Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 11/06/2025 - 00:51
नमस्कार, दिनांक ६ आणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. निवडणूकीचे निकाल १४ नोव्हेबर २०२५ रोजी येतील. निवडणूक निकालांवर मिपावरील बरेच सदस्य लक्ष ठेऊन असतीलच तर निकालांची कारणीमिमांसा करणारे काही लेख १४ नोव्हेंबर २०२५ नंतर मिपावर येऊ शकतील. मला मुख्यतः महाराष्ट्र विधानसभा आणी राष्ट्रीय स्तरावरील लोकसभेच्या निवडणूकांमधे विशेष रस असतो. मात्र बिहार विधानसभेच्या निवडणूकांबद्दल रस निर्माण झाला ते केवळ एका व्यक्तीमुळॅ ते म्हणजे प्रशांत किशोर पांडे ! (बिहार मधे आडनावाचा उल्लेख सार्वजनिक जीवनात केला जात नाही मात्र मराठी वाचकांसाठी आणि 'तुही जात कंची ?' या प्रश्नात रस असणार्‍यांसाठी 'पांडे' असण्याचा विशेष उल्लेख ! भारतातील राजकीय निवडणू़कांचा अभ्यास करणार्‍या व्यक्ती आणी संस्थांसाठी प्रशांत किशोर उर्फ पीके हे नाव अगदी ओळखीचे आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीची आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (युनोच्या) अंतर्गत 'सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रम' योजनेअंतर्गत काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून अनेक राजकीय पक्षांसाठी काम केले. मला स्वतःला त्यांना राजकीय रणनीतीकार म्हणण्यापेक्षा राजकीय व्युव्हरचनाकार म्हणणे जास्त संयुक्तिक वाटते. त्यांच्या राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून काम करण्याच्या कार्यकाळात त्यांनी केलेली आणि प्रसिद्ध पावलेल्या कामांची यादी खालीलप्रमाणॅ. भाजपा : गुजरात विधानसभा आणी लोकसभेसाठी २०१२ आणि २०१४ मधे काम केले. त्यांच्या "चाय पे चर्चा", 'रन फॉर युनिटी' "3 डी रॅली' सारख्या संकल्पना कमालीच्या यशस्वी ठरल्या. जनता दल (युनायटेड) : २०१५ मधे नितिश कुमार आणि महागठबंधनसाठी काम केले. २०१५ मधे प्रशांत किशोर आणी इतर काही जणांनी मिळून Indian Political Action Committee (I-PAC) नावाची संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने मग अनेक राज्यात आणी अनेक पक्षांसाठी निवडणूका जिंकण्यासाठी काम केले. पंजाब काँग्रेस : २०१७ मधे पंजाबमधील निवडणूकांमधे कॅप्टन अमरींदर सिंह यांचेसाठी 'पंजाब दा कॅप्टन' मोहीम राबविली. उत्तर प्रदेश काँग्रेस : '२७ साल बेहाल', "खाट पे चर्चा" अशा मोहिमा राबविल्या. मात्र सभेसाठी जमलेल्या लोकांनी त्या खाटा पळविल्याने ही मोहिम वेगळ्या कारणाने गाजली. या निवडणूकीत कॉंग्रेसला आणी पीके टीम ला विजय मिळवता आला नाही. वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी : यांचेसाठी २०१९ आणि २०२४ मधे निवडणूक मोहिम (२०२४ मधे वायएसाआर कॉंग्रेस / जगनमोहन रेड्डी चा पराभव होऊन तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले). शिवसेना (अखंड शिवसेना, आताची उबाठा शिवसेना) : पीके आणी (I-PAC) यांनी यांचेसाठी काम केले. या कामाची फी म्हणून प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की तुमच्या राजवटीत बिहारी मजुरांना शिवसेनेकडून मारहाण होऊ नये याची काळजी घ्या. २०२० मधे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी दिल्लीसाठी काम केले. २०२१ मधे तामिळनाडू मधे एम. के. स्टॅलीन साठी काम केले. २०२१ आणी २०२४ मधे प.बंगालमधे तृणमुल कॉग्रेस साठी निवडणूक मोहिमेत भाग घेतला. (प्रशांत किशोर यांनी मात्र २०२१ मधेच राजकीय व्युव्हरचनाकार म्हणून आपल्या कामातून निवृत्ती घेतली आणी त्यांनी आपले पुर्ण लक्ष बिहारवर केंद्रीत केले. २०२२ मधे त्यांनी जनसुराज आंदोलन चालू केले आणी त्या बॅनरखाली जवळ्जवळ दोन वर्ष ३००० किलोमीटर पदयात्रा करुन पुर्ण बिहार उभा आडवा पिंजून काढला, गावोगाव फिरले आणी बिहारची स्थिती जाणून घेतली आणी आपण राजकीय पक्षाची स्थापना करु असे जाहिर केले. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर सुरुवातीला गांधीजीची प्रतिमा होती. २ ऑक्टॉबर २०२४ गांधीजयंतीच्या दिवशी आपण "जनसुराज पक्ष" ची स्थापना करत असून त्या नावाखाली निवडणूका लढवू असे जाहिर केले. आता पक्षाच्या झेंड्यावर गांधीजींसोबत बाबासाहेबांची देखील प्रतिमा आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह "स्कुल का बस्ता" म्हणजे "शाळेचे दप्तर" आहे. उद्याच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास सगळ्याच मतदारसंघांमधे (२४३ पैकी २३८ जागांवर) उमेदवार दिले आहेत. जवळपास सगळेच उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. बरेचसे उमेदवार चागले शिकलेले, प्रशासकीय पदावरून किंवा चांगल्या पदावरुन निवृत्त झालेले आहे. मात्र मुस्लीम, मागासवर्गीय आणि अगदी तळागाळातील जातीतील उमेदवार देखील दिले आहेत. त्यांची बिहार स्थितीबद्द्लची बरीचशी अनुमाने सटीक आहेत व विचार करण्यास प्रवृत्त करतात. उदा. १. बिहार मधे कागदावर दिसते त्यापेक्षा जास्त गरीबी आहे. २. बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात. ३. ज्यांनी लालूंचे जंगलराज अनुभवले आहे ते केवळ ते जंगलराज परत येऊ नये म्हणून नितीश कुमारांना आणि (एनडीए ला) मतदान करतात. ४. मुसलमानांना भाजपाची भीती वाटते त्यामुळे बरेचशे नाईलाजाने लालूंच्या पक्षाला मतदान करतात. ५. देशातील सगळ्यात जास्त आय एस / आय पीएस हे बिहारमधून येतात हा मोठा गैरसमज आहे. हे बिहारी मुळातच बिहारमधून निघून इतरत्र स्थायिक झालेत व तिकडे त्यांना जे चांगले वातावरण लाभले आहे त्याच्या परीणाम म्हणून आपल्याला जास्त बिहारी सरकारी नोकरीत दिसतात. ६. बिहारी मजूर म्हातारपणी थकल्यावर तरी आपल्या घरी परत येईल मात्र शिकला सवरलेला बिहारी आजची परिस्थिती पाहता बिहार मधे येण्याची शक्यताच नाही. ७. दक्षिण भारतातील राज्ये प्रगत होण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिथले मतदार भाकरी फिरवितात. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कोणताच पक्ष सत्तेवर राहत नाही. त्यामानाने बिहारमधे पर्याय नसल्यामुळे मतदार आलटून पालटून लालू किंवा नितिश यांनाच मते देतात. मतदारांना तिसरा व चांगला पर्याय मिळावा म्हणून आपण जनसुराज पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात आणी बिहार मधून पोटपाण्यासाठी बाहेर पळणार्‍यांना बिहार मधे रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे मुख्य कार्यक्रम आहेत असे ते सांगतात. निवडणूकांमधे त्यांना किती जागा मिळतील त्याच्या अंदाज सांगताना ते म्हणतात की मुळात बिहार ची परिस्थिती सुधरु शकते हा विश्वासच तेथील लोक गमावून बसले आहेत. जनसुराज पक्ष हा तिसरा पर्याय आहे याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली तर १५० पेक्षा जास्त जागा येऊ शकतील आणि नाही झाली तर १० जागांच्या आतमधेच त्यांचा खेळ संपेल असे अनुमान ते सार्वजनिक रित्या वर्तवतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प़क्षाला ३० ते ६० दरम्यान जागा येऊ नयेत असे त्यांना वाटते कारण त्यामूळे इंडिया किंवा एनडीए ला घोडेबाजार करायला उत्तेजन मिळेल आणी त्या गोंधळात जनसुराज चे विजयी उमेदवार इतर पक्षांच्या वळचणीला जाऊ शकतील आशी भिती त्यांना वाटते. युट्यूबवर त्यांच्या बर्‍याच चित्रफिती आहेत, अधिक माहितीसाठी त्या इच्छूकांनी बघाव्यात. "इस बार अपने बच्चों के भविष्य के लिए वोट दो" हे त्यांचे निवडणूक घोषवाक्य आहे. मी भाजपासमर्थक असलो तरी प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्षाला बिहार मधे चांगले यश मिळावे असे मनापासून वाटते. नितीश, तेजस्वी किंवा काँग्रेस यांचेपैकी कुणाकडेही सत्ता गेल्यास मागील पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागेल. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान देखील एक उत्तम नेते आहेत त्यांना देखील चांगले यश लाभावे असे वाटते. त्यांचा पक्ष २८ जागांवर लढत आहे. प्रशांत किशोर यांचेकडे अनेक निवडणूकांची रणणिती तयार करणे, इतर राजकीय पक्षाची रणणिती माहित असणे, उत्तम वक्ता असणे, चांगले व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज, दुर्दम्य मात्र आंधळा नसलेला आशावाद, आणि हे सगळे गुण आहेत. मात्र ते ब्राह्नण असणे, प्रत्यक्ष राजकीय पक्ष चालविण्याचा अनुभव नसणे, पक्षात इतर लोकप्रिय नेते नसणे अशा काही कमतरता आहेत. शेवटी एक बिहारी सब पे भारी पडतो, की मागे पडतो, की उठून अजून संघर्ष करतो हे १४ नोव्हेंबर आणी त्यानंतर येणारा काळच ठरवू शकतो. मात्र बिहारला तिसरा पर्याय हवा हे बिहारींच्या आणि इतर देशासाठी देखील महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
  • 16566 views

