पंतप्रधानांनी आगामी आर्थिक संकटाची चाहूल देऊन देशावर प्रचंड उपकार केले आहेत. राज्य निवडणूक जवळ असल्याने सर्व काही आलबेल आहे अशीच बतावणी केली जात होती. महामानवाची अतिमानवीय दूरदृष्टी, अर्थमंत्र्यांची पारखी नजर इत्यादी इत्यादींनी भारतांत विशेष झळ पोचणार नाही अश्या बातम्या पसरवल्या जात होत्या. रशियन क्रूड भारत विना परवानगी विकत घेत आहे, इराण मधून सुद्धा आम्ही तेल घेऊ इत्यादी बातम्या IT सेल पसरवत होता.
आता निवडणूका संपल्या कि हृदयरविन्द मधील राष्ट्रप्रेम जागृत झाले. इतके वेगाने जागृत झाले कि राष्ट्रीय अनैच्छिक ब्रह्मचारी समाजाने स्वतः ५२व्या शक्तिपीठाची स्थापना केली. अनैच्छिक ब्रह्मचार्यांच्या नेत्यांने ह्या नवीन देवीचे निर्माण करून त्याचे उदघाटन सुद्धा केले. त्यानंतर बाकी राहिले ते म्हणजे त्याग पर्वाची घोषणा. अम्रित काळ संपून अमित काळ, माफ करा, त्याग पर्व सुरु झाले आहे.
ह्या त्यागपर्वांत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी म्हणे एक वर्षे सुवर्ण खरेदी करू नये. एकूण महागाई पाहता सुवर्ण खरेदी करण्यासाठी मध्यमवर्गीयांकडे पैसे आहेत अशी महामानवांची समजूत आहे हे पाहून समस्त मध्यमवर्गीय महिलांच्या डोळ्यांत अश्रू आले. पण ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनी सुद्धा पेट्रोल डिझेल वगैरे वापरू नये अशी सुद्धा बलिदानाची मागणी थोर हिंदू हृदयसम्राटानी केली. समस्त बुमर मंडळींना ह्या ऐतिहासिक घोषणेवरून शाळेंत ऐकलेली "तुम मुझे खून दो में तुम्हे आझादी दूंगा" ह्या घोषणेची आठवण आली आणि राष्ट्राप्रमाणे छाती भरून आली पण त्या भरलेल्या छातीत प्रदूषित हवा गेल्याने ठसका सुद्धा आला. डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे मुक्कामी विवाह विदेशांत न करता, एकात्मता स्मारकाच्या जवळ करावा अशी विनंती केली. तिथे झाडे वगैरे काही नसल्याने त्या सरकारी वातावरनात अत्यंत चांगले फोटो येतील अशी जनतेची अपेक्षा आहे.
त्याशिवाय महामानवांच्या मनात शेतकऱ्यांबद्दल नेहमीच कळ आहे. शेतकऱ्याकडून फक्त ५०% बलिदानाची अपेक्षा आहे. रासायनिक खते ५०% कमी वापरावी अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे. त्यामुळे उत्पनात १०% कमी झाले एकूण अन्न सुद्धा १०% कमी होईल कि नाही ह्याचे गणित बांधण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ह्याच समितीने मागे इथेनॉल मुळे इंजिन वर काहीही परिणाम होत नाही हे शोधले होते.
सामान्य जनतेला "तुम मुझे बलिदान दो, में बादमे टॅक्स लुंगा" ह्या देशप्रेमी घोषणेने नवीन पालवी फुटेल ह्यांत शंका नाही. अनेक देशप्रेमी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या घोषणेला मान देण्यासाठी पेट्रोल परत देण्यासाठी पेट्रोल पॅम्पवर लाईन लावली होती. पेट्रोल परत देण्यासाठी इतक्या रांगा लागल्या कि त्यामुळे सर्वत्र ट्रॅफिक जाम झाला.
जनतेला नवीन स्फुरण देऊन प्रधानमंत्री तात्काळ आपल्या विमानाने सोमनाथ मंदिरात पोचले जिथे त्यांच्या ५० गाड्यांचा ताफा पेट्रोल न वापरता १००% ह्या राजयोग्याच्या तपोबलावर चालला. मग ढोल, गजर आणि दमरुंच्या तालावर महामानवाने भगवान सोमनाथला आपले दर्शन दिले. नंतर सूर्यकिरण विमानांनी विना जेट इंधन वापरता निव्वळ हवेच्या जोरावर कसरती केल्या.
IT सेल ने त्यानंतर, गझनी आज जिवंत असता तर कसा त्याचा तळफळाट झाला असता. आजचा दिवस मग कसा ऐतिहासिक आहे आणि गझनीचा बदला कसा ह्या पुरुषांतील इंद्राने घेतला आहे इत्यादी टूलकिट अग्रेषित केले. पुरुषांतील इंद्र मग आपल्या ऐरावतावर बसून नऊ राष्ट्रांच्या सफरी वर गेले.
----
प्रधानमंत्र्यांचे वक्त्यव्य आणि त्यानंतर IT सेल ने पसरवलेला टूलकिट पाहून आर्थिक परिस्थिती गंभीर आहे असे वाटते. त्यामुळे विनोद आणि राजकीय पक्षपात बाजूला ठेवून आपले आर्थिक हित पाहणे गरजेचे आहे.
रुपया प्रचंड घसरला आहे, आणि माझ्या अनुमाना प्रमाणे आणखीन घसरणार आहे. ह्या घसरणीमुळे आयात महागणार आहे. हे का झाले इत्यादी महत्वाचे नाही पण हे आणखी होणार आहे.
उपाय काय ?
टीप: हे स्वतःचे मत असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. आपण एखाद्या योग्य व्यवसायिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. माझी भारतांत अस्थावर गुणतंवणूक नाही.
- जास्त सोने खरेदी करावे. सोने खरेदी हे भारतीय लोकांचे एक परंपरागत ज्ञान आहे. कुणा महामानवाने सांगितले म्हणून ऐकू नये ! (आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थ विवेका)
- सर्वानाच शक्य नाही पण विदेशी मार्केट ला थोडे तरी exposure ठेवावे असे माझे स्वतःचे मत आहे. हे विविध मार्गानी शक्य आहे. पण कदाचित फीडर फंडस् हा सर्वांत सोपा उपाय ठरू शकेल.
- अनावश्यक खर्च जसे विदेशी फोन, उंची घड्याळे इत्यादी चा खर्च टाळणे शहाणपणाचे आहे.
- तुम्ही जर काही विदेशी सर्व्हिस घेत असाल तर (Claude उदाहरण) त्यांचे वार्षिक प्लॅन्स आताच घ्यावेत कदाचित स्वस्त पडतील.
- परदेश प्रवास टाळा असे सांगितले असले तरी शक्य असेल तर टाळू नका. अश्या संधी परत परत येत नाही. परिवार, मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टींनी भविष्यांत हे शक्य होईलच असे नाही. (आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थ विवेका)
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीय लोक सोने का खरेदी करतात
भारतीय लोक सोने का खरेदी करतात याची चर्चा करणारा वाचनीय पेपर. परंपरेच्या पलीकडे जाणारी कारणे सांगितली आहेत.
Does financial and macro policy explain household investment in gold?
R Sane, MK Singh - Available at SSRN 5162071, 2023
We use data from June 1999-March 2021 and find that (1) a
depreciating currency has helped gold returns; (2) gold has consistently beaten
inflation and provided real returns, (3) been a hedge and a weak safe-haven against
the domestic equity market; (4) has outperformed fixed-deposits which have low
interest rates; and (5) has allowed international diversification. If policy has to
channel household savings to more productive uses, it has to confront the underlying
issues in the macroeconomic environment which make gold a preferred investment
choice.
एक आणखीन कारण म्हणजे gold…
In reply to भारतीय लोक सोने का खरेदी करतात by केदार भिडे
एक आणखीन कारण म्हणजे gold मध्ये जाण्यासाठी एन्ट्री barrier शून्य आहे. तुम्ही एक मोलकरीण सुद्धा असाल तर सोनाराकडे जाऊन कॅश देऊन तुम्ही काही सोने खरेदी करू शकता आणि त्याच वेळी ह्याला गहाण ठेवून पैसे सुद्धा मिळवू शकता. व्याज कमी असते आणि काळाच्या ओघांत सोन्याची किंमत वाढत गेल्याने तुम्हाला कर्ज सुद्द्धा जास्त किंमतीचे मिळते. विविध बँक एक दिवसांत कर्ज देऊ अश्या जाहिराती करतात. ह्या पेक्षा सोपा, सुरक्षित आणि किफायती इन्व्हेस्टमेंट प्रकार आणखीन कुठेच नाही. आमच्या घरी कामाला येणाऱ्या मोलकारीणीकडे ५० हजारांची चेन होती. ती तिने गहाण ठेवून तिने २५ हजार कर्ज काढले होते आणि ते तिने इतर महिलांना व्याजावर दिले होते. चेन तिने कधीही घातली नाही. तिच्या मते बँक लॉकर महाग आहे, त्यापेक्षा हा मॉडेल बरा. कुणाला १ हजार कुणाला अश्या प्रकारे कमी मुदतीवर ती उधार द्यायची. तिच्या मते ह्या मॉडेल चा एक फायदा म्हणजे कुणीही कधीही फुकट पैसे मागत नाही.
छान मुद्दा
In reply to एक आणखीन कारण म्हणजे gold… by साहना
अतिशय वेगळा मुद्दा आणि आपल्या मोलकरणीची कथा सुद्धा वेगळा
योग्य वेळी धागा
@साहना, अगदी योग्य वेळी धागा काढलात; चर्चेत सवडीने भाग घेईन, सध्या पोचपावती.
१.: सोने विकत घेण्याबद्धल काही ठाम मते आहेत; ती मिपावर व इतरत्र वेळोवेळी लिहिली आहेत.
२.: गुरुवार, २१ मे २०२६ ला दिवसभर गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे. इच्छूक हिंदूंनी आपापल्या बजेटप्रमाणे सोने खरेदी करावे.
काय बोलणार?
आत्ता आत्ता कुठे आय टी कंपन्या वर्क फ्रॉम ऑफिस सक्ती करायला लागल्या होत्या, तर आता पुन्हा वर्क ॲंड स्कूल फ्रॉम होम झाले तर कमर्शियल जागांचे रेट पडणार.
२०१० साली सोन्याचा भाव १५००० रु होता तो आता १.५ लाख आहे. म्हणजे १५ वर्षात दसपट. आम्ही काय ढीगभर सोने खरेदी करत नाही, पण लग्न सराईला सोने लागणारच ना?
घरी तेल कमी खा हे मान्य, तसेही जास्त तेल तब्येतीला चांगले नाही. पण तळलेले पदार्थ विकणारे गाड्या/हॉटेल्स यांचे काय?
