“It is always more difficult to fight against faith than against knowledge.”
हे सुप्रसिद्ध वाक्य आठवून गेले. बाकी धागा प्रवर्तकाशी अंशतः सहमत.
पण "आपले मन बुद्धी संस्कार गहाण टाकुन तर बोलत नाही आहोत ना........?" अशी वाक्यं प्रस्तुत धागाप्रवर्तकाच्या लेखात शोभत नाहीत असे वाटते.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे काय ?
स्वातंत्र्य हे स्खलनाचे स्वातंत्र्यच असते. 'एखादे स्वातंत्र्य देणे' म्हणजे 'देणार्याला न आवडणारा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे' असेच असते.
रस्त्याने जाताना डाव्या बाजुने चलायचे , हा झाला नियम.
मधोमध चलायचे , हे झाले अभिव्यक्ति स्वातंत्र्य !
परिणाम ???????
चालणे वा वाहन चालवणे हा घटनादत्त मूलभूत अधिकार आहे का? लेखनात वा अन्य अभिव्यक्तीमधे हे डावे आणि ते उजवे आणि आणि ते तिसरे मधोमध असले ढोबळ वर्गीकरण शक्य आहे का? आणि त्यात अमके चूक आणि अमके नाही असे ठरवणे इतके सहज शक्य आहे का? मला वाटत नाही.
वाहतूकीचे नियम आणि अभिव्यक्तीचे नियम ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सरकारने पैसा देऊन रस्ते बांधलेले आहेत. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना उपयोग व्हावा म्हणून हे नियम आहेत. पुस्तकाचे तसे नाही. खाजगी पैसा वापरुन प्रकाशित केलेले पुस्तक ह्यावर किती नियम लागू करायचे ह्यावर मर्यादा आहेत. निदान प्रगत समाजात तरी त्या असतात. हुकुमशाही, धर्माधिष्टित सरकारे इथे अशा बंधनांना मर्यादा नसतात. पण भारतात अशी सरकारे यावीत असे कुणाला फार वाटत नसेल अशी आशा करतो.
प्रस्तुत चर्चाप्रस्तावात उल्लेखिलेली 'जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी' ही चर्चा आता नष्ट करण्यात आलेली आहे, असे दिसते.
त्या चर्चेत नष्ट करण्यासारखे असे मला तरी काही वाटले नाही, उलट ती चर्चा एकंदरीत उद्बोधक वाटली, एवढेच माझे मत या निमित्ताने नमूद करू इच्छितो.
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
धागा अप्रकाशित का झाला यासाठी दुसरी चर्चा मिसळपावावर असताना या धाग्यात उहापोह नको म्हणून खालील काही प्रतिसाद संपादित केले आहेत.
धागा अप्रकाशित का झाला यासाठी दुसरी चर्चा मिसळपावावर असताना या धाग्यात उहापोह नको म्हणून खालील काही प्रतिसाद संपादित केले आहेत.
ती चर्चा वाचनमात्र केली आहे. संपादकांनी श्री जंतू यांचा धागा उडवला असे लक्षात येत आहे. संपादकांच्या या निर्णयाचा निषेध. निषेध नोंदवण्यासाठी इतरत्र जागा न सापडल्याने निषेध येथे नोंदवत आहे.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.
मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे?
--
अतिशय मान्य आहे. आणि मूळ चर्चेतही मान्य केले होते.
पण जसे तिथे म्हटले तेच इथे -->
आम्हा घरी धन - तुम्ही वर लिहिलेले हेच मोजमाप /अॅप्रोच (मराठी शब्द?) ब्रिगेडच्या समर्थ रामदास / संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलच्या लिखाणालाही लावायला हवे. याही थोर व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे काही इतक्या थोर व्यक्तींच्या रांगेत नाहीत. पण किमान ते महाराजांचे / शहाजीराजांचे निष्ठावंत सेवक म्हणून तरी आदराला पात्र आहेत. आणि याबाबत कुठल्याही इतिहासकारांचे दुमत नाही.
मग या सर्वांबद्दलचे गलिच्छ आणि अत्यंत उद्दामपणे मांडलेले लेखन हे लेनच्या एका पानाइतके किंबहुना जास्तच बंदी घालण्यायोग्य आणि निषेधार्ह आहे. त्याने माफी तरी मागितली भावना दुखावण्याचा हेतू नव्हता सांगून. इथे तर उलट प्रकार आहे.