प्रतिक्रिया

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 11/06/2025 - 05:22

Permalink

प्रशांत किशोर एक चांगला माणूस

प्रशांत किशोर एक चांगला माणूस आहे. पण राजकारणात डॅबीसपणा आवश्यक असतो. काहीजण हा डॅंबीसपणा स्वत:ची धन करण्यासाठी वापरतात हा भाग वेगळा. पेरे पाटील या डॅबीसपणामुळेच यशस्वी झाले. हा गुण प्रशांत किशोरकडे नाहीत. त्यामुळे ते निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 11/06/2025 - 10:14

Permalink

बिहार मध्ये यादव 14.26% आणि

बिहार मध्ये यादव 14.26% आणि मुस्लिम 17.7% आहेत. दोन्ही मिळून 33% पेक्षा जास्त आहेत. लोकसभा निवडणूकीत मुस्लिम समाजाचे मत विभाजणी झाली नाही. मुस्लिम समाज मतदान कितीही टक्के असले तरी 80 टक्के मतदान करतो. पूर्वांचलच्या काही जागा सोडून बाकी सर्व ठिकाणी तो 90 टक्के आरजेडीला मतदान करणार. यादव समाज ही सत्तेपासून वंचित असल्याने यावेळी भरपूर मतदान करणार. आता इतर समाजाचे मत विभाजन झाले तर आरजेडी सहज निवडणूक जिंकेल. प्रशांत किशोर ने पैश्यांसाठी सर्व राजनीतिक पक्षांसाठी काम केले आहे. भरपूर पैसा कमविला आहे. प्रशांत किशोर साठी बिहार निवडणूक एक काम आहे. काम फत्ते झाल्यावर मोबदला ही भरपूर मिळेल. बाकी भाजपचा स्टार प्रचारक एक मोठी अडचण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 11/06/2025 - 19:15

