Skip to main content

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 03/03/2026 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

वाचने 13427
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोरू लोक इतक्या वेळेस तोंडघशी पडले तरी सुधारण्याचे नाव घेत नाहीत. इराणची एक युद्धनौका भारताच्या कोची बंदरात सुरक्षित आहे. IRIS LAVAN IRIS Dena बद्दल भारताने काहीच केले नाही पासून भारताने इराणला वाऱ्यावर सोडले पर्यंत सर्व बोंबा मारून झाल्या. काहीही करून केवळ श्री मोदींवर राळ उडवायची एवढाच अजेंडा असलेले लोक सध्या जास्तच वैफल्यग्रस्त होऊन लिहीत असल्याने तोंडघशी पडताना दिसत आहेत.

श्रीगुरूजी, आणी ईतर कोणीही अडकले असाल आणी काहीही मदत लागली तर नक्की संपर्क करा, मी पण ईथेच आहे - ०५५११२४५३६

कडक सॅल्युट. श्रीगुरूजी काळजी घ्या,लवकरच सुरक्षित परत याल. रिस्ट्रिक्टेड ऑपरेशन आहे.फुल स्केल वाॅर मधे बदलण्याची शक्यता कमीच आहे.

सर्वांना धन्यवाद! परतीचा प्रयत्न सुरू आहे. रविवारचं एअर इंडियाचं तिकीट मिळालंय. परंतु आताच क्षेपणास्त्र हल्ल्याचा ॲलर्ट संदेश आलाय. अजून एस्केलेशन झाले नाही तर रविवारी संध्याकाळी भारतात पोहोचू.

In reply to by श्रीगुरुजी

रविवारचे एअर इंडियाचे उड्डाण रद्द झाल्याचा आज पहाटे संदेश आलाय.‌ आता अनिश्चित काळासाठी अडकलोय. काल संयुक्त अरब अमिरातीत वेगवेगळ्या ठिकाणी १३१ ड्रोन हल्ले व ७ क्षेपणास्त्र हल्ले झाले. त्यातील १२५ ड्रोन हल्ले व ६ क्षेपणास्त्र हल्ले निकामी केले. परंतु उर्वरित हल्ल्यांमुळे ९४ नागरिक किरकोळ जखमी झाले व काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा विमाने रद्द झाली आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी काळजी घ्या. अशा परिस्थितीत भारत सरकार/ विमान कंपन्याना पैसे देते की प्रवाशांनाच अधिकचे पैसे भरून आपआपले तिकीट मिळवावे लागते?

In reply to by स्वधर्म

विमान कंपन्या प्रचंड लूटमार करताहेत. आमची परतीची २ तिकिटे २३,००० मध्ये मिळाली होती. स्पाइसजेटने सर्व उड्डाणे रद्द केली व नवीन उड्डाणे जाहीर केली ज्याचे प्रतिव्यक्ती तिकीट ८८,००० रूपये आहे. इतिहाद प्रतितिकीट ६,४०० दिरहॅम (१,६०,०००) मागत आहे. सुदैवाने (!) आम्हाला २ तिकिटासाठी केवळ (!) ९७,१०४ घडताहेत. केंद्र सरकार, विमान वाहतूक मंत्री ही लुटमार थांबविण्यासाठी कणभरही काहीही करीत नाही. सरकारची मदत शून्य आहे. येथे अडकलेले प्रत्येक जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. तथाकथित मदतीसाठी अनेक क्रमांक सांगितले गेले ज्यावरून शून्य मदत मिळाली. वीणा वर्ल्ड, केसरी या कंपन्या आपापल्या प्रवाशांना मदत करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

वाईट वाटले! संकटकाळी तरी भारत सरकारने मदत करायला हवी! देशात मोदींचा फोटो दाखवण्यासाठी हजारो कोटी फुंकले जातात नी देशाबाहेर अडकेलेल्या नागरिकाना काढायला काडीची मदत नाही!

In reply to by श्रीगुरुजी

अरेरे,आपल्या नागरिकांची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. सर्व जण सुखरूप लवकरात लवकर भारतभूमीवर येवोत.

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी म्हणतायतः >> केंद्र सरकार, विमान वाहतूक मंत्री ही लुटमार थांबविण्यासाठी कणभरही काहीही करीत नाही. सरकारची मदत शून्य आहे. येथे अडकलेले प्रत्येक जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. तथाकथित मदतीसाठी अनेक क्रमांक सांगितले गेले ज्यावरून शून्य मदत मिळाली. इथे डॉ. खरे म्हणतातः >> कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते ... ट्रम्प तात्यांनी टेरीफ लावल्यावर सुद्धा हीच माणसं असाच भुभु : कर करत होती बाकी इस्रायल आणि ज्यू द्वेषाने भरलेले प्रतिसाद आणि त्याला मोदीद्वेशाची फोडणी पाहून त्यांच्या... गुरुजी तुंम्हाला मोदीजी, भारतीय पासपोर्टचे, भारत सरकारचे दुबई व एम बी एस वगैरेंजवळ किती वजन आहे याचा काही अंदाज येतोय का? बाकीच्या देशांचेही नागरिक असाच आधाराचा अभाव अनुभवत आहेत का? जमले तरच उत्तर द्या, तुमची सुरक्षितता व प्राधान्याने परतणे मह्त्त्वाचे.

In reply to by स्वधर्म

जगातील जनतेने आपला गाव खेड्यातलं नेतृत्व असो की, जिल्हा, राज्य आणि देशाचं नेतृत्व, आपला नेता निवडतांना, डोळे, नाक, दात, कपाळ, पोट, लहान आतडे, मोठे आतडे, किंवा छाती किती इंचाची आहे आणि कशी आहे, हे पाहण्यापेक्षा अशा माणसाच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली आहे की नाही, हेही किमान पाहिलं पाहिजे, जगभर अशा एका जागतिक सामाजिक सुधारणावादी चळवळीची जगाला गरज आहे, असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by स्वधर्म

गुरुजी तुंम्हाला मोदीजी, भारतीय पासपोर्टचे, भारत सरकारचे दुबई व एम बी एस वगैरेंजवळ किती वजन आहे याचा काही अंदाज येतोय का?
हे वजन दिसण्याचे निकष काय आहे? इतिहाद या संअअच्या विमानसेवेने आज ६,४०० दिरहॅम (१,६०,००० रूपये) प्रति व्यक्ती असे शुल्क लावले आहे. इतर भारतीय विमानसेवा संस्था सुद्धा लुटत आहेत. हे शुल्क वाढविण्यात ना मोदी काही हस्तक्षेप करीत आहेत ना दुबई सरकार. अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ना मोदी इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया यांवर सक्ती करीत आहे ना दुबई सरकार त्यांना दमदाटी करीत आहे. वजन मोजण्याचे काही दुसरे निकष असतील तर सांगा. माझी मुलगी शिकते त्या विद्यापीठात अनेक देशांच्या विद्यार्थिनी - विद्यार्थी आहेत. त्यातील बरेच जण मायदेशी गेले आहेत. परंतु बहुसंख्य भारतीय येथेच आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुम्ही निघालात ना सुखरुप? की अजूनही फ्लाईट डिले आहे? . दुबई एअरपोर्टवर ड्रोन चा हल्ला झाल्याने एअरपोर्ट आणि एमिरेटसची फ्लाईटस बंद केल्याची बातमी आहे. प्रवाशाना अंडरग्राउंड नेण्यात आले आहे सेफ्टीसाठी. . काळजी घ्या, काही अजून पर्याय आहेत का परत येण्यासाठी?

खेमिनीच्या हत्तेचा आपण निषेध केला नाही, जहजावरील हल्ल्यावरही आपण प्रतीक्रिया दिली नाही. तर आपण स्वतःलाच विश्वगुरू, महागुरू बोलणही बंद केलं पाहिजे. जागतिक राजकारणात आपण नक्कीच महत्वाचे आहोत पण एवढेही नाही की ही असली विशेषण आपल्याला शोभतील. उगाच आपल्या विकतच्या मीडियाला सांगून स्वतःच स्वतःचे गुणगान करायचे. आणि जिथं ठाम भूमिका घ्यायची तिथं मात्र शांत बसायचे.

आनंदाची बातमी To enable oil to keep flowing into the global market, the treasury department is issuing a temporary 30-day waiver to allow Indian refiners to purchase Russian oil,” the treasury secretary, Scott Bessent, said in a statement posted to social media भारताने रशिया कडुन तेल घ्यायचे नाही असा कडक संदेश अमेरिकेचा होता पण सध्याचे वातावरण पाहता एक महिन्यासाठी तेल आयात करण्याची परवानगी अमेरिकेने भारताला दिली आहे. अभिनंदन !! https://www.theguardian.com/us-news/2026/mar/05/us-waiver-india-russian…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तात्याने तुकडा फेकला.. आता मोती वरच्या वर झेलून कौतुकाने मिरवेल .. पॉ पॉ ने ओईल लाया .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

  1. भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले होते का?
  2. भारताने, "भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले" असे म्हटले होते का?
  3. रशियाने भारताला तेल देणे थांबविले होते का?
  4. रशियाने, "रशियाने भारताला तेल देणे थांबविले" असे म्हटले होते का?
यापैकी कोणत्याही एकाही प्रश्नाचे उत्तर "हो" असे नाही. मग अमेरिकेच्या "तीस दिवस तेल घेऊ देऊ" या किंवा आधीच्या "तेल घेऊ देणार नाही" या वक्तव्यांना काही अर्थ आहे का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

रशियाचे तेलाचे जे टँकर सध्या समुद्रात उभे आहे तेच तेल रशिया देणार आहे नवीन नाही. त्यामुळे किती मिळेल याची कल्पना नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कोबी सिंह पेक्षा ताम्रमुख नेत्याचे चाटुकार आणि भाट जास्त असह्य आहेत. १. भारताने रशियन तेल घेणे कधीच बंद केले नव्हते. भारतांतील अनेक रिफायनरी रशियन क्रूड वर फुल्ल स्पीड कार्यरत आहेत आणि त्यांना अचानक बंद करणे शक्य नाही. २. भारतावर २५% तथाकथित टॅरिफ लावून सुद्धा भारताने रशियन क्रूड घेणे बंद केले नाही. शेवटी जितं मया म्हणून ताम्रमुखाने तथाकथित "ट्रेड डील' घोषित केली आणि स्वतःहून हे टॅरिफ बंद केले. ३. तथाकथित ट्रेड डील मध्ये ताम्रमुखाने तात्काळ टेरीफ्स कमी केले आणि बदल्यांत भारताने सर्व विषयावर "नंतर बघू" असे उत्तर दिले आहे. प्रत्यक्षांत भारत आणि अमेरिका दोन्ही बाजूनी कुठलीही ट्रेड डील केली नाही. बहुतेक विषयावर दोन्ही बाजूंचे एकमत सुद्धा झालेले नाही. कुठल्याही ट्रेड डील चा मसुदा सुद्धा लिहिला गेलेला नाही आणि माझ्या माहिती प्रमाणे किमान २०२६ मध्ये ह्यावर प्रगती होण्याची शक्यता शून्य आहे. लुटनिक आणि बेझेन्ट दोन्ही एक नंबरचे कामचुकार, अकार्यक्षम आणि चाटुकार आहेत. त्यामुळे कुठल्याही मिरवणुकीच्या पुढे आपण उगाच जाऊन मिरवणुकीचे नेत्तृत्व स्वतःच करत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही लोक करतात. ताम्रमूख TV आणि X वर प्रचंड वेळ खर्च करतात त्यामुळे दोन्ही माध्यमात आपल्या साहेबांची स्तुती करण्याची जी चढाओढ मंडळी करत आहेत त्यातून हि असली मुक्ताफळे उधळली जातात. भारतीय लोकांना ह्यावर वेळ दवडण्याची गरज नाही. त्याशिवाय ह्यावर मौन पाळणे हे सध्या तरी शहाणपणाचे आहे. टीप: १. ताम्रमुख अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने शून्य ट्रेड डील्स केल्या आहेत. मीडिया मध्ये जे काही ऐकू येते ते फक्त बोलबच्चनगिरी. कोबी सिंह ह्यांच्या पेक्षा सुद्धा मोठा दांभिक, खोटारडा, निर्लज्ज आणि धूर्त कोणी राजकारणी असेल असे वाटले नव्हते पण ताम्रमुख तसे आहेत.

