जुलै २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Banks) निवडणुका सुरू आहेत तर काही ठिकाणी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारणात या निवडणुका व बँकांच्या माध्यमातून चालणारे अर्थकारण महत्त्वाचे असते. विविध सहकारी संस्था, सेवा सोसायट्या, गट वगैरेंची प्रतिनिधी या बँकांवर संचालक असतात.
ठाण्याची निवडणूक एकनाथ शिंदे प्रणित गटाने जिंकली. अहिल्यानगर व नांदेडची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण राजकारणात रस असलेल्या मिपाकरांनी या निवडणुका follow करायला हरकत नाही.
सध्या Citizen Vigilante या जर्मनी व ब्रिटनने अप्रत्यक्षरीत्या बंदी घातलेल्या सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सद्गुणविकृतीचा प्रादुर्भाव झालेल्या युरोपातील जनमानस या सिनेमात प्रतिबिंबित झालेले दिसते.

वाचने
3440
प्रतिक्रिया
145
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे. कन्हैया कुमार, उमर…
In reply to भारतीय तरुणांची अकारण डागाळलेली प्रतिमा पुनर्स्थापित by अप्पा जोगळेकर
सहमत आहे. कन्हैया कुमार, उमर खालिद, शर्जिल इमाम, दिपके . . . एकापेक्षा एक.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या…
In reply to भारतीय तरुणांची अकारण डागाळलेली प्रतिमा पुनर्स्थापित by अप्पा जोगळेकर
राष्ट्रकुल स्पर्धेच्या रेस्टोरंट च्या बाहेरून आंतील पदार्थ पाहून तोंडाला चव काढत तुम्हाला हळूच मागच्या गल्लींत जाऊन जंतर मंतर च्या आंदोलनाच्या कथित कचराकुंडीत पाहावे लागत आहे ह्यावरून दांभिकता, वैफल्य, बुद्धिभ्रम आणि वैचारिक दिवाळखोरी दिसून येत आहे.
जो बूंद से गयी वो हौद से नाही आती !
बदनाम गल्लीतून घरी येऊन जानवे बदलले म्हणून पापक्षालन होत नाही, आणि कुणा सरकारी नोकराने आपल्या मायबापची स्तुती केली आणि श्रेय दिले म्हणून भ्रष्टाचाऱ्याच्या दलदलीचे रुंपांतर लोण्यात होत नाही.
क्या बात है
In reply to राष्ट्रकुल स्पर्धेच्या… by साहना
साहना,
अगदी मनातलं बोललांत पहा. पूर्वी कशी पदकंच मिळायची नाहीत. त्यामुळे असली समस्याच उद्भवायची नाही. हल्ली सुवर्ण काय रौप्य काय ही ढीगभर पदकं मिळायला लागल्यापासनं हे असले दावे सुरू झालेत. मोदी आल्यावरंच ही थेरं सुरू झाली.
आ.न.,
-गा.पै.
https://www.youtube.com…
In reply to क्या बात है by गामा पैलवान
https://www.youtube.com/shorts/0EmgeO4CCuk
आपका व्हिजन है सर .... (ह्यांच व्यक्तीचे भारतातील दूरचे भाऊ)
शिळ्या कढीस ऊत
In reply to https://www.youtube.com… by साहना
०९ ऑगस्ट २०२४ चं जुनं चलचित्रं असल्याने शिळ्या कढीस ऊत आणलेला वाटतो ( वैम ).
-गा.पै.
२०१४ पासून एकाच चूर्ण खाऊन…
In reply to शिळ्या कढीस ऊत by गामा पैलवान
२०१४ पासून एकाच चूर्ण खाऊन राहिलेल्यांसाठी २०२४ म्हणजे फ्रेश माल आहे.
चूर्णप्रभाव
In reply to २०१४ पासून एकाच चूर्ण खाऊन… by साहना
२०१४ च्या चूर्णप्रभावे तर इतकी रासभर पदकं मिळताहेत. २०२४ चा माल त्यामानाने निकस, नीरस व शिळसट वाटतो.
-गा.पै.
भारताचा सर्वोत्तम CWG पदक…
In reply to चूर्णप्रभाव by गामा पैलवान
भारताचा सर्वोत्तम CWG पदक तक्ता २०१० साली होता. तेंव्हा भारताला १०१ पदके मिळून भारत द्वितीय स्थानी होता.
सुरेश भाऊ कलमाडी यांचे सुवर्ण पदक
In reply to भारताचा सर्वोत्तम CWG पदक… by साहना
2010च्या cwg स्पर्धा भारतीय भूमीवर भरवल्या गेल्या होत्या आणि ढिसाळ नियोजन, सुरेश कलमाडी यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे ही स्पर्धा क्रीडाबाह्य कारणांसाठीच जास्त गाजली. मायभूमीत भरवली गेलेल्या ह्या स्पर्धेत घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा उठवत क्रीडापटूनी अगदी सरस कामगिरी केली होती.अर्थात त्यावेळी शूटिंग, कुस्ती, बॅडमिंटन, होकी हे भारताचे हमखास यश मिळवून देणारे खेळ सोबतीला होते. ह्यावेळी हे खेळ नसून देखील ग्लासगो च्या परकीय भूमीत मिळवलेले यश आण चौथा क्रमांक दिसत असल्यामुळे क्रीडा जगतात आश्चर्य, कौतुक आणि समाधान व्यक्त होत आहे.
क्रीडा जगतात आश्चर्य, कौतुक…
In reply to सुरेश भाऊ कलमाडी यांचे सुवर्ण पदक by अप्पा जोगळेकर
शाखेवर खेळणाऱ्या मध्यमवयीन रिकामटेकड्याना "क्रीडा जगत" म्हणून संबोधित करणे थोडे जास्त नाही का झाले ?
आयला !
पदक राजकारण्यांना समर्पित केलं म्हणून कौतुक ! मुद्दलात मेडल मिळाले ह्याचे तरी कौतुक आहे का नाही कळायला मार्ग नाही. असो !
पदक प्राप्त करणाऱ्या भारताच्या जेन झी क्रीडापटूंचे हार्दिक अभिनंदन ! आणि सरकार हे जनतेने निवडलेले असते अन् प्रसंगी जनता त्यास झुकवू शकते *, ही लोकशाहीवादी जाणीव आणीबाणी नंतर पुन्हा एकदा कैक दशकांनी जागृत करणाऱ्या जेन झी पोरांचे सुद्धा अभिनंदन !