अर्थात हे लेनचे समर्थन अजिबात नव्हे. महाराजांबद्दल अंदाजे किंवा फारशा माहीत नसलेल्या (या चर्चेपूर्वी मी हा 'विनोद' कधीही पुण्यात पेठेत किंवा कुठेही ऐकला नव्हता) गोष्टी इतक्या कॅज्युअली ऑक्सफर्ड प्रेस च्या पुस्तकात लिहिण्याचा निषेध करून बंदी घातलीच पाहिजे.
+१
संभाजी ब्रिगेड्च्या गलिच्छ लिखाणाला ही चाप लावा
शिवरायांविरुद्ध गलिच्छ लिहीणार्या लेनचा निषेध, तसेच तशीच गलिच्छ भाषा वापरणार्या ब्रिगेड्चाही निषेध
अंशतः आपल्याशी सहमत आहे..
परंतु कुणा परदेशी व्यक्तीच्या माध्यमातुन संभाजी ब्रिगेड्ने असले भलते सलते उद्योग केलेले नाहीत... वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातुन याची बदनामी कर त्याची बदनामी कर... पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कि स्वैराचार) नावाने गळा फाडुन ओरडणे...
ज्या रामदासांना इतिहासकार आजवर शिवरायांचे गुरु म्हणुन सांगत आलेत महाराष्ट्र धर्माचे प्रवर्तक म्हणुन सांगत आलात तसे ते नव्हते याचे पुरावे उपल्ब्ध आहेत... त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते...
सत्य सांगितले तर कुठे चुकले?
ज्या रामदासांना इतिहासकार आजवर शिवरायांचे गुरु म्हणुन सांगत आलेत महाराष्ट्र धर्माचे प्रवर्तक म्हणुन सांगत आलात तसे ते नव्हते याचे पुरावे उपल्ब्ध आहेत... त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते...
सत्य सांगितले तर कुठे चुकले?
अंशतः आपल्याशी सहमत आहे..
परंतु कुणा परदेशी व्यक्तीच्या माध्यमातुन संभाजी ब्रिगेड्ने असले भलते सलते उद्योग केलेले नाहीत... वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातुन याची बदनामी कर त्याची बदनामी कर... पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कि स्वैराचार) नावाने गळा फाडुन ओरडणे...
ज्या रामदासांना इतिहासकार आजवर शिवरायांचे गुरु म्हणुन सांगत आलेत महाराष्ट्र धर्माचे प्रवर्तक म्हणुन सांगत आलात तसे ते नव्हते याचे पुरावे उपल्ब्ध आहेत... त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते...
रामदासांची अन शिवरायांची प्रथम भेट १६७४ ला झाली होती तर स्वराज्याची प्रेरणा त्यांनी कशी दिली होती ?
समजा शिवरायांनी वयाच्या ४४ व्या वर्षी (राज्याभिषेक समारोहप्रसंगी) रामदासांकडुन प्रेरणा घेतली असे मान्य केले तर त्यांची स्वराज्याची धडपड १६ व्या वर्षापासुन सुरु होती ती कुणाच्या प्रेरणेने?
आता हे सत्य सांगितले तर कुठे चुकले?
राहता राहिला प्रश्न निषेधाचा...तुम्ही आहातच करायला निषेध.. आम्ही म्हणतो निषेध निषेध तुमच्या मागे मागे...
या सनदेत किती तरी मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केलेली आहे. राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली आदी समकालीन ग्रंथांमधे कुठेही त्यांचा उल्लेख नाही विशेष!!! जरा तपासुन पहा!!
ओ राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली ही ब्राम्हणांनी लिहीलेली पुस्तके आहेत हो. ती चालतात का तुम्हाला? ब्रिगेडला विचारून या एकदा.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
उतरलात जातीवर..... तसे तुमचे असे सहज उतरणे अपेक्षीतच होते ... :))
ओ राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली ही ब्राम्हणांनी लिहीलेली पुस्तके आहेत हो. ती चालतात का तुम्हाला? ब्रिगेडला विचारून या एकदा.
हो चालतात ना.... तुम्ही इतिहास लिहु शकलात कारण विद्यार्जनाचा अधिकार फक्त तुम्हाला होता...
इतिहास लिखान करतांना फक्त तुम्ही हवे तसे तुम्हाला सोयीस्कर लिहिलेत याला आमचा विरोध आहे...
तुमच्यात सगळेच गुण वाईट आहेत असे माझे मत निश्चितच नाही... पण दोष आहेत हे तुम्हाला दाखविले तर का वाईट वाटावे?
सगळ्यात आधी जातीवर कोण उतरले आणि पॄथ्वी निब्राम्हण करण्याची भाषा आधी कोणी केली हे तुम्हाला ठाउक नसेलच नाही का ?
माझ्या लिखाणात कुठेही अश्या ठोकशाही भाषेचा वापर नाही.... असो... वरिल मत हे कुणाचे आहे यावर प्रकाश टाकाल काय?
इतिहास लिखान करतांना फक्त तुम्ही हवे तसे तुम्हाला सोयीस्कर लिहिलेत याला आमचा विरोध आहे... .
हा हा हा. अहो अनेक मराठा (मराठी) सरदार पदरी असे चरित्र लिहू शकणारे लोक ठेऊन ही चरित्रे लिहून घेत असत हे माहित नाही का? मग ते ही दोषीच का? का ते इतके मूर्ख होते की काय लिहीले आहे हे वाचून न घेता सहमती देत?
तुमच्यात सगळेच गुण वाईट आहेत असे माझे मत निश्चितच नाही... पण दोष आहेत हे तुम्हाला दाखविले तर का वाईट वाटावे?
शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे |
शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||
सकल सुखांचा केला त्याग |
म्हाणोनी साधिजे तो योग |
राज्य साधनाची लगबग | कैसी केली ||३||
याहुनी करावे विशेष |
तरीच म्हणवावे पुरूष |
या उपरी आता विशेष | काय लिहावे ||४||
शिवरायांसी आठवावे |
जीवित तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी उरावे | किर्तिरुपे ||५||
निश्च्यायाचा महामेरू |
बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||६||
हे कोणी कोणास लिहीले आहे माहीत आहे काय? रामदासांनी संभाजी महाराजाना....
याहुनी करावे विशेष |
तरीच म्हणवावे पुरूष |
याचा अर्थ काय हे माहीत असेल तर त्या व्यक्तीचा अधिकार काय होता हे कळेल. या अधिकाराने संभाजी महाराजांना त्यांनी वरील वाक्यं पत्रात लिहीली आहेत. हे ही ध्यान्यात घ्यावे. संभाजी राजांच्याच नावाने तुमची ब्रिगेड आहे ना म्हणे.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
हे तुमच्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासकाना ठाऊक नाही काय ? असो नसेल तर सांगतो... हे पत्र रामदास स्वामींनी संभाजी राजाना शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लिहीलेले पत्र आहे.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील
शंभुराजेंवर विषप्रयोग करणार्या अष्टप्रधान मंडळींना वाचविण्यासाठी लिहिलेले हे एक पत्र आहे... =)) शिवरायांच्या मॄत्युनंतरच... पण बर्याच कालावधीने जेंव्हा अष्टप्रधान मंडळींना शंभुराजेंनी ताब्यात घेतले होते... :)
त्यातील मजकुर नीट वाचला तर तुम्हाला नक्की कळेल... ;;)
कदाचित तुमचे मराठी आणी काव्यातील मराठी वेगळे असावे,
शिवस्तुतीतुनही तुम्हाला अष्टप्रधान मंडळींची वकीली (व त्यातुन ब्राम्हण्द्वेष साधणे हेच) दिसत असेल तर त्याला बिचारे रामदास काय करतील.
ब्रिगेडचे वय अवघे १५ वर्षाचे आहे त्यांची भाषा कदाचित तुम्ही म्हणता तशी बालीश असुही शकते.
पण तुम्हा लोकांची ज्ञान परंपरा ५००० वर्षे जुनी आहे तरी तुमची भाषाशैली टोकाची घसरते याचे मला नवल वाटते.... :O
हे सत्य असत्य ठरवण्याइतके संदर्भ ग्रंथ मी वाचले नाहीत. त्यामुळे त्यावर वाद घालू इच्छित नाही. तसे सनांचा आढावा घेतला तर संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांच्या काळाचा किंवा भेटीचा मुद्दा होऊ शकतो. पण त्याचे समर्थन जेव्हा कोणी त्याला विशेष आक्षेप घेतलेला नाही आणि रामदासांचा आणि महाराजांचा संबंध नाही हे सांगणे नवलाचेच.
रामदासांची अन शिवरायांची प्रथम भेट १६७४ ला झाली होती तर स्वराज्याची प्रेरणा त्यांनी कशी दिली होती ?