In reply to बिहार मध्ये यादव 14.26% आणि by विवेकपटाईत

Permalink

काहीही हं श्री !

प्रशांत किशोर ने पैश्यांसाठी सर्व राजनीतिक पक्षांसाठी काम केले आहे. भरपूर पैसा कमविला आहे. प्रशांत किशोर साठी बिहार निवडणूक एक काम आहे. काम फत्ते झाल्यावर मोबदला ही भरपूर मिळेल.
तो त्याचा व्यवसायाच एक भाग होता ना ? त्याचा इथे काय संबंध ते समजले नाही. कोणते काम फत्ते झाल्यावर मोबदला मिळेल आणि तो कोण देणार आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 11/06/2025 - 11:43

Permalink

बिहारी मतदारांची मानसिकता

बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे. १९९० पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मुळच्या समाजवादी कुटुंबातून पुढे आलेल्या राजद आणि जदयु या पक्षांच्या जागांची बेरीज नेहमीच बहुमतापेक्षा जास्त राहिली आहे. देशाच्या इतर कोणत्याही राज्यात मुळच्या समाजवादी कुटुंबातून निर्माण झालेल्या शेकडो पक्षांपैकी पक्ष असे डॉमिनेटिंग राहिलेले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९७७ चा अपवाद वगळता १९९० पूर्वी काँग्रेस पक्ष डॉमिनेटिंग होता. पण नंतरच्या काळात हे समाजवादी कुटुंबातील पक्ष तसे झाले. म्हणजे ज्या काळात राष्ट्रीय पातळीवर समाजवादी राजकारणाला उतरती कळा लागायला सुरवात झाली त्याच काळात बिहारमध्ये त्यांचा उत्कर्ष झाला. तसेच भाजपने उत्तर भारतात इतर सगळ्या राज्यांमध्ये आपले पाय अगदी घट्ट रोवले पण बिहारमध्ये नाही. पूर्वी झारखंड बिहारचा भाग असताना त्या भागात भाजप पुढे आला पण बिहारच्या इतर भागात तितक्या प्रमाणात नाही. दुसरे म्हणजे बिहारी मतदार बाहेरच्या उमेदवारांना अगदी सहजपणे स्विकारतो. मुळचे महाराष्ट्राचे मधू लिमये बिहारमधून निवडून जात. मुळचे कर्नाटकचे जॉर्ज फर्नांडिस एकदा मुंबईतून जिंकले पण १९८९ पासून बिहारमधून निवडून जात होते. त्याप्रमाणे मुळचे मध्य प्रदेशातील शरद यादव पण १९९१ पासून बिहारमधून निवडून जात होते. असे इतर राज्यात होणे तितके सोपे नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर या नव्या नेत्याला कितपत यश मिळते हे बघायचे. कोणताही नवा नेता नवे राजकारण वगैरे बोलत पुढे आला तर केजरीवालांच्या अनुभवामुळे बहुसंख्य लोक त्याच्यावर सहज विश्वास ठेवतील असे वाटत नाही. दुसरे म्हणजे प्रशांत किशोर हा एक स्ट्रॅटेजीस्ट आहे. पण तो मोठ्या प्रमाणावर मतदारांना आकर्षित करू शकेल का यावर अजून तरी प्रश्नचिन्ह आहेच. इतकी वर्षे जे आघाडीचे घोडे होते त्यांनाच त्याने मदत करून जिंकवून दिले त्यातून चित्र असे उभे राहिले की प्रशांत किशोरमुळे ते नेते (२०१४ मध्ये मोदी, २०१५ मध्ये नितीश कुमार, २०१७ मध्ये अमरिंदर सिंग, २०१९ मध्ये जगन रेड्डी वगैरे) जिंकले. सत्य परिस्थिती तशी आहे असे वाटत नाही. तराजूवर वजन करताना साखरेच्या शेवटच्या काही दाण्यांमुळे पारडे इकडचे तिकडे होऊ शकते याचा अर्थ एका पारड्यात आधीच साखर ठेवलेली असते त्याचा काही वाटा नसतो असे थोडीच आहे? प्रशांत किशोर त्या शेवटच्या दाण्यांप्रमाणे आहे. आता त्याला एका पारड्यात आधीपासून ठेवलेल्या दाण्यांवरच आरूढ व्हायचे नाहीये तर स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. त्यात बिहारी मतदारांची काहीशी अनाकलनीय मानसिकता. बघू काय होते ते.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 11/06/2025 - 14:34

