'शशिकांत' नावाचे अनेक लोक असणार त्यापैकी ती पट्टी माझीच कशावरून ठरणार? असे न होण्यासाठी पट्टीत व्यक्तीच्या आई-वडिलांची नावे, पति वा पत्नीचे नावे, जन्मदिनांक, जन्मकालाची ग्रहपरिस्थिती, शिक्षण व सध्याची नोकरी वा व्यवसायाची माहिती भावा-बहिणींची, अपत्यांची संख्या असे अनेक दुवे त्यापट्टीत लिहिलेले असतात. त्यासर्वांवरून विशिष्ठ ताडपट्टी आपली आहे किंवा नाही याचा पडताळा घेता येतो.
काय थोतांड आहे तिच्यायला!
समजा मी लग्न केले आणि माझा पहिल्या अपत्याची नाडी पहायला गेलो. तर सापडेल का? तिथे त्याच्या भावा बहिणीची माहिती असेल का? (असेल असे मानले तर)च्यायला मी दुसरा अपत्याला जन्मच द्यायचा नाही असे ठरवले तर काय तुमची नाडी जन्माला घालणार का?
अविवाहीताने जर नाडी पाहिली,तर त्याच्या नाडीत भावी पत्नीचे नाव असते का? अपत्यांची नावं असतात का? ब्रह्मचार्याच्या नाडीत कुणाकुणाची ननावे असतात?
गजानन कुळकर्णी, आइ लक्ष्मी कुळकर्णी आणी वडील विठ्ठल कुळकर्णी अशी पन्नास एक काँबीनेशन्स तर नक्की सापडतील (काही वर्षापुर्वी त्यात गजाननबुवा बॅंकेत अशीही अनेक काँबीनेशन्स असतीलच)
आणि तुमच्या नाडीत एचडीएफसी बॅंकेत नोकरी वगैरे पण माहीती असते का? न्यु यॉर्क स्टॉक एक्सेंजमध्ये कीती गुंतवणुक करणार हे ही असेलच!
एकविसाव्या शतकात काय हे फालतु पालुपद लावुन ठेवलंय च्यामारी.
ओकसाहेब, आपण साला फ्यॅन आहे तुमचा हे पुन्हा एकदा कबूल करतो..माझ्यासकट सार्या नाडीविरोधकांना भांचोत पार जेरीस आणलंत तुम्ही, नामोहरम केलंत! नाडीदेवींचा पुन्हा एकदा विजय असो..! :)
मला नाडीग्रंथांतील अदभूतता सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
क्या बात है..सुंदर वाक्य. आपली दाद स्विकारा ओकसाहेब!
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे.
ओकसाहेब, इथे हमीर किंवा गौडसारंग हवा. 'लकेर' हा शब्द अश्या हलक्याफुलक्या रागांकरता अधिक शोभून दिसतो..
संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय.
चालेल..
बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे.
हेही चालेल.. बसंतच्या ऐवजी मधुवंती/यमनही चालतील..
शंकरारागातील खर्जातून सुरू झालेला ख्याल
मिष्टेक ओकसाहेब.. शंकरा हा मुळातच उत्तरांगप्रधान आहे. त्यात खर्ज गायकीला फारसं महत्व नाही.. खर्ज हा शब्द वापरताय मग तिथे आमचा पुरिया किंवा दरबारीच हवा! असो..
गायनाची अशी महफिल सजलेली असताना कोणी उगाचच टाळी वाजवून, अधोवायूचा ढुंमकार काढून रसभंग करावा असा कधी कधी विरस होते.
तात्या, तुम्ही लिहीलेले असले काही वाचले की मला माझ्या सांगीतीक दारिद्र्याची जाणीव अधीक प्रकर्षाने होते. यातलं १% जरी मला कळलं तरी माझी श्रीमंती १००% नी वाढेल. म्हणजे कसं होतं की आपल्याला भूक जाणवतेय... छान साजूक तूपात बनवलेल्या लाडवांचा गोड गोड वास पण येतोय... तुमच्या सारखा खवय्या चवीनी खात खात रसभरीत वर्णन पण करतोय... आणी मी फक्त लाळ गाळतोय :(
तूमच्या तपश्चर्येला, (या बबतीत) नशीबाला आणि श्रद्धेला सलाम !!
(कफल्लक) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
अहो साहेब, उगाच कशाला स्वत:ला 'सांगितिक दरीद्री' वगैरे म्हणवून घेता? संगीतातल्या/रागदारीतल्या काही तांत्रिक गोष्टी, रागांची नावं, स्वर, इत्यादी नसतीलही तुम्हाला कळत.. पण त्यानं काय फरक पडतो? संगीत कळण्यापेक्षा संगीत आवडणे हे अधिक महत्वाचं.. तुम्हाला संगीत श्रवणातून आनंद मिळतो आहे ना? मग तुम्हीही श्रीमंतच! :)
तात्या.
हो !! संगीत फार फार आवडतं... पण कसं.. की ´ती´ खूप सुंदर दिसते, गोड हसते... पण तिच्या अदा आपल्याला काही कळत नाही... मग दील से दील मिळत नाही... मीलन अधुरं राहातं... पु. लं. च्या भाषेत सांगायचं तर, आयुष्याला जीवन बनवणारं अस काहीतरी तिच्यापाशी आहे... आणी मी उपाशी आहे...
