खेळ शारिरिक व बौद्धिक विकास तर साधतातच पण उत्तम चारित्र्य सुद्धा घडवतात.
आजकाल लहान मुलांनी मैदानी खेळांकडे पाठ फिरविली आहे आणी फास्ट फुड खाण्याकडे कल वाढलेला आहे. दुरचित्रवाहिन्या, संगणक यामुळे मुले हिंसक आणी हट्टी बनत आहेत हे खरे आहे. इथे पालकांचे काम खुप महत्वाचे ठरते.
खेळासंबंधी नसला तरी आजकालच्या मुलांच्या स्वभावाबद्दल पुर्वी यासंदर्भात मिपावर मी एक चर्चाप्रस्ताव मांडला होता.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
बोला पंढरीनाथ महाराज की जय !
तर मंडळी, मी कुठे होतो ? हो इथेच होतो की.....
मुलांना बाहेर खेळायला पाठवत चला ( अग एय कशाला त्याला बाहेर पाठवतेस ? कपडे मळतील ना?)
मुलांमधे मिसळु द्यायला हवे, म्हणजे कसे टिम बिल्डींग होते ( नको, मुलांमधे जातो आणि शिव्या शिकुन येतो)
पडतील झडतील, त्यांचे ते उठतील, शिकतील हळु हळू ( गुडघे फोडुन घेईल तर परत डॉक्टरची बिले वाढ्तात)
नवीन गोष्टी शिकतात, व्यवहारी बनतात (नाही त्या गोष्टी ऐकतो आणि विचारत बसतो, बिनडोक साला)
सारखे टीव्ही आणि अभ्यास काय कामाचा? (खेळुन काय भले होणार आहे? नोकरी का मिळणार आहे?)
नंतर आहेच कामाचा रगाडा ! खेळु द्या!! (एकदा का नोकरीला लागला, दोनाचे चार झाले की सुटलो)
तर मुलांना खेळायला पाठवा !! (बस रे मुकाट्याने अभ्यास करत. अग एय दार लावुन घे, यायला उशीर होईल, पार्टी आहे)
बोला पंढरीनाथ महाराज की जय !
(अविवाहित निपुत्रिक) अवलिया
ह्या खेळा बद्दल माहिती नाही.
'डोंगराला आग लागली' :|
कसा खेळला जातो? /जात होता?
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
जागु छान लिहिल आहेस... अगदी खर आहे....कार्टुन्स बद्दल तर काय विचारुच नाही आजकाल... मी फक्त टॉम अँड जेरी , नॉडी ..बघु देते मुलांना. बाकि आपणच सवय लावल्याशिवाय त्यांना खेळाची आणि वाचनाची आवड लागत नाही.
लेख खुप छान आहे.
टॉम अँड जेरी माझा सगळ्यात आवडता प्रोग्राम.. कधी कधी पोपाय पण पाहते.. बाकी कार्टून या विषयात मला गती कमीच.. एकदा बहुधा मटामधे लेख आला होता.. "शिनचान" बद्दल.. म्हणे हा मुलगा इतका आगाऊ नि फटकळ आहे.. की तो प्रसंगी आईबाबांचा नि शिक्षकांचाही अगदी लीलया अपमान करतो.. ते पाहून मुलं उद्ध्ट बनताहेत... म्हणून आपल्याकडे त्यावर बंदी घातली होती.. बहुतेक हंगामावरती ती मालिका पुन्हा चालू झालीये..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
वेळ नाही ही ओरड होऊनही आता मला वाटते जवळपास १५ एक वर्ष होत आली आहेत! पालकांनी निष्क्रीयता सोडायला हवी तरच ह्यावर मार्ग निघेल. नुसते ओरडून उपयोग नाही.
२० - २५ वर्षांखाली परिस्थिती बरी होती अफाट वहाने, गर्दी असे फार नसे. सुरक्षितताही खूप होती मुले पळवणे वगैरे प्रकार फारसे नव्हते, गुंडगिरी तुलनेने कमी होती अशावेळी मुलांना एकटे-दुकटे किंवा इतर लहानग्यांबरोबर मैदानावर पाठवणे शक्य होते. एकत्र कुटुंबामुळेही परिस्थितीत फरक होता. आता तशी स्थिती नाही. मुलांना असंख्य प्रकारचे धोके वेढून आहेत. काही मिनिटांचा अवकाश आणि होत्याचे नव्हते घडू शकते त्यामुळे पालकांनीच मुलांना वेळ देणे जरूर आहे त्याला सध्यातरी पर्याय नाही.
आपण पालक त्यांच्यासाठी काय करतो? रोज एखादा तास त्यांच्याबरोबर जवळच्या शाळेच्या/महाविद्यालयाच्या मैदानावर जातो? टिवी समोर स्वतः कमी बसतो? मुलांनी सतत अभ्यासच करायला हवा असा धोशा कमी करतो?
मुलांनी रोज अभ्यास जसा करायला हवा तसे रोज खेळलेच पाहिजे असा आग्रह धरतो? खेळात लागल्यावर त्याच्यावर/तिच्यावर न ओरडता ते समंजसपणाने घेतो? तुमच्या घरी त्याच्या/तिच्या सवंगड्यांना मनमुराद बागडू, खेळांचा पसारा करु देतो?
मुलांना हवा असतो तो मोकळा वेळ आणि समवयस्कांबरोबर भरपूर आरडाओरडा, पळापळ, धावणे. भरपूर पळून लालबुंद चेहेरा होऊन, छातीचा भाता धपापणार्या मुला/मुलीचं तुम्ही कधी कौतुक केलंय? वा काय मस्त दमला आहेस रे असं कधी म्हटलंय?
त्यांना आकडे, मुळाक्षरं, गणितं यायला हवीत म्हणून रागावताना; त्यांना पोहायला आलं पाहीजे, सायकल आली पाहीजे, झाडावर चढायला आलं पाहीजे असाही आग्रह धरा! ते गरजेचं आहे. अशा गोष्टीतून मुलांचा आत्मविश्वास वाढतो (आमच्यावेळी असं म्हणायला कोण होतं असा सूर नको - कारण त्यावेळच्या परिस्थितीची तुलनाच होऊ शकत नाही बर्याच गोष्टी करुन घ्यायला वडीलधारे असत आणि मोठ्या भावंडांचं बघून लहानगे शिकत. सध्याच्या मुलांचा एकटेपणा भयानक असतो. एकदा त्यांच्या मानसिकतेचा विचार करुन बघा. फक्त खाऊ आणि खेळणी त्यांना नको असतात.)
थोडी मोठी मुले/मुली असतील तर त्यांना तुमच्याबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला यायला सुद्धा आवडते. शनिवार्/रविवार पैकी कधी मुलांबरोबर सायकल चालवून बघा मजा येते.
टीवीसमोर स्वतः बसणे कमी करा मुले आपोआप कमी करतात कारण ती जे बघतात तेच करणार, ओरडून उपयोग नाही (जाता जाता - माझ्याघरी गेली पाच वर्षे टीवी नाहीये एकदाही त्याची कमी जाणवली नाही!
मी माझ्यासाठी सायकल घेतली आहे आणि मुलाबरोबर चालवतो, त्याच्याबरोबर आणि त्याच्या मित्रांबरोबर इथल्या सोसायटीत बास्केटबॉल खेळतो. खेळणारे पालक इथेही कमीच.)
चतुरंग
फार चांगला धागा कारण हा नेहमी विचार करायला लावणारा विषय आहे. चतुरंगजीचं म्हणणं अगदी पटलं, पण ..
अश्या खूप गोष्टी आहेत कि ज्यातून मुले खेळण्याचा आनंद उपभोगू शकतात आणि त्यात बुध्दी आणि शारिरीक व्यायामसुध्दा होतो. उदा. माझ्या मित्राच्या मुलाला ट्रेकींग आवडते, जंगल भटकंती आवडते त्याचबरोबर तो दुर्गप्रतिकृती करण्याचा प्रयत्न करत असतो. अश्या अनेक वेगळ्या गोष्टी असू शकतात. मित्रांसोबत जवळपासची भटकंती करण्याजोगी ठिकाणे बघायला जाणे, छंद म्हणून विविध वस्तू तयार करणे, घरातल्या बिघडलेल्या वस्तूंची जुजबी दुरुस्ती असेल तर ती करणे, इ. अनेक गोष्टी करता येऊ शकतात.
टि.व्ही.मुळे मुलांना खेळाच्या बाबतीतसुध्दा आवड-निवड निर्माण झालेली आहे. ते बहुतेक खेळ खर्चिक आहेत आणि त्यातून मुलांनी त्यात सातत्य राखले नाही, कि त्याचा कुठ्ल्याचप्रकारे फायदा होत नाही. आजकालच्या मुलांना वाचनाचासुध्दा नाद नाही, नाहीतर त्याचासारखा विरंगुळा नाही.
प्रतिक्रिया
खेळ
खेळ
उत्तम
बोला
हाण
वा ! उत्तम
चांगला लेख
ह्या खेळा
मी हि
अमोल
अनुभवी दिसताहात मास्तर.
(विषय दिलेला नाही)
मस्त लेख!
अगदी मनातलं बोललात..
वाह वाह
मुलांसाठी मैदाने नाहीत,
फार चांगला विषय / धागा.