२. श्रीकांत देशपांडे,
३. माधव गुडी,
४. नारायणराव पटवर्धन,
५. मिलींद चित्तल,
ही मंडळी किराण्याची पताका वगैरे धरून आहे असं मला वाटत नाही. बाकी माहिती छान.
तात्याशी सहमत!
किराणा घराण्यातील काही नव्या-जुन्या गायक-गायिकांची माहिती इथेही मिळेल. त्यातल्या काहीजणांनी फक्त किराणा घराण्याशी संलग्न न राहता इतर घराण्यांचेही गायन आत्मसात केले. त्यापैकी प्रमूख म्हणजे अमीर खॉं आणि बसवराज राजगुरु,माणिक वर्मा इत्यादि.
संगमेश्वर गुरव ह्यांचे गायन पूर्वी आकाशवाणीवर नित्यनेमाने ऐकलेले आठवतंय. खूप छान गायचे ते.
========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
छान माहिती आहे.
किराणा शब्द फक्त "किराणा माल " म्हणुन माहित होता.
सगळे क्लासिकल गाणारे खान ह्याच घराण्याचे आहेत का ?
सलमान, शहारुख, अमीर ह्या खानांचा काहि संबध आहे का किराणा घराण्याशी ?
तुम्ही सांगितलेली लोकं "खान" आहेत .. कानाखाली बसते ना .. "खान्" कन .. त्यातले खान ..
आणि किराणा घराण्यात तोंडाचा चंबु करून खा म्हंटल्यावर अजुन मोठा चंबू करून सोडून द्यायचं , मग जो उच्चार होतो .. तो खाँ !!
कळलं का? फरक आहे :)
-(स्पष्टीकारक) टारझन
गोपाल नायक हा देवगिरीचा राजगायक होता.. देवगिरी संस्थानाजवळ रेवा नदीच्या काठावर बसून तो गायचा... त्याने रेवा या नावाचा एक राग देखील रचला आहे.( उत्तरांगप्रधान बिभास म्हणजे साधारणपणे रेवा..) .. अल्लाउद्दीन खिलजीने त्याचे अपहरण केले होते, असे ऐकल्याचे आठवते.. नक्की माहीत नाही.
का, तो गोपाल नायक वेगळा आणि हा वेगळा, हेही माहीत नाही.. :)
http://www.otherminds.org/html/Prannath.html
ही आणखी एक कथा मिळाली...
http://en.wikipedia.org/wiki/Baiju_Bawra
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
वरच्या माझ्या पोस्टमध्ये काही तरी घोळ वाटतोय..... विकिपेडियावर गोपाल नायक हा बैजू बावराचा शिष्य म्हटले आहे.... म्हणजे साधारणपणे अकबराचा काळ... आणि त्याच्यावर जी लिन्क मी दिली आहे, त्यात अल्लाउद्दीन खिल्जीचा काळ आहे.. बहुतेक हे दोन वेगळे असावेत..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
लोकप्रभाच्या दिवाळी अंकात हा एक चांगला लेख आहे.
तसाच मलिकार्जुन मन्सूर यांच्यावरील हा लेख देखील चांगला आहे.
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
दोन्ही लेखांच्या दुव्याबद्दल अनेक धन्यवाद.
सुंदर लेख आहेत.
सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोल या बहीण भावांना अनेक वर्षे मोगूबाई आणि किशोरीताईंचा सहवास लाभला त्यामुळे त्यांच्यावर जयपूर - अत्रौळी घराण्याचा खूप प्रभाव आहे आणि तो या लेखांमधूनही दिसतो.
त्यामुळे किंवा त्यावर लिहायचं आहे हे आधी स्पष्ट केल्यामुळे इतर घराण्यांचा उल्लेख किंवा तपशील कमी आहे.
पण एकूणात दोघांचंही लिखाण मांडणी, रागांची, नामवंत गायकांची विचारधारणा, घराण्याचा इतिहास लिहिण्याची पद्धत छान आहे. लेखन शैलीचा प्रभाव पडतो.
नाद-वेध हे त्यांच्या लोकसत्तामधील लेखांचं संकलन असलेलं पुस्तक संग्रहणीय आहे. एकेका रागाचा विचार केला असला तरी त्यातल्या वेगवेगळ्या घराण्यांच्या, गायकांच्या चीजा, बंदिशी, आठवणी, उत्तम मांडल्या आहेत.
प्रथम,
ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचे आभार.
आता थोडं लेखाविषयी..
तात्या..
तुमच्या लेखी जे जे किराण्याची पताका चालवत आहेत, त्यांची नावं मला सांगता का? माझ्या माहीतीत त्याने भरच पडेल.
स्वाती ताई..
तात्यांच नाव मला घालायला नक्कीच आवडेल..पण तुमच्या उत्तरावरून तुमचा मुड चेष्टेचा आहे असं वाटत आहे. कृपया हा विषय चेष्टेचा नसल्याने अशी चेष्टा परत करु नये ही विनंती.
देवसाहेब..
नेहेमीप्रमाणेच माहीतीत भर घातल्याबद्दल स्पेशल धन्यवाद...कैवल्यकुमारांच नाव राहिलं. त्यांच गाणं प्रायवेट मैफीलीत ऐकल आहे आणि खासंच आहे.
टारझन..
श्वेता ताईंना परस्पर उत्तर दिल्याबद्दल पेशल धन्यवाद....बाकी सगळ्यात एक गोष्ट आवड्ली भावा...तु आज काल संगीतविषयक गोष्टींची चेष्टा करणं सोडलस.
प्यारेभाऊ..
अधिक माहीती मिळाल्यास नक्की कळवा...
खडुस शेठ..
तुम्ही दिलेले लेख अधिच वाचले होते. तेव्हाच असं वाटलेलं की आपण असा एखादा लेख लिहुन विषयावरील थोडी धुळ झटकणं गरजेचे आहे. जसं.."सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं."..
सगळ्यांचे पुन्हा मनापासुन आभार...
- वा
प्रतिक्रिया
२.
तात्यांच
सहमत!
छान
छान माहिती
तुम्ही
गोपाल नायक
वरच्या
अधिक माहिती
जयपूर अत्रौळी
धन्यवाद...