वा गोडबोलेसाहेब! केवळ अप्रतिम कविता...
वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली
वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली
नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित
नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत
किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे
ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे
या ओळी अतिशय आवडल्या. सुंदर...!
गोडबोलेसाहेब, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!
अवांतर - आपली कविता वाचून आपल्या घरी फोन केला होता, परंतु आजच आपले पनवेलात ज्ञानेश्चरीवर प्रवचन आहे असे काकूंकडून कळले. असो, सवडीने केव्हातरी पनवेलात आलो की आपली भेट अवश्य घेईन..
तात्या.
अप्रतिम..!
हेच म्हणते..
अत्यंत सुंदर, गेय, प्रासादिक रचना!