समाजाला दलदलीतून वर आणण्याचे काम कवीचे आहे.
हे कुणी , कधी, कसे ठरवले बुवा ?
आणि मुळात समाज दलदलीत गेला कधी ?
आपण कोणता समाज पाहताय हे ठावूक नाही, पण समाज म्हणजे आपण सर्व, ही व्याख्या गृहीत धरली, तर आपण सर्व दलदलीत आहोत, असे म्हणायचे आहे का ?
असे असल्यास, माझा तीव्र निषेध आहे !
- (दलदलीबाहेरचा) सर्किट
भाड्या, आलो रे..
हो रे माझ्या रिक्षा/टॅक्षी वाल्या दादा....
मला ठाउक आहे वाट पाहाता तुम्ही भाड्याची
दिसता स्वारी दुरुनी जरी. मनी हाक देता त्यांस
भाड्या, आलो रे..
पोट तुमचे चाले त्या भाड्यावरती...
मीटर दावते त्यास आकडे स्वतः वरती
हात कोणी दावता आनन्द होतो तुम्हा
प्रुछा होता जवळच्या ठीकाणची
मान अगोदरच ना म्हणते तुमच्या आधी.
पहाताच दुसरा कोणी दूरचा मुशाफीर
आनन्द होतो मनी असो हिंदु वा तो काफिर
मग आनन्दे शब्द येती मनात ते
भाड्या, आलो रे..
बैसता स्वारी आत्....ये मनी विचार तुमच्या तो
बरे झाले भाडे मिळाले
बैसता स्वारी आत्...ये मनी विचार त्याच्या तो
बरे झाले मिळाले गाडी भाड्याची..
बरे होइल म्हणता त्याने गड्या ये रे
म्हणाल तुम्ही झणी भाड्या आलो रे
...............जळजळीत मनापासुन विद्रोही..........
माझे मत वाचून अशा प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. माझे म्हणणे एवढेच आहे की, ज्या गोष्टीमुळे कोणाचा उपमर्द होईल असे लिखाण टाळावे. काही उल्लेखांमुळे जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्या पाहून आनंद वाटला. समाज म्हणजे आपण सर्व हा विचार बोलायला ठीक आहे. प्रत्यक्षात तसे घडत नाही. अन्यथा दलित हा शब्द सर्रास वापरला गेला नसता. भाड्याची कविता फार छान वाटली रे गड्या. माझ्याप्रमाणेच आपणही काही अशिष्ट लेखन वाचले असेल. (अशिष्ट चा अर्थ ज्याने त्याने ठरवावा.) त्या लेखनाबद्दल मी माझे मत दिले आहे. पण मत दिल्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी. माझा उद्देश लक्षात घ्या. मी वर वापरलेला शब्द भाड्या, रांड, लवडा, -----ई. देवू शकत नाही. असे शब्द कवितेत असावेत का? आपणांस काय वाटते?
समाजाचा आरसा आहे. समाजात गटार असेल तर साहित्यात येणारच. नसेल तर ते साहित्य वास्तव आहे असे म्हणता येणार नाही.
सर्कीटराव अजयजींच्या दिव्य चक्षूंना दिसणारी दलदल आपल्याला दिसत नाही तर तुम्ही आणि आम्ही काय करणार. समाजोद्धारक कवी करतीलच की.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
विद्रोही लिखाण म्हणजे केवळ शिव्या देणे असते काय? हे नव्याने कळाले.
महामहोपाध्याय अजय जोशीजी आपण डॉ यशवन्त पाठक यांचे " अंगणातील आभाळ" याचे जरा वाचन करावे.
मनातली कळकळ / झालेला अन्याय त्यानी किती शिव्या न देताही सहजपणे वर्णन केलाय की काय म्हणायचे आहे ते पोहोचते.
"कार्यकर्ता " जमले तर हे पुस्तक ही डोळ्याखालुन घालावे .
आणि सगळेच विद्रोही कवि समाजोद्धारक असतात हा एक मोठ्या प्रमाणात असलेला गैर समज आहे.
विद्रोही लिखाण म्हणजे केवळ शिव्या देणे असते काय?
मनातली कळकळ / झालेला अन्याय त्यानी किती शिव्या न देताही सहजपणे वर्णन केलाय की काय म्हणायचे आहे ते पोहोचते.
अतिशय बरोबर बोललात आपण. मलाही काहीसे असेच म्हणावयाचे होते. मात्र अनेक कवींना विचित्र लिहीणे गौरवास्पद वाटते किंवा कदाचित प्रसिद्धी मिळविण्याचे साधन वाटते. याबद्दल मला खरे तर सांगायचे होते. मी आपल्या मताशी सहमत आहे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
दलदल आणि कवी ?
मला काहीच समजले नाही.
भाड्या, आलो रे..
प्रतिक्रिया वाचल्या
साहित्य हा ......
दिव्य चक्षू
विद्रोही लिखाण म्हणजे केवळ शिव्या देणे असते काय?
विद्रोही
अगदी बरोबर