Skip to main content

तुम्हांला हे आठवतयं

लेखक chintamani1969 यांनी गुरुवार, 13/05/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याच जुन्या आठवणी आपल्याल्या आणि आपल्या मूडला फ्रेश करतात आणि मग ...... आपल्या कामाला फ्रेश तो दूरदर्शनचा गोल गोल फिरणारा लोगो दूरदर्शनचाच तो पट्ट्या पट्ट्या चा स्क्रीन सेव्हर .... कार्यक्रमापेक्षा व्यत्ययाचीच पाटी अधिक मालगुडी डेज ताना ना ताना ना ना ना रामायण देख भाई देख मिले सूर मेरा तुम्हारा टर्निग पॉईंट भारत एक खोज महाभारत अलीफ लैला व्योमकेश बक्शी तहकीकात ही म्यान आणि ती सलमा सुलतान .........समाचार सांगणारी विको तरमारिक नाही कॉस्म्यातिक ... किंव्हा वॉशिंग पावडर निरमा ........दूध सी सफेदी निरामासे आयी रंगीन कपडेभी खिल खिल जाये .... आय आम कॉम्प्लान बॉय आय आम ए कॉम्प्लान गर्ल तो बॉय आता केवढा मोठा झाला आहे ... अहो तोच तो शाहीद कपूर आणि ती गर्ल परवाच तीच म्हणे लग्न झालंय म्हणे ..... आयेशा टाकिया आणि आपली रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक ह्यांची सुरभी रघुवीर यादवचा गोंधळ ..... मुंगेरीलाल के हसीन सपने , गाजर खाणारा करमचंद,विक्रम वेताळ..... आणि बरेच काही ........ हा आपला साधारणपणे ८० ते ९० चा काळ.. नो सीटबेल्ट,नो ऐअर ब्याग्ज.....ट्रकच्या फाळक्यावर बसून प्रवास आणि तो सर्वांना आरामदायी वाटायचा .....लहान मुलांसाठी त्या रंगीबेरंगी बाबा गाड्या ..... सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्ड चा तुकडा लावून त्याचा येणारा फटर फटर .. अगदी फटफटीचा आवाज ..त्यामुळे सायकलची तास न तास भटकंती.....त्या सायकलच्या शर्यती .... ट्रीप ... नो सेफ्टी हेल्मेट्स,नो नी प्याड, नो एल्बो प्याड .......तहान लागली की दिसेल त्या सार्वजनिक नळाला तोंड लावून पाणी प्यायचे ......... नो बॉटल वाटर .........ती पोस्टाची तिकिटे ...... काडेपेट्याची कव्हर्स , आणि बरंच काही जमा करायचंय आणि जोपासायचा छंद आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर उनाडक्या.....खेळ ....मात्र कुठल्याही परिस्थितीत अंधार व्हायच्या आत घरात आणि नंतर शुभं करोति .......................
लेखनविषय:

वाचने 21373
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by इरसाल

कसला विचार करतोस रामण्णा. घराला आणि गोठ्याला कुठली पत्रे वापरावे हेच काळात नाही बघ. अरे चारमिनारचे अस्बेस्टॉस-सिमेंट चे पत्रे विकत घे. माझ्या आजोबांनी घराला बसवलेले सिमेंटचे पत्रे ...अजूनही शाबूत हायेत. अरे खरंच की. मी ही चारमिनारचे पत्रे घेउन येतो. चारमिनार...भारतातील सर्वाधिक विक्री असलेलं अस्बेस्टॉस सिमेंट उत्पादन - लहानपण देगा देवा

खरंच उशीर झाला धागा बघायला. जवळजवळ सगळे वर सांगीतलेले आहेच सगळ्यांनी! पूर्वीचं रंगोली कोण कसं विसरलं बुवा! रवीवारी सकाळी ७ वाजता उठणं जीवावर यायचं पण रंगोलीसाठी म्हणून खास उठायचो! :) राघव

मस्त स्मरणरंजन.... माझ्यावेळच्या कार्यक्रमांच्या आठवणी ताज्या झाल्या. बिपिन कार्यकर्ते

काय छान आठवणींना उजाळा मिळाला.