परदेश प्रवास आम्ही तसाही करत नाही. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, त्यामुळे नो कमेंटस
पुण्यातील सार्वजनिक वाहतुक हा एक विनोद आहे. वारजे/सिंहगड रोड ते हिंजवडी किवा भोसरी/निगडी/पिंपरीला कसे जाणार? किवा गेलाबाजार विमाननगर/विश्रांतवाडी ते हिंजवडी किवा वाकड/पिंपळे गुरव ते खराडी/मगरपट्टा? बरे ज्यांनाफिल्ड्वर दिवसाला दहा ठिकाणी फिरायला लागते त्यांचे काय? आणि ही अवस्था शहरातली. गावात तर बघायलाच नको.
एकंदरीत तात्याने अमेरिका ईराण युद्धामुळे जगाची वाट लावली आहे. स्वत: मात्र अलास्कातुन तेल काढुन मजा मारत आहे.
रच्याकने ते अंदमानात आपल्याला तेल मिळाले होते त्याचे पुढे काय झाले?
पुरुषांतील इंद्राने…
In reply to काय बोलणार? by राजेंद्र मेहेंदळे
पुरुषांतील इंद्राने मुख्यमंत्री असताना Gujarat State Petroleum Corporation (GSPC) द्वारे २१००० कोटी रुपये खर्च केले, खाडीत तेल शोधण्यासाठी. त्यातून एक चमचा सुद्धा तेल आले नाही. त्यावर CAG ने भाला मोठा रिपोर्ट लिहिला होता. GSPC ह्या नादात बुडाली पण ते लपवण्यासाठी पंतप्रधान होतंच महामानवाने ONGC ला ती विकत घेण्यास लावली. असंख्य स्कॅम मधील हे एक तुच्छ स्कॅम.
मधून मधून काश्मीर मध्ये लिथियम चा प्रचंड साठा, नागालँड मध्ये तेल, अंदमान मध्ये आणखीन काही इत्यादी फुगे सोडले जातात. पण एक ग्राम तेल किंवा लिथियम येत नाही. ईशान्य भारतांत नैसगरिक वायूचे साठे आहेत पण वाहून नेण्याचे साधन नसल्याने ते विनावापर आहेत. नाही म्हणायला आसाम मधून एक वाहिनी आता सुरु झाली आहे. एकूण गरजेच्या साधारण १०% गॅस येतुन येऊ शकतो.
> आत्ता आत्ता कुठे आय टी कंपन्या वर्क फ्रॉम ऑफिस सक्ती करायला लागल्या होत्या
भारताच्या लोकसंख्येच्या कदाचित २ % लोक सुद्धा ऑफिस मध्ये जाऊन काम करत नसतील. त्यातील आणखीन कमी अश्या पेश्यांत असतील कि ज्यांचे काम घरी बसून होईल.
> पण लग्न सराईला सोने लागणारच ना?
आणि सोने घेतले नाही तर बिचार्या सोनाराने पोट कसे भरायचे ?
भू-राजकीय तणाव
जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात बदल करते किंवा जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षितता म्हणून डॉलरकडे वळतात. याचा फटका रुपयासह अनेक विकसनशील देशांच्या चलनांना बसतो. आयात महागल्यामुळे भारतासारख्या देशासाठी चिंतेची बाब आहे.
Sovereign Gold Bonds (SGB) किंवा Gold ETFs हे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतात?
परदेश प्रवास हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक गणितं जुळवताना आपण आयुष्यातील अनुभव आणि संधी गमावता कामा नये.
जर बजेट परवानगी देत असेल, तर केवळ रुपया घसरला म्हणून अनुभव घेण्याचे टाळू नका, कारण भविष्यात महागाई अजून वाढू शकते!
मध्यम वर्गीय असाल आणि…
In reply to भू-राजकीय तणाव by निनाद
मध्यम वर्गीय असाल आणि तुम्हाला काही लाखांचे सोने हवे असेल तर शक्यतो प्रत्यक्ष सोने घ्यावे. हे तुम्ही बँक लॉकर मध्ये ठेवू शकता. वाट्टेल तेंव्हा विकू शकता. तुमच्या नंतर बायका मुले सहज विकू शकता आणि गरज पडल्यास गहाण ठेवून तुम्ही कर्ज सुद्धा काढू शकता. तुमच्या वयाप्रमाणे भविष्यांत मुलांची लागणे इत्यादी वेळी हे उपयोगी पडू शकते.
त्यामुळे सोन्याच्या नेहमीच्या खुबी साठी तुम्ही सोने घेत असाल तर नेहमी खरे सोने घ्यावे.
SGB हि भारत सरकारची स्कीम असल्याने मी ह्याच्या जवळपास सुद्धा जाणार नाही. त्यांत कुठे काय नियम बदलतील देव जाणे. Gold ETF मध्ये पैसे ठेवू शकता पण ते आपल्या equity portfolio ला बॅलन्स ठेवण्यासाठी. थोडक्यांत तुम्ही स्टोक्स मध्ये जे पैसे घालणार होतात ते सध्या सुरक्षितता पाहिजे म्हणून GLD मध्ये ठेवण्यास हरकत नाही. हे सोने प्रत्यक्षांत कुठे ठेवले आहे , त्याचे ऑडिट काय आहे ह्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण भूतकाळांत सत्यम सारखया कंपन्यांनी स्कॅम केले आहे. सोने विदेशांत ठेवले आहे तर अजिबात गुंतवणूक करू नका कारण उद्या अमेरिकेने निर्बंध वगैरे टाकले तर काय होईल ह्याचा भरोसा नाही.
त्याशिवाय सोने तुम्ही cash मध्ये खरेदी विक्रय केला तर टॅक्स सोपा होतो. ETF मध्ये तुम्हाला टॅक्स तर लागेलच पण तो टॅक्स सुद्धा किती असेल ह्याचा भरवसा नाही. उद्या गॉल्ड etf वर जास्त टॅक्स लावला तर ?
राष्ट्रीय अनैच्छिक ब्रह्मचारी
राष्ट्रीय अनैच्छिक ब्रह्मचारी हा व्य्क्ती मानसिक रोगी आहे. सारखा डीएनए एक असतो म्हणतो असतो,पण झेड किंवा झेड प्ल्स सिक्युरिटी लागते त्याला! जर डीएनए एक असेल तर भिती कसली? मोगली या मानसिक रोग्याच्या शाखेतील दुसरे उत्पादन. यांनी आपण अमेरिकेतील किती राज्य फिरुन आलोत हे स्वत:च्या मुखाने सांगितलेले आहे, हे बहुतेक गुजरातच्या मठाधिश पदी बसण्याच्या आधीची गोष्ट आहे. मोगली अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग देखील घेऊन आलेले आहेत,त्यामुळे मला आता ते त्यांचे ट्रेनिंगचा "खऱ्या अर्थाने" वापर करत असल्याचीच शंका अधिक वाटते. असेच बृती किराणी आपण कोणाचे ॲबासेडर होतो ते सांगितले होते हे पद / कार्यक्रम सीआयएच्या कोव्हर्ट फंडींग ने चालवला जातो.
भक्त अणि पे-रोल वरील माणसे त्यांनी कसे कष्टात दिवस काढलेत खस्ता खाल्ल्या आहेत याच्या खोट्या रम्य कथा पसरवत असतात. मोगलींना व्हिसा द्यायचा नाही मग मुख्य पदावर बैठक बसल्यावर ते त्याच देशात जातात ही सगळी स्क्रिप्ट चा भाग असल्याचे म्हणतात म्हणे, खरे खोटो सोमनाथ भगवान जाणे !
त्यांनी स्वत: मी ट्रेन मध्ये प्रवास करताना सीट मिळत नसल्यास समोरच्याचा हात हातात घेउन भविष्य बघितल्या सारखे करायचो मग समोरचा मला बसायला स्वत:च जागा द्यायचा असे स्वत:च्या मुखाने सांगुन बसले आहेत. :)))
हल्लीच भांग माधव या यांच्याच शाखेतील उत्पादनाने एका मुलाखतीत आपण कशी अमेरिकेची गुलामी करतो आणि आता अजुन काय करावे ? अशी कथा सांगितली नंतर याचा बोभाटा झाल्यावर मी जे बोललो ते चूक होतो आणि इतर सारवासारव केली.
आता आणखी काय बोलायचे?
जाता जाता: पीएम केअर्स फंडचे डिटेल्स द्यायला मोगली का तयार नाही? तिथे पारदर्शकता का नकोय त्यांना? [ मी घोटाळा म्हणत नाही बरं का ]
आजची स्वाक्षरी: PHIR SE (Full Video) | Dhurandhar The Revenge |
अमेरिकासे मेरा बहुत पुराना रिश्ता है
In reply to राष्ट्रीय अनैच्छिक ब्रह्मचारी by मदनबाण
अमेरिकेतल्या एसीवायपीएल मध्ये जी किशनरेड्डी, मोदी आणि अनंतकुमार हे तिघेहि भाजपाच्या पैश्याने गेले आणि ट्रेन झाले असले आणि तिघेही भाजपात मंत्रीपद भूषविले गेलेले असले तरी त्यांच्या अल्युमनी लिस्टीत मिलिंद देवरा, प्रिया दत्त, सुप्रिया सुळे ह्या पण आहेत.
शंकरसिंघ वाघेलांवर काही काळ नाराज होऊन त्यांनी पक्षकार्य थांबवुन आपण एका शिक्षणसंस्थेसाठी काम करणार आहोत आणि विश्रांती घेणार आहोत असे सांगितले होते १९९३-९३ मध्ये. त्या कालावधीत त्यांनी ह्या कथित सीआयए फंडेड कोर्सची(कतार गव्हर्नमेंट पण डोनर आहे म्हणे) ऐड्मिशन घेऊन अमेरिका ट्रीप केलेली असावी बहुधा.
हे पक्षाकडून सोची समझी मुव्ह असावी कारण त्यानंतर मुख्य प्रवाहात आले.
अमेरिकासे मेरा बहुत पुराना रिश्ता है..........
भारतीय प्रधानमंत्री, इतर…
In reply to अमेरिकासे मेरा बहुत पुराना रिश्ता है by सुरिया
भारतीय प्रधानमंत्री, इतर मंत्री आणि समस्त बाबू मंडळी हि आपल्या स्वतःच्या हिमतीवर नालायक आणि कुचकामी आहेत. ह्यांत विदेशी हात आहे वगैरे बोलून विनाकारण षडयंत्र शोधणे म्हणजे pure COPE आहे. गोबी हे भ्रष्ट, अकार्यक्षम आहेत हे सोपे स्पष्टीकरण आहे. गोबी CIA एजन्ट आहेत हे क्लिष्ट स्पष्टीकरण आहे ओक्लम चा वस्तरा !
