ब्रम्हदेशात गेल्या दोन दशकांपासून अहिंसेच्या मार्गानं चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी चेहरा. गेल्या वीस वर्षातला अधिकांश काळ तुरूंगात / नजरकैदेत काढूनही जनतेच्या मनातल त्यांच अढ्ळ स्थान. त्या नजरेनं पाहिल तर कधीच पराभूत झालेल ब्रह्मदेशच हुकूमशाही सरकार.
दुसरं महायुद्ध संपायच्या पार्श्वभूमीवर झालेला जन्म. वडिल एक उच्च सेनाधिकारी; आई ब्रम्हदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरी. २ वर्षाची असतानाच वडिलांची झालेली हत्त्या. नंतर आईची नेमणूक भारतात ब्रह्मदेशाची राजदूत म्हणून झाली म्हणून दिल्लीतलं वास्त्व्य, इथेच गांधीच्या विचारांचा पडलेला प्रभाव. नंतर लंडन मध्ये उर्वरित शिक्षण त्यानंतर संयुक्त राष्ट्र्संघात नोकरी; नवर्याबरोबर भूतान, भारत, इंग्लंड मध्ये वास्तव्य आणि उच्च शिक्षण असा मुख्यत्वेकरून एक मुलगी-पत्नी-आई असा जीवनप्रवास ( स्वातंत्रलढ्यात सक्रीय कार्य नव्हतं तोपर्यंत ).
१९८८ मध्यी आईच्या आजारपणांत भेट द्यायला रंगूनला गेल्या असताना हुकुमशहा 'ने विन' च्या राजीनाम्यानंतर ( कार्यकाल ६२-८८ ) लोकशाहीच्या मागणीसाठी प्रचंड आंदोलनं झाली , झालेला हा उठाव सरकार कडून हिंसात्मकरित्या दडपला गेला आणि याचवेळी ओंग सान सू ची यांनी राजकारणात सक्रीय सहभाग जाहीर केला. सरकारनं जमावबंदीचा आदेश लागू केला असूनही लाखोंच्या जागृतीच काम केलं, या बंदीच्या दुसर्याच दिवशी नॅशनल डेमोक्रॅटिक लिग ची स्थापना केली आणि चळ्वळीच नेतृत्व त्यांच्याकडे आलं.
असहकार आणी अहिंसा ह्या तत्वावर हा लढा चालू आहे...या सगळ्या दरम्यान त्यांच्या आईचं निधन झाल आणि त्यावेळीच त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या आईवडिलांनी देशासाठी जस आयुष्य वेचल तसंच त्याही; वेळ्प्रसंगी प्राण देउनही देशसेवा करतील. देशाच्या चारीदिशांना फ़िरून जनमत तयार केल. पण १९८९ मध्ये झालेल्या निवडणूकांत भाग घेण्यासाठी सरकारकडून बंदी घातली गेली; त्यांना अटक झाली. ह्या बंदीनंतरही त्यांचा पक्ष ८२% जागा जिंकला पण हुकूमशाही सरकारन ही निवडणूक रद्दबादल ठरवली.
१९९५ मध्ये तब्बल ६ वर्षांनी नजरकैदेतून सुटका झाली; सुटकेच्या पहिल्या काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या सभांना लाखोंच्या गर्दीन पुन्हा आपल केलं आणि चिडून परत सभाबंदी जाहीर झाली. त्यांचे अनेक सहकारी मारले गेले कित्येक आजही तुरूंगात खितपत आहेत.
त्यांनी ब्रह्मदेशाला भेट देउ नका आणि कोण्तीही आर्थिक गुंतवणूक लोकशाहीची स्थापन झाल्याशिवाय करू नका अशी विनंती आंतरराष्ट्रीय समुदायाला केली आहे, अमेरिकेनं आर्थिक निर्बंध घातलेत पण आशियाई देश मात्र हा अंतर्गत मामला आहे म्हणून गप्प आहेत...सार्क परिषद्सुद्धा मूग गिळून आहे.