* आणीबाणी काळात इंदिरा गांधीने जेलात टाकलेल्या आमच्या आळीतल्या एका काकांचे प्रांजळ मत
बाकी आमच्या आप्पांचा आवेश जगावेगळा असतो एकदम बटाट्याची चाळ मधला बंडू नाडकर्णी आठवतो. नैष्ठिक, व्रतस्थ, चाळीच्या गॅलरी मध्ये परवचा खडाखडा म्हणणारा, रतन समेळ आणि मधु गुप्तेचे प्रेमपत्र त्याच निष्ठेने घडाघडा तोंडपाठ बोलून पूर्ण चाळीला समजवून सांगणारा !
चालक मालकांना विनंती की पाककृती, काथ्याकूट, कथा आणि ललित, काव्य ह्या सारखाच "आप्पांच्या गप्पा" नावाचा एक नवा लेखन विषयच सुरू केला तर खूप उपकार होतील !.
(गरगर फिरणारा पंखा) खोंडे
तुमचा आवेश लखू रिसबूड सारखा…
In reply to आयला ! by वृषभ खोंडे
तुमचा आवेश लखू रिसबूड सारखा वाटतोय
नाही
In reply to तुमचा आवेश लखू रिसबूड सारखा… by अप्पा जोगळेकर
लग्न झालं आहे माझं, माफक पोरं पण आहेत (सरकारला चालतील इतकी), अन् आई स्वतः कॅलेंडर बघते एकादशी कधी आहे ते पाहते, मला फोर स्क्वेअर काय मार्लबरो पण परवडते अन् मी कॅप्स्टनच्या नादी लागत नाही, इतके असूनही. कॉलेजातील परब , दाराशा अन् कंपनीला वन साईड दोन सेट लागोपाठ हाग्या मार पण दिला आहे बॅडमिंटन मधेच !
नुकतेच बारावे सुवर्ण पदक…
नुकतेच बारावे सुवर्ण पदक मिळवून भारत क्रमांक 4 वर पोचला आहे.
वाहवा
In reply to नुकतेच बारावे सुवर्ण पदक… by अप्पा जोगळेकर
❤️❤️❤️ अगदीच छान बातमी !
सफरचंदे आणि संत्री तुलना करू नये इतकी बेसिक हॉर्सपॉवर बाकी असलेला (नॉन पंजाबी) शेतकरी
- (नाना) खोंडे
Rishikanta सिंगच्या स्तुतीमुळे मोदींचे टीकाकार चवताळले
Indian weightlifter Rishikanta Singh Chanambam dedicated his historic silver medal in the men's 60kg event at the 2026 Commonwealth Games in Glasgow to Prime Minister Narendra Modi. He credited the Prime Minister and the government for strengthening the country's sports ecosystem and providing vital support to athletes.
ब्रिजभूषणाला समर्पित केले तर…
In reply to Rishikanta सिंगच्या स्तुतीमुळे मोदींचे टीकाकार चवताळले by अप्पा जोगळेकर
ब्रिजभूषणाला समर्पित केले तर जास्त आनंद होईल
संघाच्या बाळासाहेब देवरसांनी
आणीबाणीच्या वेळी जेल मधून (येरवडा मध्यवर्ती कारागृह) आणि हॉस्पिटल प्रिजन वॉर्ड मुंबई मधून इंदिरा गांधींना (भालमाण करणारी)
दोन पत्रे लिहिली होती असे कळते आहे. तसेच एक पत्र आचार्य विनोबा भावेंना लिहून इंदिरा गांधींपाशी संघाची रदबदली करून संघावर त्यांनी लादलेली बंदी उठवण्याची विनंती करण्याच्या बाबत पण पत्र आहे असे दिसते.
Ramesh has submitted three letters by Deoras—two to then Prime Minister Indira Gandhi and one to Acharya Vinoba Bhave. Deoras had appealed to Gandhi to lift the ban on RSS. He had also congratulated Gandhi after the Supreme Court had upheld the validity of her 1971 election, writing: “Let me congratulate you as five judges of the Supreme Court have declared the validity of your election.” The letters indicate that the tone and tenor of the correspondence was accommodative towards the government. Deoras had repeatedly appealed for the ban on RSS to be lifted, for its jailed volunteers to be released, and for the organisation to be allowed to contribute to government programmes.
असे म्हणणे आहे एकंद्ररीत खरे खोटे देव, संघोटे अन् खांग्रेसी जाणोत
साधारण अशी गोष्ट पूर्वीही घडली आहे
In reply to संघाच्या बाळासाहेब देवरसांनी by वृषभ खोंडे
गांधीहत्येपश्चात संघावर बंदी घातल्यावर गोळवलकरांनी नेहरूंना पत्र लिहून बंदी उठवण्याची विनंती केली होती. गंमत म्हणजे या बंदीचा गांधींच्या हत्येशी कसलाही थेट संबंध नव्हता.
-गा.पै.
गांधी हत्या
In reply to साधारण अशी गोष्ट पूर्वीही घडली आहे by गामा पैलवान
आणि आणीबाणी दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत.
एक वेगळीच कथा
एका पुनर्मिलनाची गोष्ट
प्रकाश नावाचा तमिळनाडू मधील मुलगा २००३ साली १६ वर्षाचा असताना लहान भावासोबत काहीतरी घरगुती भांडणाचे कारण होऊन घर सोडून जातो. चार महिन्यांनी फोन करून घरी सांगतो की मी चेन्नई मध्ये आहे पण नंतर टोटल गायब. २०२६ मध्ये तो पंजाब मध्ये एका डेअरी फार्म वर वेठबिगार मजूर म्हणून रेस्क्यु होतो आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत री युनाईट होतो.