कितीकाळ तर lifebouy दुसरा साबण कोणी वापरू शकतं यावर विश्वासच नव्हता....lifebouy अंघोळीला आणि कपडे धुवायला washing powder निरमा.... झी हॉरर शो राहिलाच...आणि lifebouy है जहां तंदुरुस्ती है वहा... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

कि खोज देखिल खुप आवडीने बघत असे :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

छान चर्चा!!!!!!!! ते दिवस पुन्हा भर्रकन डोळ्यापुढे आले. त्यावेळी सुध्द्दा आवो मारी साथी, संताकुक्डी, अशा इतर भाषीक कार्यक्रमांचा जास्त भरणा पाहून मराठी भाषेवर अन्याय होत असल्याबद्दल दुरर्दशनचा राग यायचा... . साप्ताहीकी सुध्दा प्रथम हिन्दीत सादर व्हायची.. असो. तात्या अभ्यंकरांचा याच धर्तीवरचा एक लेख यापुर्वी वाचल्याचे आठवतेय. काहीही असो..चिमणरावांचे ... माफ करा.. चिंतामणीरावांचे या लेखाबद्दल धन्यावाद.

पूरबसे सूर्य उगा फैला उजियारा जागी हर दिशा दिशा जागा जग सारा पूरबसे सूर्य उगा.... पेंटिंग करणारा मुलगा अणि फिरायला निघालेले आजोबा यांची!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

तबस्सुम चा "फुल खिले है गुलशन गुलशन" ... रविवार सकाळी ७ वाजता येणारी "रंगोली" ... एक इंग्रजी मालिका होती ... पण अभिनेते / अभिनेत्री हिंदी ... A ...full of Sky ... असं काहीसं नाव होत ... मिलिंद सोमण, राहुल बोस होते ते नक्की आठवतंय ... कुणाला आठवतंय का त्या बद्दल ?

लई पावरबाज मेम्री हाय लोकानची ! मजा आली वाचताना. त्याही पूर्वीच्या काळात म्हणजे रेडिओच्या जाहिराती आठवल्या. एक कुटुंबनियोजनाविषयी जाहिरात होती. 'आशीर्वाद देई बाळा सौख्यवंत हो तू, औक्षवंत हो तू | हॅ, हॅ, हॅ, हॅ काय रे दादा, नंदू आता तीन वर्षाचा झाला ना ? अगं हो, आज तर त्याचा तिसरा वाढदिवस! मग नंदूला आता बहिण नको का ? ते तुझ्या वहिनीलाच विचार की! सगळे जण कोरसमधे: इश्यं ! दुसरं मूल आत्ता नाही तीन नंतर कधीच नाही. तळटीपः आमच्या वर्गातली पोरे याची नक्कल करताना वहिनीच्या जागी मोलकरणीलाच विचार की असे म्हणत! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

जुन्या सिरिअल्स चे फोटो सापडले होते पण काहीतरी एरर येते आहे....फोटो दिसत नाहीत... वेळ मिळाला कि परत प्रयत्न करते.

कोणाला अमृतमंथन मालिका आठवत नाहीए का? वसुंधरा पेंडसे नाईक असायच्या त्यात.... चर्चा चालायची संस्कृत साहित्यावर, मला तेव्हा त्यातले जाम काही कळायचे नाही. पण तिचा आवाज, वाणी, स्पष्टोच्चार, हसणे व लांबसडक केस फार आवडायचे!!! 8> त्यानंतर मोहन गोखलेंची श्वेतांबरा व मिस्टर योगी मालिका, ओम पुरी दीपा मेहता ची तमस, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तृष्णा - संगीता बिजलानी होती त्यात, तितलियां नावाची एक सह्ही सीरियल लागायची. किट्टू गिडवानीचीही एक सुंदर सिरियल लागायची.... नाव आठवत नाहीए.... तिचीच व रोहित रॉय ची अजून एक सीरियल होती.... ती त्याची सावत्र आई असते.... रविवारी विक्रम वेताळ, दादा दादी की कहांनियां - अशोक कुमार, दादीमां के नुस्खे मध्ये दीना पाठक घरगुती औषधी उपाय सांगायची. महाभारत, रामायण.... हमलोग, बुनियाद, पल्लवी जोशीची एक सिरियल लागायची - त्यात ती गर्भार असते आणि तिची स्मृती गेलेली असते......नाव काय बरे? किलबिल, संताकुकडी, आमची माती आमची माणसं, कामगारविश्व हे देखील भक्तीने बघायचो :) बातम्या देताना अनंत भावे, प्रदीप भिडे, आकाशानंद, चारुशीला साबळे, भक्ती बर्वे वगैरे. इंग्रजीतून मीनू. सुरभि, क्विझ टाईम, रविवार दुपारचे प्रादेशिक चित्रपट, शनिवार सायंकाळचे मराठी चित्रपट......... ये जो है जिंदगी तर खल्लासच! स्वरूप संपत च्या अजून अशाच एक-दोन सीरियल्स नंतर येऊन गेल्या. होळीच्या वेळी भरणारे हास्यकवी संमेलन.... गजरा..... रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या.... व्यत्ययच्या पाट्या.... आपण यांना पाहिलंत का?..... त्या कुटुंबनियोजन, एकी हेच बळ इ. इ. संदेश देणार्‍या कार्टून फिल्म्स.... लई मजा!!! :-) :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