त्यांच्या पतीनं एकदाच शेवटच भेटू द्या म्हणून केलेली विनंतीही धुडकावून दिली गेली (त्यांच ९९ ला कॆन्सरन निधन झालय )हा सगळा व्यक्तिगत छळ, त्रास हा बर्माच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आवश्यक असा त्याग आहे अस त्या समजतात.
२००० साली परत अटक; २००२ ला सुटका; २००३ पासून परत नजर्कैदेत असं अट्क्-सुटका-परत अटक च्रक्र अव्याहत चालू आहे, लढा अजून सुरूच आहे.
नेल्सन मंडेलांनंतर 'स्वातंत्र्य लढा' या शब्दांना समानार्थी शब्द असं हे अद्वितीय व्यक्तिमत्व , आत्तापर्यंत नोबेलसहीत ६४ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या आलंकृत आहेत.अशा अत्यंत तेजस्वी, निडर ओंग सान सू ची यांचा आज ६५ वा वाढदिवस ( १९ जून ); त्यांना दीर्घायुष्य लाभो; आणि त्यांचे यापुढील वाढदिवस स्वतंत्र ब्रह्मदेशात साजरे करण्याच भाग्य त्यांना आणि आंम्हा सर्वांना लाभो हीच प्रार्थना!
* संदर्भ : पुस्तक 'फ्रिडम फ्रॉम फिअर' आणि आंतरजालावरून साभार
दुसरं महायुद्ध संपायच्या पार्श्वभूमीवर झालेला जन्म. वडिल एक उच्च सेनाधिकारी; आई ब्रम्हदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरी. २ वर्षाची असतानाच वडिलांची झालेली हत्त्या. नंतर आईची नेमणूक भारतात ब्रह्मदेशाची राजदूत म्हणून झाली म्हणून दिल्लीतलं वास्त्व्य, इथेच गांधीच्या विचारांचा पडलेला प्रभाव. नंतर लंडन मध्ये उर्वरित शिक्षण त्यानंतर संयुक्त राष्ट्र्संघात नोकरी; नवर्याबरोबर भूतान, भारत, इंग्लंड मध्ये वास्तव्य आणि उच्च शिक्षण असा मुख्यत्वेकरून एक मुलगी-पत्नी-आई असा जीवनप्रवास ( स्वातंत्रलढ्यात सक्रीय कार्य नव्हतं तोपर्यंत ).
१९८८ मध्यी आईच्या आजारपणांत भेट द्यायला रंगूनला गेल्या असताना हुकुमशहा 'ने विन' च्या राजीनाम्यानंतर ( कार्यकाल ६२-८८ ) लोकशाहीच्या मागणीसाठी प्रचंड आंदोलनं झाली , झालेला हा उठाव सरकार कडून हिंसात्मकरित्या दडपला गेला आणि याचवेळी ओंग सान सू ची यांनी राजकारणात सक्रीय सहभाग जाहीर केला. सरकारनं जमावबंदीचा आदेश लागू केला असूनही लाखोंच्या जागृतीच काम केलं, या बंदीच्या दुसर्याच दिवशी नॅशनल डेमोक्रॅटिक लिग ची स्थापना केली आणि चळ्वळीच नेतृत्व त्यांच्याकडे आलं.
असहकार आणी अहिंसा ह्या तत्वावर हा लढा चालू आहे...या सगळ्या दरम्यान त्यांच्या आईचं निधन झाल आणि त्यावेळीच त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या आईवडिलांनी देशासाठी जस आयुष्य वेचल तसंच त्याही; वेळ्प्रसंगी प्राण देउनही देशसेवा करतील. देशाच्या चारीदिशांना फ़िरून जनमत तयार केल. पण १९८९ मध्ये झालेल्या निवडणूकांत भाग घेण्यासाठी सरकारकडून बंदी घातली गेली; त्यांना अटक झाली. ह्या बंदीनंतरही त्यांचा पक्ष ८२% जागा जिंकला पण हुकूमशाही सरकारन ही निवडणूक रद्दबादल ठरवली.
१९९५ मध्ये तब्बल ६ वर्षांनी नजरकैदेतून सुटका झाली; सुटकेच्या पहिल्या काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या सभांना लाखोंच्या गर्दीन पुन्हा आपल केलं आणि चिडून परत सभाबंदी जाहीर झाली. त्यांचे अनेक सहकारी मारले गेले कित्येक आजही तुरूंगात खितपत आहेत.
त्यांनी ब्रह्मदेशाला भेट देउ नका आणि कोण्तीही आर्थिक गुंतवणूक लोकशाहीची स्थापन झाल्याशिवाय करू नका अशी विनंती आंतरराष्ट्रीय समुदायाला केली आहे, अमेरिकेनं आर्थिक निर्बंध घातलेत पण आशियाई देश मात्र हा अंतर्गत मामला आहे म्हणून गप्प आहेत...सार्क परिषद्सुद्धा मूग गिळून आहे.
त्यांच्या पतीनं एकदाच शेवटच भेटू द्या म्हणून केलेली विनंतीही धुडकावून दिली गेली (त्यांच ९९ ला कॆन्सरन निधन झालय )हा सगळा व्यक्तिगत छळ, त्रास हा बर्माच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आवश्यक असा त्याग आहे अस त्या समजतात.
२००० साली परत अटक; २००२ ला सुटका; २००३ पासून परत नजर्कैदेत असं अट्क्-सुटका-परत अटक च्रक्र अव्याहत चालू आहे, लढा अजून सुरूच आहे.
नेल्सन मंडेलांनंतर 'स्वातंत्र्य लढा' या शब्दांना समानार्थी शब्द असं हे अद्वितीय व्यक्तिमत्व , आत्तापर्यंत नोबेलसहीत ६४ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या आलंकृत आहेत.अशा अत्यंत तेजस्वी, निडर ओंग सान सू ची यांचा आज ६५ वा वाढदिवस ( १९ जून ); त्यांना दीर्घायुष्य लाभो; आणि त्यांचे यापुढील वाढदिवस स्वतंत्र ब्रह्मदेशात साजरे करण्याच भाग्य त्यांना आणि आंम्हा सर्वांना लाभो हीच प्रार्थना!
* संदर्भ : पुस्तक 'फ्रिडम फ्रॉम फिअर' आणि आंतरजालावरून साभार
वाचने
5787
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!!!
हॅट्स ऑफ
असेच बोल्तो
In reply to हॅट्स ऑफ by सहज
या बाईवर
सिनेमाचं
In reply to या बाईवर by अप्पा जोगळेकर
माफ करा.
In reply to सिनेमाचं by शिल्पा ब
Silence and Fear: Aung san
In reply to माफ करा. by अप्पा जोगळेकर
सलाम
माझा
हॅ हॅ हॅ
In reply to माझा by मस्त कलंदर
आंग सांग ...
In reply to माझा by मस्त कलंदर
प्रदीप
In reply to आंग सांग ... by प्रदीप
धन्यवाद
In reply to आंग सांग ... by प्रदीप
लढा
In reply to धन्यवाद by पुष्करिणी
वाह!
In reply to लढा by प्रदीप
अॅडमिशन ऑफ गिल्ट!!!
In reply to वाह! by सहज
+२
In reply to वाह! by सहज
+३
In reply to +२ by मस्त कलंदर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुमचे सर्व
In reply to लढा by प्रदीप
हा आणि ह्या आधीचा अतिशय उत्तम प्रतिसाद!
In reply to लढा by प्रदीप
प्रदीप,
In reply to आंग सांग ... by प्रदीप
सावरकर !
In reply to आंग सांग ... by प्रदीप
हम्म्म्.
In reply to सावरकर ! by मिसळभोक्ता
काटछाट
In reply to हम्म्म्. by चतुरंग
देयर यू गो!!
In reply to सावरकर ! by मिसळभोक्ता
आम्हाला
In reply to सावरकर ! by मिसळभोक्ता
सलाम
उत्तम
सलाम!!!!!!
सलाम
+१
In reply to सलाम by ३_१४ विक्षिप्त अदिती
आँग सान बद्दल आधी वाचले होते
लेख