तब्बल ३८० वर्षांनंतर कोणी इतका प्रेरणादायी ठरू शकतो ! आजही जरीपटका बघून मन उचंबळून येतं !
>>"मला जिजाऊ व्हायचंय !" असं नुसतं म्हणणारी माऊली भेटेपर्यंत तरी नाहीच नाही !<<
खूप चांगला विचार.... आज खरंच छत्रपतिंच्या विचारांचीच नव्हे तर आचाराची देखील गरज आहे. आजही आम्ही पोरांना शिवबा आणि त्याच्या सवंगड्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतो. पण नुसतं प्रेरित होणं पुरेसं नाही ह्याची जाणीवही आहे. काहीतरी करण्याची हिंमत मिळावी हीच छत्रपतिंच्या चरणी प्रार्थना.
बाल की खालः शिवबांनी शाईस्तेखानाला लालमहालात घुसून अद्दल घडवली होती. शनिवारवाडा १७३२ मध्ये पेशव्यांनी बांधला!
आम्हांस माहिती आहे , वय वर्षे ८८ (फक्त) असलेल्या कुणा बाबासाहेब पुरंदरे वा त्यांच्या बरोबर निम्म्या वयाच्या , ४४ वर्षाच्या कुणा उदय गंगाधर सप्रे सारख्या अनेकांना अजून आमची याद आहे आणि आम्ही अजूनही मुक्तच झालो नसल्यामुळे जन्म घेण्यास तयार आणि उत्सुक आहोत !
जबरदस्त!!!!
खरोखरच आज मांसाहेब"जिजाऊं" ची जास्त गरज आहे!
कारण "जाणता राजा" जन्माला येण्यासाठी तितक्याच जाणत्या आणि खंबीर मातृत्वाची गरज असते!
हिंदवी स्वराज्य-संस्थापक प्रौढप्रतापपुरंदर गो-ब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
टीपः हिन्दु पंचागानुसार शिव-जयन्ती फाल्गुन वद्य तृतीया - ३ मार्च २०१० रोजी आहे!
अर्थात, शिवरायांचे आणि जिजामातेचे गुण खरोखर अंगी बाणवण्यासाठी त्यांच्या जयंती-पुण्यतिथीची गरज नाही,,, हेच खरं!!!
|| जय जय रघुवीर समर्थ ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
मॉर्गन साहेब ,
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , धन्यवाद ! घाईघाईत आणि अति उत्साहाच्या भरात ही चूक झाली आहे हातून , क्षमस्व , लक्षात येईतोवर लेख अपलोड झाला होता.
मिपा कर कृपया क्षमा करा....शनिवार्वाडा नव्हे , लाल महालात घुसून महाराजांनी शाईस्तेखानास अद्दल घडवली होती !
उदय सप्रेम
>>मिपा कर कृपया क्षमा करा.
अहं ! क्षमा वगैरेची काही गरज नाही. :)
>>.शनिवार्वाडा नव्हे , लाल महालात घुसून महाराजांनी शाईस्तेखानास अद्दल घडवली होती !
शनिवारवाडा काय आन लाल महाल काय ! महाराजांनी शत्रूला अद्दल घडवली ना, बस्स....!
आपल्याला इतिहासाचा पेपर सोडवून गुण थोडी मिळवायचे आहेत :)
असो, योग्य दुरूस्तीबद्दल आभार.
[अजून बदल केलेले दिसत नाही]
-दिलीप बिरुटे
महाराज आपले स्वगत आवडले. फक्त एवढ्या चांगल्या लेखनात ''आरक्षणाचे होणारे राजकारण पाहून'' वगैरे नको होते असे वाटले. कारण ती समस्या, तो प्रश्न वेगळा आहे.
बाकी, आपल्या संवाद लेखनाने शिवकाळाची सफर घडवून आणली. आपण मेलो तरी चालेल पण राजे जगले पाहिजे अशी किमया फक्त महाराजच करु शकले. महाराजांचे राज्य म्हणजे आपले राज्य असे रयतेला वाटत होते. जिजाऊ थोर आणि महाराजही थोर..!
-दिलीप बिरुटे
महाराज आपले स्वगत आवडले. फक्त एवढ्या चांगल्या लेखनात ''आरक्षणाचे होणारे राजकारण पाहून'' वगैरे नको होते असे वाटले. कारण ती समस्या, तो प्रश्न वेगळा आहे.
असेच म्हणतो.
बाकी यावरून गदिमांच्या खालील ओळी आठवल्याशिवाय राहील्या नाहीतः
नसता झाला जर शिवराया
पढवती न जर त्यास जिजाऊ
परबोलीच्या पंजरी मरते
बालकथातील चिमण्याकाऊ
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !!
जय भवानी ! जय शिवाजी !!
लेख आवडला
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
>> आज १९ फेब्रुवारी म्हणजे आमचा जन्मदिवस नसून जनकल्याणासाठी आपलं लेकरू 'इदं न मम' म्हणणार्या जिजाऊंचा 'त्याग'दिवस आहे !
सुरेख कल्पना. सुंदर लेखन सप्रे साहेब! महाराजांच्या मनातली तळमळ सुरेख शब्दांत मांडली आहे! महाराजांची याद करणारे आणि महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चालणारे बरेच मरहट्टे आहेत अजून या देशात. पण ज्या दिवशी या उभ्या महाराष्ट्राच्या आराध्यदैवताला राजकारणाचा मुद्दा बनवलं गेलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली खरंच! महाराजांच्या जन्मदिनाचंही राजकारण करून त्यामार्गे जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याची अहमहमिका आज त्यांच्याच महाराष्ट्रात लागली आहे याचंच वाईट वाटतं. खरंच तुम्ही सांगता त्याप्रमाणे महाराज जर रायगडावर असतील, तर त्यांचा जन्मदिन राजकारणाचा मुद्दा बनलेला पाहून काय हो वाटलं असेल???
"हिंदवी स्वराज्य! माझ्या मावळ्यांनी प्राण पणाला लावून हाशिल केलं. पण ज्या राज्याच्या मंगलमय, कल्याणकारी भविष्याचं स्वप्न उराशी बाळगून देह त्यागला, त्याच राज्यात आज माझ्याच जन्मदिनावर भांडणारे हे माझेच मावळे आहेत काय??"
रायगडावर हे शब्द जागोजागी ऐकू येतील!
बाकी जिजाऊ दाखवा..... कल्पना मात्र सुरेख खरंच!!
लेख आवडला...
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
सुंदर आहे हे प्रकटन, कल्पनेची भरारी. ........
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्रतिक्रिया
सुंदर लेखन
आम्हांस
अगदी बरोबर आहे.....
जाने दो..
सुंदर लेखन
+१
छत्रपती
उत्तम लेख!
सुंदर
हाय क्लास
सुंदर
वास्तववादी लेख..
अ प्र ती म