ट्रंपची केविलवाणी व…
ट्रंपची केविलवाणी व हास्यास्पद अवस्था पाहवत नाही. एखाद्या महासाम्राज्याला अत्यंत नाकर्ता व बुद्धिहीन वारस मिळाल्यानंतर महासाम्राज्य लयाला जाते, तसेच सध्या अमेरिकेत होत आहे. भारतातही एका राजकीय महापक्षाच्या कर्तृत्वहीन व बुद्धिहीन वारसामुळे तो महापक्ष आता गलितगात्र अवस्थेत आहे. काही प्रादेशिक पक्ष सुद्धा नाकर्त्या व बुद्धिहीन वारसामुळे मरणोन्मुख अवस्थेत आहेत.
सुदैवाने अमेरिकेत कायमस्वरूपी वारस नसल्याने अमेरिकेची घसरण २० जानेवारी २०२९ पर्यंतच होत राहील, पण भारतातला राजकीय पक्ष तसे सुदैवी नाहीत.
काल ट्रंप व इस्राएल एकत्रित येऊन इराणवर प्रचंड मोठा हल्ला करणार व इराणची उर्जाकेंद्रे नष्ट करणार अशी ट्रंपने (नेहमीप्रमाणेच पोकळ) धमकी दिली होती. त्यावर इराणनेही धमकी दिली की ते कुवेत, बॅहरिन, सौदी अरेबिया, कतार यांच्यावर जोरदार हल्ला करून त्यांची उर्जाकेंद्रे नष्ट करतील.
आज ट्रंपने जाहीर केले की इराणने वाटाघाटींची तयारी दर्शविल्याने आम्ही हल्ला करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. प्रत्यक्षात असे वृत्त आहे की इराणच्या धमकीमुळे सौदी अरेबिया घाबरला असून त्यांच्या प्रमुखाने ट्रंपशी बोलून हल्ला न करता वाटाघाटी करण्यास सांगितले. इतर अरब देश सुद्धा घाबरले आहेत.
इराण बहुतेक अणुबॉम्ब निर्मितीच्या अगदी जवळ पोहोचला असावा असे वाटते.
हो ना
In reply to ट्रंपची केविलवाणी व… by श्रीगुरुजी
अहमदाबादेत जगातील सगळ्यात मोठे क्रिकेट स्टेडियम भरून जनता गोळा करून माय फ्रेंड डोलांड पण करून झाले ह्याच्यासाठी पण तात्या काही सुधारण्याचे नाव घेत नाही.
एका मातेची कृतज्ञता - …
एका मातेची कृतज्ञता -
मोदींच्या महानतेमुळे माझ्या कन्येला नवीन आयुष्य मिळाले.
कालाय तस्मै नमः |
गंमतच आहे
In reply to एका मातेची कृतज्ञता - … by श्रीगुरुजी
मोदींनी लाथाबुक्क्या घालून तुडवले नाही. असो, हीच का ती ? १५ ची आहे पण व्यक्तिमत्व पाहून २५ची वाटलेली तुम्हाला ? असो असो !
माझ्या मुलीला दत्तक घेऊन…
माझ्या मुलीला दत्तक घेऊन तिचे आयुष्य घडवा अशी विनंती मुलीची आई करतीये.
हे जरा अति होतंय.
हम्म
In reply to माझ्या मुलीला दत्तक घेऊन… by श्रीगुरुजी
का करवलं जातंय ?
जलमार्गाने जर एखादा घुसखोर…
जलमार्गाने जर एखादा घुसखोर स्पेनमध्ये घुसला तर त्याची नीट चौकशी व्हावी, कोर्टात सुनावणी व्हावी आणि तोपर्यंत त्याला assylum द्यावे याउलट जमिनीमार्गेएखादा घुसखोर आला तर त्याला लगेच हाकलून द्यावे असा अजब निकाल स्पेनच्या न्यायालयाने 16 जुलै रोजी दिला त्यानंतर लगेचच 15 दिवसात मोरोक्कन लोकांनी त्यांचे रंग दाखवले. ही याचिका स्पेनमधल्या amnesty इंटरनॅशनल ने दाखल केली होती असे तपशील समोर येत आहेत
Ceuta ची लोकसंख्या 85000 आहे आणि 60000 घुसखोर सगळे पुरुष वीस ते तीस गटातले आहेत. Ceuta मधल्या स्पॅनिश बायकांचे काही खरे नाही.
तो स्युटा प्रांत उत्तर…
In reply to जलमार्गाने जर एखादा घुसखोर… by अप्पा जोगळेकर
तो स्युटा प्रांत उत्तर आफ्रिकेत आहे. स्पेनशी भौगोलिक संलग्नता नाही. तरीही स्पेनने त्यावर आपले स्वामित्व कायम ठेवले आहे. पोर्चुगीजांनी गोव्यावर याच पद्धतीने स्वामित्व कायम ठेवले होते. अर्ज, विनंती, अहिंसक आंदोलन, सत्याग्रह या मार्गाने गोवा स्वतंत्र होईल या अहिंसक भ्रमात नेहरू १४ वर्षे होते. शेवटी सैन्य कारवाईतूनच गोवा स्वतंत्र झाला.
स्पेनने अश्या भागावरील आपले स्वामित्व सोडायला हवे. अन्यथा ही समस्या वारंवार उद्भवेल.
जगभरात लुटालुट, रक्तपात करून…
जगभरात लुटालुट, रक्तपात करून झाल्यावर मग जगाला मानवतेचे धडे देणाऱ्या शेंगेन व्हिसावाल्या युरोपियन देशांमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र एका अर्थाने काव्यगत न्यायाचे चक्र पूर्ण होत आहे अशी प्रतिक्रिया भारतात व्यक्त होत आहे.
भारतात ? (वाचकांचा पत्रव्यवहार)
In reply to जगभरात लुटालुट, रक्तपात करून… by अप्पा जोगळेकर
भारतात तर (१५ पण व्यक्तिमत्वाने २५) रुचिका सिंहची माफी, तिच्या आईने मानलेले मोदींचे आभार, माझी पोरगी दत्तक घ्या म्हणून फोडलेला टाहो इत्यादी सुरू होते ना ? एकदम स्पेनला असे बोलण्यात अर्थ नाही (उपासाला बटाटा खाऊन अन तिखटाची सोय म्हणून मिरच्या खाऊन) काव्यगत न्याय इत्यादी कादंबऱ्या मध्ये बरे असते बोलायला. काय आप्पा खाली डीप स्टेट मध्ये शिरले अन् इथे थेट कुमार गटात ?
