहेत असे तेव्हा वाटले आणि त्यांच्या लेखनापासून दूर राहिलो.
आता इथे रहातोय तेथे (महाराष्ट्राबाहेर) एकदा सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ते आले होते. त्यांचे इथे येणे अचानक झाले, आणि एका त्यांच्या चाहत्याने भराभर फोन फिरवून मंडळाचे मेंबर गोळा करून त्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम घडवून आणला. तेव्हा अगदी नाईलाजाने जावे लागले (मैत्रीखातर). तरी जातांना डोके व मन उघडे ठेऊन गेलो. म्हटले, आता इतकी वर्षे गेली आहेत, मिठी नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे, तेव्हा वपु आता वेगळे असतील. दोन कथा त्यांनी सांगितल्या सुमारे दोन+ तास लागून. एक अजिबात लक्षात राहिलेली नाही, दुसरी मात्र लक्षात आहे कारण ती इतकी फालतू आहे, आणि त्याचा 'पंच' (जो त्यांच्या चाहत्या मंडळीने अगदी 'चुकचुक' करत वगैरे साजरा केला) अत्यंत बाष्कळ होता, की खरे तर वाईट वाटले. एक मराठीतील जानामाना वगैरे कथाकार, इतका आता वयोवृद्ध झाला तरी वीस वर्षांपूर्वी जे काही लिहीत होता त्याहीपेक्षा आता फालतू लिहीतोय/ सांगतोय.
मिठी नदीत पाणी वाहिले नाही, गाळच साचत गेला, दुर्दैवाने.
तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर नाही आवडत म्हणा ना.<<
का? तुम्ही इतर लेखकांना शिव्या देऊन वाईट म्हणू शकता आणि तुमच्या आवडत्या लेखकाला भंपक म्हणलं तर फटके पडणारंच?
डबल ढोलकी.
वपु = भिकार, भंपक, खोटं लिखाण हे आमचं मत आहे. आता ते मांडायचं नाही कारण तुम्ही फटके मारणार ह्याला दहशतवाद म्हणतात.
म्हणजे तुम्ही वपुंना मध्यमवर्गीय संकुचित भंपक असे सगळे म्हणु शकता पण धागाकर्तीने इतर लेखकांना शिव्या घातलेल्या तुम्हाला चालणार नाहीत. तुम्ही जसे इतर लेखकांना शिव्या घालता तसेच लोकही तुमच्या आवडत्या लेखकांना शिव्या घालु शकत्तातच की.
प्रत्येक २ पानांमागे २ भुकबळी, ३ आत्महत्या, नवर्याने दारु पिउन बायकोला मारल्याच्या ४ घटना आणि पोराने बापाला घातलेल्या ५ अर्वाच्य शिव्या याशिवाय साहित्य निर्माणच होउ शकत नाही अशी मानसिकता का? साहित्य म्हणजे काय फक्त गरीबी, दारिद्र्य, भुकबळी, निराशा हेच सगळे का?
देशातला सगळ्यात मोठा वर्ग मध्यमवर्ग. पण त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या पांढरपेशी प्रश्नांवर कोणी लिहिले की तो भंपक, संकुचित का रे बाबा?
आणि भंपकता कशात? कोणाचाही कैवार घेउन किंवा कोणाच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे आव आणुन लिहिलेले साहित्य नाहीच आहे वपुंचे. मग भंपकपणा कसला नक्की? आणि संकुचोत वृत्ती का म्हणे? त्यांनी आपल्या लिखाणातुन दलितांच्या अन्यायाला वाचा फोडली नाही म्हणुन की वेश्यावस्तीवर कादंबर्या लिहिल्या नाहीत म्हणुन?
आणि मध्यमवर्गीय लिखाण म्हणुन फक्त वपुंना नावे का ठेवता मग? पुलंचे लिखाण काय वेगळे होते? शिवाजी सावंत कसे संकुचित विचारसरणीचे नाहीत?
आता कुडं सामना रंगात यायला लागल्येलाय.
चला...पाच का दस.. पाच का दस..पाच का दस..पाच का दस..पाच का दस..पाच का दस..पाच का दस..
साथ में पॉपकॉर्न का चार्ज अलग...
प्रतिक्रिया
बाब्बौ!!!
बोलती बंद
व.पु. आणि अवचट
'बाब्बौ'शी सहमत
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
छानंय डायरीचं पान
आता 'प्रयोजन का?' म्हणुन
व.पु. च्या लेखनाला
प्रतिसाद वाचुन वाईट वाटल.
परखड
स्वतंत्र बुद्धीने वेगळ्या
अप्पा रे अप्पा, खर बोललास
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल
नेमाडे भिकार लेखक आहेत
नेमाड्यांचे एकही पुस्तक मी अजून वाचलेले नाही
हेच म्हणते.. मीही नेमाडेंचे
नेमाडे...
हुश्श. कोसला वाचली
सौरभशी सहमत
मीही
एवढेच काय मी पुलंचीही बरीच
आजकल बापू को गाली देना तो फॅशन हो गया है !
व.पु. आणि अवचट ( नक्की कोणते
नेमाडे नक्कीच मोठे लेखक
>>कोसला मला खूप आवडलेले नाही
सहमत आहे रे नगरी. असे करून
त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस
+१००००००
भेटला रे भेटला...
ओके
ओके..
कलावंत आणि संशोधक
कलावंताच अस नाही जर त्याची
१०० % सहमत !
चला
कोसला मला आवडली असली तरी
अगदी खरं..... मला पण जी.ए.
च्यामारी....
माझाही पास! मी नेमाड्यांचं
अवांतर - नेमाड्यांच्या मिश्या
आवड आपली आपली !!!
खरे सांगायचे तर ..
वपु मध्यमवर्गीय संकुचित
आता व पु मध्यमवर्गीय ,
व. पु.
आणि एका त्यांच्या चाहत्याने
काय बोल्लासा तात्यानु! कुठेही
तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर
म्हणजे तुम्ही वपुंना
हाण्ण तिच्यायला...