भारतीय तत्त्वज्ञानात तपाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. परंतु तप सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारांत विभागला जातो. भगवद्गीता आणि दासबोध या दोन ग्रंथांनी तामसिक तपाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. आजच्या लोकशाही व्यवस्थेतही या विचारांचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात,
“दुसऱ्याचा प्राण घ्यावा। आपला आपण स्वयें द्यावा।
विसरवी जीवभावा। तो तमोगुण॥”
या ओवीत त्यांनी जीवनमूल्याचा विसर घडवणाऱ्या प्रवृत्तीला तमोगुण म्हटले आहे. हिंसा ही कोणत्याही स्वरूपात असो, आत्महत्येच्या रूपाने किंवा दुसऱ्याला मारण्याच्या रूपाने, ती जीवनाच्या पवित्रतेला नाकारणारी ठरते.
गीतेतील विवेचन भगवद्गीतेच्या अध्याय १७ मध्ये तामसिक तपाचे वर्णन आहे,
“मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्॥”
म्हणजे मूर्ख हट्टाने, स्वतःला पीडा देऊन किंवा दुसऱ्याचा नाश करण्याच्या हेतूने केलेले तप तामसिक ठरते. पुढील श्लोकांत अशा तपाला "आसुरी संकल्प" म्हटले आहे. अहंकार, दंभ आणि कामरागाने प्रेरित होऊन केलेले घोर तप हे अध्यात्मिक प्रगतीचे नव्हे तर अधोगतीचे लक्षण आहे.
आजच्या वास्तवाशी संबंध लोकशाही व्यवस्थेत धोरण बदलण्याचा मार्ग संघटन, निवडणुका आणि संसदीय प्रक्रिया हा आहे. उपोषण, आत्मपीडा किंवा जीव धोक्यात घालून सरकारला वाकवण्याचा प्रयत्न हा तामसिक मार्ग ठरतो. जर अशा मार्गाने यश मिळाले, तर प्रत्येक असंतुष्ट गट संविधानिक मार्ग सोडून देईल आणि अराजकतेचा धोका निर्माण होईल.
उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्यास समर्थकांचा उद्रेक देशव्यापी अराजकतेत बदलू शकतो. संविधान सभेत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना सत्याग्रह-असहकारासारखे मार्ग "Grammar of Anarchy" ठरतील. म्हणजेच, लोकशाहीतील असंतोष व्यक्त करण्यासाठी हिंसक किंवा आत्मपीडात्मक मार्ग स्वीकारणे ही अराजकतेची पायरी आहे.
स्वातंत्र्यानंतरचे वास्तव: काही आंदोलनकर्त्यांनी उपोषण करून सरकारवर दबाव आणला. काही ठिकाणी सरकार झुकले, परंतु नंतर अशा पद्धतींचा दुरुपयोग वाढला आणि समाजात अस्थिरता निर्माण झाली. दीर्घकालीन धोरणात्मक बदल घडले नाहीत; उलट समाजात नकारात्मकता आणि हिंसक प्रवृत्ती वाढली. लोकशाही ही नदीसारखी आहे. तिचा प्रवाह संघटन, निवडणुका आणि संसदीय प्रक्रिया या किनाऱ्यांनी नियंत्रित होतो. जर हे किनारे फोडून आत्मपीडात्मक प्रवाह वाहू लागला, तर तो समाजाला अराजकतेच्या समुद्रात नेईल.
गीता आणि दासबोध दोन्ही सांगतात की आत्मपीडा किंवा दुसऱ्याला पीडा देणे हे तप नव्हे, तर तमोगुण आहे. तप म्हणजे प्रकाशाचा मार्ग; पण आत्मपीडा हा तर अंधाराचा जाळ आहे.
लोकशाहीत अशा मार्गांचा अवलंब केल्यास ते अराजकतेला आमंत्रण देतात. इतिहास दाखवतो की अशा तामसिक तपामुळे तात्कालिक उद्रेक होतो, पण दीर्घकालीन परिणाम समाजासाठी घातक ठरतात. म्हणूनच घटनात्मक, संघटनात्मक आणि विवेकपूर्ण मार्ग हाच खरा सात्त्विक तप आहे. त्यासाठी अखंड पुरुषार्थ करण्याची तैयारी ठेवली पाहिजे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
तप - लोकशाही - आंबेडकर एकाच लेखात बघून 'बादरायण संबंध लावणे' ह्या वाक्प्रचाराची आठवण झाली.
हम को मालूम है तप की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'पटाईत काका' ये ख़याल अच्छा है । 😏
- (तपस्वी) सोकाजी
हाण
In reply to =)) by सोत्रि
(तपस्वी) सोकाजी>>>>>
नाना, तुझे एकंदरीत जनरल नॉलेज बघून तुला जनरल तपस्वी हा आयडी मिळतो का बघ ना.
;)
जीवाचा
बेंबटू होणे आज अनुभवले अन् लॉगइन पाणी हुक्का इत्यादी सगळे सत्कारणी लागले
काहींना सत्य आवडत नाही. आज…
काहींना सत्य आवडत नाही. आज भारत 1980 च्या दशकात नाही. अशा आंदोलनाला जनतेचे समर्थन मिळणार नाही. बाकी या घटकेला भारतात प्राजक्ता पसरविणे विदेशी शक्तींना जमणे शक्यच नाही.
प्राजक्ता पसरविणे????
In reply to काहींना सत्य आवडत नाही. आज… by विवेकपटाईत
पसरवा हिला.
देशी शक्तींचा पाठिंबा आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात तपाला…
भारतीय तत्त्वज्ञानात तपाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. परंतु तप सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारांत विभागला जातो.
हे कुठे वाचायला मिळेल, संदर्भ द्याल का प्लीज ?