✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हे सारे कोठून येते?

न
नंदन यांनी
Fri, 08/07/2009 - 13:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13059 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

हम्म! सगळ्य

विसोबा खेचर
Fri, 08/07/2009 - 14:08 नवीन
हम्म! सगळ्याचं उत्तर एकच रे - मानवी स्वभाव. ज्याला औषध नाही. असो, नंदनसायबा, सुंदर लेख रे..! तात्या.
  • Log in or register to post comments

लेख थोडा

विंजिनेर
Fri, 08/07/2009 - 14:19 नवीन
लेख थोडा काही तुटक/अधुरा वाटला.. भय/द्वेष इ. भावना आज जश्या दिसतात तश्या आदिकालापासून दिसत होत्या म्हणजे काय?
काही तग धरून रहायची (सर्व्हायवल इन्स्टिंक्ट) भावना यामागे असावी का?
असं लेखकाला का बरे वाटले? बाकी, मानव हा समूहात राहणारा प्राणी आहे त्यामुळे वर्चस्व गाजवायचा प्रयत्न (अल्फा मेल्/अल्फा फिमेल) ही सहज प्रवृत्ती आहे. ती इतर प्राणी शरीर बळावर सोडवितात आपण बुद्धीच्या जोरावर! जाता जाता: इथे, मनावरचा ताण निवळण्यासाठी वाळवलेला पोलॅक मासा (जो वाळवल्यावर अती चामट होतो) देतात. सगळा राग त्या माश्याचा तुकडा चघळण्यात/चावण्यात निघून जातो असं म्हणतात :)
  • Log in or register to post comments

सहजप्रवृत्ती आणि तत्त्वज्ञान

बेसनलाडू
Fri, 08/07/2009 - 15:16 नवीन
बाकी, मानव हा समूहात राहणारा प्राणी आहे त्यामुळे वर्चस्व गाजवायचा प्रयत्न (अल्फा मेल्/अल्फा फिमेल) ही सहज प्रवृत्ती आहे. ती इतर प्राणी शरीर बळावर सोडवितात आपण बुद्धीच्या जोरावर! मूल तत्त्वज्ञान - विशेषतः निहिलिजम् - असा विचार करायला लावेल, की ही प्रवृत्ती मुळातच अस्तित्त्वात असते की (चुकीच्या अगर बरोबर पद्धतीने) अस्तित्त्वात आणली जाते? म्हणजे समजा तुम्ही व मी आदिम मानव आहोत जे हरीण खाऊन आपली भूक भागवतो. दोघेही स्वतंत्रपणे शिकार करायला गेलो असताना एक हरीण (योगायोगाने) एकाच वेळी दोघांनीही मारले. अशा वेळी आपले पर्याय काय? १. मी आणि तुम्ही लढायचे. जो जिंकेल हरीण त्याचे; हरलेल्याने दुसरे हरीण शोधावे. मग आपल्या लढाईत कोणाचाही जीव गेला तरी पर्वा नाही. ऑब्जेक्टिव्हिजम् याला मान्यता देईल कदाचित. २. जे मिळाले आहे, ते हरीण अर्धे अर्धे वाटून खावे. मग पुढचा प्रश्न येतो. जर अर्धे खाऊन माझी भूक भागणार आहे, अशी दोघांचीही खात्री असेल, तर दोघेही याला मान्यता देतील. मग वर्चस्व गाजवण्याचा प्रश्नच नाही. पण तशी खात्री दोघांचीही नसेल तर? ३. हरीण पहिल्यांदा कोणी मारले याची शहानिशा करावी नि त्यानुसार ते कोणाचे हे ठरवावे. ४. हरीणच खाल्ले पाहिजे का? एका हरणाऐवजी पाच ससे मारून खाल्ले तर तेव्हढाच फायदा होईल/तितकीच भूक भागेल; मग तुम्ही हरीण खा, मी पाच ससे मारून खातो (किंवा वाइस वर्सा) पर्याय ३ व ४ मध्ये 'वर्चस्व गाजवणे' ही सहजप्रवृत्ती असण्याचा काही एक संबंध नाही असे वाटते. चू.भू.द्या.घ्या. मुद्दा फक्त इतकाच की संघर्ष हे तत्त्वज्ञानांचे आहेत. आपल्या आयुष्याचे मूलतत्त्व कोणते यानुसार मनात उगम पावणार्‍या भावना, डोक्यात येणारे/होणारे विचार व त्या सगळ्यांची अभिव्यक्ती असणारी 'कृती' ही संघर्षाची फक्त माध्यमे आहेत. (समंजस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

सारांश

गोगोल
Fri, 08/07/2009 - 14:48 नवीन
1. मनुष्यात पशुव्रत भावना नैसर्गिक रित्याच असतात. 2. पुढारलेल्या समाजात त्या भावना सहसा दडपून टाकतात. परंतु एकदा त्यांना कारण मिळाले की त्या उफाळुन बाहेर पडतात. 3. ह्याचे परिणाम वाईट (ज्यूंचा संहार) किंवा निरुपयोगी गोष्टी (मक्केतिल खांबास दगड मारणे, जात्रेत शिव्यांच्या स्पर्धा) असे होऊ शकतात. 4. यातील पहिल्या पर्यायापेक्षा दुसरा बरा कारण त्यात कुणाला नुकसान पोहोचत नाही आणि दडपलेल्या भावनांना वाट मिळते. 5. म्हणून अनिस नि दुसर्या पर्ययातील गोष्टी बंद करण्यात वेल आणि शक्ति खर्च करू नये. बस्स इतकच.
  • Log in or register to post comments

सगळ्याचे मूळ व्यक्तीच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचा अंगिकार हे असावे

बेसनलाडू
Fri, 08/07/2009 - 15:31 नवीन
लेख मुद्देसूद आहे. त्यातील विचार, मांडणीमुळे पटकन पोचले. विचार करतोच आहे; पण काही तात्कालिक विचार जे मनात आले, ते मांडतो (सविस्तर विचारांसाठी व ते मांडण्यासाठी पुरेसा वेळ शोधण्यासाठीची पळवाट म्हणू हवे तर!) व्यक्तीकडून कुटुंब, तिकडून समुदाय/समाज, मग तिकडून राष्ट्र या 'बॉटम्-अप्' पद्धतीने - १. संस्कार २. व्यक्तीची मानसिक जडणघडण (यात मूळ स्वभावही समाविष्ट करू) व वैचारीक बैठक (यात विचारप्रक्रिया समाविष्ट करू) आणि ३. भावनांची निर्मिती आणि अभिव्यक्ती - यांचा विचार केला तर या सगळ्याचे मूळ हे एखादी व्यक्ती आयुष्याचे मूलतत्त्व म्हणून ज्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार करते, त्यावर बरेचसे अवलंबून असावे, असे वाटते. (अर्थात, असा अंगिकार सब्कॉन्शस्ली होत असावा; संस्कार, मूळ स्वभाव, ज्या वातावरणात वाढतो ते - यात व्यक्ती,घरे, झाडेझुडपे सगळेच आले - या सगळ्यांवर अवलंबून असावा, असे वाटते)उदा. १. ज्या व्यक्तीने अ‍ॅब्सर्डिजम (अशक्यवाद) चा अंगिकार केला आहे, ती व्यक्ती, मूल्ये, तत्त्वे, व्यवस्था, विचार इ. चे सामान्य तसेच विशिष्ट अर्थ लावण्याच्या किंवा शोधण्याच्या फंदात पडणार नाही (आणि इतर कोणी पडले तर त्यांना वेड्यात काढेल) कारण या तत्त्वानुसार असे अर्थशोधन मानवीय क्षमतेच्या पलीकडचे असल्याने शक्य नाही (ह्यूमन्ली इम्पॉजिबल्) मग अशी व्यक्ती 'उद्दीपित भावनांचा निचरा करण्यासाठीची प्रस्थापित(किंवा प्रस्तावित) व्यवस्था' या व्यवस्थेकडे/प्रणालीकडे शक्यतो पूर्णपणे अलिप्त भूमिकेतून पाहतील (कुंपणावरच्या बघ्यांसारखे; कारण मुळात या सगळ्यात/ला काही अर्थ आहे, हेच त्यांना मान्य नाही) या व्यक्ती नंदनने लेखाच्या शेवटी उल्लेख केलेल्या तीनपैकी कोणत्याही स्तरात बसत नसाव्यात, असा माझा अंदाज) फार फार तर तिसर्‍या स्तरात (अगदीच कुंपणावर बसणे नसेल तरी मूळ तत्त्वज्ञानच लौकिकार्थाने निराशावादाकडे झुकणारे असल्याने समाजव्यवस्थेत उतरायचे(च) झाले तर समूहात राहणे व समूहाचा हात धरून जाणे बरे, जो सबका होगा वोइच्च मेरा भी - अच्छा या बुरा, अशी काहीशी वृत्ती) २. ज्या व्यक्तीने निहिलिजम चा अंगिकार केला आहे, त्या व्यक्तीच्या मते मूल्ये वगैरे मूलतः अस्तित्त्वात नसतेच; पण चुकीच्या पद्धतीने अस्तित्त्वात आणले जाते. अशी व्यक्ती 'उद्दीपित भावनांचा निचरा करण्यासाठीची प्रस्थापित(किंवा प्रस्तावित) व्यवस्था' याकडे अ‍ॅब्सर्डिजमचा अंगिकार केलेल्या व्यक्तीपेक्षा फार वेगळ्या प्रकारे पाहू शकेल, असे वाटत नाही (कारण जे मुळातच अस्तित्त्वात 'आणले गेले' आहे - नि तेही चुकीच्या पद्धतीने - त्यात 'बरोबर' ते काय आणि ते सुधारावे (रेक्टिफाय करावे) असे तरी काय) त्यामुळे व्यक्तिशः मी अशा व्यक्तींनाही लेखात शेवटी उल्लेखलेल्या कोणत्याही स्तरांत बसवू शकणार नाही, असे वाटते. अगदी