बिरुटेसरांचा प्रतिसाद बोलका आहे.
पालकांची मरमर तर होतेच आहे. हाती काही लागले तर ठिक नाहीतर (पाल्य आणि पालकांना)नैराश्य येण्याची शक्यता दाट!
माझ्या पिढीतील आम्हा सर्व आते मामे चुलत भावंडांवरही असा दबाव होताच.
सगळेजण (मी सोडून....माझी बातच वेगळी) ;) नामांकित इंस्टीट्युटांमधून शिकले आणि सुदैवाने चांगल्या पदांवर आहेत.
सांगायची गम्मत अशी कि आय आयटी असू दे किंवा आणखी कोणत्याही ठिकाणी शिकलेल्यांनी त्यांच्या नोकर्या किंवा व्यवसाय हे अगदी भिन्न क्षेत्रातले निवडले आहेत. 'मला मनापासून एखादे क्षेत्र आवडते म्हणून मी ते शिकले/ शिकलो आणि त्यात काम करत आहे' असे माझ्या माहेरी अपवादानेच झाले आहे. आई वडीलांना हवे म्हणून त्यांनी करण्यास भाग पाडले. सुदैवाने (मी सोडून) सगळ्यांचा स्कोअरही चांगला होता. जे घडले तो योगायोग म्हणून सोडून देता येणार नाही कारण माझ्या आते, चुलत, मामे भावंडांची संख्या (सुदैवाने) भरपूर आहे.
आय.आय. टी. च्या तयारीच माहित नाही पण १० वी च्या परिक्षेसाठी मुलीला ६ वी पासून विविध क्लास लावणार्या एकांना मी व्यक्तिशः ओळखते. हे गृहस्थ १० वी आणि १२ वी मधे 'बोर्डात' आल्यामुळे त्यांच्या मुलीकडून त्यांची फक्त 'इतकीच, वाजवी' अपेक्षा आहे.
मुलीवर बरेच प्रतिबंध होते. तिच बॅड्मिंट्न ( जे ती अंगणात खेळायची अर्धा तास ), घरातल्यांचा टीव्ही, पाहुणे इ. वेळ्खाउ गोष्टी बंद.
मुलगी सध्या ९ वीत असून तिनं ६ महिन्यांपूर्वी बंड पुकारलय, जास्त त्रास दिलात तर पळून जाइन, शिक्षण सोडून आय्मॅक्स सिनेमा हॉल मधे डोअर कीपर होइन अशी धमकी दिलीय. वडिल हवालदील आहेत..पण कोणालाही अजिबात सहानुभूती वाटत नाही.
"डोअरकीपर होईन" या धमकीमधे नाही म्हण्टले तरी थोडा मिष्किलपणा आहे. "जीव देईन" अशी धमकी देणार्या आणि अशी धमकी प्रत्यक्षात आणण्याचा यशस्वी/अयशस्वी प्रयत्न करणार्या जीवांना ज्यातून जावे लागले असेल त्याची कल्पना करणे कठीण बाब आहे.
बोर्डात यायचा काय धोशा लावताय?
मुलगी तल्लख असणार हे नक्की.
-----------------------
माझ्या एका चुलत आजोबांचा किस्सा - ते लहान असताना (म्हणजे ही गोष्ट सुमारे ८० वर्षांपूर्वीची) एकदा वडिलांजवळ अभ्यास करत बसलेले. आता मुलांचे लक्ष जितपत असते अभ्यासात तसेच चालले होते त्यांचेही. जवळपासची मुले अंगणात खेळत होती सहाजिकच ह्यांनाही जायचे होते पण धाक.
पुस्तकात एक वाक्य आले "अशा अशा कारणाने त्या गोष्टींचा परिपाक होऊन..." असे काहीतरी शब्द होते.
त्यातले "परिपाक होऊन" हे शब्द वडिलांनी उच्चारताच हे एकदम म्हणाले "वड्या पडतात!"
वडिलांनी पुस्तक मिटले आणि म्हणाले "टाम्या, तुला धडा समजलाय! खेळायला जा!!" :)
सहावीला आय आय टी म्हणून नक्की शिकवतात तरी काय? मला वाटते कदाचित त्या त्या इयत्तांमधील स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून घेत असतील व नाव आय आय टी चे देत असतील.
