नमस्कार,
दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील.
निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील.
मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख !
भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते.
त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ.
भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या.
जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले.
पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली.
उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही.
वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले).
शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या.
२०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले.
२०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले.
२०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले.
२०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती.
२ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे.
उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत.
त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा.
१. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे.
२. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात.
४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात.
५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात.
६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही.
७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात.
मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात.
निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते.
युट्यूबवर त्यांच्या बर्याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात.
"इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे.
मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते.
नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल.
लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे.
प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत.
मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत.
शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो.
मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.
वर्गीकरण
वाचने
17447
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
बालबुद्धिची "बालदिनी" ५/६१ भेट!
पण ज्या चुना आयोगामुळे एवढा
आमच्या सोसायटीत फटाके फुटले.
In reply to पण ज्या चुना आयोगामुळे एवढा by अमरेंद्र बाहुबली
शिक्षित
In reply to आमच्या सोसायटीत फटाके फुटले. by विवेकपटाईत
"बंगाली समाज - विशेषतः
In reply to शिक्षित by चंद्रसूर्यकुमार
वा वा
In reply to "बंगाली समाज - विशेषतः by टर्मीनेटर
आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद...
In reply to वा वा by अभ्या..
आणि उजवे विचारतात गांधीजींनी
In reply to "बंगाली समाज - विशेषतः by टर्मीनेटर
भगतसिंग आणि कट्टर कम्युनिस्ट .... ?
In reply to आणि उजवे विचारतात गांधीजींनी by आग्या१९९०
क्रांतिकारक भगतसिंगांना
In reply to भगतसिंग आणि कट्टर कम्युनिस्ट .... ? by गामा पैलवान
काहीच गैर नाही.
In reply to क्रांतिकारक भगतसिंगांना by आग्या१९९०
तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही.
In reply to काहीच गैर नाही. by गामा पैलवान
तुम्ही या कि उजव्यांच्या
In reply to तुम्हाला भगतसिंग समजलाच नाही. by आग्या१९९०
अधिकृत पदवीधर असल्याने
In reply to तुम्ही या कि उजव्यांच्या by सुबोध खरे
मग अतिजरठ विभागात बसा
In reply to अधिकृत पदवीधर असल्याने by आग्या१९९०
:)
In reply to मग अतिजरठ विभागात बसा by सुबोध खरे
श्री० गा०पै०
In reply to भगतसिंग आणि कट्टर कम्युनिस्ट .... ? by गामा पैलवान
ए० आय० च्या मदतीने गीतेतल्या
In reply to श्री० गा०पै० by युयुत्सु
अलिकडचा संदर्भ
In reply to श्री० गा०पै० by युयुत्सु
भद्रलोक म्हणजे अभिजन. या
In reply to शिक्षित by चंद्रसूर्यकुमार
समजा बिहार सरकारने महिलांना
PK तेरी मोरनी को मोर ले गये...
PK ला ६ टक्के मते मिळाली असती
In reply to PK तेरी मोरनी को मोर ले गये... by टर्मीनेटर
बाकी पेमेंट मिळणार नाही.
In reply to PK तेरी मोरनी को मोर ले गये... by टर्मीनेटर
सुवर्णकाळ
इकडे कशाला ** घालायला येतात ?
कसलं वैफल्य?
In reply to इकडे कशाला ** घालायला येतात ? by सुबोध खरे
कॉन्ग्रेस
फक्त हात बांधून मान
In reply to कॉन्ग्रेस by माईसाहेब कुरसूंदीकर
??
In reply to कॉन्ग्रेस by माईसाहेब कुरसूंदीकर
आणि लालूप्रसादांना २५
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे
In reply to कॉन्ग्रेस by माईसाहेब कुरसूंदीकर
तेजस्वी पार्टीला प्रति जागा
In reply to तेजस्वीची मतं कॉंग्रेसकडे by शाम भागवत
अवांतर : आम्हांस भगतसिंग समजलाच नाही ....
ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा
In reply to अवांतर : आम्हांस भगतसिंग समजलाच नाही .... by गामा पैलवान
त्यांनी माफी मागितली म्हणून
In reply to ज्यांनी इंग्रजांची अनेकवेळा by आग्या१९९०
जे स्वतंत्रता सैनिक होते ते
२७२ हूर निवडणूक आयोगाच्या
In reply to जे स्वतंत्रता सैनिक होते ते by आग्या१९९०
"Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang
In reply to २७२ हूर निवडणूक आयोगाच्या by आग्या१९९०
ह्यात नवीन असे काहीच नाही...
In reply to "Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang by टर्मीनेटर
'Whores' (सो कॉल्ड 'हूर/
In reply to "Old wine in new Bottle, Shape and Colour of the bottle is chang by टर्मीनेटर
'Whores' (सो कॉल्ड 'हूर/ हूरें')येक लंबर, टर्मी भौ!आजतागायत कुणी वीर चक्र,
हे २७२ दगडाखाली हात अडकल्याने
In reply to आजतागायत कुणी वीर चक्र, by सुबोध खरे
गोरी काकी च्या मतिमंद मुलाची
शिशुवर्गाच्या आजीवन
In reply to गोरी काकी च्या मतिमंद मुलाची by सुबोध खरे
अतिजरठ पणाचे लक्षण असते
In reply to शिशुवर्गाच्या आजीवन by आग्या१९९०
:)
In reply to अतिजरठ पणाचे लक्षण असते by सुबोध खरे
राहुल गांधींना हे कोर्टात का
:)
In reply to राहुल गांधींना हे कोर्टात का by सुबोध खरे
रागा २०२९ च्या लोकसभा
In reply to :) by आग्या१९९०
तुम्ही टंकत राहा राहुल गांधी
In reply to :) by आग्या१९९०
तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत
In reply to तुम्ही टंकत राहा राहुल गांधी by सुबोध खरे
एक सर्वेक्षण केले की 2029
In reply to तुम्ही आयुष्यभर कण्हत कुथत by आग्या१९९०
राहुल गांधी हे भाजपचे स्टार
चेन्नईत कॉलेजकन्यकांसमोर
काँग्रेसचे लोकं अजूनही राहुल
ए आई लेखावर प्रतिसाद देताना
मोशांचा राजकीय विमा
पंतप्रधान
मला पण! अमितशा नाही हू देत पण
In reply to पंतप्रधान by हणमंतअण्णा शंक…