ठासून बसवायचेच झाले तर वरीलप्रमाणे तिसर्‍या स्तरात. ३. ज्या व्यक्तीने एग्जिस्टेन्शालिजम् (अस्तित्त्ववाद) चा अंगिकार केला आहे, ती व्यक्ती स्वतःचे अस्तित्त्व जगापासून चार हात लांब राहून जपण्यात इतकी कुशल असते, की संस्कार, मूल्ये, व्यवस्था, घटना, समाज यांचे योग्य अर्थ लावणे; त्यांत लवचिकत आणून त्यायोगे स्वानुभवविश्व समृद्ध करणे आणि त्याबाबत इतरांना जागे करणे (एन्लायटन्) या गोष्टी तिला सहजगत्या जमतात. ही व्यक्ती त्रयस्थ विचारवंताची भूमिका अधिक प्रभावीपणे वठवू शकेल; इतकेच नव्हे, तर प्रस्थापित व्यवस्थांमधील अर्थशोधन तसेच न्यूनशोधन यशस्वीपणे करून त्यावर पर्यायही सुचवू शकेल. अशा व्यक्ती लेखात शेवटी उल्लेखलेल्या पहिल्या तसेच दुसर्‍या स्तरात मोडत असाव्यात, असे मला वाटते. ४. ज्या व्यक्तीने ऑब्जेक्टिविजम् चा अंगिकार केला आहे, ती व्यक्ती ही व्यक्तीस्वातंत्र्याची पुरस्कर्ती, तात्कालिक तसेच शाश्वत सत्याला मान्यता देणारी आणि तारतम्य बाळगून स्वान्तसुखासाठी धडपडण्याला प्राधान्य देणारी असावी. आपापल्या मनिषा पूर्ण करण्याचा अबाधित हक्क प्रत्येक व्यक्तीस असतो, हा या तत्त्वज्ञानाचा मूलसिद्धांत. जसे मी लोकल ट्रेनमध्ये चढलो आणि मला चौथी सीट मिळाली, तर मी बसेन किंवा बसणार नाही; पण मला चौथी सीट मिळू नये, ही माझी मनिषा पूर्ण करण्याचा/होण्याचा हक्क मला आहे नि तो मिळवण्यासाठी मी बाकड्यावर तिसरी किंवा दुसरी जागा मिळेपर्यंत उभेच राहीन कदाचित. त्यासाठी तेथे अगोदरच बसलेल्या व्यक्तीस हुसकावून लावणे मात्र मला मान्य नाही; पण त्याच वेळी मोकळ्या झालेल्या जागेवर माझ्यासोबत आणखी कोणाचा डोळा असेल, तर मात्र मी सर्व शक्तीनिशी स्पर्धा करून माझ्यासाठी जागा मिळवेन. कांदिवलीला बसून उलटे येणार्‍या व्यक्तींना शिव्या देईनच मी; कारण ती माझ्या सीट मिळवण्याच्या हक्कावर व त्यायोगे येणार्‍या सुखावर गदा आहे; पण संधी मिळेल तेव्हा कांदिवलीला बसून मीच सीट मिळवून उलटेही येईन. (या सगळ्या स्पष्टीकरणात 'सीट मिळवणे हे सुख' हे 'ऑब्जेक्टिव्ह' घेतले आहे.) अशा व्यक्ती बहुधा लेखात उल्लेखलेल्या तिसर्‍या स्तरात मोडत असाव्यात, असा माझा अंदाज आहे. या व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेचा 'वापर' स्वान्तहिताय कसा करावा, याचे बाळकडू कोळून प्यायलेल्या असाव्यात. अर्थात, असे हितशोधन, सुखशोधन सर्वमान्य 'नैतिक' मार्गांनी करण्याकडे सामान्यतः कल दिसतो. सबब, 'सगळ्याचे मूळ' हे व्यक्तीने कोणत्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार केला आहे, यात आहे, असे सकृतदर्शनी तरी वाटते. जेथे जेथे संघर्षाचे प्रसंग येतात तेथे तेथे तो संघर्ष या मूल्ये, भावना, संस्कार, समाज इ. चा कमी आणि या मूलभूत तत्त्वज्ञानांचा संघर्ष जास्त असतो, असे मला वाटते. तूर्तास इतकेच. बाकीच्यांची मते वाचून, विचार करून अधिक चर्चा करायला नक्कीच आवडेल. (तत्त्वज्ञानी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