कोणाला अमृतमंथन मालिका आठवत नाहीए का? वसुंधरा पेंडसे नाईक असायच्या त्यात... अर्थातच आठवते. तसेच शास्त्रीय संगितावरून कुठलातरी एक मराठीत कार्यक्रम असायचा. डॉ. मोहन रानडे मला वाटते त्याचे सुत्रसंचलन करायचे. किलबिल, संताकुकडी, आमची माती आमची माणसं, कामगारविश्व हे देखील भक्तीने बघायचो खरे आहे! यावरून रविवारची, "प्रतिभा आणि प्रतिमा" ही मालीका पण आठवली. अशाच दिवाळीच्या शनिवार-रविवारी पुल, श्रीकांत मोघे आदी दिग्गजांचे वार्‍यावरची वरात आणि एका रविवारची कहाणी बघितल्याचे आठवले. बातम्या देताना अनंत भावे, प्रदीप भिडे, आकाशानंद, चारुशीला साबळे, भक्ती बर्वे वगैरे. इंग्रजीतून मीनू. तसेच हिंदीतील हरीश भिमाणी, सरीता सेठी, इंग्रजीतील लोकू संन्याल, मराठीतील चारूशिला पटवर्धन, ज्योत्स्ना किरपेकर आणि अवघ्या महाराष्ट्राला चटका लावून गेलेली नंतरची विख्यात अभिनेत्री स्मीता पाटील यांनी दिलेल्या बातम्या पण आठवल्या... बाकी या वृत्तनिवेदक-निवेदिकांच्या बाबतीत, चांगली पर्सनॅलीटी, स्टाईल वगैरे असूनही, "नाकावरून माशी हलत नाही" हा वाक्प्रयोग अक्षरशः खरा ठरायचा ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by अरुंधती

आणि बातम्यांच्या आधी सुविचारांच्या पाट्या!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

किट्टू गिडवानीचीही एक सुंदर सिरियल लागायची.... नाव आठवत नाहीए.... तिचीच व रोहित रॉय ची अजून एक सीरियल होती.... ती त्याची सावत्र आई असते.... स्वाभिमान. रोहित रॉयची सावत्र आई म्हणजे अंजु महेंद्रु. आशुतोष राणा च त्यागी कॅरेक्टर लैच भारी होत त्यात.

In reply to by Dhananjay Borgaonkar

स्वाभिमानचं टायटल साँग द्या की रे कोणीतरी..... -शान मुहाब्बत...नफरत प्यार...दौलत शोहरत..भागम भाग...

In reply to by Dhananjay Borgaonkar

आणि त्यातच मनोज बाजपाईसुद्धा होता. वकिलाच्या भूमिकेत. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by Dhananjay Borgaonkar

नाही नाही, अन्जु महेंद्रु त्याची सख्खी आई असते (रंजना देवी) आणि किटु गिडवानी सावत्र आई असते (स्वेतलाना नाव असतं तिचं). मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

त्या सत्यजित रें च्या भयकथा आठवताहेत का कुणाला? . त्या कथा बघीतल्यावर चाळीतील कॉमन टोयलेट मधे जाताना चळाचळा कापत असे (भरीस भर म्हणुन बहुतेक वेळा गेलेला बल्ब कुणी लावायचा या वादात अंधारच असायचा) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by एक

