"निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना असे मर्ढेकरांनी का म्हटले असेल?
ब्रम्ह निश्चल आहे का? की चल आहे? की चल + निश्चल मिळून आहे? की सर्वम खल्विदं ब्रम्ह आहे?
आपण दिलेल्या कवितेचा अर्थ आम्हाला सांगता येणार नाही आणि आम्ही ती कविता वाचलेली नाही पण मर्ढेकरांच्या बाबतीत ते इंग्लंडला जाऊन येईपर्यंत रविकिरण मंडळाच्या स्वप्नाळू आणि रोमॆंटीक कविता श्रेष्ठ होत्या मात्र इलियेट,ऒडेन आणि काही इतर पाश्चिमात्य कविंचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांची कविता जमिनीवर उतरुन चालू लागली, असे म्हणतात. नवे वास्तव त्यांनी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यांच्या दुष्पपरिणामुळे वैयक्तिक जीवनात येणारे दैन्य,लाचारी,स्वार्थ, ढोंग त्याचबरोबर आलेली यांत्रिकता,महायुद्धांचे परिणाम यांच्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून उपरोधाने,उपहासाने,तिरस्काराने आणि कारुण्याने त्यांची कविता मानवतेची बनली इतकेच आम्हाला माहित आहे.बुद्धांचा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता का ? या बद्दल आमचे फारसे वाचन नाही.
बाकी "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, याचा विचार आम्हाला तरी तेव्हाच्या काळाच्या दृष्टीने अप्रस्तुत वाटतो ! (प्रतिसादाचा सूर हलकेच घ्या असा आहे.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
"निश्चलता"
मानवतेचा कवी मर्ढेकर !
मस्त !