बाप रे !

दशानन
Fri, 08/07/2009 - 15:51 नवीन
बाप रे ! :S *** मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

नंदन, बरेच

यशोधरा
Fri, 08/07/2009 - 15:41 नवीन
नंदन, बरेच दिवसांनी लिहिलंस. धन्यवाद! >>ज्याचा त्याचा बागुलबुवा>>>> अगदी, अगदी.
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Fri, 08/07/2009 - 16:43 नवीन
ज्याचा त्याचा बागुलबुवा>>>> अगदी, अगदी. होहो नंदन ,बरेच दिवसांनी लिहिलेस आणि उत्तमच लिहिले आहेस. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

उत्तर

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/07/2009 - 16:21 नवीन
प्रश्न- हे सारं कुठुन येतं? उत्तर- हे सार 'आतुन' येतं प्रश्न- आतुन म्हणजे नक्की कुठुन? उत्तर- तेच तर आपल्याला शोधायचय. चला आपण सारे तत्वज्ञान तत्वज्ञान खेळू! अनादी कालापासुन चालत आलेला खेळ व अनंतकाळापर्यंत पुरणारा खेळ चालू द्यात! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

विचार करतोय.

भोचक
Fri, 08/07/2009 - 16:38 नवीन
विचार करतोय. बाकी एक खरं. आतलं बाहेर काढण्यासाठीची स्पेस गमावलीय. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

सुरेशचंद्र पाध्ये

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/07/2009 - 16:41 नवीन
अंनिसची ही कामगिरी 'दुसर्‍या स्तरातील लोकांचा तिसर्‍याशी होणारा संघर्ष' आणि 'विचारांत विसंगती असली तरीही तिला वाट देण्यासाठी नव्या पर्यायी यंत्रणेचा अभाव' या सदरात मोडतं, असं माझं मत.
सुरेशचंद्र पाध्ये यांच दै.सकाळ मधील अश्रद्ध सश्रद्ध आणि अंधश्रद्ध लेखातील मत पहा."परिणामी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसल्या जातात आणि अंधश्रद्धाच श्रद्धेची जागा घेते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संघर्ष सुरू होतो तो येथे. हा बिंदू नेमका कसा पकडायचा, यावर तोडगा निघत नाही आणि मग वस्तुतः अंतर्यामी मतैक्‍य असलेले दोन श्रद्धावान गट परस्परांशी लढायला उद्युक्त होतात." हे अगदी अचुक निरिक्षण पाध्यांनी मांडले आहे. अत्यंत समर्पक, समतोल साधणारा लेख क्वचितच वाचायला मिळतो. विवेकी परंतु श्रद्धावान लोकांना जोडून घेण्यास अंनिसला अंतर्मुख करायला लावणारा हा लेख आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

वा ! सुंदर

लिखाळ
Fri, 08/07/2009 - 16:48 नवीन
वा ! सुंदर लेख. शिव्या देण्याच्या प्रथेबाबत अंनिसला काय समस्या आहे ? होळीच्या वेळी बोंब मारण्याबाबत सुद्धा आता ते बोलणार काय? या प्रथांमागे 'मनातल्या द्वेषभावनेचा, रागाचा निचरा करणे' हा हेतू/भाव आहे हे मला बरोबरच वाटते. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
  • Log in or register to post comments

नणंदेचं

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/07/2009 - 17:02 नवीन
नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्य़ाला । सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला हे नाथांच्या भारुडातील सासुरवाशिणीच मनोगत देखील नीचराच आहे. आता त्रास देतीय नणंद, बारक पोरग म्हणल्यावर किरकिर करणारच. त्यात त्या बिचार्याचा काय दोष? आईवरच्या रागापायी बिचार्या पोराला खरुज कशाला? हे प्रश्न निरर्थक असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

आपली

लिखाळ
Fri, 08/07/2009 - 17:10 नवीन
आपली प्रसिद्धी अबाधित राहावी आणि ती मिळवताना कुठला मोठा वर्ग किंवा ताकदवान गट आपल्या विरोधात येऊ नये म्हणून या असल्या साध्या प्रथापरंपरांना 'खरूज होऊ दे' असे काही आहे का? प्रसिद्धीचा रोडगा आपल्याला मिळावा हा हेतू आहे का? (हे प्रश्न आरोप नाहीत तर उत्सुकतेतून विचारत आहे.) -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/07/2009 - 17:25 नवीन
आपल म्हणण खर आहे. ज्या प्रथापरंपरा अनिष्ट आहेत,शोषण करणा-या आहेत त्यांना कालबाह्य प्रथापरंपरांपेक्षा प्राधान्य द्यावे.प्रसिद्धी ही गोष्ट विचारांच्या प्रसारासाठी वापरली जाते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

एका जनार्दनी...

विकास
Fri, 08/07/2009 - 19:16 नवीन
प्रकाशराव, नाथांनी सासू, सासरा, जाऊ, नणंद इतकेच काय अगदी (खवीस असेल कदाचीत म्हणून) नवरा अशा सर्वांनाच काही ना काही (तळपट) होवुदे असे म्हणून शेवटी म्हणले आहे की, "एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला". अर्थात शेवटच्या एकाच ओळीत नाथांनी घेतलेला असल्या शिव्यांचा यथोचीत परमार्श आणि परीणाम पण सांगणे महत्वाचे आहे. त्या निमित्ताने हे भारूड सगळेच खाली देतो: सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, ||भवानी आई || सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करिते लौकर निर्दाळी तिला ||भवानी आई || सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला जाउ माझी फडफड बोलति बोडकी कर गं तिला ||भवानी आई || सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला नणंदेच पोर किर्किर करिते खरूज होऊ दे त्याला ||भवानी आई || सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला दादला मारून आहुति देईन मोकळी कर गं मला ||भवानी आई || सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकलीच राहू दे मला ||भवानी आई || एकनाथ हे समाजात राहून समाजसुधारणा करत होते. स्वतः ज्ञानी होतेच, बुद्धीवंत होतेच. त्यांनीच २००/२५० वर्षे लोपलेल्या ज्ञानेश्वरीचा "जिर्णोद्धार" (शुद्धीकरण) केला. वास्तवीक त्यांना पण स्वतःचा बुद्धीवाद दाखवत रहाता आले असते. पण तसे करून समाज सुधारत नाही हे ते जाणून होते. म्हणूनच एकीकडे गाढवाला पाणी पाज, दुसरीकडे महाराकडे जेवायला जा, तिसरीकडे श्राद्धांच्या भटजींना शब्दाने नाही तर न बोलूनच "फाट्यावर मारणे" असले सगळे प्रकार करत चौथीकडे जनसामान्यांना समजेल करमणूक होईल अशा पद्धतीने भारूड तयार करून लोकशिक्षणाचा प्रयत्न देखील केला. हे सगळे विसरता कामा नये. नाहीतर परत तथाकथीत बुद्धीवादी एखादी ओळ "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन "असे कसे म्हणाले एकनाथ" म्हणत बसतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

छान. हे

लिखाळ
Fri, 08/07/2009 - 19:27 नवीन
छान. हे भारूड एकनाथांच्यावरती असलेल्या धर्मात्मा या चित्रपटात मी ऐकले आणि मला फार आवडले.
हे सगळे विसरता कामा नये. नाहीतर परत बुद्धीवादी एखादी ओळ "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन "असे कसे म्हणाले एकनाथ" म्हणत बसतील...
एकनाथांनी वैयक्तिक समस्या सोदवण्यासाठी देवाला आळवायला शिकवले यावर मात्र नक्कीच उहापोह करतील काही बुद्धीवादी. असो. शहरी जीवनात मोकळेपणा येण्यासाठी आवश्यक असे खेळ-रुढी-गावातल्या पारांसारख्या जागा कमी होत आहेतच. पण शहरी माणसांना त्याचे महत्व सुद्धा वाटत नाहीये असे वाटायला लागले आहे. अंनिससारख्या संस्थांनी उचललेली पावले अश्याच मुळे तर नसतील ना?! -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उहापोह

विकास
Fri, 08/07/2009 - 19:44 नवीन
एकनाथांनी वैयक्तिक समस्या सोदवण्यासाठी देवाला आळवायला शिकवले यावर मात्र नक्कीच उहापोह करतील काही बुद्धीवादी. (फॉर द रेकॉर्ड आपल्याला "तथाकथीत बुद्धीवादी" असे म्हणायचे असेल असे मी समजतो. नाहीतर मेरीलँडहून कान पकडण्यात येतील ;) ) ज्या अशा (तथाकथीत) बुद्धीवाद्यांना असे एका रात्रीत अंधश्रद्धेचा प्रश्न सोडवायचा आहे, त्यांना सांगा, पर्यावरणाचा धोका हा संपुर्ण मानवजातीला आहे. सगळ्यांनी कार्बनौत्सर्जन करणार्‍या विविध गोष्टी (त्यात उर्जा, इंधन आणि सगळेच अधुनिक रहाणीमान आले) तात्काळ कमी कराव्या लागणार आहेत. होतील का कमी तात्काळ? त्या हळूहळूच होऊ शकतील. नुसते बोलायला गेलात तर सामान्य जनता, सरकार आणि उद्योगधंदे सगळेच सरसावतील...तिथे हळू हळू होणे महत्वाचे मग इथे कशाला ओव्हरनाईट? बरं समाजातील अंधश्रद्धा (रुढी या अर्थाने) कमी झाली नाही आहे का? नक्कीच झाली आहे असे मला वाटते. अजूनही होणे महत्वाचे आहे. पण त्या सुधारणेला वेळ देणे महत्वाचे आहे आणि नंदनने सांगितलेला प्रमुख मुद्दा - आल्टरनेटीव्ह देणे.. नाहीतर देवळातले भारूड बंद आणि गुत्त्यातील देशीदारू तेजीत... मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, तैसे जनांसी सिकवावे, हळू हळू|| - समर्थ रामदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

पण शहरी

Nile
Sat, 08/08/2009 - 04:39 नवीन
पण शहरी माणसांना त्याचे महत्व सुद्धा वाटत नाहीये असे वाटायला लागले आहे. अंनिससारख्या संस्थांनी उचललेली पावले अश्याच मुळे तर नसतील ना?!
बर्‍याचदा काही त्या त्या काळातील महत्त्वाच्या रुढी, परंपरा किंवा चालीरीती लोप पावत चालल्या आहेत अशी ओरड होते व त्यावर अनेक जण हळहळतातही. पण जर त्या कालबाह्य किंवा ज्या करीता सुरु झाल्या/केल्या होतील ते कारण नाहीसे झाल्याने बंद पडत असतील तर त्यात नवल ते काय. येथे, त्यांचं जतन करु नका असे प्रतिपादन नाही आहे तर त्या चालीतरी पाळा हा अट्टाहास का हा प्रश्न आहे. एक उदाहरण म्हणुन: लोकमान्यांनी सुरु केलेला गणेशोत्सव व त्याची कारणं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीती आहेत. पण आजचा गणेशोत्सव हा त्याच उद्देशाने होतो का? व्हायला हवा का? तर त्या उद्देशाची गरज आज आहे असे मला तरी वाटत नाही. पण 'जर' इतर कोणताही उद्देश त्याने साध्य होत नसेल 'तर' हा उत्सव थांबला तर त्यात मला तरी हळहळण्यासारखं काही आहे असं वाटत नाही. पण, याच गणेशोत्सवामुळे भारतापासुन सुमारे ८-९ हजार मैलांवरती अजुनही सामाजीक बांधीलकी जोपासली जात आहे हे मी स्वत: अनुभवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

मी असे

लिखाळ
Sat, 08/08/2009 - 04:51 नवीन
मी असे लिहिले होते...
शहरी जीवनात मोकळेपणा येण्यासाठी आवश्यक असे खेळ-रुढी-गावातल्या पारांसारख्या जागा कमी होत आहेतच. पण शहरी माणसांना त्याचे महत्व सुद्धा वाटत नाहीये असे वाटायला लागले आहे. अंनिससारख्या संस्थांनी उचललेली पावले अश्याच मुळे तर नसतील ना?!
अधोरेखीत वाक्यावर अवलंबून असे पुढले वाक्य आहे. आणि त्यामुळे मी प्रथा बंद पडण्याबाबत चिंतीत नसून अधोरेखीत वाक्यातील तत्त्वाकडे शहरी माणसे दुर्लक्ष करीत आहेत असे वाटून सचिंत आहे. नंदनने ज्या कडे निर्देश केला आहे ती भावनेचा निचरा करुन देणारी एक वाट अंधश्रद्धा या नावाखाली बंद होणार असे वाटल्याने सर्व काही लिहिले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तुमचा

