Skip to main content

ध्येय!

लेखक राघव यांनी शनिवार, 01/08/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :) आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज, भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे! अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! राघव
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3864
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! ... सुंदर !

अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! अप्रतिम! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

असेच म्हणतो.

In reply to by घाटावरचे भट

सहमत...... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

बऱ्याच दिवसांनी?

सर्वांचे मनापासून आभार. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )