मानवजातीबद्दल तो म्हणतो. "किरणोत्सारी पदार्थांचे गुणधर्म एकवेळ बदलता येतील पण मानवाच्या मधला आसुरशक्तीचा अंश काढून टाकणं महाकठिण!"
१००% सत्य बोलला आहे हा शास्त्रज्ञ.....
(महर्षि कणाद प्रेमी)
मदनबाण
मी तिथे जाऊन त्याच्या काम करण्याच्या जागेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आलोय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार तिथे कोणतंही स्मारक वगैरे केलेलं नाही. त्याची खोली सध्याचे प्रोफेसर वापरत असतात. तिथे फक्त त्याच्या नावाची एक पाटी आहे. मला त्याजागी उगीचच भारल्यासारखं वाटलं.
हीच तर तीर्थक्षेत्रे!
आइनस्टाईनवरचा लेख आवडला हे वेसांनल.
स्वाती
धन्यवाद! अशी वेगळी माहिती इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्द्ल... अशा महान लोकांमुळे जग बदललं पण त्याने लिहील्याप्रमाणे वृत्ती बदलणं शक्य नाही... सापेक्षतावाद सोडला तर हे चांगले विचार सामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत..
त्यासाठी पुन्हा एकदा भार...
मागच्याच आठ्वड्यात आईनस्टाईनची बायोग्रफी आणली होती.. व्हायोलिनबद्दल वाचून मजा वाटली होती मला.. माझ्या दुर्दैवाने मी त्या पुस्तकामधलं फिजिक्स फार काळ सहन नाही करू शकले, म्हणून अर्धवट सोडुन दिले पुस्तक.. आता हळहळ वाटतीय.. असो..
लेख मस्तच लिहीलाय... प्रिंस्टन विद्यापिठातली ती खोली अजुन प्राध्यापक वापरतात हे भारीच.. काय वाटत असेल ना त्या लोकांना.. :)
पेटंटच्या कार्यालयातील कारकून हा. सरकारी खात्यातील नीरस वातावरणांत देखील याची स्वप्ने पाहाण्याची वृत्ती जिवंत राहिली. सापेक्षतावादाची कल्पना सुचल्यावर हा कमालीचा बेचैन झाला. कारण त्याला याचे गणिती स्पष्टिकरण पाहिजे जर्मन शास्त्रज्ञ गॉस (की मॅक्सवेल? नक्की आठवत नाही) याने त्याला मदत केली व एकदाचा याने पेपर लिहिला. ही हकीकत मनोज्ञ आहे.
याला शाळेतून हाकलले होते. क? तर याने शिक्षिकेला विचारले की आपण जर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असलो तर आपल्याला बाजूने जाणारी प्रकाशशलाका कशी दिसेल?
परंतु तारे जमी पे या चित्रपटात म्हटल्याप्रमाणे याला डिसलेक्सिया होता असे माझ्या वाचनात नाही.
सुधीर कांदळकर.
डिसलेक्सीया नव्हता.. पण भाषा या प्रकारात फार इंतरेस्ट किंवा गती नव्हती असे मी वाचले..
शिवाय त्याला शाळेतून काढून टाकले होते वगैरे ऐकिवात होते ते सुद्धा चुकीचे आहे असं वाटते.. त्याला लष्करी शिस्तीची शाळा आवडत नव्हती व ठराविक वय झाल्यावर लष्करात भरती व्हावे लागत असे, त्यामुळे त्याने ती शाळा सोडली.. व दुसर्या राज्यातल्या शाळेत गेला..
डिस्लेक्शिया किंवा लर्निंग डिफिकल्टी नव्हती. शाळेतून काढल्याचे वगैरे ऐकिवात नाही. विषयाची मूलतत्त्वे समजून न घेता फक्त पाठांतरावर जोर देणार्या शिक्षणाचा मात्र त्याला तिटकारा होता.
(अवांतर - अरेरे, कसे होणार आपल्याकडील १० वी आणि १२ वीच्या मेरिट लिस्टमधे येण्यासाठी मुलांना इतके क्लासेस लावणार्यांचे;))
गणित आणि भौतिकीमध्ये उत्तम गुण मिळवूनही 'फेडरल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', झूरिक, ह्यांची प्रवेशपरीक्षा मात्र तो उत्तीर्ण होऊ शकला नव्हता!
तुम्ही म्हणता आहात तो प्रकाशकिरणाच्या बरोबर प्रवास करण्याचा 'वैचारिक प्रयोग' (थॉट एक्सपेरिमेंट) त्याने वयाच्या १६ व्या वर्षी केला - ज्यातून त्याला सापेक्षतावादाकडे जाता आले.
चतुरंग
आईन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला... ह्यापलीकडे मला फारसे काही माहीत नव्हते. (बिच्चारा आस्टा)
चतुरंगांच्या लेखनामुळे थोडी ज्ञानात भर पडली. हा लेख योग्य प्रसंगी लिहिल्यामुळे औचित्यही साधले गेले आहे असे वाटते.
ह्या थोर शास्त्रज्ञाला माझी विनम्र आदरांजली.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
प्रतिक्रिया
वंदन
असेच
अल्बर्ट आईनस्टाइन
या महान शास्त्रज्ञाला माझे अभिवादन.
तीर्थक्षेत्र
रंगा,
लेख आवडला
असेच
धन्यवाद
खुप छान लेख..
या तत्त्ववेत्त्याला प्रणाम
अप्रतिम व्हायोलिन फीत आणि त्यातली प्रसंगोचित माहितीसुध्दा!
सुंदर लेख!
मागच्याच
स्विट्झरलंड्मधील .........
डिसलेक्सी
प्राथमिक शाळेत असताना त्याच्या बोलण्यात थोडे दोष होते.
एका .......
प्रासंगिक आणि औचित्यपूर्ण!
थोडक्यात