संसर्गजन्य रोग, त्यायची आकडेवारी , त्यायचे इष्लेषन भारीच हाये.
भारतात लस निरुपयोगी आहे, असे नसावे, तर सध्या याबाबतीत भारतात दुर्लक्ष आहे. ह्यो मुद्दा लय पटला.
-बाबुराव
अतिशय अभ्यासपुर्ण लेख. बरकावे दिल्याने बरेच काही मुद्दे उलगडले गेलेत.
वरील सर्व प्राधान्यक्रमात नवजात अर्भकाच्या / बालम्रुत्यूचे काहीच स्थान नाही का? असे का?
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
अर्भकांच्या/बालकांच्या मृत्यूला प्राधान्यक्रम हा DALY हिशोबात दिला जातो. अर्भकाच्या/बालकाच्या मृत्यूने आयुष्याचा अधिक कालखंड हरपतो, त्यामुळे एका अर्भकाच्या मृत्यूला वृद्धाच्या मृत्यूपेक्षा अधिक वजन मिळते.
त्याहूनही अधिक वजन मिळावे असा भावनिक मुद्दा कधीकधी आपल्याला दिसतो. विशेषतः नवसासायासाने टेस्ट-ट्यूबच्या मदतीने झालेले मूल मृत्यूशी झटत असताना लोक अक्षरशः लाखोनी डॉलर/करोडोनी रुपये खर्च करण्यास तयार असतात. पण ही भावनिक बाब मात्र थोडीशी संदर्भावर अवलंबून असते. एखादा पुत्र आपल्या आईसाठीसुद्धा पाण्यासारखा पैसा वाहावील. आजी आणि नवजात बालक दोघांना वाचवण्याचा प्रसंग एकाच वेळी कोणावरही क्वचितच येतो, त्यामुळे प्राधान्यक्रम काय असावा, याविषयी लोकांना विचारता जवळातजवळचा संदर्भ डोळ्यासमोर येऊन लोक उत्तर देतील.
उत्तम लेख आणि विश्लेषण.
आपण वर दिलेले प्राधान्यक्रम हे खरोखर वापरातले आहेत, की ते असे असावेत असे आपल्याला वाटते? लेख वाचून उलगडा झाला नाही म्हणून विचारले.
"Great Power Comes With Great Responsibilities"
या विषयावर उपलब्ध असलेली बरीच माहिती गोळा करून या लेखात दिली आहे. पण केंव्हाही प्राधान्याचा विषय येतो ( तसा तो क्षणोक्षणी येतच असतो) तेंव्हा आपल्यासमोर शृंगापत्ती असते. प्राधान्य ठरवतांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेक रोगांपैकी कोणता रोग अधिक घातक आहे, प्राण वाचवणे की जीवन अर्थपूर्ण करणे अधिक महत्वाचे, कोणाचे जीवन अधिक मौल्यवान अशा प्रकारच्या विकल्पांची चर्चा या लेखात केलेली आहे. प्रत्येक माणूस आपापल्या दृष्टीने विचार करतो, त्यामुळे यातल्या कशावरच सर्व लोकांचे एकमत होणार नाही. याखेरीज आणखी कांही पैलू आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे सद्यपरिस्थितीत आपण काय काय करू शकतो आणि त्यातल्या प्रत्येकात यशाची खात्री कितपत आहे? तसेच अपयशाची शक्यता केवढी आहे हे पाहून ठरवावे लागते. साध्या आजारातसुध्दा घरगुती उपचार, अॅलोपाथिक, आयुर्वेदिक, होमिओपाथी, निसर्गोपचार हे विकल्प असतात, त्यातल्या एकाची निवड करावी लागते. तो उपचार कधी लागू पडतो, कधी पडत नाही, कधी अर्धवट गूण येतो. कधी कधी साइड इफेक्ट्स दिसतात. पण तरीही एकच प्राधान्यक्रम ठरवता येत नाही. व्यक्तीगत आयुष्यात असे होते तर समाजासाठी ठरवणे किती कठीण असेल?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
पण तरीही एकच प्राधान्यक्रम ठरवता येत नाही. व्यक्तीगत आयुष्यात असे होते तर समाजासाठी ठरवणे किती कठीण असेल?
अगदी खर आहे. "लाख मरो पण लाखांचा पोशिंदा जगो' हा प्राधान्य क्रम असाच आला. कधी कधी स्वतःला लाखांचा पोशिंदा समजणारे तथाकथित लोकप्रतिनिधी जगल्या मुळे लाखो मरतात हा भाग अलाहिदा (|:
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
धनंजय यांचा अतिशय मुद्देसूद लेख.
मी मांडलेले जवळजवळ सर्व मुद्दे आकडेवारी देऊन खोडून काढले आहेत.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवणे अवघडच असते. काही गोष्टी मी मला वाटणार्या प्राधान्यक्रमाला अनुसरून लिहिल्या होत्या. त्याबद्दल अर्थातच मतभेद असू शकतात.
एक मुद्दा मात्र मांडू इच्छितो.
एडसवर उपाय नसताना होणारे मृत्यू आणि पटकी / क्षय यांवर उपाय अनेक वर्षांपासून उपलब्ध असताना होणारे मृत्यू आकड्यांत जरी साधारण सारखे दिसले तरी ते सारखे नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.
रोगप्रतिकारशक्तीचा मुद्दा थोडा स्पष्ट करतो. पाश्चात्यांचे विविध जंतूंना असलेले एक्सपोजर कमी असल्याने फ्लूसारख्या रोगांविरोधातली प्रतिकारशक्ती कमी असते (रेडी नसते). त्या मानाने भारतीयांना ते एक्सपोजर जास्त असते आणि त्या प्रमाणात स्वाइन फ्लूसारख्या रोगांपासून मृत्यूचा धोका कमी संभवतो.
सार्स रोगावर वेळीच उपाययोजना केल्याने रोग आटोक्यात राहिला की रोग किरकोळच होता याची निश्चित आकडेवारी माझ्याकडे नाही.
(त्या रोगाचे नाव मात्र Severe Acute Respiratory Syndrome असे मजेशीर म्हणजे एकाच अर्थाचे दोन शब्द वापरून बनवले होते).
(अवांतर: शतकातील सर्वात मोठी भरती या निमित्ताने आनंद घारे यांनी हाईप या प्रकाराचा समाचार घेतला आहे)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
एडसवर उपाय नसताना होणारे मृत्यू आणि पटकी / क्षय यांवर उपाय अनेक वर्षांपासून उपलब्ध असताना होणारे मृत्यू आकड्यांत जरी साधारण सारखे दिसले तरी ते सारखे नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.
सहमत. उपचार असूनही जर आकडा इतका मोठा आहे तर तो अधिक चिंतेचा विषय आहे असे मला वाटते
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
प्रतिक्रिया
लेख आवडला
माहितीपूर्ण लेख
बरकावे
अर्भकांच्या/बालकांच्या मृत्यूला प्राधान्यक्रम
चांगलाच
उत्तम लेख
धन्यवाद!
छान.
माहितीपूर्ण लेख
उत्तम प्रतिसाद
उत्तम लेख
सहमत