डीप स्टेटच्या विळख्यात सापडलेला आणखीन एक देश
अमेरिकन डीप स्टेटबरोबर जुळवून न घेतल्यामुळे फटका खाल्लेल्या देशांच्या यादीत बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यांच्या पाठोपाठ स्पेनचाही नंबर लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आप्पांच्या गप्पा - विदेशनीती (aka अँडरसनच्या परिकथा)
In reply to डीप स्टेटच्या विळख्यात सापडलेला आणखीन एक देश by अप्पा जोगळेकर
वाचकांचा पत्रव्यवहार -
डीप स्टेट वगैरे काही नसते हो आप्पा राज्यकर्ते म्हणले की सिक्रेट येतात, सिक्रेट म्हणली का तू बऱ्याचवेळा डर्टी सुद्धा असतात. ती वाचण्यासाठी जी धडपड होते ती डीप स्टेट. रिपब्लिकन पार्टीची आपली आहे, डेमोक्रॅटची आपली, प्रत्येक देशाची आपापली, पंधरा वर्षात भाजपची पण तयार झाली असू शकते.
डीपस्टेट म्हणजे काहीतरी लैच सीक्रेट, पाताळयंत्री इत्यादी इत्यादी नाही तुम्ही हॉलिवूड सिनेमे पाहणे बंद करा बुआ आप्पा, गेलाबाजार त्या यूट्यूब वरील रोथ्सचाईल्ड फॅमिली कंट्रोल डी वर्ल्ड इत्यादी शॉर्ट्स पाहणे बंद करा ! There are temporary interests and permanent greed ! विषय समाप्त. (विदेशनितीकार) खोंड्या
राष्ट्रकुल स्पर्धेत १३…
राष्ट्रकुल स्पर्धेत १३ सुवर्णपदकांसहित एकूण ३९ पदकांसह भारताने पदकांच्या क्रमवारीत चौथा क्रमांक मिळवून स्पर्धेची सांगता केली.
सर्व भारतीय पदकविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
👌👏👍💐🌹🎉🎊
गुरुजी
In reply to राष्ट्रकुल स्पर्धेत १३… by श्रीगुरुजी
पदक मोदींना योगींना डेडिकेट करणाऱ्यांना काही खास नाही ? हेचि का फळ मम तपाला ?
😭😭
खेळाडुंचे अभिनंदन.
In reply to राष्ट्रकुल स्पर्धेत १३… by श्रीगुरुजी
राष्ट्रकुल स्पर्धा नुकतीच संपली. ऑगस्ट महिन्यात भारत श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने असून १९ सप्टेंबर पासून जपानमध्ये एशियन गेम्स ना सुरुवात होत आहे. त्यामुळे राजकारणाच्या दलदलीला आणि आयपीएल नावाच्या तमाशाला कंटाळलेल्या लोकांसाठी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने दिलासादायक ठरत आहेत.
माफीनाम्याची नामुष्की आणि उतरलेली बिअर
जंतर मंतर येथील रिकाम्या लोकांचे आंदोलन संपले तसे आंदोलकांच्या नेत्यांनी आंदोलकांना वाऱ्यावर सोडून दिले असून त्यामुळे
रुचिका सिंग यांच्यापाठोपाठ माफीनामे देण्याची अहमहमिकाच आंदोलकांमध्ये सुरु झाली असून आंदोलकांच्या पालकांना अक्षरश: तोंड लपवून फिरावे लागत आहे. शिवीगाळ आंदोलन करत असताना काही लोकांनी स्वतः:ची तुलना थेट भगतसिंग यांच्यासारख्या महान प्रभृतींशी केली आणि आता चार दिवसांतच नाक घासून हातापाया पडण्याची वेळ आल्यामुळे हा लोकांच्या टिंगलटवाळीचा विषय झाला आहे.
दिल को बेहलाने के लिये गालिब…
In reply to माफीनाम्याची नामुष्की आणि उतरलेली बिअर by अप्पा जोगळेकर
दिल को बेहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है , एक ब्रह्मन् ने कहा है ये साल अच्छा है ।
ह्या बातम्या पांचजन्य मध्ये छापून येत आहेत कि सनातन प्रभात मध्ये ?
+१खऱ्या बातम्या तर वेगळ्याच…
In reply to दिल को बेहलाने के लिये गालिब… by साहना
+१
खऱ्या बातम्या तर वेगळ्याच येताहेत.
पैसा वसूल
In reply to माफीनाम्याची नामुष्की आणि उतरलेली बिअर by अप्पा जोगळेकर
आप्पांच्या गप्पा पुष्प (कितवे ?) :
आप्पांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांचे पालक आता चेहरे लपवून फिरतात, त्यामुळे त्यांना मजा येत असावी. लवकरच पोलिसांतर्फे झालेल्या लाठीचार्ज वर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे पण आप्पांच्या गप्पांमध्ये तो विषय त्याज्य असल्यामुळे असले फाऊल करणाऱ्यांचे देशद्रोह क्रेडिट एकदम १० पॉइंट्सने वाढू शकते असे सुतोवाच आप्पांनी केले आहे.
(वृत्त निवेदक) खोंड्या
राष्ट्रकुल स्पर्धा
सर्व भारतीय पदकविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
👌👏👍💐🌹🎉🎊
भाजपच्या अध्यक्षपदी निवड…
भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन नबिन यांनी आपल्या बिहार विधानसभेतील सदस्यत्वाचा त्याग केला होता. त्या बांकिपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
या जागेवर १९९५ पासून सलग ८ निवडणुकीत भाजपचा उमेदवार जिंकत होता. परंतु या पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर जवळपास ९,००० मतांनी पुढे आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. असं वाटतंय की नितीशकुमारना मुख्यमंत्रीपद सोडून भाजपला द्यावे लागल्याने त्यांच्या संजदचे समर्थक उमेदवार नाराज असून आपली नाराजी त्यांनी प्रशांत किशोरांना मत देऊन व्यक्त केली आहे.
प्रशांत किशोर जवळपास १९ हजार…
प्रशांत किशोर जवळपास १९ हजार मतांनी जिंकले. भविष्यात कदाचित प्रशांत किशोर व नितीशकुमार एकत्र येऊ शकतात.
