>>हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी भारतातून परत इथं आल्यापासून अगदी वेधंळ्यागत वागतोय. आपल्याच तंद्रीत असतो एवढ्यात.
खरं कारण मला माहीती आहे ;)
आणि हो सगळेच प्रसंग मस्त आहेत .. तुला आठवते तरी मला एवढं जास्ती आठवत पण नाही .. पोटे मास्तरच नाव बर्याच दिवसानंतर ऐकलं .. अजुन आहे का तीथेच?
>>एक दिवस घरी परतल्यावर सूप बनवलं...
असच माझ्या बाबतीत चहा करतांना होते .. आत्तापर्यंत कमीत कमी १० वेळा मी ते भांडे जाळले आहे =))
सगळेच मस्त अनुभव.
शाळेत असताना मी एकदा कुकरमध्ये नुसते तांदुळ ठेवले पाण्याशिवाय तापवत ठेवले होते.तांदुळ गरम झाले झाले की आपोआप शिजतील असा समज होता.
भेंडी
P = NP
तुमच्या सोबतही होतं का असं कधी कधी?
आमच्या सोबत फक्त असंच होतं!;)
आता सांगत बसलं तर ग्रंथ होइल किहो!
आणि ते स्वप्निल भौ म्हणताहेत त्यांना कारण माहितीये......आम्हालाही कळू द्या!.......विकेट पडली असेल तर!:)
रेवती
अरे वा वा वा!!!
अभिनंदन अनामिक!
अनुभव मजेशीर आहेत. तुम्हाला स्वत:ला आलेले अनुभव (वेंधळेपणाचे) योग्य आहेत आणि आत्ता यायलाच हवेत. सगळं कसं बरोबर चालू आहे.;)
मला असे अनुभव रोज येतच असतात. आज कपभर दूध मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदासाठी ठेवले. आलार्म झाल्यावर फ्रिज उघडून कप शोधत बसले. अश्याच प्रकारे फ्रिजमध्ये चमचे, डाव अश्या गोष्टी ठेवून इतर ठिकाणी शोधत बसते. कालच इंडियन ग्रोसरीमध्ये कोथिंबीर घ्यायची म्हणून प्लास्टिकची पिशवी घेउन त्यांच्या फ्रिजपाशी उभी राहून थोड्यावेळानं मेथी घेउन परत आले.
मी लहान असताना आम्हा भावंडांचे मित्र मैत्रिणी यांचा गलका ऐकून (व आपलीच मुले आहेत असे वाटल्याने) बाबा वैतागून रागवायला लागले. आईनं आठवण करून दिली.....ही आपली मुले नाहीत, शेजारच्या मुलांवर ओरडू नका! सगळेजण हसून बेजार झाले. असे भरपूर हास्यास्पद प्रकार आहेत.
रेवती
अनामिक भौ..
हे असं कधी कधीच होतं.. पण तुमचं सारखं सारखं का होतंय ते कळलंय बरं आम्हाला. असो..
सध्या हे असे थोडेसे वेंधळे आणि सुवर्णाचे दिवस घ्या भोगून. :) या दिवसांची योग्यता या वयातच असते. ;)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
मी एकदा शाळेत जाताना घराला कुलूप लावायच्या ऐवजी ते कुलूप दप्तरात घेऊन शाळेत गेलो होतो. वर्ग चालू झाल्यावर वही काढताना कुलूप हाताला लागले तेंव्हा लक्षात आले.
माझा एक मित्र रस्त्यात भेटला. तो त्याच्या बायकोसोबत चालला होता.
बोलताबोलता आणखी कोणीतरी त्याला हात केला. तो त्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या स्कूटरवर बसून निघून गेला. मित्राची बायको तिथेच राहिली. ह्याच्यावर कडी म्हणजे . मित्राच्या बायकोल जेंव्हा तिच्या घरी पोचते केले तेंव्हा हे महोदय दार उघडताना म्हणाले " काय ग कुठे गेली होतीस. मी कित्ती वेळ वाट बघतोय"
सगळेच अनुभव मजेशीर आहेत.
"पण निवांत झोपलेल्या आढळल्या. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला"
"सुटके(स)चा निश्वास" हा वाक्प्रचार कसा तयार झाला त्याचाही उलगडा झाला....
प्रतिक्रिया
:)
मस्त
मस्तच....
तुमच्या
:)
अरे वा वा
ही आपली
मस्त किस्से!
अनामिक
अनामिकराव
मी एकदा
सगळ्यांचे किस्से वाचुन
मस्त...
गजनी...
सगळेच
मला