वाईट प्रसंग. पण तुम्ही ज्याला कामी न आलेला विश्वास म्हणता, कदाचित त्याच विश्वासापोटी श्रद्धेपोटी शेवटचा क्षण त्यांच्याकरता सुसह्य झाला असावा, कोणी सांगावे. त्या शेवटच्या क्षणी काय होते हे भोगल्या शिवाय कळत नाही, आणि भोगणारा सांगायला राहत नाही.
बिपिन कार्यकर्ते
कोणी सांगावे. त्या शेवटच्या क्षणी काय होते हे भोगल्या शिवाय कळत नाही, आणि भोगणारा सांगायला राहत नाही.
अगदी सहमत आहे. हे त्यावेळच्या मेंदुतील केमिकल लोच्यांवर अवलंबुन आहे.श्रद्धा अश्रद्धा या संकल्पनांचा गोंधळ मनात असतो. माझ्या मनात श्रद्धा ( किंवा अश्रद्धा) ही कधीच निर्माण होणार नाही असे ठामपणे कोणी म्हणु शकणार नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
खूपच भावनेच्या भरात लिहला आहे हे जाणवते आहे. जाणार्याला त्यांच्या दृढ विश्वासाने जो काही फायदा झाला तेवढाच लक्षात घेतला तर त्याहुन आधीक विचार करण्यात काही हशील नाही.
काळ हेच मलम. बाकी औषध काही नाही, जखम भरणे नाही. आपलाच आपल्याशी समझोता.
काळ हेच मलम. बाकी औषध काही नाही, जखम भरणे नाही. आपलाच आपल्याशी समझोता.
असेच म्हणतो.
आपण स्वतःला कितीही प्रौढ (mature) समजत असलो तरी आईच्या जाण्यानंतरच आपण वयाने मोठे झालो असलो तरीदेखील किती लहान होतो हे समजते...
--------------------------------
त्यांचा देवावर इतका गाढ विश्वास होता म्हणूनच देवाने यातनांमधून सोडवले असेल.
:(
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
ते तसे का? असा प्रश्न विचारुन आपण त्याचे उत्तर जाणून घेऊ शकूच असे नाही. त्या लोकांना तसे वागण्यात त्रास होत नाही का? असे आपण व्यवहाराच्या चौकटीत राहून विचारले तर विचित्र उत्तरे मिळतात.
ते तसं सोसायचं बळ त्यांना त्यांच्या श्रद्धेतून मिळत असतं हे मात्र नक्की.
आपण फक्त साक्षीदार असतो आणि भावनिक गुंतवणुकीमुळं ते वेदनादायी ठरतं.
डॉक्टरी उपचारांच्या प्रयोगांमधे त्यांच्यातला मानवी चेहरा लपून गेला तर त्याचे हाल रुग्णाला आणि त्याच्या अप्तांना भोगायला लागतात. मृत्यूशी स्पर्धा करत त्यावर वरताण करण्यापेक्षा नैसर्गिक सत्याला सामोरे जात रुग्णाचे कष्ट कमी करणं हा ही वैद्यकीय उपचारांचा एक भाग आहे हे जेव्हा डॉक्टरांना सर्वतोपरी समजेल त्यावेळी असे पीळ पाडणारे प्रसंग कमी होतील अशी आशा करुयात.
चतुरंग
वाचून वाईट वाटले.
ते तसे नसते, हे तिला मरण्यापूर्वी कळायला हवे होते... आपल्या मदतीला फारसा आला नाही, हे तिला समजायला पाहिजे होते. समजलेही असेलही, कुणास ठाऊक!
म्हटले तर मदतीला खरे तर कोणीच येत नसते, आणि म्हटले तर सगळेच येत असतात.
माझी आजी गेली तो प्रसंग आठवला. मी दहावीत होते. आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर ती तापाने आजारी होऊन झोपून होती. ती टॉयलेटमध्ये गेली आणि तशीच कार्डिअॅक अरेस्ट होऊन गेली. विम्बल्डनची संपत आलेली मॅच, बाहेर पावसाचा आवाज यात ती वर काय करते आहे ते कळले नाही.. थोड्याच वेळात जेवायला हाका मारल्या तरी उत्तर मिळेना. नंतर लक्षात आल्यावर तिला त्या लहानशा जागेतून बाहेर काढले, आणि रिव्हाईव्ह करण्याचा प्रयत्न सुरू झाला. घरात त्यादिवशी दोन घरातलेच म्हणता येतील असे डॉक्टर हजर होते. मी देवभक्त अशी नव्हते, पण देवाला एक सकाळचा नमस्कार करीत असे. शिवाय आजी भजन/कीर्तनाची आवड असलेली अशी होती. तिला रिव्हाईव्ह करताना पाहून मनात आले की ही वाचू शकेल कदाचित. तसेच देवघरात जाऊन म्हटले की माझ्या आजीला बरे कर, तिने तुझे कायम सगळे केले आहे. पण ती गेलीच.
त्यानंतर "एक शक्ती आहे" अशा प्रकारचा देवावरचा विश्वास उडाला. अचानक विश्वास असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात जशी त्या विश्वासाला तडा गेल्यावर पोकळी तयार होते तशी पोकळी तयार झाली. हा शब्द अगदी पुचाट, आणि दहावेळा वापरून अर्थहीन झाला आहे, पण त्याला इतर काही म्हणता येत नाही. त्यानंतरच जेव्हा कठीण प्रसंग आले, तेव्हा असे वाटले की "त्या" दिवशी मी देवाच्या नावे धावा केला नसता तर बरे झाले असते, काहीतरी आधार राहिला असता. त्यानंतर एक ठरवले -बाकी सगळे ठीक आहे, मनाचा रिकामेपणा सगळ्यात वाईट आहे. असो.
तुमच्या दु:खात सहभागी आहे.
ना तरी अर्जुना मी काळु|
आणि ग्रासीजे तो माझा खेळु||
यापलीकडे काय बोलणार?
आपल्या दु:खात सहभागी आहे.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
त्या बिचार्या बाईंना काय काय भोगावे लागले ते वाचून वाईट वाटले.
हे वाचताना माझ्या वडिलांची आठवण झाली. ते नुकतेच ९१ वर्षांचे होऊन गेले. त्यांची गोष्टही वरील गोष्टीशी साम्य असणारी आहे. बारीक तापाचे कोणतेही निदान न झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधे ठेवले. कुठल्याही प्रतिजैविकांचा एक महिना उपयोग न झाल्याचे माहित असतानासुध्दा, एम. डी. डॉक्टरांनी त्यांच्यावर ५ दिवस इंट्राव्हेनसचा मारा केला व शेवटी सीटी स्कॅनमधे प्रोस्टेट कँसर सापडल्यावर पेन कमी करण्याच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला त्यामुळे स्वतःच्या पायानी चालत गेलेले माझे वडिल मरेपर्यंत कोमात राहिले.
कसाई बरा तो पटकन मारतो तरी! असे हाल हाल नाही करत!!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
दिवसवारासाठी पुण्यात गेलो होतो.खरे म्हणजे दिवसवार आधीच होऊन गेलो होतो .काल गेलो होतो ते सगळी आवरासावर आणि निरवानिरव करण्यासाठी .(किंवा त्यात मदत करायला.)
या आज्जी ऐंशी वर्षाच्या होत्य्य. गेल्या वर्षी आजोबा गेल्यावर फार एकट्या होत्या. पण मन खंबीर करून परत कामाला लागल्या. वेळ जावा म्हणून वर्षभरात घराचे काम दोन मजले वाढवले. बॅकेकडे जाऊन ते भाड्यानी देण्याची व्यवस्था केली.
हे काम संपते न संपते तोच अचानक एक दिवस लक्षात आले की मानेजवळ काहीतरी गाठ आहे. इथून पुढे तुम्ही लिहील्यासारख्या पायर्या चढत गेल्या.
मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा म्हणाल्या "अरे सहाच तर केमो घ्यायच्या आहेत .चार झाल्याच आहेत आण्खी दोन झाल्या की कामाला मोकळी झाले. "
पण तसे व्हायचे नव्हते. अचानक एक दिवस तब्येत खालावली आणि पुढच्या सात दिवसात सगळं काही संपलं .
एकंदरीतच देव आपल्या पाठीशी आहे ही श्रद्धा
किती भयाण विरोधाभास. देव अस्तित्वात नाही आणि असलाच तर सज्जन लोकांचे त्याला काहीही घेणेदेणे नाही हे सिद्ध होते.
प्रचंड मोठ्या लोकसमूहाने काही एका प्रकारच्या नियंत्रणात रहावे, एकसारखा विचार करावा, आणि त्यास गरज पडेल तसे मॅनिप्युलेट* करता यावे यासाठी देव, धर्म यांची निर्मीती झाली असावी असे वाटते. तसेच बहुसंख्य लोकांना एकटेच, त्यांचे ते असे जगण्यापेक्षा कुठेतरी श्रद्धा ठेवणे आवश्यक वाटते.
डॉक्टरची फारशी चूक वाटत नाही. त्यांना माहीत असलेले सगळे उपचार केले, औषधे दिली.. रुग्णाने प्रतिसादच दिला नाही तर ते काय करणार ? आपले शरीरच आपल्याला बरे करते, रोगांशी लढते... डॉक्टर आणि औषधे मदत करतात एवढच. सदर स्त्रीने आयुष्यात अनेक खस्ता खाल्या, त्यात त्यांच्या खाणापिण्याची आबाळ --> कुपोषण झाले असण्याचे शक्यता आहे :(
परदु:ख शीतल म्हणून इतका विचार करू शकलो. माफ करा. तुमच्या जागी मी असतो तर कदाचित असेच केले असते.
'अपंग म्हणून जगणे तिला अत्यंत क्लेशदायक झाले असते, म्हणून झाले हे फार बरे झाले' या विचाराचे पांघरुण खूप अपुरे, तुटक वाटत होते. एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.
साडेपाच वर्षांपूर्वीच्या दिवाळीचा पहिला दिवस.. या सार्या भावनेतून गेलो आहे..
शेवटचे ते काही दिवस भयानक अवघड अनुभव देतात...
वर सर्वांनी उल्लेखलेल्या सर्व सहानुभूतीपर प्रतिसादांशी सहमत आहे.
जन्मलेला प्रत्येक जीव संपायचा हे तर्काला धरूनच आहे. समस्या मृत्यूची नाही, वेदनांबद्दलची आहे. एखाद्या व्यक्तीने वेदना सहन करणे ही तिची शिक्षा आणि त्या वेदना सहन करताना आप्तजनांनी पाहाणे ही त्यांची शिक्षा. या इतक्या वेदना सहन करणे म्हणजे कुणाचे देणे लागतो ? हा खरा प्रश्न आहे. मरण यायच्या आधी जर्जरावस्था येणे , या जगातून सन्मानपूर्वक निघून जाण्याचा हक्क हिरावला जाणे ही खरी शोकांतिका आहे.
आलेला जीव जाणारच हे माहीत असलं तरी यातना व्हायच्या त्या थांबत नाहीत. आपण काय, डॉक्टर काय, एका विशिष्ट मर्यादेपलिकडे कोणाला काही करता येत नाही. तुमचं दुःख हलकं करण्यासाठी माझ्याकडे काहीही शब्द नाहीत. हेही माहीत असूनही लिहितोय... हे अपरिहार्य भोग सहन करून, स्वीकारून, लवकरच तुम्हाला जीवन जगण्याची शक्ती लाभो ही आशा...
प्रतिक्रिया
सुन्न
वाईट
सहमत
देव फक्त अश्याच लोकाची इतकी खडतर परिक्षा का घेतो
असे अनुभव मन सुन्न करून जातात.
+१
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वाईट वाटले.
+१
सुन्न..
लेख
+१
काय
.
त्यांचा
निरपेक्ष जगणं हा काही माणसांचा धर्म असतो.
असं काही
सुन्न
+१
हम्म!
वाईट वाटले..
माझ्या
ना तरी
वाईट
खरच सुन्नं
सुन्न
परवाच मी माझ्या एका नातेवाईक आज्जींच्या
त्या वेळी
सुन्न करणारा अनुभव
एकंदरीतच
'अपंग
(विषय दिलेला नाही)
लेख
प्रत्येक
माहीत असूनही...