✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इतिहासाची दुरुस्ती

य
युयुत्सु यांनी
Tue, 12/30/2025 - 17:06  ·  लेख
लेख
 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला. एक उदा० देतो. माझ्या वडीलांचे शिक्षण युरोपात (तेव्हाच्या झेकोस्क्लोव्हाकीयामध्ये) नेहेरूंनी आणलेल्या काही शिष्यवृत्त्यांमुळे झाले होते. ते त्याबद्दल बोलत असत आणि मी पण युरोपमध्ये जावे म्हणून आग्रही होते. माझे वडील १९८६ गेले, त्यानंतर त्यांच्या एका बॅगेत त्यांचा पासपोर्ट सापडला. त्या पासपोर्टमध्ये माझ्या वडीलांनी युरोपात कोणता प्रवास केला याच्या नोंदी सापडल्या. त्यात मला स्वित्झर्लँडच्या व्हिसाचा शिक्का सापडला. तो बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी स्वित्झर्लँडला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. १९५८-५९ मध्ये जग काय करत होतं माहित नाही पण आपले वडील तेव्हा युरोपात बर्फ तुडवत होते याचं अधूनमधून भारी वाटतं, पण "उत्खननात सापडलेल्या स्वित्झर्लँडच्या व्हिसाच्या" पुराव्याचा नंतर पुढे काहीच उपयोग झाला नाही. देशाचा इतिहास बदलून तरी काय साधणार?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3348 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

त्यामुळे { विद्यार्थ्यांचं

कंजूस
Wed, 12/31/2025 - 16:08 नवीन
त्यामुळे { विद्यार्थ्यांचं}भविष्य बदलेल का?
  • Log in or register to post comments

भविष्य बदलेल का?

युयुत्सु
Wed, 12/31/2025 - 19:52 नवीन
कळीचा मुद्दा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

"अहो तुमच्या चिन्मयचे काय

कांदा लिंबू
Wed, 12/31/2025 - 16:15 नवीन
"अहो तुमच्या चिन्मयचे काय सांगता, आमचे वाडवडील तर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच विलायतेत जाऊन-येऊन होते" हेच म्हणायचं आहे ना?
  • Log in or register to post comments

श्री० कांदालिंबू

युयुत्सु
Wed, 12/31/2025 - 17:32 नवीन
श्री० कांदालिंबू फक्त वाडवडील नाही, तर माझी कन्या पण! म्हणजे पुढची पिढी देखिल...
  • Log in or register to post comments

तेच तर म्हणतो, वाडवडील,

कांदा लिंबू
Wed, 12/31/2025 - 17:56 नवीन
तेच तर म्हणतो, वाडवडील, पुत्रपौत्र विलायतेत आहेत हे सांगण्यासाठीच धागा काढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

पुत्रपौत्र विलायतेत आहेत हे

युयुत्सु
Wed, 12/31/2025 - 18:08 नवीन
पुत्रपौत्र विलायतेत आहेत हे सांगण्यासाठीच धागा काढला आहे. ज्याची त्याची समज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे

सुबोध खरे
Sat, 01/03/2026 - 11:33 नवीन
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय

गामा पैलवान
Wed, 12/31/2025 - 18:31 नवीन
युयुत्सु, इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं : इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो. जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

श्री० गा०पै०

युयुत्सु
Wed, 12/31/2025 - 19:42 नवीन
श्री० गा०पै० नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

उदाहरणार्थ ....

गामा पैलवान
गुरुवार, 01/01/2026 - 00:09 नवीन
युयुत्सु, नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

अनेक उदाहरणे देता येतील-

युयुत्सु
गुरुवार, 01/01/2026 - 08:40 नवीन
अनेक उदाहरणे देता येतील- ० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. ० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार ० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw ० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

माझं मत ....

गामा पैलवान
गुरुवार, 01/01/2026 - 19:54 नवीन
युयुत्सु, मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच. गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787 कन्यादान भावनिक प्रश्न आहे. या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

श्री० गा०पै०

युयुत्सु
गुरुवार, 01/01/2026 - 21:02 नवीन
श्री० गा०पै० गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही https://www.misalpav.com/node/52684
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

चूक काढणे वा न काढणे कितपत ग्राह्य

गामा पैलवान
Fri, 01/02/2026 - 20:54 नवीन
युयुत्सु, याच तर्काने पाहू जाता गोत्रपद्धतीतही चूक सापडली नाही, असं म्हणता यावं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हा हा हा!

युयुत्सु
Fri, 01/02/2026 - 21:25 नवीन
हा हा हा! गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो- - एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम! - किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हॅप्लोग्रुप का बरं समान असायला पाहिजेत ?

गामा पैलवान
Fri, 01/02/2026 - 21:40 नवीन
युयुत्सु, हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत?

युयुत्सु
Fri, 01/02/2026 - 21:50 नवीन
हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

इतिहास बदलणे......

कंजूस
Sat, 01/03/2026 - 13:29 नवीन
इतिहास बदलणे...... इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.) ( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

संघ आणि भाजपा हे सतत

युयुत्सु
Wed, 12/31/2025 - 18:55 नवीन
संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात. नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता. माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.
  • Log in or register to post comments

हे म्हणजे टिळक गेले , गांधी

विजुभाऊ
Wed, 12/31/2025 - 19:08 नवीन
हे म्हणजे टिळक गेले , गांधी गेले, नेहरू गेले मी पण आजारी पडलोय असे म्हणण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments

अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे

विवेकपटाईत
Mon, 01/12/2026 - 11:28 नवीन
अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. बाकी भारतात इतिहासावर गेल्या 200 वर्षांत शेकडो संशोधन झाले आहे. शेकडो जागांवर पुरातत्व विभाग , विभिन्न विश्वविद्यालय आणि अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय संस्थांनी जारो वर्ष जुना इतिहास खोदला आहे. पण तो संकलित करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही आणि त्यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न ही झाला नाही. बहुधा राजकीय दृष्ट्या वोट बॅंकशी संबंध नसल्याने राजनीतिक दृष्ट्या फायदेशीर नसावा. काही दिवसांपूर्वी आचार्य बाळकृष्ण यांना कुणी प्रश्न विचारला होता. world herbal encyclopedia (१०९ खंड 125000 जवळपास पाने) पूर्ण झाल्यावर पुढे काय. त्यांनी उत्तर दिले आपल्या देशात प्रत्येक भागात हजारों वर्ष जुना माणसांचा इतिहास आहे. त्यावर झालेल्या सर्व संशोधन आम्ही एका जागी एकत्र करतो आहे. काही वर्षांत हे कार्य निश्चित पूर्ण होईल. भारताचा माहीत नसलेला सर्वांसमोर येईल. (एक कोटीच्या जवळ पांडुलीपीं पानांचे डिजिटल करण्याचे काम ही आता पर्यन्त झाले आहे) बाकी माझे मत - अधिकान्श पुरोगामी आणि मानसिक दृष्ट्या गुलामांना खरा इतिहास पचणार नाही.
  • Log in or register to post comments

श्री० पटाईत

युयुत्सु
Tue, 01/13/2026 - 09:03 नवीन
श्री० पटाईत अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. किशन लाल ने प्रजा वाढविण्याशिवाय जर काही पराक्रम आयुष्यात केला नसेल तर त्याचं नाव कशाला घ्यायचे? इतिहास दुरुस्त करण्याने भविष्य घडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

उगाच आठवले म्हणुन!!

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 01/12/2026 - 13:05 नवीन
माझे वडील संघात जायचे आणि मी ही जावे म्हणुन आग्रही असायचे. ते २००५ मध्ये गेले. परवा जुनी कपाटे आवरताना माझ्या वडीलांचा लंगोट सापडला. त्यात नागपूरचे रेल्वे तिकीट होते. ते बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी नागपूरला/रेशीमबागेला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. ईत्यादी ईत्यादी...
  • Log in or register to post comments

एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची

कांदा लिंबू
Mon, 01/12/2026 - 14:16 नवीन
एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची उगाचच आठवण झाली.) +१ लिखाण व लेखनशैली आवडली; अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा