Skip to main content

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/03/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌ आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

वाचने 9724
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

कशाला उगाच मेगाबायटी प्रतिसाद दळून आपलंच खरं करायला जाताय? त्यात काहीही दम नाही बुंद से गयी वो हौद से नही आती! मी उगाच प्रतिवाद करायला जात नाही फुकटचा कालापव्यय!

हॉरमुझ स्ट्रेट मधून ज्या देशांच्या जहाजांना इराण ने जाण्याची परवानगी दिली ती नावे खालील प्रमाणे- 1) रशिया 2) चीन 3) बांगलादेश भारताच्या जहाजांना बिलकुल परवानगी नाही. याआधी असं कधी घडलं नव्हतं. इस्त्राईल अमेरिकाच्या मैत्रीचे हे पडसाद उमटणारच आहेत. धन्यवाद...!
पंडित नेहरू के टाइम भी नालियाँ और गटर थे, पर उन्होंने कभी नहीं कहा कि इसकी गैस निकाल कर चाय बनाओ - संजय राउत
हे राम... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बातम्यात तर आलय की भारतीय जहाजांना इराण ने जाण्याची परवानगी दिली म्हणून.

In reply to by रात्रीचे चांदणे

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीची कृपा. काल सत्ताधारी पक्षाने संसदेत उगाच पंडित जवाहरलाल नेहरूंची स्तुती केली का?आंतरराष्ट्रीय जगात नेहरू अजून जिवंत आहेत. नेहरू नामही काफी है l

In reply to by आग्या१९९०

मोदी पंतप्रधान बनले नसते तर मला नेहरूंचे महत्व कधी कळले नसते! कुठे इंद्राचा ऐरावत…..

In reply to by आग्या१९९०

पण सोनिया गांधी यांनी तर आर्टिकल लिहून खेमेनीच्या हत्तेचा निषेध न केल्या बद्दल भारत सरकारला धारेवर घरल होत.

In reply to by सुबोध खरे

बातम्या काहीही देत असु शकतात. सरकारी माध्यमे कोण चालवते ते सगळ्यांनाच माहीती आहे. Since March 2, 2026 · 10 days ago The Strait of Hormuz is effectively closed to most commercial shipping following US-Israeli strikes on Iran on February 28, 2026. Iran's IRGC officially confirmed closure on March 2 and threatened to attack vessels attempting passage. Traffic has dropped to near zero (from ~150 vessels/day to ~13/day). However, on March 5, Iran announced it would permit non-Western vessels to transit. आजच्या घडीला त्या सामुद्रधुनीतून केवळ दोन जहाजे जात आहेत. कुठे भारतीय जहाजांची उदबत्ती उजळवायची यात?

भविष्यात , रस अल खेमा ते डिब्ब्बा अल फुजेरा असा जलमार्ग ( कॅनाल ) निर्माण केला तर होर्मुझ पूर्ण बायपास करता येईल. यु ए ई आणि ओमान याना नवा उत्पन्नाचा स्त्रोत मिळेल

In reply to by विजुभाऊ

काहीही फरक पडणार नाही. ब्लॅकमेल करणाऱ्यांना देशांच्या यादीत भर पडेल इराण अधिक उग्रपणे त्या देशांना सतावेल. लांबून सगळे सोपे वाटते.

परराष्ट्रमंत्री जयशंकर व इराणचे परराष्ट्रमंत्री यांच्यात बोलणी झाल्यानंतर इराणने भारतीय इंधन जहाजांना हार्मूज सामुद्रधुनीतून सुखरूप जाऊन द्यायचे मान्य केले आहे. भारताने या युद्धात तटस्थ राहून समतोल भूमिका घेतली आहे व कदाचित त्यामुळेच इंधन भरलेल्या भारतीय जहाजांना इराण अडविण्यात नाही. दुसरीकडे ट्रंप यांनी आपल्या नेहमीच्या फाक्या मारण्याच्या व्यसनाला अनुसरून "आम्ही युद्ध जिंकले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या तासातच आम्ही विजयी झालो होतो." असे हास्यास्पद दावे केले आहेत. या माणसाने सातत्याने इतरांच्या नावाने वाटेल ते दावे करून स्वतःला हास्यास्पद केले आहे. कोणीही याला गांभीर्याने घेत नाही. इराण युद्धात आता इस्राएल व अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र आहे. हे युद्ध आता त्यांच्या गळ्यात अडकलेले हाड झाल्याचे दिसत आहे. इस्राएल व अमेरिकेला या युद्धातून मानहानीकारक माघार घ्यावी लागावी अशी इच्छा आहे. अर्थात मला इराणविषयी कणभरही प्रेम नाही. आली खामेनी अत्यंत धर्मांध, लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवर अत्याचार करणारा नीच थेरडा होता. तो मेला याचा आनंदच आहे. परंतु इस्राएल व अमेरिकने आपल्या अहंकारातून सर्व जग वेठीस धरून जे हत्याकांड, विध्वंस चालविला आहे तो मला अजिबात मान्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आली खामेनी अत्यंत धर्मांध, लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवर अत्याचार करणारा नीच थेरडा होता. तो मेला याचा आनंदच आहे. परंतु इस्राएल व अमेरिकने आपल्या अहंकारातून सर्व जग वेठीस धरून जे हत्याकांड, विध्वंस चालविला आहे तो मला अजिबात मान्य नाही.
+१००००

In reply to by श्रीगुरुजी

कोणीही याला गांभीर्याने घेत नाही. नाही कसं? आपल्याकडील एक अवतार ट्रम्प निवडून यावा म्हणून प्रचार करायला गेला होता तो उगाच का ?

In reply to by श्रीगुरुजी

खामेनी अत्यंत धर्मांध, लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवर अत्याचार करणारा नीच थेरडा होता. तो मेला याचा आनंदच आहे. परंतु इस्राएल व अमेरिकने आपल्या अहंकारातून सर्व जग वेठीस धरून जे हत्याकांड, विध्वंस चालविला आहे तो मला अजिबात मान्य नाही.
पूर्णतः सहमत.

In reply to by श्रीगुरुजी

परराष्ट्रमंत्री जयशंकर व इराणचे परराष्ट्रमंत्री यांच्यात बोलणी झाल्यानंतर इराणने भारतीय इंधन जहाजांना हार्मूज सामुद्रधुनीतून सुखरूप जाऊन द्यायचे मान्य केले आहे. भारताने या युद्धात तटस्थ राहून समतोल भूमिका घेतली आहे व कदाचित त्यामुळेच इंधन भरलेल्या भारतीय जहाजांना इराण अडविण्यात नाही.
किती तो अंधविश्वास! Since March 2, 2026 · 10 days ago The Strait of Hormuz is effectively closed to most commercial shipping following US-Israeli strikes on Iran on February 28, 2026. Iran's IRGC officially confirmed closure on March 2 and threatened to attack vessels attempting passage. Traffic has dropped to near zero (from ~150 vessels/day to ~13/day). However, on March 5, Iran announced it would permit non-Western vessels to transit. आजच्या घडीला त्या सामुद्रधुनीतून केवळ दोन जहाजे जात आहेत. कुठे भारतीय जहाजांची उदबत्ती उजळवायची यात?

In reply to by श्रीगुरुजी

इस्राएल व अमेरिकेला या युद्धातून मानहानीकारक माघार घ्यावी लागावी अशी इच्छा आहे. अर्थात मला इराणविषयी कणभरही प्रेम नाही. आली खामेनी अत्यंत धर्मांध, लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवर अत्याचार करणारा नीच थेरडा होता. तो मेला याचा आनंदच आहे. परंतु इस्राएल व अमेरिकने आपल्या अहंकारातून सर्व जग वेठीस धरून जे हत्याकांड, विध्वंस चालविला आहे तो मला अजिबात मान्य नाही. बाडीस दोन हत्तीच्या साठमारीत आपण कशाला आपल्याला जखमा करून घ्यायच्या. आपण आपल्या जनतेसाठी जे उत्तम आहे तेवढं पाहावं

In reply to by सुबोध खरे

>>>> दोन हत्तीच्या साठमारीत आपण कशाला आपल्याला जखमा करून घ्यायच्या..... अगदी खरं आहे. ​२०१९ आणि २०२० दोन्ही देशांतील भव्य सभांमध्ये मैत्री व्हावी, आपला दोस्त म्हणून " माय फ्रान्ड ट्रम्प हा भारताचा मित्र" असा सातत्याने उल्लेख करीत लोंडा घोळणे. नोव्हेंबर २०२४: माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक निवडणूक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आपली मैत्री यंव आणि आपली मैत्री त्यंव. फेब्रुवारी २०२५, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. नाद खुळा.. ऑक्टोबर २०२५, मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बदल्यात काय ? भरमसाठ कराचा बोजा. अतिशय हीन दर्जाची वागणूक. आपल्या पन्नास वर्षाच्या आंतरराष्ट्रीय राजकीय मुत्सद्देगिरीची वाताहात झाली. पण या सगळ्याचा आजवरचा परिणाम पाहता, हा सर्व प्रकार म्हणजे केवळ उंटाच्या ढुंगनाचा मुका घेण्याचाच प्रयत्न होता असे वाटत नाही का ? -दिलीप बिरुटे

ह्या सगळ्यात तात्यांची काहीही चूक नाही, तात्याना व्विलीच नोबेल दिला असता तर ही वेळच आली नसती, तात्यांनी संतापून मग हल्ला केला! विलन्स नॉट बोर्न, दे मेड! तस काहीतरी. तात्यानी तर उलट कितीतरी युद्ध थांबवले, रश्या -युक्रेन, भारत पाक, वरचा कोऱ्या खालचा कोऱ्या. तात्याना बदनाम करणाऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. मी प्रचंड आशावादी, मी तात्यवादी! :- अमरेंद्र बाहुबली. (तात्यावादी)

आपल्याकडील एक अवतार ट्रम्प निवडून यावा म्हणून प्रचार करायला गेला होता
हो ->
तात्यानी तर उलट कितीतरी युद्ध थांबवले, रश्या -युक्रेन, भारत पाक, वरचा कोऱ्या खालचा कोऱ्या. तात्याना बदनाम करणाऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. मी प्रचंड आशावादी, मी तात्यवादी!
lol

बाकी, अंधभक्तांच्या पॉ पॉ ने रशिया-युक्रेन युद्ध थांबवले होते म्हणे, माग आता काय झोपा काढतो आहे का? पॉ पॉ?

मिपावर (खरंतर इतरत्रही) अत्यंत अनाश्चर्यकारक बाब म्हणजे व्हेनेझुएलाच्या प्रमुखाला उचलल्यावर काही विशिष्ट लोकांनी काही आदळआपट केली नाही, इराणच्या प्रमुखाला मारल्यावर मात्र सतत रुदन सुरु आहे.

In reply to by कांदा लिंबू

खामेनी अत्याचारी होता त्याला मारले म्हणून आनंद झाला हे ठीक आहे, परंतु मणिपूरमध्ये डबल इंजिन सरकार होते तेव्हा तेथील ' कारभाऱ्याला ' असे कोणी बाहेरच्याने येऊन मारले असते तर चालले असते का? बाहेरच्याच काय देशातील कोणीही कायदा हातात घेऊन मारले असते तरी चुकीचे होते.

बाकी काही असो पण श्रीगुरूजींना परत लिहिते केल्याबद्दल श्री.रा.रा. डॉनल्डरावजी ट्रम्पसाहेब आणि श्री.रा.रा.बिन्यामिनजी नेतान्याहूसाहेब यांचे आभार.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

१५ लाख देणार या असत्य आरोपाप्रमाणेच मोदींनी ट्रंपचा प्रचार केला हा अजून एक असत्य आरोप. म्हणून लिहिले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाषणात मोदी म्हणाले “अमेरिकेतही निवडणुकीचे वातावरण आहे… भारतात एक घोषणा खूप प्रसिद्ध झाली होती – ‘अबकी बार मोदी सरकार’. आता अमेरिकेत लोक म्हणत आहेत – ‘अबकी बार ट्रंप सरकार.’” हे म्हणताना त्यांनी थोडे हसत आणि प्रेक्षकांकडे पाहत हा ट्विस्ट केला. त्यावर प्रेक्षकांनी टाळ्या आणि घोषणा दिल्या. मोदींनी हे अधिकृत निवडणूक समर्थन म्हणून नाही, तर लोकप्रिय घोषणेवर केलेला विनोदी संदर्भ म्हणून सांगितले असे आपले परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत आणि अर्थात तसेच श्रीगुरुजींचे म्हणणे असावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मागच्या वेळेस मी लिहिते केले होते ह्या वेळेस सरळ तात्याना मन वळवावे लागले. :)

In reply to by कॉमी

आज दोन जहांज भारतात दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत. येत्या आठवड्यात अजून जहाज दाखल झाली तर बातमी खरी म्हणता येईल.

In reply to by कांदा लिंबू

काय खरं काय खोटं? परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्या-येण्यास परवानगी मिळाल्याच्या वृत्तावर चर्चा करणे अपरिपक्वपणाचे आहे! "परराष्ट्र मंत्री आणि इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्यात गेल्या काही दिवसांत तीन वेळा चर्चा झाली आहे. शेवटच्या चर्चेत जहाजांच्या सुरक्षिततेशी आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यापलीकडे, काहीही बोलणे अपरिपक्वपणाचे आहे" असे मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. Reports of Iran allowing Indian ships through Strait of Hormuz ‘premature’: Centre त्याच बातमीतुन - २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत किमान चार भारतीय खलाशी हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. पहिला हल्ला एमटी स्काय लाईट जहाजावर झाला. त्यानंतर ओमानच्या किनाऱ्यावरील एमटी व्योम वर आणि एलसीटी अलीह वर हल्ला झाला. त्याशिवाय, इतर जहाजांवरील अनेक हल्ल्यांमध्ये किमान २० इतर भारतीय खलाशी जखमी झाले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

UBSC ने शेजारील राष्ट्रांवर इराणला हल्ल्यास मज्जाव करणाऱ्या ठरावाला भारताने पाठिंबा देऊन माती खाल्ली. चीनआणि रशिया तटस्थ राहिले भारतानेही तटस्थ राहायला हवे होते.

आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मी मोदी भक्तांच्या कळपात नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो आहे हे दाखवण्याची सध्या फॅशन आहे. त्यामुळे परत परत तोंड आपटलं तरी काही तरी नवीन खुसपट काढून श्री मोदींना शिव्या देण्यात काही लोक धन्यता मानतात. उदाहरणार्थ- अमेरिकेने आय आर आय एस देना हे जहाज अरबी समुद्रात बुडवले त्यावेळेस मोदी काय करत होते म्हणून दोन दिवस शंख करून झाला. मोदींनी अमेरिकेपुढे लोटांगण घातले इ इ मग बातमी बाहेर आली कि एक इराणी जहाज कोची बंदरात सुरक्षित आहे. नंतर अधिकृत बातमी आली कि तीन इराणी जहाजे भारतीय बंदरात सुरक्षित आहेत. https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/shipping-/… आता हेच फुरोगामी त्याबद्दल काही ना बोलता नवीन काही तरी काढायचा प्रयत्न करत आहेत. मग मोरारजी देसाईंनी काहूता बद्दल माती खाल्ली, त्यात अटळ बिहारी आणि लालकृष्ण अडवाणी याना गोवायचा प्रयत्न झाला. त्यात परत तोंड आपटलं कारण रॉ संघटना थेट पंतप्रधानांनाच रिपोर्ट करते हे पुढे आलं. "मग भारताच्या जहाजांना बिलकुल परवानगी नाही. याआधी असं कधी घडलं नव्हतं. इस्त्राईल अमेरिकाच्या मैत्रीचे हे पडसाद उमटणारच आहेत" म्हणून रडारड करून झाली. आता दोन जहाजानी होर्मूझ पार करून भारतापर्यंत मजल मारली म्हटल्यावर दोनच जहाजं म्हणून रडारड चालू झाली. आता इराण ने भारतीय जहाजांना परवानगी दिल्यावर तिसरं च काही तरी काढायचं https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/india-gets-safe-passage-amid-attack-on-tankers-iran-allows-ships-through-strait-of-hormuz-after-jaishankar-speaks-to-counterpart/articleshow/129494866.cms चालायचंच. काही जणांचा मोदी बद्धकोष्ठ हा रोग फार जुना आणि हट्टी आहे. काहींचा २००१ पासूनचा तर काहींचा २०१४ ला चालू झालेला आहे. तो काही बरा होण्यातला नाही

In reply to by सुबोध खरे

मोदीनी म्हणे परदेशात अडकलेल्यांना काडीची मदत केली नाही म्हणे. (कधीतरी) त्यावरपण बोला!

In reply to by सुबोध खरे

तुम्ही मला सिरियस घ्या नाहीतर नका घेऊ, त्याच्याने पृथ्वीच्या गतीवर, मिपाच्या पानावर नी अमेरिका इराण युद्धावर काहीही परिणाम होणार नाहीये. म्हणणे हेच आहे की मोदींची स्तुतीसुमने नी जरा टीका झाल्यावर लागेच मोदी कसे ग्रेट नी काँग्रेस वगैरे कशी वाईट सांगायला येतात तसे ह्या परदेशात अडकलेल्या लोकांना मदत न करण्यामागे कोणता मास्टरस्ट्रोक होता ते तरी कळूदेत! :)

In reply to by सुबोध खरे

काहीही म्हणा अबांना बहुतेक गोष्टींविषयी फारशी माहिती नसली तरी ते इनोसंट आहेत दुष्टबुद्धी नाहीत असे माझे तरी मत झाले आहे. आणि हो... ते पवनचक्क्यांसंबंधी काम करतात त्याचा भरपूर उपयोग आहे. उगीच कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे निरूपयोगी आणि नॉन प्रॉडक्टिव्ह विषयांवर पाट्या टाकत नाहीत :)

In reply to by सुबोध खरे

उदाहरणार्थ- अमेरिकेने आय आर आय एस देना हे जहाज अरबी समुद्रात बुडवले त्यावेळेस मोदी काय करत होते म्हणून दोन दिवस शंख करून झाला. मोदींनी अमेरिकेपुढे लोटांगण घातले इ इ मग बातमी बाहेर आली कि एक इराणी जहाज कोची बंदरात सुरक्षित आहे. नंतर अधिकृत बातमी आली कि तीन इराणी जहाजे भारतीय बंदरात सुरक्षित आहेत.
. तुमचा प्रतिसाद आणि दिलेली न्युजची लिंक नुसार " इराणने ३ जहाजे डॉक करण्यासाठी भारताची परमीशन मागितली आणि ती भारताने दिली आणि आत्ता ती तीन जहाजे भारतीय बंदरात सुरक्षित आहेत " असाच ना? . मूळ मिलन २०२६ ह्या भारत आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सरावासाठी तीन इराणच्या नौका आल्या होत्या. २५ फेब्रुअरी च्या आसपास त्या विशाखापट्टणहून परत निघाल्या. २८ फेब्रुअरीला इराण सरकारने जहाजे डॉक करण्यासाठी रिक्वेस्ट केली. तरीही १ मार्च ला लावान हे जहाज तांत्रिक कारण व इंजिन समस्येमुळे कोची बंदरात भारताची परमिशन घेऊन थांबले, त्यातील १८३ नौसैनिक जण भारताच्या आश्रयात आहे. तरीही बुशेर आणि देना ही जहाजे पुढेच गेली. ४ मार्चला देनाला अमेरिकेने श्रीलंकन हद्दीत बुडवले, ८७ नौसैनिक मेले, काही नौसैनिकांना श्रीलंकेने वाचवले दुसरे जहाज बुशेर ने श्रीलंकेकडे तांत्रिक समस्येमुळे आश्रय मागितला ते सध्या त्रिंकोमाली येथे श्रीलंकेत श्रीलंकन नियंन्त्रणाखाली आहे. त्यावरचेही २०८ जण श्रीलंकेतच आहेत. . विद्वत्ता दाखवण्यासाठी कोणी काहीही करोत पण आपण नौदलांसंबधी विद्वान आहात आणि वेळोवेळी त्यासंदर्भात आपण लिखाण केलेले आहे म्हणून विचारतो. नवीन काही काढणे नाही पण हे तरी बरोबर आहे ना?

२०१४ - मोदींनी निवडणूक प्रचारात "अबकी बार मोदी सरकार" अशी एक घोषणा लोकप्रिय केली होती. त्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. २०१६ - अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंपने भारतीय मते आकर्षित करण्यासाठी "अबकी बार ट्रंप सरकार" असे एका जाहिरातीत म्हटले होते. याची चित्रफीत उपलब्ध आहे. सप्टेंबर २०१९ - संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील वार्षिक अधिवेशनानंतर टेक्ससस्थित भारतीय वंशाच्या लोकांनी "हौडी मोदी" शीर्षक दिलेला, भारतीयांचा एक मेळावा आयोजित केला होता ज्यात मोदी व ट्रंप हे दोघेही निमंत्रित होते. जमलेल्या भारतीयांना उद्देशून आपल्या भाषणात मोदींनी ट्रंप यांचा गौरव करताना खालील वाक्ये उच्चारली होती. (या संपूर्ण भाषणाची चित्रफीत उपलब्ध आहे) Mr Modi made the comments as he appeared onstage alongside the US president during a rally in Houston on Sunday, which was attended by more than 50,000 members of the Indian diaspora. Mr Modi said he admired his counterpart’s “sense of leadership, passion for America, concern for every American and strong resolve to make America great again”. “He has already made the American economy strong again,” Mr Modi said. “He has achieved much for the US and the world. Friends, we in India have connected well with President Trump.” With a smile, he added: “In the words of candidate Trump: Abki baar Trump sarkar (This time, Trump government).” The line was a reference to Mr Modi’s own catchy slogan Abki baar Modi sarkar, which helped propel him to power in 2014 and has been described as “one of the most popular election catchphrases ever in the history of Indian elections”. It also harked back to a TV advert released by the Trump campaign in 2016 that appealed to the Indian American community for their votes, when Mr Trump himself first adopted Mr Modi’s catchphrase. नोव्हेंबर २०२० - अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक झाली. मोदींची सभा सप्टेंबर २०१९ मधील आहे व पुढील निवडणूक नोव्हेंबर २०२० मध्ये म्हणजे १४ महिन्यांनंतर होती. अमेरिकेत १४ महिने आधी प्रचार नसतो. अमेरिकेत अश्या मोठमोठ्या प्रचारसभा नसतात. बहुसंख्य प्रचार दूरचित्रवाणीवरील जाहिराती, समाजमाध्यमे, प्रचारनिधीसाठी उमेदवाराने ५०-१०० नागरिकांसमवेत भोजन करणे (जे सशुल्क असते) असा असतो. तेव्हा बोलताना मोदींनी २०१६ निवडणुकीचा संदर्भ देताना म्हटलं होते की "तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की आता ट्रम्प सरकार". एवढेच वाक्य होते व ट्रम्प २०१६ मध्ये जे म्हणाले होते केवळ तेच मोदींनी निवडणुकीच्या आधी १४ महिने आधी संदर्भ म्हणून सांगितले. ना हे वाक्य मोदींचे होते ना ही प्रचारसभा होती ना हा ट्रंपचा प्रचार होता. मोदींनी १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते, मोदींनी प्रियंका वड्रा आपल्यासाठी मुलीसमान आहे असे म्हटले, मोदींनी मुस्लिमांना कुत्र्याची उपमा दिली अशी अनेक असत्य वाक्ये पसरविण्यात आली होती. मोदींनी ट्रंपचा प्रचार केला हे असत्यही असेच पसरविण्यात आले होते. या वाक्यात अमेरिकन व जागतिक माध्यमांना काहीही प्राचारिक किंवा वावगे दिसले नाही, ना त्यांनी या वाक्याची दखल घेतली ना मोदींवर आरोप केले. परंतु मोदीद्वेष्ट्या भारतीय खोडसाळ माध्यमांनी मात्र मोदींनी ट्रंपचा प्रचार केला अशी खोडसाळ अफवा पसरविली.

आपले अवतार कुठेही असले तरी २४×७ निवडणूक मोडमध्ये असतात हे त्यांचे भक्तही कबूल करतात, त्यामुळे त्यांनी असा प्रचार केला नाही असे होऊच नाही. कोण काय म्हटलं हे बोलायची गरज काय होती? कुठे गप्प बसत आणि कुठे तोंड उघडायचे ह्याची जाणीव नसली की असे आरोप होणारच. आता कितीही सारवासारव केली तरी काही फायदा नाही. :)

मोदी ते वाक्य कोट करीत असले तरी तो एकंदरीत कार्यक्रम आणि मोदींचा एकंदरीत आविर्भाव ट्रम्पचा प्रचार करण्याचाच होता. https://youtu.be/ONlMkenN7io?si=ivJKHNDsDEQWjmJk वाक्य कोट केलं, टाळ्यांचा कडकडाट, सूचक हास्य. मला तर हे प्रचारात्मक वाटले. जर असा गैरसमज टाळायचा असता तर सूज्ञ माणूस असे काही कोट किंवा आदरवाईज बोललाच नसता.

In reply to by कॉमी

त्यांचं तसंच असतां! मान्यच करायचं नसतं त्याना, मोदी पवाराना गुरु मानून“पवारांचे बोट धरून राजकारणात आलो” वगैरे बोलले तरीही ते मान्यच करणार नाहीत लोडी असे बोलले. मोदी अबकी बार ट्रम्प सरकार असे बोलून आले तरीही ते मान्य करत नाहीत, स्वतःलाच खोटा दिलास देतात की काय काय माहीत! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदी पवाराना गुरु मानून“पवारांचे बोट धरून राजकारणात आलो” वगैरे बोलले तरीही ते मान्यच करणार नाहीत लोडी असे बोलले.
कोणते न-गुरु? ते लज्जारक्षणासाठी शेवटी शेवटी पेशव्यांकडून वस्त्रे घेण्याची पाळी आलेले? की महाराजांना जाणता राजा म्हणण्यास विरोध करणारे? की न झालेला तेरावा बॉम्बस्फोट करणारे?

In reply to by कॉमी

कशातूंनही आपल्याला हवा तो सोयिस्कर अर्थ काढता येतो. मुळात हा प्रचार, प्रचार असे केवळ भारतातीलच मोदीद्वेष्टे गटाणा करीत बसले. जेथे निवडणूक १४ महिने लांब होती, तेथे कसला प्रचार आणि कसली प्रचारसभा. अमेरिकन माध्यमे, विरोधातील डेमोक्रॅटिक पक्ष किंवा इतर देशातील कोणत्याही माध्यमांना त्यात काहीही वावगे दिसले नाही. अन्यथा राजनैतिक शिष्टाचारभंग असा आरडाओरडा जगभर झाला असता.

गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या अवताराला कोणीच सिरियस घेत नाही. तेथील मिडिया तर भयानक चेष्टा करते त्यांची. ताजी चेष्टा माहितच असेल. इतके करूनही कळत नसेल तर कठीण आहे.

गॅस तूटवड्यावर त्या टाळ्या, थाळ्या, दिवाबत्ती कधी पासून सुरु करायचं ? भाईयो और बहनो... =)) -दिलीप बिरुटे

@श्रीगुरुजी तुम्ही कितीही पुरावे दाखवा ते काही मान्य करणार नाहीत. काही जणांचा मोदी बद्धकोष्ठ हा रोग फार जुना आणि हट्टी आहे. काहींचा २००१ पासूनचा तर काहींचा २०१४ ला चालू झालेला आहे. तो काही बरा होण्यातला नाही. आपण पैज लावलेले घोडे (पप्पू, युगपुरुष इ) एकतर खेचरं निघाली किंवा गाढवं हे काय ते मान्य करणार आहेत का? मग आपलं गाढव धावत नाही तर दुसऱ्याच्या घोड्याला नांवे ठेवायची हा मनुष्य स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही

In reply to by सुबोध खरे

+ १ अज्ञान + पक्षपात + द्वेष + क्रोध + वैफल्य = येथील काही प्रतिसाद.

In reply to by सुबोध खरे

आपण पैज लावलेले घोडे (पप्पू, युगपुरुष इ) एकतर खेचरं निघाली किंवा गाढवं हे काय ते मान्य करणार आहेत का? मग आपलं गाढव धावत नाही तर दुसऱ्याच्या घोड्याला नांवे ठेवायची हा मनुष्य स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही
हा मोगुंचा* नेहमीचाच भ्याड युक्तिवाद असतो. संघ-भाजप-मोदींकडून जनतेला असलेल्या अपेक्षा व त्यांनी दिलेली व्यक्त-अव्यक्त आश्वासने पूर्ण नाही झाली किंवा मोदींनी अगदीच उरफाटे वर्तन केले (SC ST कायदा, UGC नियम, डीएनए एकच आहे, दर्ग्यावर चढवल्या जाणाऱ्या चादरी अशी असंख्य उदाहरणे आहेत) व सामान्य जनतेतील कणी त्याविरुद्ध आवाज उठवू लागला की लगेच सामान्य जनतेला हे मोगु लोक्स मोरु** असल्याचे लेबल लावतात. अर्थात त्या मोगुंना वस्तुस्थितीची जाणीव नसते असे नाही; पण त्या बिचाऱ्यांची स्थिती अगदी केविलवाणी असते. त्यांनाही माहीत असते की भाजप-संघ हे काँग्रेससारखेच हिंदुद्वेष्टे व मुस्लिमप्रेमी आहेत; पण उघड बोलायची चोरी असते. त्यांचेही काही ना काही हितसंबंध असतातच, नाही का? म्हणून मग सामान्य जनतेतील कुणी मोदींच्या चुका दाखवायला लागला तर त्या चुका झाल्याचं मान्य करण्याऐवजी लगेच त्या लोकांना मोरु म्हणणे, तुमचे नेते गाढव / खेचर आहेत असे म्हणणे, हे प्रकार होतात. अरे मोग्यांनो, आम्ही तुमच्या पप्पूने समर्थक आहोत असे अपरोक्षपणेही दर्शविणारा एकतरी प्रतिसाद वा लेख अख्या मिपावर दाखवून द्याल का? --- *मोगु == मोदींचे गुलाम **मोरु == मोदींचे रुग्ण

In reply to by कांदा लिंबू

भाजप-संघ हे काँग्रेससारखेच हिंदुद्वेष्टे व मुस्लिमप्रेमी आहेत; या शोधाला २०२६ चे नोबेल द्यायला हरकत नाही. तेही ठीक आहे पण भारतभर कुठेच मुसलमान भाजप ला मत देत नाहीत असं कसं काय बुवा?

In reply to by सुबोध खरे

भाजप-संघ हे काँग्रेससारखेच हिंदुद्वेष्टे व मुस्लिमप्रेमी आहेत; या शोधाला २०२६ चे नोबेल द्यायला हरकत नाही.
धन्यवाद, तुम्हाला माझं मत पटलं याबद्दल धन्यवाद.
पण भारतभर कुठेच मुसलमान भाजप ला मत देत नाहीत असं कसं काय बुवा?
तेच तर ना, स्वतःच्या हक्काच्या मतदारांशी विश्वासघात करायचा आणि जे कधीही मत देत नाहीत तसल्या उंटांच्या शिंगाचा मुका घ्यायला जायचं, वरून डीएनए एकच आहे असं म्हणायचं, असलं उर्फाटं काम संघ-भाजपचं!

युजिसीने नक्की कुठले बटण दाबले काही कट्टर लोकांच्या मेंदूतले की ओवरनाईट कट्टर मोदी समर्थक ते संघ - मोदी द्वेष्टे असे मतपरिवर्तन झाले ??? Lol.

In reply to by कॉमी

तुझी यत्ता कंची ? (कॉमी, तुम्हाला अरेतुरे बोलण्याचा उद्देश नाही, या चर्चेत हे मराठीतील वाक्य कोट केले आहे एवढेच.)

गॅसचा तुटवडा केल्याने आतंकवाद्यांना गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि ते चुलीवर जेवण बनवतील. त्याने धूर होईल.. आणि धूर कुठून येतोय हे लांबूनच दिसेल त्यामुळे त्यांना पकडणे सोपे जाईल. पण ही मोदीजींची आयडीया देशद्रोह्यांना कधीही कळणार नाही . च्यायला, लोकांच्या प्रतिभेला नुसता बहर आलाय हहपूवा झाली. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॅसचा तुटवडा? कुठाय तुटवडा? gas . ११.४५ चा मुहूर्त मला तर त्या रूप मंत्रा नाहीतर ऑर्थोप्लस च्या पेपरमधल्या जाहीराती आठवल्या. एकाच लेखकाने लिहिलेले रिव्ह्यु आहेत ते स्पष्ट कळत असते पण ते निदान गावे आणि ग्राहक बदलताना मजकूर थोडातरी बदलायची दक्षता घेतात. . सौ: शेजारचेच

In reply to by आग्या१९९०

an Bharat . Bharat vowel कधी झाले? नवीन भारत असावा
एक नंबर निरीक्षण, भावा ! यह नया भारत है। यह व्याकरण में घुसता भी है और उसे तोड़ मरोड़ भी देता है।

गॅसच्या तुटवड्याचे ट्विट्स चे sceen शॉट्स बऱ्याच व्हाट्स app ग्रुप वर फिरत आहेत. वरवर पाहता असं वाटेल की वरचे सर्व भाजप समर्थक आहेत. आणि आपल्या पक्षासाठी खोटे ट्विट्स करत आहेत. काल मोकळा वेळ होता तर नक्की बघावं म्हणलं ही लोकं आहेत तरी कोण जी एक प्रकारे त्यांच्या आवडत्या पक्षांची बदनामीच करत आहेत. तर स्क्रीन शॉट्स मधला पहिलाच शशी कुमार निघाला पक्का भाजप समर्थक. म्हणजे त्याची इतर ट्विट्स भाजपची आरती ओवाळणारी आहेत. त्याला गॅस सिलेंडर जवळ जवळ दोन तासात मिळाला असेल किंवा नसेलही. शक्यतो नसेलच मिळाला. त्याच प्रोफाइल बघता त्याचा ट्विटला काही किमत द्यायची गरज नाही. समर्थक तो समर्थकच. दुसरा, विकास कुमार.ह्याची बरीच ट्विट राहुल गांधी समर्थनची आहेत.ह्यांने थेट कॉपी आणि पेस्ट केलं असणार. पण हा भाजप समर्थक नक्कीच नाही तर विरोधकच आहे. तिसरी,विरोधीणी. तीण तिच्या प्रोफाइल मध्ये Left leaning centrist आणि I reject Idea of God.,असं लिहिलंय.याच्याशी आपल्याला काही करायचं नाही.पण तिच्या एका ट्विट मध्ये हे ट्विट sarcastic आहे म्हणून re post केलंय. चौथा, पुनीत. हा पक्का भाजप विरोधक ह्याला गॅस सिलेंडर खरंच मिळाल असत तरी त्यानं कांय ट्विट केलं नसतं. पाचवा, रोनी, ह्याचा प्रोफाइलच सापडलं नाही. सहावं,गणेश.ह्याची बहुतेक ट्विट भाजप विरोधाची आहेंत. म्हणजे, पाहिला भाजप समर्थक आहे म्हणून त्यानं गॅस साठीच खोटं ट्विट केलंय असं मानलं तरी राहीलेले इतर यांनी केवळ भजपाला चिडवण्यासाठीच केलेली आहेत. याचा अर्थ गॅसचा तुटवडा नसेल असं नक्कीच नाही. व्यापारासाठी लागणारे सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत असं एक हॉटेल व्यावसायिक काल बाहेर जेवायला गेला असता म्हणाला. अजून युद्ध लांबल तर घरघुती लागणारे गॅस सिलेंडरपण मिळणार नाहीत. गॅस घेऊन येणारी दोन जहांज खाडी तुन निघाल्याच्या बातम्या आहेत. पण आपली मागणी पाहता एक दोन ने जास्त काही होणार नाही.