In reply to by साहना

>> कोबी सिंह ह्यांच्या पेक्षा सुद्धा मोठा दांभिक, खोटारडा, निर्लज्ज आणि धूर्त कोणी राजकारणी असेल असे वाटले नव्हते पण ताम्रमुख तसे आहेत. कोबी सिंह यांनाही तसंच व्हायचं आहे बहुतेक. बहुधा म्हणूनच 'अब की बार ट्रंप सरकार' अशी घोषणा देत होते. फक्त त्यांनी नॉन गोदी मिडिया पत्रकारांना घाबरण्याचं बंद केलं तर जमेलही. ताम्रप्रमुख कुठल्याही पत्रकार परिषदेत बिनधास्त बोलतात, कुठेही जातात, पण कोबी सिंह यांचे महिला खासदारांकडून धोका असल्याने संसदेत येण्यापासूनही संरक्षण केले जाते. खरे कारण जनतेला माहित असते, ते वेगळे.

मोरू ( मोदी रुग्ण) लोक आजकाल कोणत्याही धाग्यावर आपली जुनी ठसठसती गळवं कुरवाळत बसले आहेत. त्याचा प्रतिवाद करण्यात काहीही हशील होणार नाही. मूळ धागा इस्रायल इराण युद्ध हा आहे. त्याबद्दल चर्चा करायच्या ऐवजी हे केवळ मोदीनि यंव करायला हवं होतं त्यंव करायला हवं होतं याचे रतीब टाकत राहिलेले आहेत. मोदींच्या जागी दुसरा येणार नाही हे त्यांना माहिती झालंय. त्यामुळे आपलं वैफल्य कुठे तरी निचरा करण्यासाठी बाहेर काढणं चालू आहे. सद्य स्थितीत श्री राहुल गांधी पंतप्रधान असते तर काय झालं असतं याचा विचार करून पहा. सुदैवाने असं काहीही नाही यात परमानंद आहे. कुठे वितंडवाद घालायचा.

इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
. मूळ धागा नऊ ओळीचा. त्यात पाच ओळी भारताबद्दल. त्यातही नुकताच इस्रेलने सर्वोच्च सन्मानही दिल्याचाही उल्लेख. मग मिपावर चर्चा काय कुणी कीती बॉम्ब टाकले आणि कुणाचे कीती वर गेले , आजचा स्कोर काय? इतकीच करायची का? .

आजचा नवीन विनोद तात्या तात्या प्रतिबंध लावून ही मोदी शेट रशियाकडून सर्वात जास्त तेल विकत घेतात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तात्या: आपण असं करू जगाला सांगू आम्ही शेटजीला रशिया कडून तेल विकत घेण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. बघा कशी जिरेल मोदी शेटची.

In reply to by विवेकपटाईत

आपण आधी जितके तेल आधी घेत होतो त्या पेक्षा आता फार कमी घेतो हे सत्य आहे ना? आता रशियाकडुन तेल घेऊन त्यावर अधिकचा प्रिमियम द्यावा लागतोय का? आधी डिस्काऊंट ने मिळत होते ना? मी वाचलेला तेलसाठ्यांचा आकडा. अमेरिका: २०० दिवस चीनः १०४ दिवस जपानः २६० दिवस दक्षिण कोरिया: २१० दिवस सिंगापुरः २४५ दिवस आपणः २५-५० दिवस. जाता जाता: दिल्लीत सिलेंडरचे भाव ६० रुपयांनी वाढले म्हणे! कोबी जी म्हणे गॅस निर्माण करुन ट्युब मधुन नेउन ती ट्युब शेतात नेउन त्या गॅसवर पाण्याचा पंप चालवायचे हे खरे आहे का? :))) गटारातील गॅसवर चालणारी चहाची टपरी ही अद्भुत गोष्ट यांनीच सांगितली होती ना?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S

https://www.bloomberg.com/news/articles/2026-03-06/bessent-says-us-may-… https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/us-treasur… भारताला रशियन तेल घेण्याविरुद्ध असलेले निर्बंध अमेरिका हटवणार. उगाच अपनी माँ का दूध पिया है तो सामने आ जा सारखी वक्तव्ये न करता शान्त राहून सरकार काम करत आहे. त्याचा परिणाम दिसून येतो आहे. पण मोरू लोकांचे वैफल्य अजूनच वाढते आहे. सध्या बर्नोलची विक्री जोरदार वाढली आहे असे ऐकतो

In reply to by सुबोध खरे

एक करार करु यात भविष्यात जर तुम्हाला जर परत लिहावेसे वाटले कि १९७१ इंदिरा गांधीनी कित्येक हजार चौ. की. मी. चा प्रदेश युध्दानंतर परत केला अमुक केले तमुक केले. आणि सर्व तोट्यात व्यापार केला तर ते खुशाल लिहा. पण छप्पनेश्वरांनी २०२५-२०२६ मध्ये सांगितल्यावर रशियाकडुन घेणे बंद केले व सांगितल्यावर रशियाकडुन तेल घेतले (कोणी ते विचारु नका) . यातली एक मेख लपवत आहात. या युध्द परिस्थितीत रशिया सवलती च्या दरात तेल देतच नाही कदाचित महाग देत असेल, ठिक आहे आपली गरज भागत आहे. पण छप्पनेश्वरांची छप्पन इंचाची छाती झुकल्यामुळे हे तेल रशियाकडुन मिळत आहे .(या केस मध्ये कोणाची छाती झुकली हे विचारु नका ). या सगळ्याचा अंधभक्ताना हा व्यापार कळुन पण छप्पनेश्वर सर्वोतम. एकुण या केसमध्ये बुडावर पडलो तर नाक वर आणि नाकावर पडलो तर बुड वर. पण फायद्याचा व्यापार झाला ( गुजराती एकदम एक्सपर्ट ). १९७१ मध्ये सर्व बाजुनी तोट्याचा व्यापार झाला हे सिध्द करायला अंधभक्त एकदम एक्सपर्ट. मुद्दा काय अंधभक्तांनी १९७१ च्या तोट्यातील व्यापाराबद्द्ल लिहायचे. आणि मोरुंनी ( मोदी रुग्ण) २०२५-२०२६ च्या फायद्याच्या व्यापाराबद्द्ल लिहायचे.. ???

थिंक बँक तूनळी वाहीनीवर अविनाश धर्माधिकारी यांच्या मुलाखतीत त्यानी असा उल्लेख केलाय की खामेनी ऑपरेशनसाठी मोसादने किमान १ वर्षभर ईराण्/तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करुन खामनी आणि त्यांच्या ईनर सर्कलमधील महत्वाच्या अधिकारी लोकांवर पाळत ठेवली आणि त्यातुन त्यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी होणार्‍या मीटींगची जागा कळली. हेजबोल्लावर झालेला पेजर अ‍ॅटॅक असो किवा ही बातमी--मोसाद नेहमीच काहीतरी नवीन युद्धतंत्र वापरत असते जे जगाला तोंडात बोट घालायला लावते. पण वरील मुद्द्यानुसार आपले ट्रॅफिक कॅमेरे कितपत सुरक्षित आहेत? सायबर युद्ध हा आता नवीन युद्धाचा अटळ भाग आहे आणि डेटा प्रोसेसिंग साठी आपण गुगल अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट वर अजुन किती काळ अवलंबुन राहणार आहोत हा कळीचा मुद्दा आहे. हे म्हणजे तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू कुठे आहे हे चोराला माहीत आहे फक्त त्याचा चोरी करायचा मूड कधी होईल ते बघायचे. ते जाउद्या- बहुतेक चिनी बनावटीचे फोन आपण वापरतो, हुआवे, ओप्पो आणि काय काय , ते आपली माहीती चोरुन तिकडे पाठवत नाहीत कशावरुन? फोनवरील अनेक अ‍ॅप तुम्हाला लोकेशन ऑन ठेवायला भाग पाडतात त्यामुळे बहुतेक सगळ्यंच्या फोनवरील जी पी एस ऑन असते त्याचे काय? म्हणजे तुमचा रोजचा दिवसभराचा ट्रॅफिक पॅटर्न गुगल ला माहीत आहेच. फक्त तो कोणाला आणि कधी विकायचा एव्हढाच विषय आहे. जाता जाता- साले हे मिपावर चकरा मारायचे व्यसन लागलेय. ऑफलाईन मोडवर जगण्यासाठी काय करावे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मोसादने किमान १ वर्षभर ईराण्/तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करुन खामनी आणि त्यांच्या ईनर सर्कलमधील महत्वाच्या अधिकारी लोकांवर पाळत ठेवली आणि त्यातुन त्यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी होणार्‍या मीटींगची जागा कळली.
खामेनी हे न समजण्याइतका मूर्ख नव्हता. त्याने ठरवले असते तर इराणमध्ये सुरक्षित स्थळी नक्कीच लपून बसता आले असते. परंतु देशातील विरोधकांना संधी मिळू नये म्हणून त्याने शहीद होणे पत्करले, आणि त्यात तो जिंकलही. आता इराणी जनता एक होऊन अमेरिका आणि त्याच्या मित्रांविरुद्ध एक होऊन प्रतिकार करत आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तुमची ही प्रतिक्रिया आणि आग्या यांचा प्रतिसाद,हाच चर्चेचा आशय फेबु, तूनळीवर अनुभवला आहे. खूप हसू आलं, किती सारखे विचार प्रवाह सोशल मीडिया तयार होतात :) Predictable!!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

जाता जाता- साले हे मिपावर चकरा मारायचे व्यसन लागलेय. ऑफलाईन मोडवर जगण्यासाठी काय करावे?
मिपाच व्यसन जरा बरंय! ऑफलाईन मोडसाठी -दिवसातून ४ तास मोबाईल / सिस्टिम पासून दूर जा. माळ्यावर टाका. दिसणार नाही असे ठेवा. -लेकरांचा २ तास अभ्यास घ्या. १ तास विदाउट मोबाईल /डिजिटल गोष्टी फिरायला जा. चहा /पेय गॅलरीत पीत जा, सूर्य चंद्र पाहत!!

In reply to by Bhakti

एक सांगू का, तुमचं काम इंटिरियस्टिंग असेल तर सिस्टिमवर लॉग इन आलो तरी सोशल मीडिया आठवत नाही. दोन दिवस मी सिस्टिमवरच आहे पण काम नवीन आवडीचं आहे त्यामुळे सोशल मीडिया आठवलंच नाही. WFH म्हणूनच बोर आहे. काहीच माणसं दिसत नाही. रच्यकाने माजगावकर wfo आहे पण इथे माणसं कमी म्हणून बोर होतं :) थोडं तरी स्पर्धात्मक वातावरण हवं ;)

भारताला अमेरिकेने ३० दिवस रशियन तेल विकत घेण्याची अनुमती दिली हा दावा वाचून हसायला आले. मुळात भारताने रशियाकडून तेल विकत घेणे थांबविले नव्हते ना तेल विकत घेण्यासाठी अमेरिकेची अनुमती मागितली होती. गेले वर्षभर ट्रंप भारताला दरडावत आहे की रशियाकडून तेल घेऊ नका. भारत आपल्या धमक्यांकडे दुर्लक्ष करतोय हे पाहून ट्रंपने चवताळून आयातशुल्क वृद्धी केली. तरीही भारताने लक्ष न देता तेलखरेदी सुरूच ठेवली. आता ट्रंपच्या अधिकाऱ्याने परस्पर घोषणा करून ट्रंपप्रमाणे स्वतःस हास्यास्पद बनवून घेतले. भारताने अत्यंत प्रगल्भपणे ट्रंपच्या कोणत्याही दाव्याचा प्रतिवाद न करता संपूर्ण दुर्लक्ष करून ट्रंपला अदखलपात्र केले आहे. याच विषयावर How India had the last laugh after Trump's Russian oil waiver हा उत्कृष्ट लेख वाचनात आला.