आम्हाला आमच्या सरांनी ९वी मध्ये थोडेफार सुरू केले होते. म्हणजे आठवड्यातून दीड तास. मी त्यावेळी ते फक्त ऐकून घेत असे. परत वहीला हात लावत नसे. सुरवातीचा थोडा पार्ट समजायचा. पण डेरिवेटिव सुरु झाले तेव्हा मला त्याचा आलेला राग अकरावीत पण नीट गेला नव्हता. मात्र या थोड्या केलेल्या गणित व भौतिकच्या जादा अभ्यासाचा दहावी एनटीएस ला मात्र छान फायदा झालेला.
धाग्याला उत्तर देणार्यांचे आभार. काही मुद्दे.
- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, निरनिराळ्या स्कॉलरशिप्स, ऑलिंपियाड्स , क्विझेस, परीक्षा या गोष्टी त्याज्य तर नव्हेत. या सर्वांच्या मागे पाचवीसहावीपासून मुलांना धावताना आपण पाहातोच. मुलांच्या बुद्धिमत्तेचा कस लावणार्या या परीक्षा नकोत असे तर कुणी म्हणत नाही. तर मग "आय आय टी चा अभ्यास सहावीपासून" या प्रकारातच इतके धक्कादायक - आणि गर्हणीय काय असावे ?
- मुलांना त्यांच्या वयाच्या आधी , समज यायच्या आधीच काहीतरी शिकवण्याकरता ढकलणे हे चुकीचे. पण , ज्यांना या प्रकारची क्षमता आहे त्या क्षमतेला लहान वयापासून वाव मिळणे हेही महत्त्वाचेच.
- माझ्यामते मुद्दा रॅटरेसचा आहे. लहान मुलांना शिकवताना , त्यांना नव्या गोष्टी समजाव्यात, त्यांचे ज्ञानाचे नि विचारांचे वर्तुळ विस्तृत व्हावे या उद्दिष्टांनाच या "काँपिटीशन सक्सेस रिव्ह्यू" आणि गाइडे-घोकंपट्टी-रट्टा मारणे- परीक्षा "क्रॅक" करणे या गोष्टींनी हायजॅक केलेले आहे. सतत असुरक्षिततेने पछाडलेले असणे , स्पर्धेच्या नि परीक्षांच्याच नव्हे तर एकंदर आयुष्यातल्या सगळ्याच बाजूंच्या संदर्भात स्पर्धात्मक प्रवृत्ती असणे या दुर्दैवी गोष्टींनी पालकांपैकी कुणी ग्रस्त असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होणार - एकतर ती अत्यंत घाबरलेल्या मनःस्थितीमधे असतील किंवा ती नको तितकी अॅग्रेसिव्ह बनत असतील.
मुलांनी यश कमवावे आणि "चमकणे" , त्यांच्या ज्ञानात नि विचारात प्रगल्भता येणे आणि " नेहमी टॉपर असणे" यातली सीमारेषा सूक्ष्म आहे. मुलांची हेळसांड, दुर्लक्ष आणि त्यांना सतत धावडवणे या दरम्यान कुठे तरी ती आहे.
हैदराबादेच्या मित्राबरोबर "शिक्षणपद्धती"बद्दल गप्पा मारायच्या हीच एक चूक आहे!!! (का लोणची, बिर्याणी वगैरे विषय संपले?)
:)
त्या लोकांमध्ये शिक्षणाचा डायरेक्ट संबंध पुढे मुलाला लग्नात मिळणार्या हुंड्याशी असतो.....
आपल्याकडे आहे का तसं?
काय मुसु हे!!!
उद्या बंगाली माणसाशी शाकाहाराबद्दल, गुजराती माणसाशी साहित्याबद्दल, (आणि मराठी माणसाशी सौजन्याबद्दल!!!) चर्चा कराल!!!!!
:)
प्रतिक्रिया
अवांतर
मुसु, (माझी स्मरणशक्ती ठीक
व्यनि
अहो व्यनितून कशाला इथेच लिहा
धन्यवाद
हा हा हा
बिरुटेसरांचा प्रतिसाद बोलका
आय.आय. टी. च्या तयारीच माहित
अरे बापरे!
डोअरकीपर
ही धमकी मिष्किलच आहे पण
अहो म्हणावं एवढा मिष्किल विचार करु शकणारी कन्यका असताना
मस्त
सहावीला
प्रतिसाद
मुसु, तुम्हारा चुक्याच!