पकाकाका,
मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि तुम्ही राग मानणार नाही म्हणुन सांगण्याचे धैर्य करत आहे.
बास झाले हे ज्योतिषाचे धागे, जरा काही काळ वेगळे वाचु द्या आम्हाला.. ! :)
जरा विश्रांती घ्या आणि मग परत टाका वाटल्यास.. ! पण सध्या अजीर्ण व्हायला आले आहे.. !
प्ली.... ज ! समजुन घ्या !!
आपलाच,
अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अरे ही तर प्रतिक्रिया माझ्या मनात होती. अशी कुणी ती देईल का हे आजमवण्यासाठी मी हा धागा टाकला. दुसरा ही एक उद्देश होता कि सर्फिंग करणार्या वा मिपावर आलेल्या नवीन लोकांना मागील धागे उचकट बसायला वेळ नसतो. त्यांच्या साठी ही बाब पुर्णपणे नवीन असते.जे समोर आले ते पाहिले जाते व प्रासंगिक प्रतिक्रिया मनात येतात. मिपावर मागील धागे हा काळाआड व पडद्या आड वेगाने जातात, समयोचित प्रसंगी जर पुढे आले तर काही व्यक्तिंना त्यात स्वारस्य वाटू शकते. जुन्या लोकांना दुर्लक्षण्याची सुविधा/ मुभा असते पण नवीन लोकांना तीच बाब संधी असते.
फलज्योतिषाच्या उपयुक्ततेचा मुद्दा युयुत्सुंच्या धाग्यात आला म्हणुन हा मोह आवरला नाही
मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि तुम्ही राग मानणार नाही म्हणुन सांगण्याचे धैर्य करत आहे.
धैर्य कसले तो हक्क च आहे तेवढा हक्क दाखवण्याइतपत 'जवळीक' सहअस्तित्वातुन येतेच. तो आम्ही नाकारण्याच्या शक्यतेच भय आपल्याला वाटले म्हणुन धैर्य बिर्य शब्द सुचले की काय नाना?
बाकी चालु द्यात. सध्या उसंत घेतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
"फलज्योतिषाची काहि लोकांसाठी असलेली उपयुक्तता आम्हाला मान्य देखील आहे. सर्वच ज्योतिषी हे जातकाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात अस सरसकट मी म्हणू शकत नाही. फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?"
चला एक बरे झाले! घाटपांड्यांचे वरील मतप्रदर्शन वाचून धन्य धन्य झाले. याशिवाय करमणुकीच्या पंक्तीला ते फलज्योतिषाला बसवायला तयार आहेत म्हणजे विज्ञान आणि फलज्योतिष करमणुकीसाठी का होईना एका पातळीवर आहेत, हे लक्षात आल्यामूळे गुदगुल्या झाल्या. आंतरराष्ट्रीयख्यातीच्या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक सुरस आणि चमत्कारिक परिकथा (read rejected theories) शेवटी करमणूक करतातच की... पण ही भूमिका त्यांची वैयक्तिक की अंनिसची अधिकृत, हे कळले नाही.
"या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते."
वरील विधान दिशाभूल करणारे आहे. माझा त्यातील "निश्चितपणे" या शब्दाला आक्षेप आहे. वास्तविक आधुनिक ज्योतिषी फक्त शक्यता सांगतो. भारतीय ज्योतिषी जेव्हा "ठामपणे" बोलतो तेव्हा तो समूहमनाने तयार झालेल्या मानसिकतेतून बोलत असतो. त्यामूळे "ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते" या समजाला धर्माने/संस्कृतीने दिलेला जीवनविषयक दृष्टीकोन आणि त्यातून निर्माण झालेली मानसिकता कारणीभूत आहे.
"ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत."
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्या घटनांचे दोन प्रकारांत वर्गीकरण मी निश्चित व्याख्या करून यापूर्वीच केले आहे. त्यामुळे हे वाद्ग्रस्त कसे याचा पुरेसा खुलासा घाटपांड्यांनी करावा ही विनंती.
आता मला घाटपांड्याना एक रोखठोक प्रश्न विचारायचा आहे. त्या प्रश्नाला त्यांनी (दाभोळकरांसारखी) बगल न देता उत्तर द्यायचा प्रयत्न करावा, ही विनंती.
एखादे भाकीत खोटे ठरते तेव्हा खालिल शक्यता असू शकतात. त्या अशा
- The technique used by astrologer does not suitably capture events in the life of a person
- The astrologer made mistake/oversight in using the right technique
- The native made adequate effort to avoid/alter the predicted event
त्यामुळे पत्रिका जुळून केलेले विवाह सुखाचे ठरतात हे हमखासपणे सिद्ध झाले नाही असे म्हणण्यास वरील मर्यादा आहेत. मुळात ज्योतिषातील नियम प्रवाही आहेत (भाषेच्या नियमांप्रमाणे) हे वास्तव आपण मान्य करायचे नाकारत आहात. आपल्याला अपेक्षित असलेली "वादातीत सिद्धता" होण्यातील मुख्य अडचण अशी की कालबाह्य नियम वापरून जुळवलेल्या पत्रिका आणि वर्तवलेली भविष्ये ही खोटी ठरणारच...
तेव्हा माझा प्रश्न असा की ज्योतिषाला निकालात काढणारी संशोधने वरील सर्व बाबींचा योग्य विचार करतात का?