नितीन नबीनच्या जागेवरून भाजप…
नितीन नबीनच्या जागेवरून भाजप हरली, आत्मपरीक्षणाची सक्त गरज आहे. २००६ मधे ते पटना (पश्चिम) मतदारसंघातून पहिल्यांदा पोटनिवडणूक जिंकले आणि आमदार झाले. त्याच्यानंतर मतदारसंघ परिसिमन झाल्यावर स्थापित बांकीपुर मतदारसंघातून ते कायम जिंकत आले आहेत. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ सालच्या निवडणुका ते असेच सलग जिंकले होते. त्यातून ते भाजपचे जुने नेते नबीन किशोर प्रसाद सिन्हा ह्यांचे चिरंजीव होते (परिवारवाद ? असो). इतके सगळे असताना आणि शक्यतो प्रतिष्ठेच्या असल्यामुळे पोटनिवडणुकी कुठलीही पार्टी आपल्याला अतिशय जास्त झुकते मत असणारा मतदारसंघ घेऊनच लढते. अशा कंडीशन मधे पण जर नितीन ह्यांनी मोकळी केलेली सीट भाजप retain करू शकली नसेल तर अवघड आहे. फॅमिली सीट, लेगसी सीट, पोटनिवडणुकीत भावनिक आंदोलनावर पहिला विजय, त्यानंतर सतत ४ टर्म तो टेम्पो मेन्टेन ठेवणे हा नितीन नबीन ह्यांची कार्यक्षमतेचा द्योतक मुद्दा आहे. पण ती सीट त्यांनी सोडल्या सोडल्या जात असेल आणि जनसुराज्य सारख्या हल्लीच्या विधानसभा निवडणुकीत deposit जप्त झालेल्या पार्टीच्या संस्थापकाने हरवले असेल तर भाजपने क्लिअर रायटिंग ऑन द वॉल वाचणे गरजेचे आहे असे वाटते. 🚨🚨🚨🚨
अभिनंदन व सहानुभूती
मला वाटतं, प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत; त्यांचे हार्दिक अभिनंदन.
राज्यात सत्ताधारी असलेला पक्ष बहुतांश वेळा विधानसभा पोटनिवडणुकीत हरतो असा इतिहास आहे. तथापि आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर नवव्यांदा हरली म्हणून भाजपशी सहानुभूती.
राज्यात सत्ताधारी असलेला…
In reply to अभिनंदन व सहानुभूती by कांदा लिंबू
राज्यात सत्ताधारी असलेला पक्ष बहुतांश वेळा विधानसभा पोटनिवडणुकीत हरतो असा इतिहास आहे.
ह्याला आपण काय आधार घेतला आहे ? ते जाणून घ्यायला आवडेल. सहसा ह्याच्या उलट असते असा माझा समज, पण तूर्तास विदा हाताशी नाही त्यामुळे तुमच्या विधानाला पूरक काय डेटा तुम्ही देऊ शकाल हे पाहण्याची उत्सुकता.
कळावे
(रणनितीकार) खोंड्या
Calling @CSK
In reply to राज्यात सत्ताधारी असलेला… by वृषभ खोंडे
Calling @CSK
तुम्ही
In reply to राज्यात सत्ताधारी असलेला… by वृषभ खोंडे
सरकारी नोकरीत किंवा स्टेट बँकेत किंवा एखाद राष्ट्रीयीकृत बँकेत आहे का हो नोकरीला ? सरळ पुढच्या विंडोला/ काउंटरला जा म्हणता आहात ! कॉर्पोरेट मध्ये नाही चालत राजे हे ! तुम्ही बोलला तुम्हीच बोला, दावे करताना विदा द्यावा लागतो ह्याचे भान हवेच.
एकटे चंद्रसूर्यकुमार कुठं कुठं पुरणार ?
सेऊटा!
स्पेनच्या सेउटा (हा उच्चार योग्य आहे का?) शहरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदा स्थलांतराच्या घटनेने पुन्हा एकदा सीमा सुरक्षा आणि निर्वासित धोरणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोशल मीडिया व मुख्य माध्यमांतील बातम्यानुसार, एकाच दिवशी पन्नास हजाराहून अधिक मोरो्को नागरिकांनी समुद्रमार्गे किंवा थेट कुंपण ओलांडून सेउटा हद्दीमध्ये थेट घुसखोरी केली. अनेकांनी सीमेवरील तारांचे कुंपण तोडून प्रवेश केला, तर या प्रयत्नांत काही जणांचा मृत्यूही झाला.
या घुसखोरांना परत पाठविण्याचे पोलीस व सैन्याने प्रयत्न केले त्यातही काही घुसखोरांचा मृत्यू झाला.
या घटनेमागे स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा उल्लेख केला जात आहे. त्या निर्णयानुसार, समुद्रमार्गे आलेल्या व्यक्तींना तात्काळ परत पाठवण्याऐवजी त्यांना कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर मोरोक्कोमधून घुसखोरीचा ओघ वाढल्याचा बातम्या येत आहेत.
ही घटना केवळ स्पेनपुरती मर्यादित नाही. सीमा सुरक्षा, मानवी हक्क आणि राष्ट्रीय हित यांच्यात समतोल कसा साधायचा, हा प्रश्न अनेक देशांसमोर उभा आहे. भारतातही बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदा घुसखोरीच्या संदर्भात अशाच प्रकारच्या कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींबाबत वेळोवेळी चर्चा होत असते.
कोणत्याही देशाने मानवी मूल्यांचे संरक्षण करतानाच आपल्या सीमांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय हित यांचाही तितकाच विचार करणे आवश्यक आहे. या विषयावर भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा तथ्यांवर आधारित, संतुलित आणि दूरदृष्टी ठेवून चर्चा होणे अधिक महत्त्वाचे आहे.
मी याआधीही लिहिलंय. जो…
In reply to सेऊटा! by कांदा लिंबू
मी याआधीही लिहिलंय. जो प्रदेश भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या संलग्न नाही, त्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड असते. पाकिस्तान व बांगलादेश हे जुने उदाहरण.
स्पेनने हा भाग स्वतंत्र करून टाकावा.
सेऊताचा स्पेनच्या जवळंच
In reply to मी याआधीही लिहिलंय. जो… by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
सेऊताचा धोंडा मूळ स्पेन देशापासून अवघ्या पंचवीसेक किमीवर समुद्रापार आहे. हे अंतर फारसं नाही. पाकिस्तान ते बांगलादेश हे अंतर अफाट आहे. त्यामुळे सेऊता जरी मोरोक्कोस संलग्न असलं तरी स्पेनला ताब्यात ठेवायला अडचण नाही. शिवाय, आजची घुसखोरी मोरोक्कोच्या अधिकृत सरकारने केलेली नाही. ते ही तिच्या विरोधात आहेत, निदान वरवर तरी दाखवताहेत.
आजूनेक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर स्पेनने सेऊता मोरोक्कोत सामील होऊन दिलं गेलं, तर जिब्राल्टरविषयी असेच प्रश्न उपस्थित होतील. जिब्राल्टर आज जरी स्पेनच्या भूमीशी संलग्न असलं तरी त्याचा ताबा ब्रिटीशांकडे आहे. संलग्नभूमीच्या मुद्द्यावर स्पेनने सेऊता मोरोक्कोत सामील होऊन देणे याचाच अर्थ त्याच मुद्द्याच्या आधारे जिब्राल्टरवर हक्क सांगणे, असा लंडनमध्ये लावला जाईल. ब्रिटन हे कदापिही होऊ देणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
अशा बाबतीत भारतीय किंवा…
In reply to सेऊटा! by कांदा लिंबू
अशा बाबतीत भारतीय किंवा वसाहतवादाची शिकार झालेल्या कोणत्याही देशातल्या माणसांनी संतुलित प्रतिक्रिया देणे हेच असंतुलन ठरेल. एखादा बलाढ्य माणूस आपल्याला वारंवार धोपटून काढत असेल आणि अचानक त्याच्या चड्डीत लाल मुंग्या घुसल्या तर मार खाणाऱ्या माणसाला आनंद होईल तसेच हे आहे.
आप्पांच्या गप्पा (सात्विक संताप व्हर्जन)
In reply to अशा बाबतीत भारतीय किंवा… by अप्पा जोगळेकर
मग हा विषय पेंडिंग ठेवा येत्या शिमग्याला होळी पेटली का स्पेनच्या नावानं घाऊक बोंब मारू हां बॉ बॉ बॉ बॉ करत !
पहिले तर स्पेनची कधीच भारतावर अर्थाअर्थी वसाहत नव्हती. पोर्तुगाल, डच, इंग्रज अन् फ्रेंच हेच त्यातल्या त्यात.
त्यातही तैनाती सेना वगैरे प्रकार करून फ्रेंच आणि इंग्रजच आपापसात भिडले होते इथे. आता हा झाला इतिहास......
पण त्याच फ्रेंचांनी भारताला राफेल विमाने दिलीत अन् त्याच विमानांनी ऑपरेशन सिन्दुर मध्ये पाकिस्तानचे धिरडे भाजले आहे ना ? इतके काव्यगत होऊन राफेल पण त्यांचेच घ्यायचे अन् अल्जीरियन मुसलमान त्यांच्या छातीवर नाचले (तुमच्या भाषेत चड्डीत लाल मुंग्या शिरल्या) म्हणून आपण टाळ्या पिटायच्या ? इतिहास शिकून परत फ्रेंच छातीवर बसू नये म्हणून तयारी करावी पण म्हणून त्यांच्याशी व्यापार अन् इतर संबंध सोडू नयेत
आणि म्हणूनच, संतुलित प्रतिक्रिया देणे फायद्याचे असते ! अतिरेक करून बोंबलायला लागले की जीवाचा ईरान होतो, इस्लाम होतो अन् तावडे लागतात !
(प्रोफेश्वर) खोंडे
ता. क. - २०२४ मध्ये स्पॅनिश राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते, त्याच वेळी वडोदरा ह्या गावात जॉइंट विमान निर्मिती इत्यादी करारमदार तर झालेच पण २०२६ हे भारत - स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुध्दिमत्ता वर्ष म्हणून नामनिर्देशित करण्याचे पण ठरले, काव्यगत न्यायची ऐशी तैशी केली आप्पा तुमच्या
कोणी एकेकाळी स्पेन आणि इतर…
In reply to सेऊटा! by कांदा लिंबू
कोणी एकेकाळी स्पेन आणि इतर युरोपियन देशांनी जगभर वसाहतवाद केला म्हणून आज घडीला तेथील सामान्य ख्रिश्चन स्त्रिया जिहादी अत्याचाराला बळी पडाव्यात याचे समर्थन कोणताही सच्चा हिंदू करणार नाही. सनातन हिंदू धर्माला हे मान्य नाही.
इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल…
इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल किंवा एकंदरीतच युरोपियन देश यांनी काहीशे वर्षे भारतीय उपखंड, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अमर्याद लुटालुट, रक्तपात केला , धर्मांतरे घडवली, सरकारे हायजॅक केली आणि बनाना रिपब्लिक जन्माला घातली. भारतात लुटलेल्या संपत्तीची मोजदाद आताच्या मूल्यांकनाप्रमाणे 45 ट्रिलियन डॉलर इतकी आहे असे शशी थरूर यांनी सांगितले होते.ही मोजदाद कशी केली ते माहिती नाही.
तर अशा लुटारू देशांमध्ये आज घुसखोर शरणार्थी घुसले, लुटालुट केली ,स्पॅनिश बायका भोगल्या तर एका अर्थाने हा काव्यगत न्याय झाला. आपण आता पाताळ विजयम मधल्या दानवासारखे विकट हास्य करू शकतो.
वसाहती व मायदेशी नागरिक
In reply to इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल… by अप्पा जोगळेकर
अप्पा जोगळेकर,
याबाबत माझं मत वेगळं आहे. वसाहतवादी सत्तांनी जगभर लुटालूट केली असली तरी त्यातनं मूळदेशी नागरिकांचा फारसा फायदा झाला नाही. ही लुटलेली संपत्ती काही विशिष्ट कुटुंबांच्या घशात गेली. या लुटीत सर्वसामान्य नागरिकाचा कसलाही सहभाग नव्हता. म्हणून मी या काव्यगत न्यायाच्या विरोधात आहे. ज्या वसाहतवादी सत्तेनं भारताला लुटलं तीच सत्ता आता इंग्लंडला लुटंत आहे.
आ.न.,
-गा.पै.
लुटलेल्या पैशांतून येणारी…
In reply to वसाहती व मायदेशी नागरिक by गामा पैलवान
लुटलेल्या पैशांतून येणारी सोशल सिक्युरिटी, उच्च राहणीमान आणि बँकांच्या माध्यमातून सावकारी ह्या सगळ्याचे डायरेक्ट,indirect फायदे युरोपियन माणसांनी उपभोगले/अजूनही उपभोगत आहेत.
एखाद्या बाहुबलीची मुले वागण्या, बोलण्यात कितीही चांगली असली तरी ज्यांना नाडले त्या लोकांच्या शिव्याशापांचेच धनी होतात.
मोरोक्कन शरणार्थी हीसुद्धा माणसेच आहेत. अतिशय गरीब आहेत त्यांना चांगले आचार, विचार शिकवले गेलेच नाहीत. पण स्पेन आणि युरोप मधली माणसे तर सुसंस्कृत आहेत ना. त्यांनी ह्या शरणार्थी मंडळींना आपलेसे करून घ्यायला काय हरकत आहे.ह्यातच मानवतेचे कल्याण आहे. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हेच आपली संस्कृती शिकवते.
आप्पांच्या गप्पा (पक्षांतर्गत बैठक गप्पा लिकेज्)
In reply to इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल… by अप्पा जोगळेकर
स्पॅनिश बायका भोगल्या तर एका अर्थाने हा काव्यगत न्याय झाला. आपण आता पाताळ विजयम मधल्या दानवासारखे विकट हास्य करू शकतो.
डोकं ठिकाणावर आहे का हे बोलताना ? का तुम्ही पण जय व्यक्तिमत्व पाहून २५ची वाटते मंडळीचे सभासद ?
(असं आता विरोधीपक्षनेते आपल्याला विचारू लागलेत आप्पा)
अहो काय करून बसलात हे ? असली विधाने तुम्हाला वाटले समानशील लोकांत पक्षाच्या अंतर्गत बैठकीत करता आहात पण ते झाले न लीक ! त्यांचे म्हणणे आहे की महिला भोगणे (पक्षी बलात्कार) आणि काव्यगत न्याय ह्याचा परस्पर संबंध आपल्याला उलगडून सांगावेच लागेल. महिलांना भोग्य वस्तू मानण्याची माननीय मंत्र्यांची ही कुठली रीत असा सवाल मीडियाकडून येतो आहे. तसेच जर मोरक्कन बेकायदेशीर अप्रवसी लोकांनी स्पॅनिश स्त्रिया भोगणे काव्यगत न्याय आहे कारण स्पॅनिश लोकांनी जगावर वसाहतवाद लादला तर मग उद्या उठून कोणीही अमक्या गटाने आमच्यावर तमका अन्याय केला म्हणून आम्ही काव्यगत न्यायाने त्यांच्या स्त्रिया भोगण्याची सुप्त/व्यक्त लालसा ठेवतो ती चूक कशी ? असे म्हणेल ना ? पक्षश्रेष्ठींनी उत्तर द्यावे अशीही एक मागणी आता उठू लागली आहे. लवकर डॅमेज कंट्रोल करून टाका माफी मागून असे पक्षांतर्गत वारे आहे साहेब असा माझा स्वीय सहाय्यक म्हणून सल्ला आहे.
वृषभ खोंडे (स्वीय सहाय्यक)
माननीय आप्पासाहेब जोगळेकर,
मंत्री, महिला व बालकल्याण विभाग,
मिसळपाव सरकार.
**स्पॅनिश बायका भोगल्या तर…
In reply to इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल… by अप्पा जोगळेकर
हीच काय ती संस्कारी भाषा ? हेच का विश्वगुरूचे थोर संस्कार ?
युरोपियन देश काही लुटून वगैरे श्रीमंत झाले अशी काही तरी गोड गैरसमजूत विश्वगुरुंच्या पाईकांनी करून घेतली आहे. आणि आता स्वातंत्र्यानंतर सुद्धा देश दाळीद्रयांत खितपत आहे तर त्याचे खापर स्वतः सोडून इतर सर्व गोष्टींवर आपटायची आणि आपल्या समाजाचा मागासलेलापणा मान्य करायचा नाही उलट मग्रुरी. कुणाच्या तरी आया बहिणींची अब्रू लुटली तर त्याला "काव्यगत न्याय" म्हणे. ह्या लोकांनी आपलेच किंवा आणखीन कुणाचेच काही गैर केले नाही. वसाहतवादाच्या परिसीमेवर सुद्धा बहुसंख्य युरोपियन गरीब आणि मजुरी करत होते.
हल्लीच्या वैफल्याने सर्व मानसिक विकृती बाहेर येत आहेत.
नका तुम्ही चिडून जाऊ ताई.
In reply to **स्पॅनिश बायका भोगल्या तर… by साहना
राज्य महिला व बाल हक्क आयोग अध्यक्ष श्रीगुरुजी, वरिष्ठ नेते "व्यक्तिमत्व पाहून २५ वाटते" पक्ष जातीने ह्याच्यात लक्ष घालणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे.
तसेच, ह्या विषयावर अधिकचा शोध घेता असेही कळते की स्पॅनिश वसाहतवादी धोरणांचा पूर्वलक्ष्यी प्रभावाने कडक देशप्रेमी निषेध करायचा म्हणून आदरणीय आप्पासाहेब जोगळेकर, मंत्री, महिला व बालकल्याण विभाग, मिसळपाव सरकार, ह्यांनी कोलंबियन एक्सचेंज मधून भारतात रुजलेल्या भाज्या पक्षी हिरवी/ लाल/ पिवळी/ शिमला/ लवंगी/ संकेश्वरी/ ब्याडगी/ भिवापुरी अशा कुठल्याच मिर्च्या, टोमॅटो, बटाटा, गाजर, मका अशी स्पॅनिश काँक्विस्तादोर मंडळींनी लॅटिन अमेरिकेतून जगात पसरवलेली एकही भाजी/फळ इत्यादी न खाण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे
शिवाय नैष्ठिक पश्चाताप अनुष्ठान म्हणून अननस लागवड, वाहतूक, विक्री आणि खाणे पूर्णपणे बॅन करण्याचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे हे मी ह्या पत्रकाचा माध्यमाने जाहीर करू इच्छितो.