माहीत नाही का? पण मला हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल असे वाटतेय, हे कोरोनासारखे होईल असे वाटतेय, कोरोना आला तेव्हा पहिले एक दोन महिने आपल्याला काही पडली नव्हती कारण तो तिकडे चीनमध्ये होता जसजसा मार्च उलटू लागला तसतसा आपल्याकडे परिणाम दिसू लागला.

तिसरं महायुद्ध वगैरे नाही झालं तर चांगल आहे. उलट जे चालू आहे ते पण लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. लवकरात लवकर ट्रम्पला अमेरिकेने घरी बसवयला पाहिजे. बायडेन अध्यक्ष असतानाच त्याला त्याच्या पक्षाने बदलला असता तर कदाचित ट्रम्प आलाही नसता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इराणमध्ये खामेनी गेल्यावर बंडाळी होईल आणि युद्ध लांबणार नाही अशी स्वप्ने बघणाऱ्या ट्रम्पला पळावे लागणार हे नक्की. रशिया आणि चीनला मध्ये पडावे लागणार नाही.

रशिया स्वतःच अडकलाय तो काही इराणची मदत करणार नाही. तर चीन इराणची मदत कारण्याऐवजी तैवान घायचा प्रयत्न करेल.

मला वाटतय नाही, अमेरिकच्या दादगिरीविरुद्ध दुसरे टोक उभे राहण्याची ही योग्य संधी आहव मी चिन ती भूमिका निभावेल, अजूनही चीनच्या गोटातून हालचाल का नाही हे कळत नाहीये. अजून १५ दिवस वाट पाहून मग चिन प्रत्यक्षात मैदानात उतरेल. ह्या सगळ्यात प्रचंड वाट जगाची लागणार आहे!

दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी विमान शेवटच्या क्षणी रद्द केल्यानंतर शेवटी तिसऱ्या विमानाने काल मध्यरात्री मुंबईत परतलो. आता पुण्यात यायला निघालोय. मुंबईत एक बदल दिसला. विमानतळापासून दादरपर्यंतच्या बहुसंख्य दुकानांवर दुकानाचे नाव मराठीत लिहिलेले दिसले.

इस्रायलने इराणच्या तेलसाठ्यांवर हल्ला केला आहे. ह्याचा बदला घेण्यासाठी इराण असा हल्ला सौदी, यूएई, बहरैन, कतार, कुवेत मध्ये करू शकतो. असे झाले तर जगावर गंभीर परिणाम होतील. इराणचे अरब जगताशी कित्येक शतकांचे वैर आहे. पण ह्या युद्धात इराण व्यतिरिक्त अरबांचेच मोठे नुकसान आहे. बरे, ते हे युद्ध लढत पण नाही आहेत. सर्व वैर बाजूला ठेऊन अरबांनी ह्या युद्धाचा विरोध केला पाहिजे. हे युद्ध म्हणजे संपूर्ण जगाचे नुकसान आहे.

अमेरिकेने हे युद्ध सुरू करण्याचे कारण काय असू शकते यावर चर्चा करूया. काही काळासाठी मोदी, राहुल, सोनिया आणि तुमच्या सर्व आवडत्या पात्रांना बाजूला ठेवा. मला वाटते की हे युद्ध AI आणि डेटा सेंटर नियंत्रणाबद्दल आहे. डेटा सेंटरला भरपूर ऊर्जेची गरज आहे आणि चीनला इराण आणि बहुधा व्हेनेझुआला येथून खूप स्वस्त तेल मिळत आहे. जर अमेरिका या उर्जेवर नियंत्रण ठेवू शकली तर ते चीनची गती कमी करू शकते. युद्ध सुरू झाल्यानंतर, जटिल परिस्थितीचा हवाला देत चीनने अलीकडच्या काळात आपले वाढीचे लक्ष्य कमी केले आहे. आता आणखी एक चीन समर्थक क्युबा अमेरिकेच्या हाती पडणार आहे. त्यामुळे, मला वाटते की या युद्धात आणि इतर यूएस कृतींमध्ये आणखी बरेच काही आहे कारण त्यांना चीनची गती कमी करायची आहे आणि पृथ्वीवरील दुर्मिळ सामग्रीच्या ब्लॅकमेलिंगला धक्का बसवायचा आहे. तुम्हाला काय वाटते?