जाता जाता "मनाचा खंबीरपणा" विषयी
- मनाच्या खंबीरपणाला नैसर्गिक क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती यांच्या मर्यादा असतात. मनाचा खंबीरपणा अपार वाढवता येईल असे खात्रीलायक मार्ग विज्ञानाने उपलब्ध करून दिले तर ज्योतिषांची कशाला गरज राहील. तेव्हा आपण आणि अंनिसने समाजाची ही गरज युद्धपातळीवर पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही विनंती...
अर्थात, आपल्याशी. तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलंय. :)
बाय द वे, मी या संदर्भात काही लिहू इच्छितो आहे. पण लोकांचं अजीर्ण बरं झाल्यावरच लिहीन.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
The technique used by astrologer does not suitably capture events in the life of a person
याचा अर्थ कायद्याच्या तरतुदीत असलेली पळवात असा होउ शकतो
- The astrologer made mistake/oversight in using the right technique
तर मग तो/ती अचूकतेचा दावा कसा करू शकतात?
- The native made adequate effort to avoid/alter the predicted event
म्हणजे भविष्य हे तकदीरमध्ये नसून तदबीर मध्ये आहे . तदबीरने तकदीर को मात दे दी
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
>>The astrologer made mistake/oversight in using the right techniq>> इत्यादि.
यालाही हरकत नाही. पण चुकलेल्या भाकीतामध्ये कोणते तंत्र वापरले होते आणि त्या ऐवजी दुसरे तंत्र वापरले असते तर असे बरोब्बर भाकीत आले असते असे दाखवून द्यायला हवे. ज्योतिष्याचे नेमके काय चुकले ते दाखवता येत नसेल तर ज्योतिषशास्त्र बरोबर पण ज्योतिषी चुकला हे म्हणण्यासदेखील जागा रहात नाही.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
माझी सगळ्याच नाडी आणि ज्योतिष वाल्यांना जाहिर विनंती आहे की काही काळापुरते तरी आता हे नाडी आणि ज्योतिषाचे धागे काढणे बंद करा. अति झालं आणि हसू आलं अशी गत झालीये आता. प्रकाशराव रागवणार नाहीतच याची खात्री आहे, बाकीच्यांनी पण रागवू नये, सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा विचार करून त्यांच्यावर दया करावी.
अगदीच वाटले तर आपापल्या ब्लॉगांवर साद-प्रतिसाद देऊन त्याच्या लिंका तुमच्या खरडवहीत लावा. जिज्ञासू तिथे जाऊन वाचतील. बाकीचे सुखात राहतील.
बिपिन कार्यकर्ते
नाडी आणि जोतिष्य ह्यांचा आता वैताग आला आहे. पण ह्यात नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे युयुत्सुंसारखे जोतीषी लोक लेखनाचा भडीमार करत आहेत ते त्यांच्या दुकानाची जाहीरात व्हावी ह्या स्वार्थी हेतूने.
ज्योतिष विषयक लेखनाची ही लाट त्यांनीच सुरू केली. (आठवा ब्लॉगची लिंक देणारे अनेक लेख/स्फुट) त्यांच्या ब्लॉगवर गेले असता ते २५० रुपये घेऊन भविष्य बघतात ही माहिती प्रथमदर्शनी दिसते आणि त्यामुळेच ट्रॅफिक खेचण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे हे कुणीही सांगेल. वैयक्तिक हल्ले/ टीका झाली तरी युयुत्सु नेमाने लिहितात कारण त्यांच्या ते पथ्यावरच पडते आणि ब्लॉगची भरपूर जाहिरात होते.
प्रकाश घाटपांडेंचा मात्र तसा कुठलाही छुपा/उघड स्वार्थ दिसत नाही. त्यांचे लेखन हे युयुत्सु सारख्यांच्या आवाहनाला बळी पडण्यापासुन सामान्य जनतेला सावध करण्यासाठीच आहे ह्याची खात्री वाटते.
नाडी आणि जोतिष्य ह्यांचा आता वैताग आला आहे. पण ह्यात नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे युयुत्सुंसारखे जोतीषी लोक लेखनाचा भडीमार करत आहेत ते त्यांच्या दुकानाची जाहीरात व्हावी ह्या स्वार्थी हेतूने.
ज्योतिष विषयक लेखनाची ही लाट त्यांनीच सुरू केली. (आठवा ब्लॉगची लिंक देणारे अनेक लेख/स्फुट) त्यांच्या ब्लॉगवर गेले असता ते २५० रुपये घेऊन भविष्य बघतात ही माहिती प्रथमदर्शनी दिसते आणि त्यामुळेच ट्रॅफिक खेचण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे हे कुणीही सांगेल. वैयक्तिक हल्ले/ टीका झाली तरी युयुत्सु नेमाने लिहितात कारण त्यांच्या ते पथ्यावरच पडते आणि ब्लॉगची भरपूर जाहिरात होते.
प्रकाश घाटपांडेंचा मात्र तसा कुठलाही छुपा/उघड स्वार्थ दिसत नाही. त्यांचे लेखन हे युयुत्सु सारख्यांच्या आवाहनाला बळी पडण्यापासुन सामान्य जनतेला सावध करण्यासाठीच आहे ह्याची खात्री वाटते.
प्रतिक्रिया
नको वाटते आता हे लेख वाचणे
तु आपला
योगायोग
पटले...
फलज्योतिष
+१
आपण नक्की
अर्थात,
The technique used by
>>The astrologer made
पकाकाका
जाहिर विनंती...
सहमत....
सहमत आहे!
सहमत आहे!
नो
छान