सुदैव म्हणजे आता मिरच्या…
In reply to नका तुम्ही चिडून जाऊ ताई. by वृषभ खोंडे
सुदैव म्हणजे आता मिरच्या सुद्धा झोम्बणार नाहीत कारण मिरच्या सुद्धा ह्या फिरंगांच्या देशांतून आल्या आहेत.
Russia has proposed settling…
Russia has proposed settling bilateral trade and debt payments with Bangladesh using the Indian rupee to bypass Western financial sanctions. The proposal is under review by Bangladeshi officials and aims to solve stalled project payments, though nothing has been finalized
इराण युद्धाच्या बाबतीत धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत अशी स्थिती असताना रशिया बांगलादेश यांच्यातला व्यापार रुपयामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे अमेरिका चवताळून उठेल अशी शक्यता आहे.
बांगलादेश सारख्या आर्थिक…
In reply to Russia has proposed settling… by अप्पा जोगळेकर
बांगलादेश सारख्या आर्थिक सुपरपावरने विश्वघाबरू चे चलन वापरायला सुरु केल्याने कदाचित जगांत लुंगी च्या किमती गगनाला भिडणार आहेत आणि ट्रम्प तात्या चवताळून उठणार आहे. गोबींची हि कदाचित लुंगी डिप्लोमसी असावी.
ट्रम्पतात्यांच्या नावाने नाचणार्या संघ परिवाराला कदाचित आता मॉस्को मध्ये पाऊस पडल्यावर इथे पुण्याचं छत्री उघडण्याची गरज भासू लागतेय असे वाटते.
मॅडम
In reply to बांगलादेश सारख्या आर्थिक… by साहना
आप्पांनी आपल्या प्रश्नावर सध्या नो कॉमेंट्स म्हणले आहे. तूर्तास राजकीय धकाधकीतून आलेल्या थकव्यामुळे ते आपल्या फार्महाऊस वर विश्रांतीला जाणार आहेत. तुम्ही उपस्थित केलेल्या टीकेवर लवकरच "१५ ते २५ व्यक्तिमत्व पक्षाची" राष्ट्रीय कार्यकारिणी तसे मार्गदर्शक मंडळ पत्रक जारी करणार आहे तरी आपण थोडी सबुरी ठेवावी अशी विनंती आपल्याला आप्पांच्या वतीने करण्यात येत आहे.
वृषभ खोंडे (स्वीय सहाय्यक)
माननीय आप्पासाहेब जोगळेकर,
मंत्री, महिला व बालकल्याण विभाग
मिसळपाव सरकार.
चप्पल प्रमुखांचे पद सर्वांत…
In reply to मॅडम by वृषभ खोंडे
चप्पल प्रमुखांचे पद सर्वांत महत्वाचे आहे.
समाजकंटकांवरील FIR
सरकारने आता सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की, NEET आंदोलनाशी संबंधित आणि गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २,७३८ व्यक्तींवरील कोणतेही खटले मागे घेतले जाणार नाहीत; मात्र, अशी पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेतले जाऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी, CJP चे नेते असा दावा करत होते की आंदोलनादरम्यान हिंसाचार करणारे लोक हे RSS चे सदस्य होते. त्यामुळे, आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत असल्याने CJP च्या नेत्यांना आनंदच व्हायला हवा. RSS चा खरा चेहरा उघड करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
सरकारने
In reply to समाजकंटकांवरील FIR by कांदा लिंबू
हे कोर्टाला नाही तुम्हाला सांगितले आहे 😂
आता हळूच केस पुकारली जाणार अन् सगळ्या लोकांना (हिस्ट्री शीटर सुद्धा) नीट क्लास सी समरी करून सोडले जाणार !
लक्षात घ्या, हिस्ट्री शीटर असले तरी "बाहेर" होते सगळे, पक्षी हल्लीचा गुन्हा नव्हता काही किंवा हजर दाखल गुन्ह्यात बेल वर होते.
हिस्ट्री शीट काय असते, कशी मेन्टेन होते, कुठे मेन्टेन होते ह्यासंबंधी अभ्यास वाढवण्याची गरज आहे.
(न्यायदर्दी) वृषभ खोंडे
खोंडे साहेब तुम्ही तर पार…
In reply to सरकारने by वृषभ खोंडे
खोंडे साहेब तुम्ही तर पार पिसेच काढताहात! तुम्हाला प्रत्युत्तर द्यायची अनेकांची हिंमत होत नाहीये! कुठे होतात इतके दिवस? 😁
ट्रेनिंग घेत होतो
In reply to खोंडे साहेब तुम्ही तर पार… by अमरेंद्र बाहुबली
पिसे काढण्याचं 😂😂🙏🏾🙏🏾
मिसळपाव वर यायचे तर व्यवस्थित अभ्यास करूनच यायचे हे fix होते, त्यासाठी कैक वर्षे वाचनमात्र नामक हिमालयात तपश्चर्या केली. लोकांच्या लकबी, लेखन अभ्यासले, आपण स्वतः "कोण लिहितो ह्यापेक्षा काय लिहितो" बघायचे असे स्वतःला बजावले आणि आयडी बनवला.
विनोद हा जीवनाचा जीव का प्राण असावा म्हणजे जीवन लांब होते. त्याचे पालन करतो, सोसेल तितका सोशल मीडिया हे पाळतो, आनंदी राहतो आनंद देतो.
बोला चांगभले
(दार्शनिक तत्ववेत्ता सॉक्रेटिस) नाना साहेब खोंडे 🙏🏾😇😂
डॉ डी. वाय. पाटील यांचे निधन
महाराष्ट्रात "शिक्षणसम्राट" म्हणून ओळखले जाणारे डॉ डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी आज कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मागच्या काही काळापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती.
पाटील हे मूळचे कोल्हापूरचे. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. सुरुवातीला काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी राजकारणात काळ काम केले नंतर त्यांनी शिक्षणक्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी काही काळ बिहारचे राज्यपालपदही भूषवले होते.
१९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
डॉ डी वाय पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.