अरुंधती सर्वात प्रथम हा किस्सा मनमोकळेपणाने सांगीतल्याबद्दल तुमचे आभार.
फारच रोचक आणि थरारक तसेच भावनांना हात घालणारा अनुभव आहे.
मी तर म्हणेन तो फकीर मनकवडा (माइंड रीडर) होता. पूर्वजांबद्दल खरही असेल नव्हे असेलच असेल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
काय राव, अशी थट्टा नका करु! :-) तिथं काय त त प प झाली होती ने नाही कळणार बरं! पळता भुई थोडी का काय म्हणतात ना, त्यातली गत! आज तो अनुभव आठवला की मजा वाटते, पण तेव्हा तंतरलीच होती चांगली!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
किस्सा अजब आहे खरा..
लेखनशैलीही छान..
अरुंधतीदेवी, येऊ द्यात अजूनही असेच काही किस्से! :)
अण्णांवरच्या भक्तिपायी मी एकदा गदगला गेलो होतो, तेव्हाच विजापूरही पाहून झाले..
तात्या.
हो ना मीनल, काही कोडी उलगडत नाहीत आपण कितीही डोके खाजवले तरी! हे बहुधा त्यातलंच कोडं आहे. किती विचार केला तरी बुध्दीला पटेल असे समाधानकारक स्पष्टीकरण नाही देता येत इथे!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अजब किस्सा!
लहानपणी एकदा नाशिकला गेलो असता, एका भटजींच्या घरी आजोबा-पणजोबांचे हस्ताक्षर पाहून असाच गदगदलो होतो. पण हा किस्सा तर अफाटच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने!
आई व्यवहारी दिसते.
त्याकाळी धर्मांतरे ही जीवन स्वास्थ्यासाठी व्ह्यायची. बळजबरीने असो स्वखुशीने असो . एका पत्रकाराने अंतुलेंचे पुर्वज हे कोकणस्थ ब्राह्मण असल्याचे वंशावळीतुन सांगितले होते. त्यावर अंतुले म्हणाले काय फरक पडतो माझ्या कैक पिढ्या इथल्याच मातीतल्या आहेत. (ऐकीव / वाचीव किस्सा) हल्ली काही कुलवृत्तांतांचे संकलन होउ लागले आहे. त्यावरुन काही माहिती मिळते. आपल्याला आजोबांच्या मागील पिढीबाबत काही माहित नसते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अरुंधतीतै,राग मानू नका,एक प्रश्न आला मनात!
जर तुमचे पूर्वज(धर्मांतरीत) मुसलमान होते...असे मानले तर तुम्ही कसे हिंदू?...म्हणजे त्यापैकी नंतरच्या कोणत्या पिढीने पुन्हा हिंदू धर्मात येणे केले?
देवसाहेब, तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. लक्षात घ्या, हे आमच्या (वडीलांच्या) मागच्या चौथ्या - पाचव्या पिढीतील लोक होते, रक्ताचे नाते असले तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराने [नवरा, बायको व मुले] मुस्लिम धर्म स्वीकारला होता -- पण ते आमच्या भावकीमधले [ म्हणजे चुलत-चुलत, कझिन्स ऑफ कझिन्स] होते. त्यामुळे ते जरी मुस्लिम झाले असले तरी त्यांचे इतर बंधू-भगिनी हिंदूच होते. ह्या सर्व हिंदू भाईबंधांची वंशावळपण मग हिंदूच!
मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या गृहस्थांचे संगीत गुरु मुस्लिम होते. आणि त्यांच्या सन्मानार्थ, स्मरणार्थ किंवा एक समर्पणाची भावना म्हणून, जो माझ्या गुरुचा धर्म तोच माझा धर्म ह्या भावनेने त्यांनी हा धर्म स्वीकारला असावा असे वाटते.
त्यांचा मृत्यू कसा व का झाला, एकाच ठिकाणी सर्व परिवाराला का पुरले, सगळ्यांचे मृत्यू एकाच वेळी झाले किंवा कसे, ह्या गोष्टींबाबत आत्तातरी कळायला जास्त मार्ग नाही. हयात नातेवाईकांना ह्याबाबत सुतराम कल्पनाही नाही. अन्य कोणाकडे ह्या संदर्भातील कागदपत्रे, उल्लेख, नोंदी वगैरे मिळाले तरच तपास लागू शकेल. धन्यवाद! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
माझा तेवढा उत्साह नाही, पण चुलतभावाने हे ऐकले तेव्हापासून त्याच्या डोक्यात पुढची छाननी करण्याचा किडा वळवळतोय! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
मानो या ना मानो...पण काही गोष्टी खरचं अगम्य असतात...
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
प्रतिक्रिया
खरोखर अजब
अरुंधती
कुल !!
नाडी
>>नाडी
फकीर आणि नाडी?
किस्सा अजब
सु रे ख
साधारण
बापरे
मीनल
अजाब
अकल्पित
एक प्रश्न!
देवसाहेब,
कमाल आहे
+ सहमत
आश्चर्यकारक
माझा तेवढा
छान!
एक वेगळाच
मानो या ना मानो...