In reply to by कोण

तेल आणि अमेरिकन युद्धाचा संबंध नाही. एके काळी होता पण आता नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून नाही. तेल कंपन्या पहिल्या दहा मध्ये सुद्धा नाहीत. फ्युजन आणि ते सिद्ध होईपर्यंत साधारण आण्विक ऊर्जा हे प्रमुख ऊर्जेचे स्रोत असणार आहेत. चीन, भारत, अमेरिका ह्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मोठ्या अमेरिकन कंपन्या जसे मायक्रोसॉफ्ट, गुगल इत्यादींनी आण्विक प्रकल्प विकत घेणे सुरु केले आहे. सध्या अमेरिका तेल निर्यात करते आयात करत नाही. इराण युद्धाने रशियन क्रूड ची डिमांड पुन्हा वाढली हे युरोप आणि अमेरिका साठी भूराजकीय नुकसान आहे. युद्धाचा खर्च आणि तेल ह्यांचे गणित बसत नाही. उदाहरण द्यायचे तर जमिनीतील तेलाची किमंत शून्य. तेल बाहेर काढले तरच त्याला किमंत आहे. ते बाहेर काढण्यासाठी आधी खर्च करावा लागतो. म्हणजे व्हेनेझुएला मध्ये १०० डॉलर्स चे तेल जमिनीत आहे तर ते बाहेर काढण्यासाठी, रिफायिं करण्यासाठी ३० - ४० डॉलर्स खर्च आधी होतात. त्याशिवाय भांडवल खर्च सुद्धा आहे. ते तेल मिळविण्यासाठी युद्ध करायचे तर आधी ५०० बिलियन डॉलर्स खर्च करावे लागतात. ते गणित जुळत नाही. इराक युद्धाचा खर्च हा इराक मधील एकूण तेलाच्या किमतीच्या साधारण ५०% होता. म्हणजे तेल बाहेर काढायचा खर्च धरल्यास एकूण नुकसान होते. अमेरिकन युद्धे हि नेहमीच अनेक कारणासाठी होतात (multi causal). इराण युद्धाचे प्रमुख कारण इस्राएल हे आहे. बीबी ना आपली सत्ता ठेवण्यासाठी देशाला युद्धाच्या खाईत कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अमेरिकन राजकर्त्यांनी आपल्या भयोपदानांत अडकवले आहे. ट्रम्प साहेबांच्या अंगावर एप्सटिन प्रकरण शेकत आहे. जनतेचा बुद्धिभ्रम करण्यासाठी काहीतरी इतर प्रकरण आवश्यक आहे. इस्राएल चा साम्राज्यविस्तार, ट्रम्प साहेबाना diversion, आणि त्यातून चीन चे नुकसान झाल्यास आणखीन फायदा हे हेतू आहेत असे वाटते. इराक मधील युद्धासाठी इस्राएल कारणीभूत होता. त्याशिवाय ट्रम्प ऍडमिन मधील लोकांची. भांडणे सुद्धा इथे कारणीभूत आहेत. जे डी वन्स हे ट्रम्प आणि पीटर थील ह्यांनी रस्त्यावरून उचलून आणलेल्या कुत्र्याप्रमाणे आहेत. ट्रम्प साहेबानी भुंक म्हटले कि वन्स त्या दिशेने भुंकतात. हा गुण सध्या त्यांच्यासाठी चांगला असला तरी पुढील निवडणुकीत त्यांच्या अंगाशी येणार आहे. म्हणून रुबिओ आणि हेगशेठ हे आपली फिल्डिंग लावत आहे. युद्धे टाळणे हे वन्स ह्यांचे पालुपद होते. युक्रेन युद्ध अजून चालू आहे, व्हेनेझुएला मध्ये अमेरिकन हस्तक्षेप, आता इराण युद्ध, पुढे म्हणे क्युबा मध्ये हल्ला हे सर्व वन्स ह्यांना डिफेन्ड करणे कठीण जाईल. ह्या उलट हेगशेठ आपण स्वतः राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उडी घेतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी अमेरिकेला युद्धांत भाग घेणे आवश्यक आहे. जेव्हडी युद्धे जास्त तितके हेगशेठ ह्यांना आपला उदो उदो करून घेणे शक्य होईल. त्याशिवाय इस्राएल जे अनेक अमेरिकन नेत्यांना दावणीस बांधून ठेवत आहे त्याचा सुद्धा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. युद्ध चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. काही विमान हल्ले केल्यास इराण कोसळेल, यादवी माजेल इत्यादी होरा ट्रम्प साहेबांचा असावा. पण तो सपशेल चुकीचा ठरला आहे. खोमिनी ह्यांना मारून सुद्धा काहीही विशेष साध्य झाले नाही. खोमेनी हे इराण आण्विक अस्त्रांच्या विरुद्ध होते. इराण कडे आज आण्विक अस्त्रें नाहीत ह्याचे प्रमुख कारण खोमेनी आहेत. त्यांनाच ठार मारून आण्विक अस्त्रे इराण मिळवणार नाहीत हे तर्कशुद्ध नाही. इस्राएल चे फार नुकसान करण्याची क्षमता इराण कडे नाही. माझी जवळची मैत्रीण IDF मध्ये कार्यरत होती आणि तिचा काही परिवार इस्राएल मध्ये आहे. त्यांच्या मते तेल अवीव वर दिवसाला १०-१५ क्षेपणास्त्रें येतात त्यातील बहुतेक हवेत नष्ट केली जातात पण एखाद दुसरे खाली कोसळते. पण दुबई इत्यादी ठिकाणी मात्र हल्ले जास्त प्रभावी आहेत. इस्राएल प्रमाणे त्यांच्याकडे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कार्यरत नाही. ह्या हल्ल्यांनि त्याच्या जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. इस्राएल इराण च्या भांडणात "मुझे क्यू पिटा ?" हाच प्रश्न त्यांची मंडळी विचारात आहेत. पण त्याच वेळी इराण हे एक जुने राष्ट्र आहे. लोकांची संस्कृती जुनी आहे. त्यामुळे हा देश अचानक कोसळेल हि शक्यता कमी आहे. इराण मध्ये सर्वत्र असंख्य क्षेपणास्त्रे जमिनीत ठेवली आहेत. त्याशिवाय इराण असंख्य शाहिद यन्त्रभ्रमर निर्माण करतो. ह्याची किंमत सुद्धा त्यांच्या साठी कमी आहे. त्यामुळे अमेरिका, इस्राएल चे वर्चस्व असले तरी इराण अगदीच अबला नारी नाही. युद्ध जास्त काळ टिकले तर अमेरिका इस्राएल ला अब्जावधींचे नुकसान रोज सोसावे लागते. ३५,००० डॉलर्स च्या यन्त्रभ्रमर साठी १० मिलियन डॉलर्स ची यन्त्रभ्रमर विरोधी अस्त्रे वापरावी लागतात. हे किती काळ टिकू शकते ?

आणखी एक निरीक्षण म्हणजे हवाई दलापेक्षा अमेरिका इराणच्या नौदलाला अधिक लक्ष्य करत आहे. अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवायचे आहे, असे यावरून स्पष्ट होते. जर ते यावर नियंत्रण ठेवू शकले तर कमी-अधिक प्रमाणात ते स्वस्त तेलाच्या स्त्रोतापासून चीनची गळचेपी करू शकतात. "चीन रीअर अर्थ मटेरियल ब्लॅकमेलिंगला हे मोठे काउंटरवेट असेल."

इस्रायलला इराणच्या अणुप्रकल्प बंद करायचा आहे आणि हमास, हुती, आणि हिझबुल्लाह च्या मुळावरच कुर्हाड घालायची आहे. याची कारणे मी वर दिलेली आहेतच अमेरिकेचा हेतू चीनवर नियंत्रण ठेवायचे आहे यात व्हेनेझुएला आणि इराण हे दोन चीनला तेल पुरवणारे दोन देश याना वेसण घालायची आहे याशिवाय इराण चीनला युआन चलनात तेल विकत होता. त्यामुळे डॉलरच्या मक्तेदारीवर निर्बंध येत होते. ब्रिक्स देश या डिडोलारायझेशन मध्ये अग्रेसर होते. त्यात रशिया विरुद्ध युक्रेनला उभे करून त्यांनी रशियाच्या तेलावर निर्बंध टाकले आता या युद्धात चीनला शह द्यायचा आहे. कारण चीनने दुर्मिळ धातू वर निर्माण केलेली मतदारी अमेरिकन कंपन्यांच्या गळ्यात एक धोंड झालेली आहे त्यातून मुक्तता करणे हा एक हेतू आहे. तैवान हा चीनच्या अस्मितेचा भाग आहेअमेरिकेला तैवान बद्दल अजिबात प्रेम नाही पण चीनच्या गळ्यात अडकलेले ते हाड ते अजिबात काढणार नाहीत. तैवान मध्ये होत असणाऱ्या अर्धवाहक चिप्स (semiconductor chips) चीनच्या हाती पडू नये इतकाच हेतू आहे. त्यामुळे तैवानला चिप्स च्या बदल्यात शस्त्रास्त्रे विकून अमेरिका आपल्याच कंपन्यांची धन करत असते. राहिला भारत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील. हे तिन्ही देश सध्या तरी अमेरिकेच्या तुलनेत तसे लहान आहेत पण त्यांनी मोठे होऊ नये म्हणून त्यांच्यावर टेरिफ लावून सध्या तरी त्यांना गप्प बसायला लावले आहे. बाकी अमेरिकेशी दोन हात करण्याची भारताची सध्या तरी स्थिती नाही. त्यांची अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेच्या सहा पट आहे तर चीनची तिप्पट. तेंव्हा सध्या सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणणारे आपल्याला आवश्यक आहे. सा \ध्या अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आपलयाला जेमतेम ५० वर्षे झाली आहेत. त्यातून आपल्याला अमेरिकेच्या एक तृतीयांश जमीन असून अमेरिकेच्या चौपट लोकसंख्येचे पोट भरायचे आहे. २००३ साली आपली लोकसंख्या १०७ कोटी होती आणि २००८ साली १२० कोटी होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षात आपल्या लोकसंख्येत १३ कोटी १८ वर्षावरील तरुणांची वाढ झाली आहे आता या १३ कोटी लोकांना रोजगारही पुरवायचा आहे उगाच मीच पाटील म्हणून मिशा पिळून काय साध्य होणार आहे?

In reply to by सुबोध खरे

>> सा \ध्या अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आपलयाला जेमतेम ५० वर्षे झाली आहेत. त्यातून आपल्याला अमेरिकेच्या एक तृतीयांश जमीन असून अमेरिकेच्या चौपट लोकसंख्येचे पोट भरायचे आहे. २००३ साली आपली लोकसंख्या १०७ कोटी होती आणि २००८ साली १२० कोटी होती. एवढा सगळा विचार तुंम्ही केला आहे पण असे म्हटले जाते की आपल्या सरकारने अमेरिकेसोबत करारामुळे आपली कृषीव्यवस्था उध्वस्त होणार आहे. शेतमालावरील निर्बंध काढून (मका सोयाबीन इ.) त्यांना भारताची बाजारपेठ का मोकळी करून दिली आहे? सरकारमधल्या धुरीणांना हे एवढं सोपं कसं समजलं नाही?

In reply to by स्वधर्म

***************************************************************************************** AI Feedback in US-India trade deal Fully protected items include wheat, rice, maize (corn), millets, pulses, dairy (milk, butter, ghee, cheese), poultry, and meat. The ban on Genetically Modified (GM) corn and soybeans remains strictly in place ***************************************************************************************** शेतमालावरील निर्बंध काढून (मका सोयाबीन इ.) त्यांना भारताची बाजारपेठ का मोकळी करून दिली आहे? --> हि माहिती कुठे मिळेल? खूप दिवस शोधत आहे.

In reply to by कोण

कोपायलट वरुनः Soybean, Oilseed & DDGS-Linked Losses The most significant negative impact is expected for soybean farmers and domestic oilseed processors. India is expected to allow imports of DDGS, a protein‑rich animal feed ingredient. India already has a surplus, and further inflows will depress demand for domestically produced soymeal. [newsmax.com], [deccanherald.com] Cheaper imports could push farmers to abandon oilseed crops like soybean and groundnut in favour of maize or rice, even though the government has been pushing hard for oilseed self‑sufficiency. [newsmax.com], [deccanherald.com] Duty‑free soybean oil imports (within tariff‑rate quotas) will put downward pressure on domestic edible oil prices, hurting farmers and processors. संदर्भः https://www.newsmax.com/politics/india-us-trade-pact/2026/02/09/id/1245… https://www.deccanherald.com/india/explained-india-us-trade-pact-and-it…

In reply to by सुबोध खरे

India has approved the import of Distillers’ Dried Grains with Solubles (DDGS) from the United States under a bilateral trade agreement, granting duty concessions to ease domestic feed shortages. The imports are capped at 5 lakh tonnes, representing roughly 1% of total domestic consumption, aiming to support the poultry and dairy sectors without overwhelming domestic corn and soybean farmers

In reply to by स्वधर्म

अन्नाची गरज जास्त तर जास्त अन्न आयात करणे बरोबर नाही का ? कमी अन्न असून फायदा कसला ? भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत. आज काल देशांत पनीर, अंडी, दूध सर्वच भेसळ युक्त आहे. अश्यांत विदेशी आयात देशासाठी चांगली आहे. शेतकर्यानी मंडळी मग सबसिडी, लोन माफी आणि त्यासाठी विविध ठिकाणी दंगे, चौकियाच्या बाजूने वाहतूक करून इतरांना ठार मारणे, एकूणच देहाती वागणूक इतरांना देणे हे सर्व काही करत आहेत ते वेगळे आणि तरीसुद्ध सामान्य मध्यमवर्गीय माणसाने कर देऊन आणि भेसळयुक्त अन्न खाऊन ह्यांना पोसावे हि अपेक्षा.

In reply to by साहना

भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत सध्या ए आय आहे त्यामुळे अभ्यास न करता सुद्धा माहिति मिळते . ती घेण्याचे कष्ट करावे लागतात . रासायनिक खते , कीटकनाशक यांचा वापर जगात कुठे किति अहे ते बघा , आणि शेतकरी भेसळ करतात की व्यापारी हे पण बघा .

In reply to by कपिलमुनी

साहना यांची एकंदर मते अत्यंत एकांगी आणि विशिष्ट दृष्टिकोन ठेवून आहेत. त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो

In reply to by कपिलमुनी

अकार्यक्षम - सर्वच पिकांच्या बाबतीत भारतीय शेतकरी अत्यंत अकार्यक्षम (inefficient) आहेत. प्रति एकर पीक हे अत्यंत कमी आहे. ह्याचे मूळ कारण जमिनीचे छोटे तुकडे, सिंचनाचा अभाव, आधुनिक खते, यंत्रे ह्यांचा वापर न करणे इत्यादी आहे. - मूळ कारण हे आहे कि अकार्यक्षमता हि सरकार सबसिडी देऊन वाढवते त्यामुळे ज्याची शेती करण्याची लायकी नाही तो माणूस सुद्धा शेती करतो. जमीन विक्री आणि खरेदी सुद्धा सरकारने अशक्य करून ठेवले आहे त्यामुळे शेतीतून काढता पाय घेणे सुद्धा कठीण आहे. - तांदूळ ह्या धान्याचे उदाहरण घ्या. भारत १५२ दशलक्ष टन उत्पादन करतो. चीन १४८. पण भातासाठी शेतजमीन भारतांत दुप्पट आहे. इजिप्त, चीन आणि usa भात शेतीत अग्रेसर आहेत. अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ह्याचा पुरावा सोपा आहे. दूध भारतांतील दुधाची संपूर्ण सप्लाय चेन भेसळयुक्त आहे. गुरांना जबरदस्त इंजेक्शन्स आणि अँटी-बीओटीकस दिल्या जातात. ह्यावर कसलेही नियंत्रण नाही. गुरांना चारा नक्की काय दिला जातो हे कुणी पाहायला सुद्धा जात नाही. त्यानंतर हे प्रदूषित दूध घेऊन त्यांत विविध प्रकारची भेसळ केली जाते. [१] [२] पनीर तर म्हणे सगळीकडे सिंथेटिक आहे. [३] अंडी दुधाची जी गत आहे तीच ह्यांची सुद्धा. [४] > रासायनिक खते , कीटकनाशक यांचा वापर जगात कुठे किति अहे ते बघा , वापर किती आहे ह्या पेक्षा कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे. सर्व भारतीय भाजीपाल्यांत कीटकनाशकांचे प्रमाण फारच जास्त आहे. कोंबड्याना जो खाद्य दिला जातो त्यांत सुद्धा प्रचंड प्रमाणात कीटकनाशके आहेत जी शेवटी तुमच्या शरीरांत जातात. [५] [१] https://gfm.akshayakalpa.org/read/feature-article/the-dangerous-side-ef… [२] https://www.ndtv.com/food/gujarat-factory-busted-for-making-milk-with-u… [३] https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/how-to-recogni… [४] https://www.reddit.com/r/Fitness_India/comments/1pgo9mn/everyones_shock… [५] https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/8-foods-with-h…

In reply to by साहना

>> अन्नाची गरज जास्त तर जास्त अन्न आयात करणे बरोबर नाही का ? कमी अन्न असून फायदा कसला ? खरंच? १. मागील काही वर्षांपासून आपल्याकडे अन्नधान्याची कोठारे अन्न सडून जाते व त्यासाठी ओरड होत असते. खास करून एफ डी आय ला यासाठी जबाबदार धरले जाते. पण सरकारी व्यवस्था ढिम्म हलत नाही. २. अन्नधान्याचे उत्पादन जास्त झाले की भाव कोसळतात आणि शेतकर्‍याला खर्चाइतकाही भाव मिळत नाही, हमी भाव तर सोडूनच द्या. अशा परिस्थितीत आणखी अन्नधान्य आयात करुन शेतकर्‍यांचे अधिक नुकसानच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आपले मत अतिसुलभीकरणावर आधारित आहे असे म्हणावे लागेल. >> भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत. आज काल देशांत पनीर, अंडी, दूध सर्वच भेसळ युक्त आहे. अश्यांत विदेशी आयात देशासाठी चांगली आहे. हा उपाय आहे? आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी! भेसळ होऊ नये, अन्न विषारी नसावे यासाठी वेगळे उपाय आहेत, जे आपण सदैव केलेच पाहिजेत. त्यासाठी आयात वाढवा म्हणजे अजब उपाय आहे.

अमेरिका-इराण युद्धात लक्ष न दिलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे झिम्बाब्वेने लिथियम निर्यातीवर बंदी घालणे. चीनची 15-20% लिथियम आयात झिम्बाब्वेमधून आहे आणि वरवर पाहता चीनवर लक्षणीय परिणाम झाला आहे. त्याच दिवशी झिम्बाब्वेने "यूएस हेल्थ एड" प्रस्ताव नाकारला कारण त्यासाठी अमेरिकेला "रीअर अर्थ" खनिजांमध्ये प्रवेश आवश्यक होता. असे दिसते की बऱ्याच गोष्टी वेगाने घडत आहेत जरी त्यांच्या दरम्यान कोणतेही त्वरित सम्न्बध दिसत नाही.

भारताला अंदमान व निकोबारच्या दक्षिणेला समुद्रात तेल साठे सापडले म्हणतात. त्याचं उत्खनन सुरू झालं पाहिजे. भारत व चीन दोघांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. याच दोन देशांना सर्वात जास्त तेल लागतय, इतिहासात तरी हे दोन देश कायमच समृध्द राहिले आहेत. जगातला पहिला दुसरा नंबर यांचाच असायचा.अपवाद ब्रिटिश राजवटीचा.