

कथा आहे एका भटक्या कुटुंबाची आणि त्यांच्या जित्रापाची!! वसंत ऋतूच्या सुरवातीला यांच्या जित्रापाचा विणीचा हंगाम.
कथा घडते मन्गोलिअन वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर. दूर वर पसरलेले वाळवंट आणि खुरटी झुडुपे. जित्राप म्हणजे मेंढ्या, शेळ्या आणि उंट.
हे नोमाडीक कुटुंब त्यांच्या जित्रापावर पुरे पूर अवलंबून, पण म्हणून या नात्यात कुठे ही व्यवहार वां पिळवणूक अजिबात जाणवत नाही. हेच तर या चित्रपटाच मर्म. चित्रपटाचे डायरेक्टर Byambasuren Davaa आणि Luigi Falorni यांचे हेच मोट्ठे वैशिष्ट्य . पुरी कथा कुठेही interfere न करता एखाद्या डॉक्युमेंटरी सारखी आपल्या समोर उलगडत जाते.एक दोन प्रसंग जेथे थोड मंगोलियन संस्कृतीच दर्शन घडवण्याचा मोह त्यांना आवरला नसावा तिथच डायरेक्शन जाणवत. बाकी सार जसं च्या तस्स, नैसर्गिक !!
तर या कुटुंबाच्या काही उंटीणी प्रसवाच्या बेतात आहेत. त्याचं या हंगामाच पाहिलं पिलू अगदी व्यवस्थित जन्माला येत. कुटुंबातली आजी हे दुध गरम करून चारी दिशांना वाहते आणि मग सारे जण त्याचा आस्वाद घेतात. निसर्गाच्या प्रती असणारी त्यांची आस्था कुठे तरी आपल्या खेड्यातील श्रद्धेची आठवण देऊन जाते. तर रात्रीत सारया उंटीणी सुखरूप सुटतात, सारी रात्र कुटुंब प्रमुख आणि त्याची कारभारीण धावपळ करत राहतात. पण एक पहिलीटकरीण मात्र प्रसव वेदनांनी तळमळत राहते. कारभारीण पुन्हा पुन्हा मायेचा हात फिरवून तिला आधार द्यायचा प्रयत्न करते.
शेवटी मोठ असणार तो बछडा थोडासा जबरदस्तीन ओढून जन्माला येतो आणि या चित्रपटाच नाट्य सुरु होत. जे पूर नैसर्गिक.
त्या अत्यंत वेदनादायक प्रसवान घायाळ झालेली ती पहिलट करीन आपल्या पिल्लाला साफ नाकारते . आई च्या मागून नैसर्गिक ओढीन फिरणारा तो अजाण जीव आणि post natal depression मध्ये गेलेली मादी!! या दोन्ही ला जोडणारी ; त्या पिलाला वरून दुध पाजणारी ; आणि त्या आईला " किती सुंदर आहे बाळ तुझा घे ना जवळ" असं सांगणारी त्या कुटुंबाची सून.
ही स्वत: ही तीन मुलांची आई! घराची देखभाल , जीत्रापाच काम आणि ओटी मध्ये एक लहाण अजून रांगणार बाळ. हे सार ती सांभाळते.
सारा वेळ दिवसाच्या उन्हात आणि रात्रीच्या थंडीत ते उंटाच पिलू हुंकारून हुंकारून आई ला बोलावत राहत, पण ती माय त्याला धुडकावून लावत वाळवंटात सैरावैरा फिरत राहते . तोंडातून फेसाचे फुगे सोडत पिलाला धमकावत राहते. पार्श्वभूमीवरचा तो टाहो आपल्याला अस्वस्थ करून राहतो. मग शेवटी त्या उंटीणी साठी त्यांचा तंत्र मंत्र उपाय करायचं ठरवलं जात. त्या साठी परवडत नसणारा खर्च करून उंटा वरून दोन दिवस प्रवास करून शहर गाठल जात. एक वायोलिन वादक शिक्षक आणला जातो. हा शेवटचा प्रसंग पाहताना डोळ्याच पाणी ठरत नाही. खरच ही लोक अशिक्षित? असा प्रश्न पडतो. वायोलिन च्या धुनीला गाईड करत, त्या घाबरल्या मादीवरून प्रेमान हात फिरवत ही सून फक्त उच्च स्वरात "सां सां सां ! हे ! सां सां सां " हे गाण गाते. इतक सुंदर गीत मी आज पर्यंत नाही ऐकल. हळू हळू पिलाला आई कड आणलं जात. पहिला ती बिथरते पण मग त्या गाण्यान आणि त्या वायोलिन च्या व्याकूळ सुरांनी तिचे डोळे भरून येतात. मनाचा बांध फोडून दुख: झिरपायला लागत.आणि त्या अश्रून बरोबर तिला पान्हा फुटतो.पहिला घोट घेऊन पिलू आईचा एक भाग बनत.
खरच का ते तंत्र मंत्र होते? की संगीताच्या माध्यमातून केलेला depression वरचा तो उपाय ? मनाला भिडते ती त्या कुटुंबान दाखवलेलं आपलेपण एका आई च दुख: समजावून घेवून एकदाही जबरदस्ती न करता केलेले प्रयत्न. एकदा तरी पहावाच असा , एकदा तरी अनुभावावाच असा national geography न गौरवलेला हा "THE STORY OF WEEPING CAMEL"
http://video.google.com/videoplay?docid=6668096176688447819# इथे पहा!!
प्रतिक्रिया
पिक्चर ची
हे घ्या
थैन्क्स
छान ओळख!
किती सुंदर
सुंदर
खरच आई
खूप मस्त
फार छान परीक्षण . .
आधि लिन्क
अपर्णाजी
छान चित्रपट
मस्त लिहलय
संगीताची
सुरेख