- मला सन माहीत नाही. पण जर त्यांची भेट झाली इ. तुम्ही मान्य करता तर त्यांचा विचार घेतला, प्रभाव होता, सज्जन गडाच्या खर्चाची सोय महाराजांनी केली याला आक्षेप घेण्याचे आणि गलिच्छ भाषा वापरण्याचे कारण आणि समर्थन काय?
इतिहासाचा वाद इतिहासकारांना घालू देत. महाराजांच्या जन्मसालाचा झाला. त्यात सामान्यांना घालून इतके टोकाचे लेखन कशासाठी ?
त्यांना जो परळिचा किल्ला शिवरायांनी दिला असे आजवर सांगत आलेत, प्रत्यक्षात तो आदिलशाहीत होता हे सोयीस्कररित्या लपविले जाते... -- म्हणजे चक्क आदिलशहाने एका हिंदू संन्याशाला किल्ला दिला असे तुम्ही सांगताय का? उत्तम. याचा मात्र पुरावा जरूर द्यावा कारण यावर शाळेतला मुलगा पण विश्वास ठेवणार नाही.
संत ज्ञानेश्वरांबद्दल काय पुरावे आहेत बाराव्या / तेराव्या शतकातले?
इतके सगळे पुरावे आहेत तर इतकी घाणेरडी भाषा वापरण्याचे आणि वाट्टेल तसे लिहिण्याचे प्रयोजन काय?
आदिलशहा म्हणजे एक सुल्तान होता त्याच्या पदरी केवळ मुस्लिम होते हे तुम्ही कशावरुन म्हणता... त्याचा एक सरदार अफजल्खान जो शिवरायांवर चालुन आला होता त्याचा वकिल कॄष्णा भास्कर कुळकर्णी, हो तोच ज्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला होता हा पण आदिलशाहीत कार्यरत होता... त्यामुळे रामदासांना ते केवळ हिंदु आहेत म्हणुन आदिलशहाने किल्ला दिला नसता हा तुमचा युक्तीवाद थिटा पडतो... :O :O
अहो कृष्णा भास्कर एक होता. जसे मागेही वाद घातला तसा की वकिली चिटणिशी हा पेशा होता. तुम्हीच म्हणालात की लिखाण फक्त ब्राम्हणांकडे होतं. त्यातले हे थोडे तिकडे होते.
एका हिंदू संन्याशाला एक किल्ला देण्याइतके कोणते राजे / आदिलशहा सहिष्णू होते काय? असं नाही की दर दिवशी कोठे देवळे पाडत हिंडत असतील पण म्हणून धर्म प्रसार करणार्या एका हिंदूला किल्ला कशाला देईल तो आदिलशाहा?
आणि कृष्णा भास्कर अफझलखानाचा वकील असण्याचा आणि आदिलशाहाने रामदासस्वामींना किल्ला देण्यासा परस्पर संबंध काय?
मी उलट सिद्ध का करावे? तुम्हीच मुद्दा मांडला आहे कोणाला माहीत नसलेला. तुम्हीच पुरावा द्या.
इतके सगळे पुरावे आहेत तर इतकी घाणेरडी भाषा वापरण्याचे आणि वाट्टेल तसे लिहिण्याचे प्रयोजन काय?
माझ्या लिखाणात कुठे शिव्या आहेत का? किंवा घाणेरड्या भाषेत काही लिहिलेले आहे काय?
असल्यास संपादकांनी ते लिखाण संपादित करण्या पुर्वी निदर्शनास आणुन द्यावे.. :S
लेनच्या प्रक्षोभक लेखनाप्रमाणे ब्रिगेडच्या प्रक्षोभक लेखनावर आणि वाट्टेल तसे शिंतोडे उडवण्यावर बंदी घालावी हा मुद्दा आहे. त्याला तुम्ही उत्तर देत होतात. रामदास / ज्ञानेश्वर इ. बद्दल बोलत आहोत. म्हणजे तुम्हाला काय विषय आहे माहीत आहे.
मग ब्रिगेडचे गलिच्छ लेखन सोडून तुमच्या मिपावरच्या प्रतिक्रियांबद्दल का विचारताय?
प्रत्येक प्रश्नाची भलतीच उत्तरं देऊन विषय का बदलताय?
परत एकदा : ऐतिहासिक पुराव्यांबद्दल आक्षेप आहे तर त्याबद्दल त्यांना बोलू द्या. इतकी खराब भाषा थोर संतांबद्दल कशासाठी? त्यावर बंदी घालायला हवीच.
ते लिखाण तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही करा ना बंदीची मागणी... मी कुठे तुम्हाला नाही म्हटले?
माझ्या लिखानात कुठे गैर शब्द आहेत का?