अमेरिकन साम्राज्य अवाढ्यव्य आहे. विविध गोष्टीवर दोन्ही देशांचे मत विपरीत असले तरी अनेक बाबतीत दोन्ही समाज चांगले संबंध ठेवून आहेत. त्यामुळे येथून अनेक लोक तेथे जातात, काही कोर्स वगैरे करतात ह्यांत आश्चर्य नाही. प्रत्येक ठिकाणी CIA चे काही तरी प्रचंड षडयंत्र आहे असे नाही. अमेरिकेत शिकले, काही काळ राहिले तर लोक अमेरिकन धार्जिणे होतील अशी अपेक्षा CIA वगैरेची असतात. पण ह्याचा अर्थ गोबी एजन्ट आहेत असा होत नाही.
भारताचे विविध आर्मी जनरल उदाहरणार्थ बिपीन रावत, बिक्रम सिंग आणि सध्याचे उपेंद्र द्विवेदी इत्यादी अमेरिकन वॉर कॉलेज मध्ये शिकले ह्याचा अर्थ ते पेंटागॉन साठी काम करतात असा होत नाही.
गोबी सरकारने विविध ठिकाणी…
In reply to राष्ट्रीय अनैच्छिक ब्रह्मचारी by मदनबाण
गोबी सरकारने विविध ठिकाणी घोडचूक केल्या असल्या तरी ते अमेरिकेत असताना नक्की कुठे राहिले होते हे मला ठाऊक आहे आणि त्या व्यक्तीशी माझे सलोख्याचे संबंध होते. गोबी हे अमेरिकन हस्तक वगैरे आहेत ह्यांत काहीही तथ्य नाही. अमेरिकन हस्तक होते तर भारत पूर्णपणे अमेरिकन धार्जिणा असता.
भारताची सध्याची प्रमुख समस्या म्हणजे आर्थिक स्थिती वाईट आहे. अंतर्गत व्यापार चांगला असला तरी मागील १० वर्षांत ज्या काही मूलभूत गोष्टींच्या निर्माणात भारताने आघाडी घेतली पाहिजे होती ती घेतली नाही. बाबू लोकांना जास्त सत्ता आणि रक्तपिपासू करपद्धती ह्यामुळे काही ठराविक लोक आणि काही ठराविक धंदे सोडल्यास इतर क्षेत्रांत जास्त प्रगती झाली नाही. भारताचा निर्यात उद्योग हा प्रामुख्याने लो value गोष्टींत अडकलेला आहे. त्यातून जास्त परदेशी चलन येऊ शकत नाही, परतावा कमी आहे आणि पर्याय सुद्धा जास्त आहेत. अंतर्गत व्यापारांत सुद्धा भारत खूपच परावलंबी आहे.
गोबी सरकारची प्रमुख समस्या म्हणजे चुपके चुपके मधील राजपाल यादव प्रमाणे "मुझे सब आता है" हि आत्ममुग्धता, बाबू लोकांवर अति विश्वास आणि आपल्या नेहमीच्या खात्रीच्या मतदारांना गृहीत धरणे आणि त्यांचीच जास्त पिळवणूक करणे आणि ह्या सर्व गोष्टींवर देशप्रेमाचा मुलामा चढविणे. ज्या गोष्टीसाठी लोकांनी पाठिंबा दिला होता त्या गोष्टी केल्या नाहीत.
गोबी पराकोटीचे आत्मकेंद्रीत व्यक्तिमत्व आहे. अश्या आत्मकेंद्रित व्यक्तीला योग्य प्रकारचे साथीदार मिळाले तर चांगल्या गोष्टी होऊ शकतात. नक्सलवादाचा अंत हे चांगले उदाहरण आहे. गुंड प्रवृत्तीचे सहकारी असल्याने हे शक्य झाले. सरकारी दंडुका वापरून कुणाला नष्ट करणे ह्यांत ह्या गुंडाचा हातखंडा होता आणि त्यामुळे नक्सलवादाचा अंत शक्य झाला. SIR सुद्धा एक चांगले उदाहरण आहे.
पण शिक्षण, उद्योग, रक्षाआणि अर्थ क्षेत्रांत गोबी सरकार मध्ये योग्य व्यक्तीची वानवा आहे आणि व्यक्ती योग्य असल्या तरी त्यांची भीती गोबीजी ना वाटते. १० वर्षे मागे योग्य त्या सुधारणा केल्या असत्या तर आज त्याची फळे मिळाली असती. पण चुकीच्या लोकांना मोठ्या पदांवर ठेवल्याने आज हि नामुष्कीची स्थिती आली आहे.
अनैच्छिक ब्रह्मचारी संघातील लोक वारंवार अमेरिका आणि इतर देशांत जातात ह्याचे प्रमुख कारण त्या प्रदेशांतून जास्त पैसा येतो. तेथील सामाजिक वर्तुळांत आपण फिरलो तर मग मातृभूमीत स्वतःला विचारवंत म्हणून मिरवता येते. आपली व्यसने ह्या देशांत लपवली जाऊ शकतात. गोबी सरकार ने मध्यंतरी एका माणसाला सत्तेचे एक पद दिले होते हि व्यक्ती जी अनैच्छिक ब्रह्मचारी संघाची विचारवंत मानली जात होती हिला एका खाजगी रात्रिभोजांत बोलावले गेले. हि व्यक्ती काही चांगले बोलणार ह्या अपेक्षेने लोक आले होते पण भोजन सुरु होण्याच्या आधीच ह्या व्यक्तीने इतकी फुकटची स्कॉच पिली होती कि मग त्यांना भोजन आधीच हॉटेल वर सोडावे लागले.
भांग माधव बद्दल मी मिपा वर आधीच लिहिले आहे. हा माणूस ढोंगी आणि दांभिक आहे. अमेरिकन रिपब्लिकन पार्टी च्या इव्हेंट मध्ये स्वतःला हा वारंवार घुसवण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी विचित्र बरळतो. ह्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचा मी प्रयत्न केला होता पण कधी उत्तर आले नाही. हा माणूस म्हणजे रिवर्स मिडास टच आहे, ज्याला हात लावेल तिथे घाण करून ठेवेल. अनैच्छिक ब्रह्मचारी संघाला लेखन वाचन गोष्टींचा तिटकारा आहे त्यामुळे त्यातून कधी चांगल्या दर्जाचे विचारवंत निर्माण होत नाहीत. होतात ते फक्त विचारजंत.
--
भारत अमेरिकेची गुलामी वगैरे करतो ह्याला काहीहि अर्थ नाही. अमेरिकन मार्केट भारतासाठी महत्वाचे आहे आणि अमेरिकन गुंतवणूक सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे अमेरिकन निर्बंध टाळणे हे भारतासाठी फायद्याचे आहे. कुठल्याच क्षेत्रांत भारताचे वर्चस्व नाही त्यामुळे अमेरिकेकडे वाटाघाटी करण्यासाठी भारताकडे काहीही लिव्हरेज नाही. हि नामुष्की असली तरी गुलामी नाही. कुठलाही नेता असला तरी त्याच्याकडे हेच पर्याय असते आणि त्यातून त्याने सुद्धा तेच निर्णय घेतले असते. भारताचे परराष्ट्र मंत्री विनाकारण गरजेपेक्षा जास्त बरळतात त्यामुळे हि नामुष्की जास्त मोठी वाटते.
परराष्ट्र मंत्र्यांचे बरळणे पहा : https://x.com/MattooShashank/status/2054104941267190088?s=20
नेहमीच्या यशस्वी
नेहमीच्या यशस्वी समर्थकांच्या प्रतिसादाची वाट बघतोय. हाही कसा एक मास्टरस्ट्रोक आहे, हा सल्ला न मानणारे कसे राष्ट्रद्रोही आहेत वगैरे वगैरे...
कब्बडी......
मोरू V/s अंधभक्त
वाचतोय.
मोरू V/s अंधभक्त नव्हे,…
In reply to कब्बडी...... by कर्नलतपस्वी
मोरू V/s अंधभक्त नव्हे, मोरू V/s मोगु
मिपावरचे चांगले लेखक कसदार…
मिपावरचे चांगले लेखक कसदार लेखन करायचं सोडून
मोदीद्वेषाचे असले फालतू लेख किंवा तशाच फालतू कविता करण्यात
आपला आणि वाचकांचा वेळ का वाया घालवतात हे समजेनासे झाले आहे.
साहना, चांगलेच शालजोडीतले…
साहना, चांगलेच शालजोडीतले हाणलेत! निवडणुकांपूरते देशपुढील संकट दाबून धरले होते बहुतेक! 🤣
त्यात भारताचा अजून एक…
त्यात भारताचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे कमालीचा आकार्यक्षम असणारा विरोधी पक्ष. त्यामुळे आपण काहीही केलं तरी विरोधी पक्ष आपल्याला सांभाळून घेईल हा आत्मविश्वास भाजपाला आहे.
दुसरं म्हणजे, भाजपामय झालेली न्यू्ज चॅनेल्स. हिंदी बातम्यात तर अँकर्स मध्येच भाजपची बाजू मांडायची चढाओढ असते.
भारतांत बहुतेक पक्षांची…
In reply to त्यात भारताचा अजून एक… by रात्रीचे चांदणे
भारतांत बहुतेक पक्षांची विचारसरणी एकच आहे. येन केन प्रकारेन वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता प्राप्त करायची आणि त्या निमित्ताने माया गोळा करायची.
भाजप आणि काँग्रेस ह्यांच्यांत टॅक्टिकल लेव्हल वर फरक आहे. उदाहरणार्थ राम मंदिरासाठी काँग्रेस ने अजिबात धडपड केली नसती. पण स्ट्रॅटेजिक लेव्हल वर काहीच फरक नाही. आरक्षण, SC/ST ऍक्ट, आयात निर्यात निर्बंध, शेती धोरण, उद्योग धोरण, शिक्षण इत्यादी बहुतेक गोष्टींवर दोन्ही पक्षांचे एकमत आहे.
100% सहमत
In reply to भारतांत बहुतेक पक्षांची… by साहना
सहमत. सगळ्यांनी आपली नावे सिपीआय आणि पुढे कंसात वेगवेगळे नाव लावावे अशी परिस्थिती.
भारताचा अजुन एक मोठा…
In reply to त्यात भारताचा अजून एक… by रात्रीचे चांदणे
भारताचा अजुन एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कमालीचा निगरगट्ट, दुराग्रही, आळशी व उद्दाम असा त्याचा नागरीक. ज्याला साधा आपला परीसर स्वच्छ ठेवता येत नाही, नियम पाळता येत नाही, टॅक्स भरतो म्हणजे आपण जणु काय सगळ्यांना विकतच घेतले आहे असा अविर्भाव, ज्यात पराकोटीचा माजुरडैपणा वगेरे वगेरे गुण अगदी ठासुन भरले आहेत. त्यावर कडी म्हणजे हातचे तळवे व काखा वर करुन "सरकार कसे निकम्मे आहे" असे बोलायला मोकळे.