Nile
Sat, 08/08/2009 - 04:57 नवीन
तुमचा प्रतिसादाला उत्तर म्हणुन(आणि जरी तुमचं वाक्य quote करुन) मी प्रतिसाद दिला असला तरी तो तुम्ही असे म्हणता या अर्थी नव्हता. म्हणुनच मी सुरुवात "बर्‍याचदा ...अशी ओरड होते" अशी केली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

हे मात्र खरं

प्रकाश घाटपांडे
Sun, 08/09/2009 - 09:47 नवीन
नाहीतर परत तथाकथीत बुद्धीवादी एखादी ओळ "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन "असे कसे म्हणाले एकनाथ" म्हणत बसतील...
अगदी खर आहे. कधी कधी हेच लोक सोयीचा"कॉन्टेक्स्ट" मात्र घेतात प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शिव्या

विकास
Fri, 08/07/2009 - 18:58 नवीन
शिव्या देण्याच्या प्रथेबाबत अंनिसला काय समस्या आहे ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र अनिसचा पुढचा हल्ला (याच कारणास्तव) मिपावर होणार अशी माझी "भविष्यवाणी" आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

अस्वस्थ ऊर्जा कुठली ?

दत्ता काळे
Fri, 08/07/2009 - 17:56 नवीन
अशा वेळी अंनिसने अशा 'ब्लेसिंग इन डिस्गाईज' असणार्‍या प्रथा बंद करण्यात ऊर्जा वाया घालवणे कितपत योग्य आहे? अशी अस्वस्थ ऊर्जा मग प्रथम भडक उक्तीकडे आणि अपरिहार्यपणे विध्वंसक कृतींकडे वळत असेल का? - वरचे वाक्य वाचून माझा काहीतरी गोंधळ होतोय ( कदाचित माझ्या समजण्यातही असेल) वाया जाणारी आणि नंतर ती अस्वस्थ होऊ शकणारी ऊर्जा कुणाची ? अनिस असेलतर ती भडक उक्तीकडे आणि विध्वंसक वृत्तीकडे कशी वळेल ? कारण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दुसरा स्तर हा अधिक विचारी व्यक्तींचा. अंनिस त्यातच मोडत असावे. तरमग विचारी व्यक्ती, कि ज्या अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम समाजाला बरोबर घेऊन करतात, त्या विध्वंसक कश्या होऊ शकतील ?
  • Log in or register to post comments

लेख आवडला....

मनिष
Sat, 08/08/2009 - 01:33 नवीन
विल्यम गोल्डिंगची ३ स्तरातली विभागणी थोडी बाळबोध आणि ढोबळ वाटत असली तरी त्यात तथ्य आहे. मला वाटते की दुसर्‍या स्तरातील वर्गाला पर्याय न देण्यातली अपरीहार्यता आणि अनुषंगाने येणारी विफलता जाणवली की येते ती एक उदासीन निष्क्रियता, बहुतेक शहरी, मध्यमवर्गीय समाज हा असा असतो, असे मला वाटते. बेसनलाडू ह्यांनी म्हटल्याप्रमाणे 'तत्त्वज्ञानाचा अंगिकार' ही एक बाजू आहेच, पण सर्व वेळेस आपण *एकाच* तत्वज्ञानाने नाही वागत; प्रत्येकात ह्या विविध (सगलेच नाही) तत्त्वज्ञानांची सर्मिसळ असते असे वाटते - अर्थात काही तत्त्वज्ञानांचा जास्त पगडा/प्रभाव असू शकतो. एक उत्तम वैचारीक लेख! :) (खुद के साथ बातां : ह्या नंदनचे वाचन बघितले की थक्क व्हायला होते, मी पुस्तकातला किडा आहे बदलून मी चाळतो पुस्तके अधुन-मधून असे म्हणावसे वाटते! ;) काय कय आणि किती वाचतोस रे? बेला आणि नंदन हे चलतेबोलते एन्सायल्कोपीडीया आहेत खरच!)
  • Log in or register to post comments

बर्‍यापैकी सहमत

बेसनलाडू
Sat, 08/08/2009 - 03:22 नवीन
पण सर्व वेळेस आपण *एकाच* तत्वज्ञानाने नाही वागत; प्रत्येकात ह्या विविध (सगलेच नाही) तत्त्वज्ञानांची सर्मिसळ असते असे वाटते - अर्थात काही तत्त्वज्ञानांचा जास्त पगडा/प्रभाव असू शकतो. याच्याशी बराचसा सहमत. परिस्थितीजन्य विचार व वर्तणूक हे या सरमिसळीचे फलित असावे, असे वाटते. मात्र सर्वसाधारण मानवी आयुर्मर्यादेत एक 'ढोबळ', जास्त पगडा असलेले तत्त्वज्ञान हे जीवनाचे मूलतत्त्वज्ञान म्हणून रुजते आणि लेखातील मुद्दा संघर्षभावनेबद्दल असल्याने अशा संघर्षाच्या ठिकाणी या तत्त्वज्ञानाशी फारकत घेणारे दुसरे तत्त्वज्ञान दुसर्‍या बाजूने समोर आले की त्यांचा संघर्ष होतो, असे वाटते. (चिंतनशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

