४ चारोळ्या
लेखनविषय:
आताशा डोळ्यात
आषाढमेघ येऊन वसलाय
मनात मात्र माझ्या
वैशाखवणवा पेटलाय
*********
तुझी जागा मनामध्ये
अपुरीच राहिली
फुल खुडलेल्या देठाला का
कधी पुन्हा कळी आली?
*********
प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं
*********
माणसे तशीच राहतात
युग फक्त सरते
महाभारतातली द्रौपदी
कलियुगातही झुरते
सुरेश नायर
https://sites.google.com/site/surmalhar/
वाचने
2389
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
महाभारतात
In reply to महाभारतात by टारझन
प्रतिक
In reply to प्रतिक by sur_nair
का म्हणे
In reply to का म्हणे by टारझन
कुणाकडे?
फुल
प्रत्येका
In reply to प्रत्येका by प्राजु
+१
धन्यवाद
शेवटची कळली नाही
तुझी जागा