ज्या देशाच्या नागरीकाला आपले गाव / शहर स्वच्छ ठेवता येत नसेल त्याच्या कडुन बाकी अपेक्षा का करावी ...
ह्याला इंटरनेटवर हल्ली …
In reply to भारताचा अजुन एक मोठा… by सुक्या
ह्याला इंटरनेटवर हल्ली "देहातीझम" म्हणून संबोधले जाते. ट्विटर वर हा शब्द शोधला तर बरेच काही सापडेल. ह्यावर सविस्तर पणे नंतर लिहीन.
*भारत देशाचे काहीच होऊ शकत…
*भारत देशाचे काहीच होऊ शकत नाही. (c)(R)
भारत देश रामभरोसे सुरू आहे.
काळाच्या ओघांत देश सुधारेल…
In reply to *भारत देशाचे काहीच होऊ शकत… by पाषाणभेद
काळाच्या ओघांत देश सुधारेल ह्यांत शंका नाही. पण हा काळ किती असेल हे सांगता येत नाही.
सोमनाथ मंदीराचा अम्रूत…
सोमनाथ मंदीराचा अम्रूत महोत्सव नुकताच साजरा झाला. आता त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पान पान भर जाहिराती वर्तमानपत्रांना का दिल्या?
तसेच ज्या शासकीय योजना महाराष्ट्राच्या असतात, त्यांच्या पान पान भर जाहिरातीत मोदींचा फोटो कसा? त्यांचा काय संबंध असतो?
आणि ह्या जाहिरातीत…
In reply to सोमनाथ मंदीराचा अम्रूत… by पाषाणभेद
आणि ह्या जाहिरातीत आंबेडकरांचा फोटो धरून उभा राहिलेला डेव्ह फर्नांदिस ! आंबेडकर आणि सोमनाथ मंदिराचा संबंध काय ?
बेस्ट एकदम.
बेस्ट एकदम.
सर्व कसे एकदम ठरवून.
वाभाडे निघताहेत पण ते ही कसे ठरवून, उमजून.
सेफ्टी व्हॉल्व सिस्टिम आहे ही संघाची.
मोदींचा कुचकामीपणा काय एका आवाहनातच उघड झाला? मंत्री आणी सगळी बाबू सिस्टिम एकदम भ्रष्ट आणि अकार्यक्षम झाली? कसे गेल्या तीनचार महिन्यात काही आयडींना एकदमच जोर येऊन मोदींचे सगळेच वाभाडे अगदी आयटीसेलच्या वर प्रचारु लागले?
मोदी काय स्गळे निर्णय एकट्याच्या जीवावर घेतात काय? पक्ष, मातृसंस्था आणि त्यांची धोरणे काय कौतुकालाच आहेत काय? जर काही अपयश किंवा अंगलट येणारे असले की अलगद आधी मातृसंस्थेने मग पक्षाने बाजूला व्हायचे असे किते दिवस चालणार? आणि हे मोदींना कळत नसते काय?
युध्द काय आज सुरु झाले? बरं इतका पुढचा अंदाज येतो ह्या विद्वांनाना तर इस्त्रायलच्या फनट्रीपला आला नाही अंदाज दोन दिवसात होणारे युध्द सुरु म्हणून? बर जाऊन आले तर निदान युध्दाचा जो काही निकाल बरावाईट लागेल त्यानुसार नको काही तरतूदी करायला? इंधन सुरक्षितता नावाची चीज असते आणि त्यानुसार परराष्ट्र धोरण आखावे हेही नाही कळत? तो ट्रंप बोलला चार दिवसात इराण राजवट बदलतो नेतन्याहूला घेऊन की हे आले खुषीत. परस्पर एक कट्टर मुस्लीम राजवट संपली तर तेवढेच त्याचे श्रेय घ्यायला पळत आले असते. इस्त्रायलची ट्रीप ही कशी त्याची प्लानिंगची ट्रीप होती आणि विगुंनी कसा जगावर प्रभाव पाडला ह्याचे ढोल पिटायला आयटीसेल तयारच होते. अगदी सुरुवातीस आयातुल्लांची हत्या झाली की डान्स स्टेप पण सुरु झाल्या होत्या. त्यांच्या दुर्दैवाने इराणने अंदाज चुकवले. मग हळूच इराण कसा जुना मित्र ह्याचे हळूहळू सूर वातवरणात विहरु लागले. खोट्यानाट्या बातम्या टाकून इतकी जहाजे आली आणि इतकी फ्री मध्ये आली अशी प्रचार यंत्रणा सुरु झाली. तेंव्हाही परिस्थितीचे गांभीर्य नाही. निवडणुका होत्या ना. इंधन, पैसे आणि सगळ्या साधनांचा पार धुरळा उडवताना नव्हते गांभीर्य? एकटे मोदी ठरवतात काय हे सगळे? सगळे पार पडले आपल्या सोयीने की साहेब आले आवाहनाला. बरं स्वत: ते तरी गंभीर आहेत का? आवहनानंतर चार पाच रोड शो, एक एअरशो करणार राज्योराज्यी जाऊन. मग हळूच आधी चे सरकार आणि मंत्र्यांनीही कशी आवाहने केली होती ह्याची उदाहरणे ध्यायला चालू केली. चक्क जुन्या वृत्तप्त्रांच्या खोट्या इमेजेस बनवून फिरवायला चालु केल्या. हेच लोक आता बोलायला लागले की अंगलट आल्याप्रमाणे त्यांनी आवाहन केलंय सक्ती थोडीच केली आहे असा रागआळवणी सुरु झाले. "बघा बाबा तुमचे तुम्ही, खड्ड्यात जाणारच आहात, मी सांगायचे काम केलेय" असला बायकी त्रागा सुरु झालाय. खड्ड्यात लोटणारा गंगाधर हाच शक्तीमान आहे ते नाही बोलणार. श्रेय सगळे पाहिजे, अपयश लोटायला आक्खी दुनिया पार पन्नास वर्षांचा इतिहास लागतो.
धन्य आहात....
तीन तीन लोकसभेची इलेक्षन आणि कित्येक विधानसभा इलेक्षनं हाच झेंडा घेऊन नाचत होते ना? अगदी परवा बंगालच्या निकालानंतर कसे परमानंदात काही आयडी स्वर्गात विहरत मिरच्या वाटत होते? फ२० ला शिव्या देणारे आयडी महाराष्ट्रातल्या निवडणूका फ२० च्या खटपटी लटपटी फोडाफोडीमुळे जिंकल्या की सगळे विसरुन पक्ष आणी मातृसंस्थेचे गुणगान गायला मोकळे झाले. मराठीद्रोही, होंदूद्रोही, राज्य्द्रोही फ२० जायला पाहिजे असे म्हण्णार पण त्यांच्यासोबतच त्यांच्याकडून ही धोरणे राबवून घेणारा पक्ष जायला पाहिजे म्हणले की बरोब्बर मीठाची गुळणी बसते.
त्यात साळसूदपणे काही आयडींनी मोदी कसे हिंदूविरोधात आहेत आणि त्यामुळेच ते बदलायला पाहिजेत हा राग आळवायला सुरु केला. अरे आहे ते सुध्दा जरा नॉर्मल(तेही कायदा आणि जनक्षोभाच्य भीतीने) सुध्दा हिंदूद्रोही वाटत असतील तर मग कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे ह्यांच्या स्वप्नातले नेते आणि त्यांची कृत्ये काय असणार ह्याचा सर्वसामान्य नागरिकांनी विचार करायची वेळ आली आहे.
काहीच स्पष्ट नसणारी एक धूसर आणि द्वेशःआधारित संकल्पना लोकांसमोर ठेऊन स्वत:चे स्वार्थ साधायची ट्रीक कीती दिवस करत राहणार आहेत हे कुणास ठाऊक.
...........................................
बर मिपा पातळीवर बघायचे तर एक शिस्तीत सेफ्टी व्हॉल्व पॅटर्न येणार हे माहीतच होते.
पहिल्यांदा मोदींना शिव्या देणार. नाही नाही ते हुडकून काढणार. इतरवेळी जरा काही विरोधात लिहिले की उसळून येणारे सोयीस्कर चूप बसणार. ही शिट्टी अगदी जोरात वाजू देणार.
दुसरी शिट्टी वाजणार "विरोधी पक्ष तरी कुठे कामाचा आहे, त्यांनाही गांभीर्य नाही, ते काही करत नाहीत, केले त्याचा प्रचार जमत नाही"
तिसरी शिट्टी फार सुरेल " आपले नागरिक तरी कुठे त्या लायकीचे आहेत, लोकांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते."
न वाजलेली शिट्टी पण वाफेची धूसपूस अशीच असते "दुसरे आहे का कुणी मग ऑप्शन"
मग झाकण पडते "आहे ते छान आहे, योग्य आहे, सुंदर आहे, ह्याब्द्दल काही बोलु नका, टीका तर अज्याबात करायची नाहे नाहीतर भात मिळणार नाही"
शेजारच्या बर्नरवर एक भांडे उकळत ठेवायचे "ही काही साधक बाधक चर्चा नाही, हे काही कसदार लेखन नाही, कितीदिवस कोबी कोबी करणार, त्याविषयी नाही ब्वा आम्ही बोलणार, अर्थकारणावर निबंध लिहू, एका शब्दाच्या इनपूटने एआय देईल असे जुने जुने तपशील आणू पण ज्याने अर्थकारणाची वाट लावलीय त्याविषयी नाही बोलणार ब्वा, त्याच्या पक्षाविषयी आणि मातृसंस्थेविषयी काही बोलणे तर अब्रम्हण्यम....."
जय श्रीराम.
बेस्ट चाललंय एकदम.........
आमचे एक लाडके डॉक्टरसाहेब आहेत मिपावर, खरोखर त्यांच्याशी बरेच पटते मिपावर मला.
त्यांच्या लाडक्या शब्दातच म्हणायचे झाले तर
"चालू द्या"
लोकांना आपली अशी मते आहेत,…
In reply to बेस्ट एकदम. by अभ्या..
लोकांना आपली अशी मते आहेत, कुठल्याच ठराविक विचारसरणीच्या नेत्याकडे आपली बुद्धी गहाण न टाकता लोक दोन्ही बाजूनी विचार करू शकतात हि संकल्पना काही लोकांना अजब वाटते आणि ह्या बुद्धिभ्रमात, मिपा वरील सदस्य षडयंत्र रचून लेख वगैरे लिहितात आणि कमेंट सुद्धा अनैच्छिक ब्रह्मचारी संघाच्या बैठकीत ठरवूंन मग इथे टाकतात अशी समजूत करून घेतात.