In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार

Permalink

केजरीवालांच्या अनुभवामुळे

आता दिल्ली चे लोक केजरीवालची आठवण काढत आहेत.. प्रदूषण मोजणार्‍या मशीन बाहेर पाणि मारून चुकीचे रीडींग दाखवणे , यमुना साफ केलि म्हणायचे आणि पी एम साठी पिन्याच्या पाण्याचा अंघोळी साठी तलाव बनवणे अशा मजेशीर गोष्टी आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sat, 11/08/2025 - 09:41

In reply to केजरीवालांच्या अनुभवामुळे by कपिलमुनी

Permalink

दिल्लीत कोणीही केजरीवालची

दिल्लीत कोणीही केजरीवालची आठवण काढत नाही. दिल्लीत यमुनेच्या दोन्ही काठांवर बांध आहे. त्यामुळे गाळ मोठ्या मात्रेत नदीत जमा होतो. दर दोन तीन वर्षानी गाळ काढावा लागतो. केजरीवालच्या संपूर्ण काळात एकदा ही गाळ काढला गेला नाही. दिल्लीत भाजप आल्या नंतर यमुनेतून मोठ्या प्रमाणात गाळ काढला गेला. यमुना छट पूजा करण्यालायक स्वच्छ झाली. केजरी काळात सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे तलाव बनायचे. केजरी काळात मेट्रोचे प्रोजेक्ट अडकवून ठेवले होते. काम बंद पाडले होते. जे प्रोजेक्ट 2024 मध्ये पूर्ण व्हायाला पाहिजे होते ते आता 2026 मध्ये पूर्ण होतील. उदा. जनकपुरी ते आरके आश्रम मार्ग मेट्रो लाइन. पुढील निवडणूकीत कांग्रेस दुसर्‍या नंबरचा पक्ष बनला तर आश्चर्य होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 11/06/2025 - 19:32

In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे.

बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे.
सहमत आहे.
तराजूवर वजन करताना साखरेच्या शेवटच्या काही दाण्यांमुळे पारडे इकडचे तिकडे होऊ शकते याचा अर्थ एका पारड्यात आधीच साखर ठेवलेली असते त्याचा काही वाटा नसतो असे थोडीच आहे?
बरोबर आहे. मला स्वतःला प्रशांत किशोर यांनीच पक्षांना निवडणूका जिंकवून दिल्यात असे अजिबात म्हणायचे नाही. पक्षांकडे जी काही पुर्वपुण्याई म्हणा, नेटवर्क म्हणा, त्यांचे काम म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचा फायदाच होतो. मात्र पीके यांनी निवडणूक मोहिमेचे व्यवस्थित संचालन केले, जरुर तिथे पॉलिश करुन पक्षांचे अजेंडे चमकवायला मदत केली हे नाकारता येणार नाही. करोडो रुपये मोजून राजकीय पक्ष त्यांना राजकीय व्युव्हरचनाकार नेमत असतील तर त्याची काहीतरी उपयोगिता नक्कीच आहे. मी मुळ लेखात प्रशांत किशोरांचे काही विचार मांडले होते. त्यातील खालील एक वाक्य लिहिले आहे.
बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
मला मात्र स्वतःला यात तथ्य वाटत नाही. मी कामानिमित्त अनेक उत्तर प्रदेशी, बिहारींच्या संपर्कात असतो. यात जातीने ब्राह्मण, धोबी, सुतार आणी इतरही अनेक जातीतील माणसांचा संबंध येतो. मधून मधून तिथल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा देखील करत असतो. अशी चर्चा सुरु झाली की अरे वह ठाकूर है, यह यादव है, यह पासी है, वह नीचले जातवाला है , इनका दिमाग ऐसे ही चलता है असले डायलॉग वारंवार ऐकायला येतात. त्यामुळे युपी बिहार मधे महाराष्ट्रापेक्षा जास्त जातीयवाद आहे असे जाणवते पण मी शहरात राहत असल्यामुळे कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अजूनही अशा प्रकारचा जातियवाद असू शकेल आणी मला तो जाणवत नसेल अशीही एक शक्यता आहे. मुळात प्रशांत किशोर यांना बिहारमधे काँग्रेस सोबत काम करुन बदल घडवायचा होता मात्र कॉंग्रेस ने नेहमीप्रमाणे माती खाऊन त्यांना नकार दिला नाहीतर आज बिहार मधे काँग्रेसला सोनियाचे दिवस येण्याची काही एक आशा होती. मी प्रशांत किशोर यांची बिहार यात्रा मागील एक वर्षांपासून ऑनलाईन पध्दतीने फॉलो करत आहे. सुरुवातीला प्रशांत किशोर निवडणूक निर्णयाबद्द्ल जास्त आशावादी होते असे वाटत होते मात्र जसजशा निवडणूका जवळ आल्यात तसतसा त्यांचा जागा जिंकण्याबाबतचाअ आत्मविश्वास कमी कमी होत गेलेला दिसतो. काय ते लवकरच कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 11/07/2025 - 17:44

In reply to बिहारच्या मतदारांची मानसिकता कळणे अवघड आहे. by धर्मराजमुटके

Permalink

पीके

मला स्वतःला प्रशांत किशोर यांनीच पक्षांना निवडणूका जिंकवून दिल्यात असे अजिबात म्हणायचे नाही.
नक्कीच. तुम्ही तसे म्हटलेले नाही. मात्र गेल्या काही वर्षात काही चर्चांमध्ये प्रशांत किशोरने कोणाकोणाला निवडणुका जिंकून दिल्या असे मिपावरही म्हटले गेले होते म्हणून तसे लिहिले.
करोडो रुपये मोजून राजकीय पक्ष त्यांना राजकीय व्युव्हरचनाकार नेमत असतील तर त्याची काहीतरी उपयोगिता नक्कीच आहे.
नक्कीच. पण प्रशांत किशोर हा काही जादुगार नाही. मुळात अशक्त घोड्याला तो पहिला नंबरवर जिंकवू शकणार नाही. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस काय झाले हे आपण बघितलेच. त्याची उपयोगिता किती आहे हे बघून भाजपने त्याला २०१४ मध्येच राज्यसभेची सीट द्यायला नकार दिला म्हणून मग तो नंतर केजरीवाल, नितीश कुमार वगैरेंबरोबर गेला. म्हणजे त्याची जी काही उपयोगिता असेल त्या तुलनेत त्याला राज्यसभेची सीट देणे ही खूप जास्त किंमत असेल असे भाजपला कदाचित वाटले असावे.
बिहारी मतदार जातीपातीवर आधारीत मतदान करतात हा गैरसमज आहे. देशातील बाकी मतदार जितका जातीपातीचा विचार करुन मतदान करतात तेवढाच विचार बिहारी मतदार करतात.
याविषयी मला तरी काही लिहिता येणार नाही. तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी बोलल्याशिवाय नक्की जमिनीवर काय चालू आहे हे समजणार नाही. मी तरी बिहारमध्ये कधीच गेलेलो नाही- ती कधी वेळच आली नाही. नाही म्हणायला माझा बिहारी लोकांबरोबर संवाद करायचा एकच अनुभव आहे. माझ्याकडे एका एम.बी.ए एन्ट्रन्स परीक्षेसाठीच्या मॉक परीक्षेत लॉजिकल रिझनिंगचे काहींनी बनविलेले सेट तपासायला आले होते- ते सेट त्या परीक्षेत घेता येतील का हे ठरवायला. काही काही सेट्स असतात त्यात 'अ' या प्रकारचे लोक नेहमी खरे बोलतात, 'ब' या प्रकारचे लोक नेहमी खोटे बोलतात, 'क' या प्रकारचे लोक एक वाक्य खरे आणि दुसरे वाक्य खोटे बोलतात अशाप्रकारचे. तो सेट एका बिहारीने बनविला होता. त्याने 'अ', 'ब', 'क' असे न लिहिता चक्क जातींची नावे थोडी अक्षरे बदलून लिहिली होती- म्हणजे कुर्मी असे न लिहिता कुमरी वगैरे. त्याला म्हटले- अरे बाबा असले काही इथे चालायचे नाही. असे आडवळणाने का होईना जातीविषयक लिहायचे नसते. मग त्याला 'अ','ब' आणि 'क' असे लिहायला भाग पाडून मग तो सेट घेतला होता. बिहारच्या लोकांवर जातीपातींचा बराच पगडा असतो हे नेहमी वाचत आलो आहे ते खरे असावे असे तेव्हा वाटून गेले. अर्थात तो एकच अनुभव आहे त्यामुळे त्याविषयी ठाम काही लिहिता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 11/10/2025 - 19:53

In reply to बिहारी मतदारांची मानसिकता by चंद्रसूर्यकुमार

Permalink

पीकेंची तिसरा पर्याय उभा

पीकेंची तिसरा पर्याय उभा करण्याची धडपड.. दोन वर्षांपासून फिरत आहेत.. चांगले उमेदवार दिलेत.. त्यात वाढलेले मतदान.. आणि जातींचं समीकरण! तसंच पीकेंनी एवढ्या जागा लढवण्याचं कारण देखील पाण्याची खोली किती हेच बघण्यासाठी आहे हे उघड आहे. तसंच कुठे कोणते उमेदवार द्यायचे हे त्यांनी अनुभवानं काढलंच असणार. पण पैशाचा खेळ आणि राजकारणाचा मेळ यात त्यांना किती स्पेस घेता येते त्यावर बरंच अवलंबून आहे. पीकेंनी काही टक्के मतं पळवलीत तर नुकसान सत्ताधारी पक्षाचं होणार की विरोधी पक्षाचं.. त्या बरहुकुम काठावर पास होणारे नेते बराच गोंधळ करू शकतात..
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 11/07/2025 - 16:23

Permalink

मतदानाची टक्केवारी वाढलीय.

मतदानाची टक्केवारी वाढलीय. २०१० मधे ५२.० टक्के २०१५ मधे ५५.९ टक्के २०२० मधे ५६.१ टक्के २०२५ मधे ६४.६६ टक्के ९ टक्के म्हणजे खूपच वाढलंय. मला वाटतंय की गेली अनेक दशके मतदानापासून लांब राहिलेला मतदार सामील झालाय की काय. एक शक्यता म्हणजे केपी फॅक्टर. यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. दुसरी शक्यता म्हणजे पहलगाम इफेक्ट. बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या हल्यामुळे जसा महाराष्ट्राच्या मतदानावर परिणाम झाला तसाच परिणाम दिसायची शक्यता आहे. तसे झाले तर कॉंग्रेस व तेजस्वी हे दोघेही ५० पेक्षा कमी आमदारांचे धनी होतील. मला दुसरी शक्यता जास्त जाणवतेय. कारण गेल्या अनेक निवडणूकांत स्पष्ट बहुमत देण्याचे मतदारांचे कौल दिसून आले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 11/10/2025 - 08:27

In reply to मतदानाची टक्केवारी वाढलीय. by शाम भागवत

Permalink

एस.आय.आर चा किती वाटा असेल?