(प्यासा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
समवन सेड ... इफ यु कान्ट अवॉईड द रेप ... देन जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय इट :) लेखक हल्ली फार रिलॅक्स होऊन एन्जॉय करत करत लेख पाडतांना दिसतात :)
नाडी केंद्रात बकरे पकडुन आणण्याचे कमिशन भेटतं काय ?
-(पोपट्,हस्तरेषा,नाडी किंवा पत्रिकेपेक्षा आमच्या जगन्नाथावर अंमळ विष्वास असलेला) चिंताक्रांत लोक
नाडी केंद्रात बकरे पकडुन आणण्याचे कमिशन भेटतं काय ?
टार्या ते मिशन असतय काहि लोकांसाठी. कमिशन असत ते परिहारकांडम नावाच्या प्रकारात. म्हण्जे खरी कमाई तिथे असते.काही लोक काडीकाडी जमवुन पैसा उभा करतात तर काही नाडीनाडी जमवुन! ;)
नशा केवळ ताडीने येत नाही
नशा केवळ माडीने येत नाही
नशा ही नाडीने येते
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
>>समवन सेड ... इफ यु कान्ट अवॉईड द रेप ... देन जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय ....
आईच्य्या गावात........हा बलात्कार नाही तो तरी केन्व्हातरी संपतो ...हा न संपणारा मानसीक छळ आहे ~X(
आरे ह्यांना कुणी तरी आवरा रे.....साले टेली मार्केटिन्ग वाले परवडले.....
अवांतरः आता मालकांनाच खिश्यात टाकल्यावर तक्रार तरी कुणाकडे करायची? :T
ईल्यास्टिक वाला
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
वरची वाक्ये वाचून 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ' आठवला.
बाकी वर नायल्याने विचारलेले प्रश्न मलाही पडलेत... उत्तर मिळणार नाही हे माहीतच आहे.
-अनामिक
हद्द आहे बुवा. आपण तर वाचून वाचूनच थकलो.
ओकसाहेब,
अहो भविष्य जाणणं, ते जाणून देण्यास मदत करणं.. हे काय जीवनाचं प्रयोजन बनलंय का काय? बरेच जण भविष्य जाणण्याचा दावा करतात. खरेही धरून चालू एकवेळ. त्यामुळे कुणी भारावूनही जाईल. तेही एकवेळ मान्य करू. पण त्यापुढे काय?
भविष्य जाणून घेतले. बास. खुष अथवा नाखुष. अहो पण त्याचा उपयोग काय मुळात? हे करणे म्हणजे आपल्या जगण्यातला अमूल्य वेळ वाया घालवणे नाही का? इतर अनेक सर्जनशील गोष्टी करणे शक्य असतांना काय हे घेऊन बसलात? तुमचे किंवा इतर कुणाचेही भविष्य तुम्ही किंवा दुसर्याने जाणून घेतल्याने तुमची किंवा कुणाचीही काही उन्नती घडली का? घडेल का?
एखाद्या गोष्टीला वाहून घेणे चांगले पण त्यासाठी काही योग्य प्रयोजन नको का?
हे सर्व थोतांड आहे अथवा नाही हा वादसुद्धा निरर्थक आहे, असे खरोखर तुमच्या विवेकबुद्धीला पटत नाही का?
(तुम्हाला मनापासून समजावून सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणारा) राघव
मला एक कळत नाही, "नाडी शास्त्र किती बरोबर" हे सांगण्याचा आटापिटा का?
तुम्हाला वाटतो न विश्वास, मग तुम्हाला कुणाच्या पावतीची गरज नाही आणि कुणी किती नाव ठेवताहेत याची चिंता नको.
व्यक्तिगत श्रद्धेला सार्वजनीक करूच नये. केलंच तर, लोकांच्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रियेला तयार असावा आणि त्यांचा आदर करावा.
श्रद्धेत वाद विवाद होऊच शकत नाही कारण ती व्यक्ती सापेक्ष आहे. तुम्ही तिला विज्ञानाच्या कक्षेत आणा, मग वाद विवाद होऊ शकतात.
नाडी शास्त्र हा श्रद्धेचा भाग आहे आणि त्याला प्रचाराची जोड नको.
माझ अस मत आहे:
जेव्हा एखाद्या गोष्टीला प्रचाराची जोड असते, तेव्हा त्यात स्वार्थ निगडीत असतो. (तो स्वार्थ कुठल्याही प्रकारचा असू शकतो)
जर तुमचा त्या गोष्टी वर प्रामाणिक विश्वास आहे, तर तुम्हाला प्रचाराची गरज नाही, तुम्ही स्वानंदात आणि स्वानुभवात रममाण असा.
तसा काही नाही तात्या,
मुळात मला असा वाटत कि ओकसाहेब त्यांच्या श्रद्धेबद्दल प्रामाणिक आहेत.
फ़क़्त त्याचा (ती एक श्रद्धा असल्या कारणाने) सार्वजनिक उहापोह व्हावा, हे मला पटत नाही.
कारण त्यात मना दुखावण्याचा संभाव होतो, कारण विरुद्ध बाजूचे लोक देखील त्यांच्या श्रद्धे बद्दल प्रामाणिक असतात.
प्रतिक्रिया
'शशिकांत'
मला तर
ओकसाहेब,
अरे काय हा
अरे काय हा
अती अवांतर प्रतीसाद!!
अहो साहेब,
बनीया !!
लकेर
समवन सेड ...
मिशन
टारुलियाजी
आईच्य्या गावात........
नाडीग्रंथ
हद्द आहे
मला एक कळत
स्वगत :
आम्ही
नायल्या,
तसा काही