लिखाण

मुक्तसुनीत
Sat, 08/08/2009 - 09:56 नवीन
लिखाण बहुपदरी आहे. मनात अनेक विषय, अनेक संदर्भ जागे असल्याचे जाणवले. मात्र प्रस्तुत बहुस्तरीय लिखाणामधे विस्कळितपणा जाणवला ; जो खुद्द लेखकाने लेखाअंती मान्य केला आहे. एकमेकांचे अवकाश व्यापून असणारे , प्रसंगी छेद देणारे मुद्दे आहेत ; परंतु त्यांमधून काही एक बोधस्वर coherence असा मला जाणवला नाही. मात्र लेखाचा आस्वाद जरूर घेतला. अनेक मुद्द्यांचा परामर्श घेता येईल. सर्वप्रथम प्रमुख गोष्ट : अंनिस ने या प्रथेला दाखवलेला विरोध आणि त्यातून या , प्रथमदर्शनी बिननुकसानीच्या विरेचक (cathartic) - आणि विरेचक म्हणून एका अर्थाने उपकारक - प्रथेला थांबण्याचा धोका. - शिवीगाळीचा कार्यक्रम केवळ शाब्दिक देवघेवीपुरता मर्यादित आहे असे आपण इथे धरून चालतोय. थोडक्यात शिव्यांचे रुपांतर हाथापाईवर येणारच नाही असे एक गृहितक आहे. या गृहितकाच्या ग्राह्यतेचा थोडा विचार हवा. - शिव्यांची तीव्रता हा मुद्दा पूर्णपणे विसरला जावा असे मला वाटत नाही. शिव्या विरेचक म्हणून - थोडक्यात ज्याला "भडास" काढणे असे म्हणतात तशा आहेत (असे लेखक स्वतःच म्हणतो.) तसे असल्यास शिव्यांची तीव्रता, त्यातील लैंगिकता , हिंसक भाव non-trivial असणे धरून चालायला हरकत नाही. आई-बहीण आणि इतर नातेवाईकांचा लैगिक उद्धार , धमकीवजा हिंसक शिव्या हे सगळे विरेचक आहे की भावना भडकाविणारे याचा विचार केला जाऊ शकतो. - या गालिप्रदानात एक कायदेशीर मुद्दा येऊ शकतो : जातीवाचक शिव्या. माझ्या अल्प माहितीप्रमाणे , जातीवाचक शिव्या हा दखलपात्र गुन्हा आहे. ग्रामीण भागातल्या शिव्या जातीवाचक सोडून नक्की कशा असतील याची मला कल्पना थोडी अवघड वाटते. - १८ वर्षांखालच्या मुलांना हे गाली-आदान-प्रदान ऐकायला येऊ नये म्हणून काही विशेष खबरदारी घेतली असेल - पर्यायाने एका बंदिस्त (secluded) वातावरणात हा कार्यक्रम चालत असेल काय ? नसावा असे मला वाटले. ( याबाबत माझ्याकडे पुरावा किंवा स्पष्टीकरण नाही.) एकूण या बाबतीत आंनिस ला झोडपणे म्हणजे typical liberal hogwash वाटायला लागलेला आहे. अंनिस ची एक बैठक मी स्वतः पाहिलेली आहे. माझ्या मते , ते लोक जे काम करतात त्याची तुलना फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावणे अशी मी माझ्यापुरती करतो. आता , या संदर्भात , "या लोकांवर हे ठिगळ लावल्यामुळे तुम्ही त्यांचे social fabric खराब करता आहात " असे कुणी म्हण्टले तर अंनिस किंवा त्यांच्या समर्थकांनी कितपत गांभीर्याने घ्यावे याचा मला प्रश्न पडला आहे. लेखातल्या इतर, चिंतनस्वरूपी बाबी मला (येथील इतर वाचकांप्रमाणे) आवडल्या. गोल्डींग या नोबेलविजेत्या लेखकाचा परिच्छेद मननीय वाटला. लॉर्ड ऑफ द फ्लाईज , प्रस्तुत परिच्छेद वगैरे गोष्टींमधून माणसाच्या स्वभावधर्माबद्दल अखंड चिंतन करणारा माणूस अशी त्याची प्रतिमा दृढ होते. मात्र अंनिसची तुलना इतक्या एका घटनेवरून "नवे पर्याय न देता जुने पर्याय काढून घेणारा घटक" असे करणे मला काय पटले नाही. याबाबत थोडा दिलगीर आहे.
  • Log in or register to post comments