ह्याला काही उपाय आहे असे वाटत नाही. चालू ठेवा !
उपाय असेल तर सुचवा. ... …
In reply to लोकांना आपली अशी मते आहेत,… by साहना
उपाय असेल तर सुचवा. ... "बुद्धी" गहाण न टाकता.
गेले बरेच महिने डाव्या…
गेले बरेच महिने डाव्या पुरोगाम्यांचे सुतकाचे दिवस चालू होते. एका मागोमाग एक निवडणुकांत हार मिळत होती. दिल्ली, बिहार आणि आता बंगाल आणि आसाम मध्ये त्यांचे लाडके लै म्हणजे लैच मार खाऊन राहिले होते. एवढे युद्ध झाले आणि भारतात त्याचा फारसा परिणाम नव्हता.
या वेळेस तामिळनाडू मध्ये विजय हे शून्य पासून १०८ जागांपर्यंत पोचून आश्चर्यकारक रित्या निवडून आल्यामुळे इ व्ही एम बद्दल सदा रडारड करणाऱ्या डापु गँगची बरीच गोची झाली आहे. इ व्ही एम केवळ बंगाल किंवा आसाम मध्ये हॅक होतात असे म्हणणे म्हणजे मूर्खपणा आहे हे समजल्यामुळे बंगाल मध्ये एस आय आर चे तुणतुणे वाजवण्याचा प्रयत्न केला. पण एकंदर त्याने फार तर दीदींच्या काही सीट्स वाढतील सरकार तर येणे अशक्य आहे असे दिसल्यामुळे तो बारही फुसका निघाला.
आता श्री मोदी यांनी युद्ध फार काळ चालल्यामुळे आपल्याला आता पोटाला चिमटा घ्यावा लागेल असे सांगितल्याबरोबर हे सर्व लगेच दुप्पट उत्साहाने मिपावरच नव्हे तर इतर सर्व सोशल मीडियावर मोदी विरोधाचा अश्वमेध फिरवायला पुढे आले आहेत.
बऱ्याच दिवसांची खदखद आणि जळजळ बाहेर येते आहे.
बरं हे युद्ध काही श्री मोदीनी चालू केलं नव्हतं कि त्यात त्यांनाच काय जगातील बहुसंख्य राष्ट्रांचा त्यात काही हात नव्हता. मागच्या वर्षी ट्रम्प तात्यांनी टेरिफ लावल्यावर मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीची आठवण देऊन त्यांनी भुभु: कार केला होता आणि मोदी तात्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत नाहीत म्हणून बराच आरडा ओरडा केला पण थोड्याच दिवसात तात्यांनी त्याना ( जसे अमेरिकेतील आणि बाहेरील सर्वाना) तोंडघशी पाडले.
मोदींनी इतके दिवस पेट्रोलचे भाव वाढवले नव्हते ते आता नाईलाजाने वाढवायला लागणार आहेत म्हणून त्यांच्या नावाने शिमगा करायला चालू केला आहे.
खरं तर काय झालंय कि डापु गॅंग ने जितक्या घोड्यांवर आपले पैसे लावले होते ते सर्व टांग्याचे घोडे निघाले/ मोडीत निघाले.
त्यात अखिलेश, केजरीवाल, ममता दीदी, उद्धव ठाकरे, शरद पवार पासून सर्वच येतात.
राहुल गांधी तर फारच बेभरंवशी निघाले एकंदर ९९ निवडणूका हारून ते शतकाकडे यशस्वी वाटचाल करत आहेत
तेंव्हा आता कोणत्या घोड्यावर आपली भिस्त ठेवायची हेच समजेनासे झालेले आहे.
चालायचंच.
तेंव्हा
चालू द्या
मोदीळ... त्यावर इलाज…
In reply to गेले बरेच महिने डाव्या… by सुबोध खरे
मोदीळ... त्यावर इलाज नाही लिब्रंडुनी (समजा सत्तेत असते) तर काय केले असते? 🤭
असो... बाकी चालू द्या!
ज्या प्रकारे आमच्या…
In reply to गेले बरेच महिने डाव्या… by सुबोध खरे
ज्या प्रकारे आमच्या आईवडिलांनी कांग्रेस वर विश्वास ठेवला आणि प्रत्येक टीकेच्या मागे "विदेशी हात" चे षडयंत्र पहिले त्याच प्रमाणे सध्या व्हाट्सपप ला चिकटून राहिलेली बुमर मंडळी आपले सर्वस्व एकाच गोबीवर ओवाळून टाकत आहेत. प्रत्येक टीका म्हणजे व्यक्तीद्वेष किंवा पुरोगामी षडयंत्र. महामानवाचा प्रत्येक निर्णय म्हणजे मास्टर स्ट्रोक. गोबी है तो पम्पकिन है ! काही चांगले झाले तर महामानवांची चाणक्यदृष्टी, नामुष्की ओढवली तर ग्लोबल टर्मयिल त्यांत आधुनिक चाणक्याचा काहीही दोष नाही.
चालू द्या कारण ह्याला काही इलाज नाही !
दुसरा कुठलाही पक्ष सत्तेत…
In reply to ज्या प्रकारे आमच्या… by साहना
दुसरा कुठलाही पक्ष सत्तेत असता तर काय केले असते किंवा अपेक्षित असते? द्वेष न ठेवता, विचार करुन उत्तराची अपेक्षा ठेवतो.
बाकी माझी हि धुराळ्यात भर..
गोबी है तो पम्पकिन है. ओके. और रागा है तो बरबादी है! 😁
धुराळा उडवा उडवत रहा.. मोदीळ... त्यावर इलाज नाही..
आत्याबाईला मिश्या असत्या तर…
In reply to दुसरा कुठलाही पक्ष सत्तेत… by नावातकायआहे
आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटले असते का ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही. पण काँग्रेस (किंवा इतर कुणी) पक्ष सत्ता स्थानी असता तर गोबी पेक्षा जास्त अकार्यक्षम आणि भ्रष्ट असता असे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे तर मला सुद्धा ते मान्य आहे. गोबींची टीका हि काँग्रेस किंवा इतर कुठल्याही पक्षाचे समर्थन नाही.
काँग्रेस (किंवा इतर कुणी) पेक्षा थोडेफार चांगले हेच गोबी ह्यांचे वैशिष्ट्य आहे तर ते सुद्धा मी मान्य करते. पण हे कॅन्सर पेक्षा हृदयरोग चांगला म्हणण्यासारखे आहे.
गोबी ह्यांना दिलेले लोकमत हे "काँग्रेस पेक्षा थोडा चांगला कारभार" ह्यासाठी नव्हते, देशांत जास्त आमूलाग्र बदल आणण्यासाठी होते. गोब्बी ह्यांनी बहुतांशी काँग्रेसी धोरणेच जास्त प्रखर पणे राबवली आहेत.
"गोब्बी" ह्यांनी बहुतांशी…
In reply to आत्याबाईला मिश्या असत्या तर… by साहना
"गोब्बी" ह्यांनी बहुतांशी काँग्रेसी धोरणेच जास्त प्रखर पणे राबवली आहेत. हिदीत म्हणतात "घुस्सा अकल को खा जाता है".
"देशांत जास्त आमूलाग्र बदल आणण्यासाठी होते".
जे "थोडे फार" झाले आहेत ते तरी मान्य आहेत का? अजून खुप करायचे आहे हे हि खरे आहे.
पण मोदीळ... त्यावर इलाज नाही.. 😀
"गोब्बी" ह्यांनी बहुतांशी…
"गोब्बी" ह्यांनी बहुतांशी काँग्रेसी धोरणेच जास्त प्रखर पणे राबवली आहेत. हिदीत म्हणतात "घुस्सा अकल को खा जाता है".
"देशांत जास्त आमूलाग्र बदल आणण्यासाठी होते".
जे "थोडे फार" झाले आहेत ते तरी मान्य आहेत का? अजून खुप करायचे आहे हे हि खरे आहे.
पण मोदीळ... त्यावर इलाज नाही.. 😀
जाऊ द्या हो काही लोकांचं कसं…
जाऊ द्या हो
काही लोकांचं कसं असतं कि आपण किती समतोल आहोत हे दाखवण्यासाठी श्री मोदींवर प्रच्छन्न टीका करायची.
त्याला पर्याय काय? त्याचं उत्तर नाही. दुसरा उपाय काय ते सांगता येत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेण्याची राजकीय अपरिहार्यता असते ते मान्य करायचे नाही. मोदींनी कसं आदर्श असायला हवं. ( अद्रष्टेच्या मागे लागून श्री वाजपेयी एका मताने हरले आणि त्यामुळे काँग्रेसचा फास गळी लागला ते सोयीस्करपणे विसरायचं आणि आपण परदेशात बसून उंटावरून शेळ्या हाकायच्या
हे म्हणजे टिपिकल फेमिनिस्ट सारखे असतात. स्वतः लग्न करायचं, त्याचे सर्व फायदे उपटायचं वर लग्नसंस्थेवर टोकाची टीका करायची कि लग्नसंस्था आदर्श नाही. त्याला दुसरा उपाय काय? ते सांगता येत नाही. आणि सुधारायची कशी तेही सांगता येत नाही.
पण आम्ही फेमिनिस्ट
त्यांचं चालू द्या
अद्रष्टेच्या मागे लागून श्री…
In reply to जाऊ द्या हो काही लोकांचं कसं… by सुबोध खरे
अद्रष्टेच्या मागे लागून श्री वाजपेयी एका मताने हरले आणि त्यामुळे काँग्रेसचा फास गळी लागला
त्यांनी एका ओळिचा राजिनामा दिला.. "कोर्टात" जायला हवे होते.. 😁
तिकडे "ग्रेटर बांगलादेशची" पं.प्र. होणार होती ममत बानो.. आता "पाचर" मारताहेत मु.मं.अधिकारी. खुप घाण काढायची आहे.
सो. मि. वर असुन सुद्धा, लिब्रांडू बाहेरील थ्रेट किती आणि किती प्रकारच्या आहेत हे लक्षात घेत नाहीत. ह्या लिब्रांडू लोकांनी झापडे लावली आहेत.. किंवा ते सामिल आहेत..
प्रोब्लेम आहेत हे सत्य आहे. ते सोडवायला भारत टिकला तर ना?
बाकी उंटांवरुन शेळ्या हाका किंवा आणिक काहि... "गेल्या घरी" सुखी रहा..
देशोधडीला लागलेल्या भा.ना. नोंद. घ्या...
आपण परदेशात बसून उंटावरून शेळ्या हाकायच्या....
आम्ही खुशाल आहोत. जगजितसिंह यांच्या प्रसिद्ध गझलेवर "ना चिठ्ठी ना कोई संदेस", रडणे बंद केले आहे. आम्ही, भा. ना. माजोरडे, वेशिस्त...... जसे आहोत तसे खुश आहोत.
तुम्हीं तुमचे बघा. पेट्रोल चे भाव वाढलेत पण सांगत नाहीत. आटा तांदूळ पण मिळायची मारामार झालीय,अर्थिक बजेट कोलमडलयं तरी आम्ही कसे खुशहाल हे सांगत फिरतायत. दोन चार द्रोण फुटले तर "नमो मला वाचवा, नमो मला वाचवा",(काका मला वाचवा ची ट्युन वर ऐका) म्हणून गळा काढताय. तात्यांनी विसा देण्यासाठी घाम काढलाय, वीसा संपलाय तरी मायदेशात येत नाहीत कारण तात्या परत घरात घेतील याची खात्री नाही. हिरवे पोस्टकार्ड देण्यासाठी पण तात्या काकू करत आहे.
डाॅक्टर, नर्सेस कमी पडल्या, दवाखाने भकास झाले म्हणून मेडीकल,पॅरामेडिकल कुशल लोकांसाठी रेड कार्पेट टाकले आहे. बाकी कामगार व्वहेंटी वर आहेत.
नका सांगू आम्हाला. आपलं फाटतय त्याला ठिगळ लावा. आमचे आम्हीं बघून घेऊ.
पप्पू ही आमचा नमो ही आमचाच.
शिकलेले(सुसंस्कृ त ) असाल तर भारत व भारतीयांवर बोलताना, लिहीताना सयंम बाळगा. योग्य शब्द सुचत नसतील तर लिहू नका.
डिस्क्लेमर- काही परदेशस्थ मिपाकरांची सौहार्दपूर्ण व्यवहाराची नोंद आहे त्यामुळे हा प्रतिसाद त्यांच्याकरता नाही.
लेख आवडला विशेषतः पहिला,…
लेख आवडला
विशेषतः पहिला, दुसरा आणि शेवटचा परिच्छेद खूप छान लिहिला.
तुम्ही भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात वास्तव्य केल्यामुळे तुम्ही या दोन्ही देशांच विश्लेषण तुमच्या पद्धतीने करता मला तरी ते आवडतं.
तुमच्या ' देहातीझम ' वरील लेखाच्या प्रतीक्षेत.
एकंदर चर्चा पाहुन गंमत वाटली…
एकंदर चर्चा पाहुन गंमत वाटली!
गोबींची टीका हि काँग्रेस किंवा इतर कुठल्याही पक्षाचे समर्थन नाही.
@ साहना जुन्या मिपा पद्धतीने बाडिस म्हणतो.
जितके लोक मोगलीजींचे समर्थन करतात ते त्यांच्या चुकीच्या गोष्टी बद्धल चकार बोलत नाहीत.
आज मोगली आहेत उध्या नसतील [ सगळे निर्णय ते घेत नाहीत, त्यांच्या खाली असलेले अधिकारी इतर मंडळी घेतात इ. तरी चेहरा मोदींचाच आहे हे नाकारता येत नाही, या चेहऱ्याच वापर करुन जिंकता येते मग टिका देखील याच चेहऱ्यावर होणार ] पण त्यांच्या निर्णयांमुळे हिंदुंची आयुष्य बरबाद होत आहेत तरी त्यांना हिंदू विरोधी म्हणायचे नाही?
जे हिंदुंचे शत्रु आहेत त्यांना आर्थिक आणि इतर बाबतीत बलवान करणे हे देखील हिंदू विरोधीच आहे. पण मोगली आता हिंदू विध्यार्थांना देखील आयुष्यातुन उठवायला लागले आहेत तेव्हाही ते हिंदू विरोधी नाहीत? हिंदुंचे भले करता येत नसेल तर वाटोळे तरी करु नका!
नीट मध्ये पकडले गेलेले माजपाचेच आहेत ना? जरा त्या विध्यार्थांचा विचार करा, किती मानसिक ताण ते विनाकारण सहन करत आहेत. एकाने तर आत्महत्या देखील केली. बरं चांगेले टक्केवारी,मेरिट मिळुन काय उपयोग? कारण या पेक्षा जातियवाद मोठा! मध्यप्रदेश मध्ये माजपाचेच सरकार आहे ना? किती टक्क्यावर आरक्षण गेले आहे ते जरा पहा ना!
जे राजकिय पटलावर मोदींच्या विरोधात जातात, त्यांना वाटेल ते बोलतात, गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत,लाचखोर आहेत ते सर्व आज मोदीं बरोबरच आहेत. मग जनतेने चुकीच्या गोष्टींसाठी विरोध केला तर मळमळ कशाला व्हायला हवी?
बरं मोदी सरकार तर विरोध प्रदर्शन देखील करुन देत नाही, हे विरोध करणारे हिंदू आणि त्यांनीच मतांच्या जोरावर मोदींना निवडुन आणले होते ना?
हिंदूनीं हिंदू मतांच्या जोरावर एक हिंदू सरकार निवडुन आणल्यावर आणि एक दशक पेक्षा अधिक काळ जाऊन जर काही सकारात्मक फरक पडत नसेल तर टोपीवाले आणि त्यांचे सरकार शहाणे, ते कुठ्ल्याच बाबतीत वेळ घालवत नाहीत आणि वैचारिक कुंथत देखील बसत नाही. संधी सोडत नाहीत आणि त्याचा पुरेपुर फायदा उचलतात.
गेल्या काही काळात तर सरकार विरुद्ध बोलणाऱ्यांची खाती सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वरुन उडवली गेली आहेत किंवा हिंदुस्थानातुन ती दिसणार नाही याची व्यवस्था मोगली सरकार ने केली, यातील बरीचशी खाती सामन्य जनतेचीच होती. मी त्याला इंडियंन फ्री व्हॉइस पेर्ज म्हणतो.
जाता जाता: येनकेन प्रकारेण सरकारवर दबाव पडुन सरकारचे डोके जागेवर येईल का ? यासाठी मी माझ्या क्षुद्र विरोधातुन प्रयत्न करतो. ज्या देशात मागसपणा मिरवण्यात, मागास होण्याची चढाओढ करण्याची स्पर्धा लागली आहे तिथे अधिक काय बोलायचे? मोगलींची जात काही काळापूर्वी अतिपिछडा मध्ये घातली गेली आणि याच माणसाने गुजरात मध्ये टोपीवाल्यांच्या बऱ्याच जाती [ बहुतेक ५०-७५ ] विशिष्ठ गटात टाकल्या. ३ टर्म पंतप्रधान असलेला व्यक्ती आता नरडं फाडुन लोकांना सांगतो मी अतिपिछडा आहे.
आजची स्वाक्षरी: Ishqam Mika Singh ft.Ali Quli Mirza
समस्या ही आहे की काँग्रेसी…
समस्या ही आहे की काँग्रेसी राजकारणाच्या प्रभावाखाली ज्या पिढ्या पिळल्या गेल्या, ज्यांनी काँग्रेसी भ्रष्टाचार, समाजवाद आणि त्यातून निर्माण होणारी पराकोटीची गरिबी, जातीयवादी आणि हिंदू विरोधी धोरणे पाहिली आहेत, त्यांना गोबी मध्ये आणि अनैच्छिक ब्रह्मचारी संघात एक आशा दिसली. आता समजा, मी या देशात एक सवर्ण स्त्री आहे (ज्याला आरक्षण वगैरे नाही पण शिक्षण आहे) आणि हा देश माझा आहे असे मला वाटते. या देशात मला इतरांप्रमाणे समान अधिकार असावेत असे मला वाटते, माझ्या पूर्वजांनी देशाच्या प्रगतीत हातभार लावला आहे आणि मी जे काही पोटार्थासाठी करते त्यातून समाजाला आणि देशाला फायदा होतो असा माझा विचार आहे.
माझी मुले शांतपणे झोपली असताना त्यांच्याकडे पाहून मला वाटते की, या मुलांनी परिश्रम केले, प्रामाणिकपणे शिकून काही पदवी मिळवली, तर या मुलांना या देशात भवितव्य आहे. मी लोकलमध्ये धक्के खाल्ले, पण माझी मुले कदाचित AC मेट्रोमध्ये फिरतील. मी कधी सुट्टी घेऊन फिरायला गेले नाही, पण पोटाला पीळ देऊन मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कृती दिली. एका सामान्य नागरिकाकडून कुठल्याही देशाला अपेक्षा असावी असे माझे चारित्र्य आहे. मग मला वाटते ती "आशा", एका चांगल्या भवितव्याची आशा. आता मला ही आशा नसेल तर मग काय? मग त्या जगण्याला अर्थच उरत नाही. ती आशा महत्त्वाची आहे कारण त्या आशेने मला प्रोत्साहन मिळते.
इंग्रज गेले म्हणजे "आपले सरकार" येईल आणि ते सर्व समस्यांचे निराकरण करेल अशी भाबडी समजूत या समाजाने ठेवली. पण त्यांना मिळाली ती काँग्रेसी समाजवादी विचारसरणी. यात धर्मांधांना रेवडी मिळाली. जातिगत आरक्षणातून जातीयवाद वाढला. शैक्षणिक धोरणाने दर्जा खालावला आणि चांगल्या शिक्षणासाठी मारामारी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. मी कष्ट करून पदवी मिळवली आणि बँकेत कारकुनाची नोकरी केली. तिथे पाचवी नापास नेत्याने जात आणि गुंडगिरी वापरून सत्ता प्राप्त केली. मी रोज लोकलने जाते, संध्याकाळी घरी येऊन डाळ-भात खाते; आणि तो आज गांधी जयंतीला तसबिरीला हार घालतो आणि संध्याकाळी आलिशान गाडीतून डान्सबारमध्ये कबाब आणि शबाबमध्ये दंग असतो!
या विरोधाभासात सामान्य माणसाने "आशा" कशी ठेवायची? पण हिंदू मध्यमवर्गीयाने ती ठेवली. त्यासाठी संघ आणि संबंधित संघटनांनी थेरपी सेशनप्रमाणे बैठका/शाखा घेतल्या. आपण 'विश्वगुरू' आहोत; आम्ही शून्याचा शोध लावला, त्यामुळे भविष्यात विश्वगुरू होण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही; आमच्याकडे चाणक्याचे अर्थशास्त्र आहे, चरकाची संहिता आहे, विमानाचा शोध आम्हीच लावला होता, गोमूत्राने सर्व रोग बरे होतात इत्यादी इत्यादी 'कूल-एड' पाजून त्यातून आशा निर्माण केली आणि एक असे चित्र उभे केले की भविष्य अत्यंत चांगले असणार आहे. आज मी माझ्या पलंगाजवळ उभी राहून आपल्या लहान मुलांना झोपलेले पाहते. त्या मुलाला किंवा मुलीला जगातील सर्व सुखे मिळोत, मी सर्व काही देऊ शकले नाही पण देशाचे भविष्य चांगले असल्याने त्यांचे आयुष्य चांगले होईल, अशी आशा कुठल्या पालकाला वाटणार नाही?
अनैच्छिक ब्रह्मचारी संघ आणि गोबीसारखे नेते यांनी याच आशेचा धंदा केला. आता मी यांना सुद्धा दोष देत नाही. संघातील ब्रह्मचारी ढोंगी नव्हते, स्वतःचे 'कूल-एड' ते स्वतःच पीत होते. कुठल्याही संस्थेला टीकात्मक वैचारिक अधिष्ठान पाहिजे. आपल्या प्रत्येक गृहीतकाला वारंवार तपासून पाहिले पाहिजे. पण ते इथे होत नाही. इथे मतांतराला स्थान नाही, स्वतंत्र विचाराला स्थान नाही. आहे ती फक्त 'Whataboutry'. वैचारिक अधिष्ठान नसल्याने कुठल्याच विषयावर सखोल चिंतन नाही. आहे ती फक्त घोषणाबाजी, दिखावा आणि प्रत्येकाला राष्ट्रप्रेमाचा दिखाऊ मुलामा. या मुलाम्याच्या मागे असलेले किडलेले वैचारिक लाकूड मग कुणाला दिसत नाही.
मग जेव्हा संकट येते, जेव्हा एखादी भूमिका घेण्याची गरज भासते तेव्हा काय? सखोल चिंतन नसल्याने "प्रथम तत्वे" (First Principles) नाहीत. त्यामुळे त्यावरून तार्किक दृष्ट्या भूमिका घेता येत नाही. भूमिका असली तरी ती घेण्याची क्षमता किंवा हिम्मत नाही. त्यामुळे त्या वेळी जे काही सोपे वाटेल ती भूमिका घ्यायची आणि त्याला वरून राष्ट्रवादाचा नाही तर हिंदुत्वाचा वर्ख चढवायचा. कधी कधी हिंदुत्व सुद्धा मग अस्वस्थ करते, मग त्याचीच व्याख्या बदलायची. हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व. आपल्याच देवी-देवतांचा तिटकारा म्हणून मग नवीन देवी "भारत माता" निर्माण करायची आणि तिचे शक्तीपीठ स्थापन करायचे. जिथे फायदा आहे तिथे सावरकर, नाहीतर आंबेडकर; आणि विदेशात अचानक गांधी आठवतात.
सामान्य मध्यमवर्गीय आणि विशेषतः सवर्ण हिंदू याला बळी पडला. ज्या जातींना आरक्षण आहे त्यांनी किमान स्वतःचा काहीतरी फायदा पाहिला. तुम्ही अत्यंत गरिबीतून आलात आणि तुम्हाला जर आरक्षण मिळाले तर तुमचा संपूर्ण परिवार गरिबीतून वर येतो. राजकीय समर्थनातून काहीतरी फायदा होतो; त्याची नैतिकता हा वेगळा विषय आहे. पण मी सवर्ण असेन तर काय? ठेंगा! माझा कर वाढत जाणार, पण राष्ट्रनिर्माणासाठी हे आवश्यक आहे, किंबहुना माझे कर्तव्य आहे. मी वारंवार KYC साठी रांगेत उभी राहणार, कारण राष्ट्राच्या रक्षणासाठी KYC महत्त्वाचे आहे. मला टँकरने पाणी, बिल्डिंगमध्ये स्वखर्चाने सिक्युरिटी, खाजगी शाळेत मुलांना ऍडमिशन, घामाच्या वासाने भरलेल्या सार्वजनिक बसमधून प्रवास – हे सर्व मी करते कारण मला गोबीजी आणि संघाने एक स्वप्न दाखवले आहे. मी सर्व काही योग्य पद्धतीने केले तर शेवटी किमान माझ्या मुलांना एक चांगले भविष्य मिळेल ही आशा आहे; आणि या आशेची सर्व अंडी मला याच एका बास्केटमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
भले उद्या पूल कोसळून लोक मरोत, विमान पडून मरोत, किंवा कलिगड खाता खाता मृत्यू येवो, किंवा कुणा धेंडाची पोरं दारू पिऊन आपली पोर्शे चार लोकांवर चढवून त्यांना ठार मारोत, कुणा सामान्य मुलीवर बसमध्ये बलात्कार होवो... या सर्व बातम्या मी रोज वाचते आणि फक्त इतकीच प्रार्थना करते की माझा परिवार, माझी मुले कधी अशा संकटात न सापडोत. कारण 'मोदी है तो मुमकिन है', 'अमृत काळ' जवळ आहे.
आता या परिस्थितीत मला कुणी सांगितले की गोबी भ्रष्ट आणि कामचुकार आहेत; माझी शाळा-कॉलेजे आज सुद्धा डावी पुरोगामी मंडळीच नियंत्रित करतात इतकेच नाही तर डाव्या पुरोगामी मंडळींचेच धोरण आणखीन प्रभावीपणे राबवले जात आहे; माझ्या औद्योगिक धोरणात आणि जुन्या समाजवादी धोरणात काहीही फरक नाही; ज्या चुका मागील सरकारने केल्या त्याच गोबी करत आहेत; जो माझा वर्तमान आहे तेच माझ्या मुलांचे भविष्य आहे... पूल मागे पडत होते आणि उद्याही पडतील. मला खस्ता खात दमडी कमवावी लागली, तेच माझ्या नातवंडांचे होणार आहे.
हे सत्य सहन करायला पराकोटीचा संयम पाहिजे आणि वैचारिक प्रामाणिकपणा. तो सगळ्यांकडे असेलच असे नाही. कारण 'पर्याय नाही' हा विचार मनात येतो. लोक कॅन्सरने मेले हे आम्ही दररोज ऐकतो, पण मला कॅन्सर होणार नाही असेच वाटते. ज्या दिवशी पहिला ब्लड रिपोर्ट काही चिन्हे (signs) दाखवतो, तेव्हा सर्वप्रथम माणसाची भावना 'Denial' (नकार) ची असते. असे असूच शकत नाही, हा प्रोपोगंडा आहे, ही फेक न्यूज आहे, हा 'मास्टरस्ट्रोक' आहे फक्त अजून आम्हाला समजत नाहीये. मग हळूहळू 'Denial' ची जागा 'Anger' (राग) घेतो. तुम्हाला गोबी-द्वेष आहे, तुम्ही 'लिब्रान्डू' आहात वगैरे वगैरे. त्यानंतर येते 'Bargaining'. गोबींना पर्याय नाही, जागतिक स्थितीमुळे असे झाले, अमुक माणसाने घात केला नाहीतर गोबींनी करून दाखवले असते, काँग्रेसने ७० वर्षे घाण करून ठेवली होती ती आधी साफ करायला नको का? राजकीय अपरिहार्यता म्हणून गुन्हेगार मंडळींना पार्टीत घेण्याशिवाय पर्याय नाही; दुष्ट लिब्रान्डू दलितांचा बुद्धिभ्रम करतील म्हणून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी UGC आणि SC/ST ऍक्टसारखे कायदे गरजेचे आहेत; गोबीजी यात गंभीर नाहीत इत्यादी इत्यादी.
सध्या विविध लोक विविध टप्प्यांवर आहेत. पुढील टप्पे म्हणजे Guilt, Depression आणि Acceptance काळाच्या ओघात येतीलच. तोपर्यंत ही पिढी मरणपंथाला लागेल. मला या लोकांचा राग आणि तिटकारा अजिबात येत नाही. उलट मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. गोबींवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती का विश्वास ठेवतात ते मला समजते, त्यांचे हृदय सुद्धा चांगले आहे. देश आणि समाजाबद्दल त्यांना प्रेम आहे. बहुतेकांनी आपले आयुष्य सरळ मार्गाने घालवले आहे. आपण सर्व काही योग्य केले असताना त्याचे फळ मिळावे ही रास्त अपेक्षा आहे. पण, Life is unfair.
प्रतिसाद आवडला!
In reply to समस्या ही आहे की काँग्रेसी… by साहना
प्रतिसाद आवडला!
छान
In reply to समस्या ही आहे की काँग्रेसी… by साहना
चांगला प्रतिसाद साहनाजी.
बऱ्याच गोष्टी 'अगदी अगदी' म्हणाव्या अशा.
बऱ्याच पट्टतील अशा
काही हाताश कारणारया.
पण लिहिताय चांगले.....
तुंम्ही कोणत्या समाजगटातून येता त्यावर 'समस्या' काय हे ठरते
In reply to समस्या ही आहे की काँग्रेसी… by साहना
टीप: मला व्यक्तीगत आजपर्यंत कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही परंतु आरक्षणाकडे पाहण्याची दृष्टी जरूर मिळाली आहे. ते सर्वत्र सर्वकाळ असते व राहणार आहे. तुंम्ही वडिलांची संपत्ती घेणे हे पण एक प्रकारचे आरक्षणच आहे (पूर्वी मुलींना संपत्तीत वाटा नव्हता) फक्त ते खटकत नाही इतकेच.
ही तुमची व्यक्तीगत कथा नसावी पण एक भूमिका घेऊन केलेली मांडणी असावी असे वाटते. तथापि त्यात बरीच गृहितके आढळली म्हणून फक्त 'आरक्षण' या एका बाबतीत केलेली खालील विधाने तपासली.
>> मी या देशात एक सवर्ण स्त्री आहे (ज्याला आरक्षण वगैरे नाही पण शिक्षण आहे) आणि हा देश माझा आहे असे मला वाटते. या देशात मला इतरांप्रमाणे समान अधिकार असावेत असे मला वाटते,
>> जातिगत आरक्षणातून जातीयवाद वाढला. शैक्षणिक धोरणाने दर्जा खालावला आणि चांगल्या शिक्षणासाठी मारामारी सुरू झाली.
>> ज्या जातींना आरक्षण आहे त्यांनी किमान स्वतःचा काहीतरी फायदा पाहिला. तुम्ही अत्यंत गरिबीतून आलात आणि तुम्हाला जर आरक्षण मिळाले तर तुमचा संपूर्ण परिवार गरिबीतून वर येतो. राजकीय समर्थनातून काहीतरी फायदा होतो; त्याची नैतिकता हा वेगळा विषय आहे. पण मी सवर्ण असेन तर काय? ठेंगा!
वरील विधानातून सर्वसाधारणपणे 'मला आरक्षण मिळाले नाही, माझ्यावर त्यामुळे फार अन्याय झाला, माझी गरीबी त्यामुळे आहे इ. इ. (व्हिक्टिम कार्ड)' असा दृष्टीकोन दिसून येत आहे. तुंम्हीच असे नाही पण बऱ्याच लोकांना इतरांना आरक्षण मिळाल्यामुळे आपले कधीही भरून न येणारे जन्मभराचे नुकसान झाले असे वाटत राहते. यामुळे हळूच आपल्यावरची जबाबदारी समाज, देश, कायदे यांना यांच्यावर ढकलून स्वत:ला समाधान मानून घेता येते. हे सवर्ण म्हणून जन्मलेल्या लोकांमध्ये सरसकट आढळून येते. आठवा जरांगे आंदोलन. पण वस्तुस्थिती काय सांगते?
- भारत सरकारचा श्रम मंत्रालयाचा रिपोर्ट इथे आहे: https://dge.gov.in/sites/default/files/2025-05/Annual_Report_Periodic_Labour_Force_Survey_23_24_0.pdf परंतु त्यातून माहिती गाळणे अवघड आहे. म्हणून गुगल जेमिनीला विचारल्यावर खालील माहिती मिळाली:
- भारतात एकूण नोकऱ्या ५६ ते ५८ कोटी आहेत.
- देशातील ८० ते ८२ % नोकऱ्या ह्या असंघटीत क्षेत्रात आहेत. गेल्या (शेती, रोजंदारी, स्वयंउद्योग, दुकाने). अंदाजे १५ % नोकऱ्या संघटीत क्षेत्रात (कार्पोरेट, मध्यम व लहान उद्योग, खाजगी शिक्षण संस्था इ.)
- केंद्र सरकारी नोकऱ्यांची संख्या १५.१४ लाख असून ९.६४ लाख जागा रिकाम्या आहेत. राज्य सरकारांची आकडे वारी एकत्रित उपलब्ध नव्हती.
- केंद्र आणि राज्य सरकारे, सरकारी आस्थापने (पीएसयूज) आणि सरकारी अनुदानित संस्था - फक्त याच ठिकाणी आरक्षण लागू आहे.
- त्यामुळे आरक्षणाचे नियम लागू असणाऱ्या नोकऱ्यांचे एकूण नोकऱ्यांतील प्रमाण ३.६८% आहे.
- उरलेल्या ९६.३२% टक्के नोकऱ्यांना कोणतेही आरक्षण लागू नसून त्या सर्वांना उपलब्ध आहेत.
- सरकारी नोकऱ्यांत वरिष्ठ पदांवरील राखीव जागा वर्षानुवर्षे भरल्या जात नाहीत. कॅबिनेट सेक्रेटरी पदावर ९० पैकी फक्त दोन लोक अ.जा व अ. ज. या प्रवर्गातून आलेले आहेत असे वाचनात आले होते.
सहसा वरिष्ठ पदावर कोणता समाजगट विराजमान असतो ते निष्पक्षपातीपणे पाहिले तर सहज दिसून येईल. घर भाड्याने घेताना, बॅंकेत कर्ज मागायला गेल्यावर तुमचे आडनांव कोणते असेल तर भारतात सहज घर मिळते व कोणते असेल तर मिळत नाही, हे स्पष्ट आहे. मुळात स्वत:चे भाड्याने देण्यायोग्य घरे असलेला समाजगट कोणता आहे आणि भाड्याने मागणारा समाजगट कोणता आहे, तेही रोचकच.
असे असताना केवळ आरक्षणामुळे माझ्यावर घोर अन्याय झाला, संधी कमी झाल्या, समाजात जातीयवाद वाढला, शिक्षण खालावले, एकूणच दर्जा खालावला असे मत बाळगणे हे कितपत वस्तुथितीवर आधारित आहे?
मला वाटते, बहुसंख्य लोकांची मते ते ज्या समाजगटात जन्मले तिथून त्यांना जे जग दिसते, त्यानुसारच बनतात. मग आपण आणि ते याची सुरूवात होते. दुसऱ्यांच्या नजरेने वस्तुस्थितीकडे पाहू शकणारे लोक अत्यंत दुर्मिळ आहेत पण तेच काही चांगले घडवू शकतात व संघर्ष कटूता टाळू शकतात.
बऱ्याच लोकांचा एक टोकाचा…
बऱ्याच लोकांचा एक टोकाचा गैरसमज असतो कि तुम्ही भाजपचे समर्थक असलात तर तुम्ही रा स्व संघीच असला पाहिजे किंवा तुम्ही मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायला पाहिजे. आणि तुम्ही बुद्धिवादी असूच शकत नाही.
मी कधी संघाच्या शाखेत गेलो नाही किंवा माझा संघाच्या अनेक धोरणांना विरोध आहे संघ हा बऱयापैकी झापडबंद आहे. असे असले तरी त्यांचे समाजकार्य किंवा हिंदू जागृतीसाठी केलेलं कार्य हे नाकारता येणार नाही. संघाशी निगडित इतर संस्थांनी केलेलं कार्य अनमोल आहे हि वस्तुस्थिती बदलत नाही.
बुद्धिजीवी लोकांच्या दृष्टीने भाजप पाहिजे तेवढे करत नाही आणि कर्मकांड जास्त करतो. दुर्दैवाने बुद्धीजीवी लोकांच्या मतांवर भाजप निवडून येऊ शकत नाही इतके अल्पमतात ते आहेत.
सावरकरांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका झाली तरी काहीही होत नाही.
याउलट डॉ आंबेडकरांवर टीका करून दाखवा. मोर्चे आणि दंगे होतात कि नाही.
महंमद पैगंबरावर टीका करून पहा. जीवच जायची पाळी येईल.
जगभर हेच होत आले आहे. बुद्धिजीवी आणि समंजस लोकांच्या धोरणाने जाणारे सरकार अल्पायुषीच असते असे दिसते.
तेंव्हा मतांचे राजकारण करणे हे अत्यावश्यक आहे. मग त्यासाठी शोबाजी करणे आवश्यक ठरते. आंध्रप्रदेश तामिळनाडू कर्नाटक सारख्या राज्यात केवळ प्रख्यात नट आहे एवढ्या भांड वलावर माणूस मुख्यमंत्री होतो किंवा तरुण त्यांच्या निधनाने आत्महत्या करतात.
उत्तर प्रदेशात बिहार मध्ये न जाता महाराष्ट्रात बसून बुद्धिप्रामाण्यवाद दाखवून निवडणूका जिंकणे अशक्य आहे. हिंदी पट्ट्यात लोकांच्या भावनेला हात घातल्याशिवाय मते मिळणार नाहीत हे समजले म्हणून श्री मोदी याना असे स्टण्ट करायला लागतात.
मुसलमान एक गठ्ठा मतदान करतात आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही हे बंगालच्या भद्रलोक (लब्धप्रतिष्ठित बुद्धिवादी बंगाली उच्चवर्णीय लोक) याना आता समजले. भाजपने एकही मुसलमान उमेदवार दिला नव्हता त्यामुळे त्यांचे १०० % आमदार हिंदू आहेत. यातले अर्धे तरी मूळ तृणमूलचे टोपी फिरवून भाजप मधेय आलेले आहेत. पण १४८ आकडा पार करण्यासाठी असे गणंग घेणे हि राजकीय अपरिहार्यता आहे
उत्तर प्रदेशात मोदी योगींना हे अगोदर समजले यामुळे तेथे भाजप मते मिळवू शकला.
मुसलमानांसारखे मागासवर्गिय सुद्धा एकगठ्ठा मतदान करतात हे उमजल्यामुळे जातपात न मानणाऱ्या संघाच्या लोकांना भाजप मध्ये आल्यावर हिंदू जातीपातीची समीकरणे आवश्यक ठरतात.
प्रामाणिक माणसांचा समूह फार पटकन जमत नाही पण भ्रष्ट लोकांचा जमतो या न्यायाने तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्ट नसलेलेसरकार चालवायचे असेल तर दुप्पट नव्हे तर तिप्पट कष्ट करायला हवेत आणि जातीपातीचे राजकारण आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण केल्याशिवाय पर्याय नाही.
काँग्रेसचा राष्ट्रवादीचा मूळ विचारच "खा आणि खाऊ द्या" हा होता.शिवाय लांगुलचालन केल्यामुळे मुसलमानांची एकगठ्ठा मते त्यांना मिळत असत. त्यामुळे ३५ -४० % आमदार/ खासदार निवडून आले तरी त्यांचे सरकार व्यवस्थित चालत असे.
तीन तलाक रद्द करा वक्फ बोर्डातील भ्रष्टाचार रद्द करा किना समान नागरी कायदा आणून मुस्लिम स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून दिले तरी मुस्लिम लोक भाजपला मतदान करतच नाहीत हे सिद्ध झाल्यामुळे आता भाजपाला हिंदू मतांचे ध्रुवीकरण करणे आवश्यक झाले आहे.
सवंग लोकप्रयतेच्या योजनांना केजरीवाल सारख्या हलकट माणसाने प्रतिष्ठा मिळवून दिली आणि असे मिळणे हा आमचा हक्कच आहे हा अत्यंत चुकीचा विचार जनतेत रुजवला. त्यांचे समर्थन येथे अनेक तथाकथित हुच्च मिपाकरही करत असत.
अशा अनेक बाबी आहेत. मोदी समर्थकांना त्यांच्या अनेक गोष्टी पटत नाहीत म्हणून ते सार्वजनिक न्यासावर मांडलेच पाहिजे असे आहे का?
मुळात मोरू लोक येथे नसलेल्या गोष्टींवरून शिमगा करत असतात उगाच आगीत तेल ओतायचं कशाला इतका साधा विचार असतो.
मुळात एकदा तुमच्यावर भक्त हे लेबल त्यांनी लावलं कि काहीही लिहिला तरी ते मोदी भक्तीतूनच आलंय याच विचाराने ते प्रतिसाद देतात मग संवादच खुंटतो.
बुद्धिप्रामाण्यवादी लोकांच्या मतावर श्री मोदी निवडून येत नसल्यामुळे ते तुम्हाला भीक घालत नाहीत हे खरे तुमचे दुखणे आहे.
लाडकी बहीण सारख्या योजनेतून खिरापत वाटणे हे मला कितीही पटत नसले ( आणि ते त्या राजकारण्यांना स्वतः सुद्धा पटत नसले तरी) तरी मला कोणी विचारत नाही हे माझे खरे दुखणे आहे
मग अशा सार्वजनिक न्यासावर आपले रडगाणे गाव आम्ही आमचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करतो.
चालायचंच
खरे
In reply to बऱ्याच लोकांचा एक टोकाचा… by सुबोध खरे
खरे डोॉक्टर खरे बोलले..
.
परीस्थिती डोके शाभूत असणाऱ्या लोकांना अनुकूल नाही.