प्रतेकाचे आपले मत जरूर असते पण माझे ते चांगले अन दुसर्याचे तेवढे वाईट घाणेरडे असे म्हणने चुकिचे आहे.... आपण इतिहास नासवण्याचा प्रकार केलात म्हणुन ब्रिगेडने इतिहास आपल्या पद्धतीने लिहिणे सुरु केले असेल असे माझे मत आहे.
उदाहरण दिले आहे.
आपल्या पद्धतीने ? म्हणजे शिव्या देऊन ... संतांना?
प्रतेकाचे आपले मत जरूर असते पण माझे ते चांगले अन दुसर्याचे तेवढे वाईट घाणेरडे असे म्हणने चुकिचे आहे.... --
उद्या लेनचे समर्थन करणारे महाभाग तुम्हाला हेच वरचे उत्तर देतील!
माझा मुद्दा मताचा नाही. भाषेचा आहे.
आणि पुराव्याचं काय झालं?
एखाद्या व्यक्तीकडे तुमचा अन त्यांचा पाहण्याचा दॄष्टीकोण वेगवेगळा असु शकतो असे मत तुमच्या जेम्स लेन संबंधी विविध प्रतिक्रियेतुन व्यक्त होते आहे.. आता त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही यात मी काय करणार [( [(
जेम्स लेन हे मी फक्त एक उदाहरण दिले. "दुसर्याचे मत घाणेरडे नाही फक्त ते दुसर्याचे मत आहे तुमच्याशी न जुळणारे "असं जे कोणी जेम्स लेनचे समर्थन करु शकतात ते ब्रिगेडला म्हणू शकतात.
जे दत्तो वामन पोतदारांचे उदाहरण दिले आहे त्याप्रमाणे ( खरे खोटे माहीत नाही. पण ते काही बोलले नाहीत सार्वजनिक पणे हे खरे) ब्रिगेडने आपले विचार खाजगीत ठेवावेत. संतांवर पुस्तके लिहून चिखल फेक करु नये. इतिहासाच्या पुस्तकात दस्त ऐवजांचे संदर्भ, पुरावे, inferences असतात. दोषारोप करणारी गलिच्छ भाषा नव्हे.
अम्हाघरिघन ...
तुमचे वाचण चांगले आहे, पन वरिल एका प्रतिक्रिये प्रमाने किंचित श्या द्वेशाने कुठेतरि प्रेरित आहे. (खरच विचार करा, पटेल )
काहि व्यक्तिना टारगेट करन्या पेक्शा, आपन त्या विशयात किति खोल्वर ज्ञाणि अहोत हे पहिल्यास अप्ल्याला पटेल, कि आपन किति पुर्वग्रह्दुशित अहोत. (सर्वाना पटेल)
समाजात असे नेते होत रहतिल मतांसाथि उद्या तुम्हाला हि बुडवतिल.
जागे व्हा, महाराष्ट्र धर्म गाजवा,
जुने पाने उकरुन काढुन (महिति नसताना) देश बुदवु नका, इतिहास अप्ल्याला कधि माफ करनार नाहि.
हे सकारात्मक घ्या ... जरा विचार करा हा मुददा अत्ताच का आला, समाज कारनाचे राजकारण होत असल्याचि हि सुर्वात आहे.
क्शमस्व... पटलं तर घ्या नाहितर सोडा ... :)
ओ मैत्र,
आदिलशहाने एका हिंदू संन्याशाला किल्ला दिला असे तुम्ही सांगताय का? उत्तम. याचा मात्र पुरावा जरूर द्यावा
कै च्या कै काय बोलताय? रामदास हे अदिलशाही आणि मोगलांचे गुप्तहेर होते हे माहित नाही का तुम्हाला?
मग त्याना किल्ला राजे देणार की अदिलशहा?
आंबोळी
लिहून टाकले. आता पुरावा शोधत आहात का?
त्या एका वकीलाचा आणि समर्थांचा काय संबंध होता त्याचे उत्तर द्यायला तर पुरावा नकोय.
ज्ञानेश्वरांबद्दल काय पुरावा आहे?
=))
http://misalpav.com/node/8009#comment-123153
याला उत्तर अजुन देताय
असो.....
जेम्स लेनला विरोध या मूळ मुद्दाशी अंशत: सहमत (पण विरोध कोण करतय हे बघितलं तर मात्र तुमची कीव येते)
चेतन
भांडा, भांडा... असेच भांडत रहा. :T बहुधा 'दुहीचे" बीजं मराठी माणसाच्या जनुकातच असावेत. X(
ज्या संतांनी, महापुरुषांनी अवध्या मानवजातीच्या मांगल्याची, कल्याणाची कामना केली त्यांना आता एका चौकटीत बांधुन टाकले आहे.
रामदास आमचा. तुकाराम तुमचा, 'बाबा' आमचा, फुले तुमचे. असेच भांडत रहा.
मराठी गडी यशाचा धनी. हे वाचायला म्हणाय पुरतेच राहीले आहे.
भावश्याभौ,
जो पर्यंत मतांच्या तुंबड्या भरण्यासाठी नेते मंडळी जातीय दुहीची बिजे पेरत राहतील आणि असली मेंढरे त्याचे आलेले गवत खाउन त्यांच्या पारड्यात मतांच्या लेंड्या टाकत राहतील तो पर्यंत हे असेच चालत राहणार.....
तस्मात जवळचे झाड पकडा.
आंबोळी
शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संत तुकाराम, ज्ञानेश्वर हे कोणाचे होते? इथे आमचे तुमचे काहीच वाद नाही. वाद फक्त ब्रिगेडच्या लिखाणाचा आहे.
ज्या संतांनी, महापुरुषांनी अवध्या मानवजातीच्या मांगल्याची, कल्याणाची कामना केली त्यांना आता एका चौकटीत बांधुन टाकले आहे.
-- त्या त्या जातीने त्या त्या व्यक्तीला फक्त त्या जातीच्याच वैयक्तिक अधिकारात धरले आहे. किंवा त्या त्या जातीच्या एक गठ्ठा मतांसाठी ते ते नेते तो खेळ घडवून आणत आहेत.
धागा प्रवर्तकानं जीजामातां बद्द्ल एक विधान केलं आहे..
'कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्याला कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य'.
याच्याशी सहमत.
पण ह्याच न्यायानं , ज्या लिखाणावरून ही रणधुमाळी माजली आहे त्यामुळं एका पुरूषाच्या ( दादोजी कोंडदेव )चारित्र्यावरही चिखलफेक झाली आहे हे कसं विसरायचं?
या तथाकथित विनोदामुळं ( जर दादोजी कोंडदेवांना शिवाजी राजांचे शिक्षक मानत असाल तर ) एका पुरूषाची स्वामीनिष्ठा, एका शिक्षकाची तळमळ इ. इ. यांवर शिंतोडेच उडाले ...
शिवाजीराजांना घेउन ते पुण्याला आले तेंव्हा त्यांच वय ७० वर्ष होतं असं म्हणतात्...
आता दादोजी कोंडदेव हे राजांचे शिक्षक नव्हते आणि फक्त प्रजा होते असं जरी घटकाभर मानलं तरीही हा अत्यंत घाणेरडा आरोप आहे.
तेंव्हा जे कोणी जेम्स लेन च्या लिखाणाच्या प्रसिद्धीच्या विरोधात आहेत त्यांचं याबाबत काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
* मी हा तथाकथित विनोद ह्या प्रकरणाआधी कधीच ऐकलेला नव्हता
* मी जेम्स लेनच पुस्तक वाचलेल नाही
पुष्करिणी
प्रतिक्रिया
वा मस्त !
“It is always more
पण "आपले मन
अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
रस्त्यावरून चालणे वा वाहन चालवणे
मूळ चर्चा नष्ट
निषेध
तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.
अभिव्यक्त
सहमत आहे पण हाच न्याय ब्रिगेडलाही लावला पाहिजे
+१ संभाजी
सत्य सांगितले तर कुठे चुकले?
ज्या
अंशतः
आपण चाफळची
राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली
ओ
उतरलात
उतरलात
सगळ्यात
इतिहास
हे कधी
हे तुमच्या
http://www.maharashtra.gov.in
शंभुराजें
कदाचित
दोष आहेत
ब्रिगेडचे
ती चालतात
टाळ्या
सत्य ? आणि सांगण्याची पद्धत ?
आदिलशहा
नोकर वेगळे हो!
इतके सगळे
ब्रिगेडचे लेखन - तुमचे मिपावरचे नाही
ते लिखाण
नासवण्याचा
एखाद्या
पुन्हा एकदा मुद्दा सोडला
हे घ्या
हे काय
ओ
आदिलशहाने
म्हणजे पुराव्या शिवायच?
पुरावा
हा......
भांडा,
भावश्याभौ,
कोणीच आमचे तुमचे नाही.
धागा