शिव्या

नितिन थत्ते
Sun, 08/09/2009 - 20:31 नवीन
शिव्या देण्याच्या प्रथेविरोधातील अंनिसच्या प्रस्तावित आंदोलनाच्या निमित्ताने अनेक धागे निघाले आहेत. त्यावरचे माझे मत १. या किरकोळ गोष्टीवर अंनिस वेळ फुकट दवडत आहे याच्याशी सहमत. शिव्या देण्याच्या उत्सवात काय प्रकारच्या शिव्या दिल्या जातात हे माहिती नाही. मी होळीच्या उत्सवात ऐकलेल्या शिव्या अर्थहीन असत. म्हणजे बैलाला ... वगैरे (यात काही ही आणि हि अर्थ असला तर तो मला माहित नाही). पण रस्त्यावरील सामान्य भांडणात ज्या शिव्या स्त्री-पुरुष देतात त्या साधारणपणे स्त्रियांविषयी वाईट साईट लैंगिक उल्लेख करणार्‍याच असतात. (साल्या आणि लेका हेही असेच शब्द आहेत) तर तसल्या शिव्या दिल्याजात असतील तर तो समारंभ बंद झाला तर बरे असे मी म्हणीन पण पुन्हा त्यासाठी आंदोलन करावे इतका तो महत्त्वाचा नाही असे वाटते. २. नवा पर्याय द्यायलाच हवा हे पटत नाही ३. असे उत्सव निचरा करणारे म्हणून आवश्यक असे म्हटले आहे. परंतु होळीच्या वेळी आग न पेटवता नुसत्या शिव्या द्या असे म्हटले तर कुणाला मान्य होणार आहे का? ४. एखादी रूढी काही उद्देशाने सुरू होतही असेल. परंतु नंतर गरज संपल्यावरही त्याची फोलकटे उडून जात नाहीत. मंगळागौरीच्या किंवा भोंडल्याच्या खेळांतले बहुतेक खेळ ९-१० वर्षे वयाच्या मुलींचे आहेत. त्या मुलीच्या मानसिक वाढीला योग्य असे आहेत. परंतु आज २५+ वयाची नववधू आणि तिची ५०+ वयाची सासू हे खेळ (स्वतः) खेळण्याच्या बाबत उत्साही दिसल्या तर त्यात केवळ रूढीप्रियता म्हणावी लागेल. एखादी १८-१९ वर्षांची मुलगी भातुकली खेळताना दिसली तर तिला मानसिक आजार असावा असे आपण म्हणतो. परंतु मंगळागौरीत मात्र त्या सासू/सुनेचे कौतुक होते. सामाजिक प्रगती हळूहळू व्हावी हे मान्य केले तरी रूढींमधला फोलपणा हा दाखवायलाच हवा. आणि तो दाखवला तर अंनिसला (किंवा तसल्या कुणालाही) धोपटू नये हे ही महत्त्वाचे. अंनिस वेळ/शक्ती फुकट घालवत आहे यावर पुन्हा सहमत. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

शिव्या चांगल्या असतात, पण...

विकास
Sun, 08/09/2009 - 21:18 नवीन
१० ऑगस्टच्या "टाईम" साप्ताहीकात Why swearing is good for you म्हणून लेख आला आहे. जालावर त्याचे शिर्षक थोडे वेगळे आहे: Bleep! My Finger! Why Swearing Helps Ease Pain आत्यंतिक त्रासाच्या वेळेस शिव्या दिल्या तर त्याचा उपयोग वेदना कमी होण्यासाठी होतो हा शास्त्रीय प्रयोग ब्रिटन मधील Keele University करून पाहीला आहे. असे देखील लक्षात आले आहे की त्याचा उपयोग (वेदना नाशक म्हणून) हा स्त्रीयांना जास्त होतो. पुरूषांना न होण्याचे कारण, पुरूष उठसुठ शिव्या देत बसतात, परीणामी कुठल्याही औषधाप्रमाणे त्याचा उपयोग कमी होवू लागतो :-( तात्पर्य: अनिस आणि तत्सम संघटनांना हा वैज्ञानिक दाखला देऊन, अधुनिक विज्ञानास योग्य म्हणून "शिव्या देण्याचे" कार्यक्रम चालू करायला हरकत नाही. सोपी पद्धत ज्या अनिष्ठ प्रथांना सोडायचे असेल त्यांना शिव्या देण्यास सुरवात करायची. ही "अनिस्ट" प्रथा ताबडतोब लोकप्रियता मिळवेल आणि पाठींब्यामधे प्रचंड प्रमाणात वाढ दिसेल! ;)
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 09:39 नवीन
'अनिस्ट' प्रथा चालु करण्याची आयडिया आवडली प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

थोडासा विस्कळित, पण विचारांना चालना देणारा लेख

धनंजय
Mon, 08/10/2009 - 07:10 नवीन
आवडला. गोल्डिंगच्या लेखाचा दुवाही चांगला. (मला असे वाटले की - उच्च कोटीचा विचारवंत होणे फार थोड्यांना जमते, तेव्हा दुसर्‍या वर्गाचा विचारवंत तरी व्हावे, असा काही मथितार्थ लेखाचा आहे. उच्च कोटीचा होणे जमत नाही म्हणून तिसर्‍या दर्जाचे व्हावे, किंवा विचार करणे व्यर्थ आहे असा काहीच अर्थ मी त्यातून काढू शकलो नाही. नागपंचमीच्या शिवीगाळाबद्दल अंनिसची स्वतःहून भूमिका वाचायला आवडेल. त्यांच्या संकेतस्थळावर काही सापडत नाही. त्यांच्या संकेतस्थळावर नागपंचमीच्या वेळेला नागाची पूजा करण्याच्या नादात अनेक नाग मारण्यात येतात, त्याबद्दल लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

मन
Mon, 08/10/2009 - 21:42 नवीन
तितकीच उत्तम, यथासांग चर्चा. आपलाच, निव्वळ वाचक मनोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा