Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फटू on Sat, 03/29/2008 - 15:04
  • Log in or register to post comments
  • 4427 views

प्रतिक्रिया

Submitted by धनंजय on Sat, 03/29/2008 - 17:28

Permalink

अपूर्वने

तिच्याशी पुन्हा संपर्क साधावा. या क्षणी श्रद्धाला तिच्यावर नि:स्वार्थी प्रेम करणार्‍यांची जरूर आहे. (त्याने असे केल्यास लघुकथेचा शेवट दु:खांत न मानता सुखांत मानण्यास वाव आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/30/2008 - 13:00

In reply to अपूर्वने by धनंजय

Permalink

सहमत..

धन्याशेठशी सहमत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sat, 03/29/2008 - 17:44

Permalink

अनोखं रूप ??

हे तर प्रेमाचे खरे रुप !!
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 03/30/2008 - 05:08

In reply to अनोखं रूप ?? by आनंदयात्री

Permalink

अगदी खरं आहे तुमचं...

हेच प्रेमाचं खरं रूप आहे... पण अस प्रेम हल्ली अभावानेच पाहायला मिळतं... म्हणून 'अनोखं' हा शब्द वापरावासा वाटला सतीश गावडे आमची इथे शाखा आहे -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 03/29/2008 - 22:39

Permalink

कळलं नाही...

श्रद्धाचा प्रियकर त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. कारण नाही कळलं. श्रद्धाचा प्रियकर इतक्या कालवधी नंतर तिला सोडून का जातो आहे? त्याला दुसरी चांगली वाटू लागली म्हणून श्रद्धाला सोडतो आहे कि श्रद्धाच्या स्वभावात त्याला कांही गंभीर दोष आढळला म्हणून तो तिच्या पासून दूर जातो आहे? अपूर्वला श्रद्धाचा स्वभाव (कदाचित) नीट कळला नसेल. पण तिच्या 'त्या' प्रियकराला इतक्या मोठ्या कालावधीच्या सानिध्यातून कांही गंभीर दोष आढळला असेल. कदाचित त्याला लवकर मुले हवी असतील आणि कदाचित 'फॉर्म' टीकवण्यासाठी श्रद्धाला लवकर किंवा कधीच मुले नको असतील. कदाचित श्रद्धाला राजाराणीचा संसार हवा असेल आणि तो आई-वडीलांना सोडून वेगळा राहू इच्छित नसेल. श्रद्धाच्या प्रियकराच्या स्वभावात काही दोष असेल, जसे श्रद्धाच्या सहवासातही तो इतर मुलींच्या शोधात असेल तर ती त्याची चूक आहे. जर लग्न न करता त्याला नुसतीच मजा मारायची असेल तर त्याला लवकरात लवकर सोडून देणंच उत्तम. पण त्याच्या स्वभावातील हा दोष जाणवला तरी श्रद्धाने इतके मनाला लावून घेऊ नये. (अपूर्व आहेच). की अपूर्व इतका टाकावू आहे की कुठल्याही परिस्थितीत श्रद्धा त्याचा 'विचार'च करू शकत नाही? अनेक प्रश्न मनात उद्भवतात. अपूर्वचे श्रद्धावर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे त्याला श्रद्धा निर्दोष, निष्पाप वाटणं साहजिक आहे पण वाचकांनी श्रद्धाच्या प्रियकराला एकदम मोडीत काढू नये, वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर सारासार विचार करून स्वतःचे मत बनवावे, म्हणून हा लेखन प्रपंच.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sun, 03/30/2008 - 04:04

In reply to कळलं नाही... by प्रभाकर पेठकर

Permalink

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 03/30/2008 - 05:33

In reply to कळलं नाही... by प्रभाकर पेठकर

Permalink

अगदी या कथेचा लेखक असूनही...

मीही सहमत आहे तुमच्या मताशी. श्रद्धा किंवा तिचा प्रियकर, दोघांपैकी कुणा एकाला नाव ठेवण्याआधी दोघांच्याही बाजूंचा विचार व्हायला हवा... हा भाग या कथेत आला नाही. श्रद्धाचा प्रियकर तिला सोडून जाण्यामागे काय कारण होतं हे कथेत असायला हवं होतं. तो या कथेचा दोष आहे... बाकी प्रभाकरराव, तुमचं म्हणणं आपल्याला बिलकुल पटलं.... आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद... सतीश गावडे आमची इथेही शाखा आहे -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com