कथेच नाव होतं "पोर्ट्रेट" अजुन एक कथा आठवते "भुतनाथ" त्यामधे करमचंद फेम पंकज कपुर होता.बोलक्या बाहुलीत अत्मा वगैरे *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अजून काही - मिस्टर अँड मिसेस - अर्चना पुरणसिंग , जयंत क्रूपलानी. हलकी फुलकी कॉमेडी होती वाह जनाब - शेखर सुमन , किरण जुनेजा खानदान - बरेच कलाकार होते - किट्टू गिडवानी, मोहन भंडारी, सोनी राजदान. सुबह - शिर्षक गीत मस्त होतं - ए जमाने तेरे, सामने आ गये .... चुनौती - चन्ना रुपारेल , अरिफ जकारिया, सुचित्रा कृष्णमूर्ती आ बैल मुझे मार - परेश रावल गुब्बारे कथाकलश मालगुडी डेज- चिरकाल स्मरणात राहिली आहे. फौजी - शाहरुख खान नीव - शालेय जीवनावर होती..असगर अली आठवतोय त्यात तेहकिकात - विजय आनंद , सौरभ शुक्ला विक्रम वेताल - अरूण गोविल गुल गुलशन गुलफाम - परिक्षित सहानी , राधा सेठ , कवलजित, कुणाल खेमू पण होता...डेब्यू रोल होता एक अनुराधा पटेल आणि कवलजित ची पण सिरियल होति . नाव आठवत नाहिये. जय महाराष्ट्र , जय मराठी !

शेखर सुमन ची Reporter...त्यात बाबा-बुवा लोकांचा बुरखा टरकवणारा एपिसोड होता...खरंच काळाच्या पुढे आणि निर्भीड होता लेखक. - लहानपण देगा देवा

अजून काही कार्यक्रम: १) दुरदर्शन वर (बहुदा डी डी २/सह्याद्री वर) दर बुधवारी संध्याकाळी साडे सातला लागणारा 'कवी शब्दांचे ईश्वर' हा एक अविस्मरणिय कार्यक्रम होता. शाळेत शिकताना नुसत्या नावानी माहीत असलेल्या कवींच्या विविध कवितांची छान ओळख करून दिली ह्या कार्यक्रमाने मला. २) रविवार सकाळी ७.३० वाजता लागणारा 'रंगोली' हा कार्यक्रम. ३) रविवार सकाळी ११ वाजता लागणारा 'नींव' हा कार्यक्रम. ४) अजून एक कार्यक्रम होता ज्यात प्राध्यापक राम शेवाळकर 'मेघदूत' उलगडून सांगायचे. पण आता नावं आठवत नाही. ५) 'द वर्ल्ड धिस विक' पण खुप छान कार्यक्रम असायचा. ६) 'होनी अनहोनी' हा एक खुप जबरदस्त कार्यक्रम लागायचा. जाम घाबरायचो मी तेव्हा तो बघायला. सत्य घटनांवर आधारित असही सांगायचे प्रत्येक भागाआधी. एका भागात एका लहान मुलाच्या अंगात भुत येत आणि तो जुलमी सावकाराचा खुन करतो अशी काहीशी कथा होती. त्या भागात एक पात्र (बहुदा तो सावकार) पैसाss पैसाss पैसाss.... नोटss नोटss नोटss असं काहिसं म्हणताना दाखवला होता. एकदम जबरा असायचे काही काही भाग! :) मुशाफिर.

फ्लॉप शो मुळे तर रस्तात एखादा सरदारजी दिसला तरी खुप हसायला यायचे.. कोणाला "नीव" मालिका आठवते का? ४-५ एपिसोडच झाले..पण छान मालिका होती. "धरती पर्..सुरज की किरणे..रख्खे नीव उजाले की..." असे काहीतरी शिर्षक गीत होते.. ओहो दिपिकाजि आइये आइये, ये.............मान गये. किसे ? आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनों को.. यातला म्हातारा फारच रंगेल वाटायचा..या वरून मि.पा. वरच्या एका जेष्ठ सदस्याची आठवण येतेय.. सगळ्यात जाम पकवले असेल ते "चंद्रकांता" ने...मुळ कथा सोडून भलताच धिंगाणा चालू होता... खादाडमाऊ