मतदानाची टक्केवारी वाढली आहे असे सगळीकडे येत आहे. मात्र यात एस.आय.आर चा वाटा किती असावा? म्हणजे पूर्वी मतदारयाद्यांमध्ये रोहिंग्ये, बांगलादेशी घुसखोर वगैरे लोकही होते. मरण पावलेल्या मतदारांची नावे आणि त्या ठिकाणी राहायला नसलेल्या मतदारयादीत तशीच होती. त्या मतदारयाद्यांची सफाई एस.आय.आर मध्ये झाली. त्यामुळे पूर्ण बिहारमध्ये ६५ लाख नावे मतदारयादीतून कमी झाले असेही येत होते. मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात सव्वाचार कोटी मतदान झाले आणि ते साधारण ५६% होते. त्याचा अर्थ मागच्या वर्षी मतदारयादीत असलेल्यांचा आकडा साडेसात कोटीच्या आसपास असावा. त्यात ६५ लाख नावे कमी झाली असतील तर त्याचा अर्थ पूर्वी मतदारयादीत कृत्रिमपणे असलेले साधारण ९% लोक कमी झाले- म्हणजे डिनॉमिनेटर कमी झाला. ९% घट हा आकडा थोडा नक्कीच नाही. त्यातील बांगलादेशी-रोहिंग्या वगैरे लोक नक्कीच मतदान करत आले असतील ते यावेळी करू शकले नसतील. त्यामुळे डिनॉमिनेटर ९% ने कमी झाला तरी न्युमरेटर ९% ने कमी होणार नाही. तरीही मतदान थोडेसेच जास्त झाले तरी मुळातला बेस कमी झाल्यामुळे थोड्याच जास्त मतदानामुळे टक्केवारी भरपूर वाढली असे दिसत असेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Mon, 11/10/2025 - 08:32

In reply to एस.आय.आर चा किती वाटा असेल? by चंद्रसूर्यकुमार

Permalink

एस.आय.आर

एस.आय.आर मुळे घाबरुन / जर आपण मतदान केले नाही तर आपले नाव मतदार यादीतून काढले जाऊ शकते या भितीने देखील अनेक मतदारांनी यावेळेस मतदानास हजेरी लावली असावी असा अंदाज आहे. या अंदाजास पुष्टी मिळावयाची असेल तर उद्याच्या मतदानाचे आकडे बघावे लागतील. ६ तारखेला अनेक मतदार छटपुजेनिमित्त गावी परत आले होते. यावेळेस त्यातील काही परत आपल्या कामधंद्यासाठी परतले असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Mon, 11/10/2025 - 22:35

In reply to एस.आय.आर चा किती वाटा असेल? by चंद्रसूर्यकुमार

Permalink

नुसत्या टक्केवारीचा विचार

नुसत्या टक्केवारीचा विचार केला तर तुमच्या शंकेत तथ्य आहे असे म्हणता येईल. त्यासाठी प्रत्यक्ष संख्या लक्षात घेतली तर वस्तूस्थिती लक्षात येऊ शकेल. मागच्या वेळेस २.१५ कोटी लोकांनी मतदान केलं होतं पण यावेळेस तिथे २.४२ कोटी लोकांनी मतदान केलेले आहे असे आकडे समोर यायला लागले आहेत. म्हणजे अंदाजे १२.५६% मतदान वाढलेलं आहे. जबरदस्त ध्रुविकरण होत चाललंय असं मला तरी गेली अनेक वर्षे वाटत आलेलं आहे. सनातन नावाचा हत्ती जागा झालाय. त्याला मजबूत करण्याचे काम सनातन धर्म प्रेमी करतातच आहेत. पण तो परत झोपू नये यासाठी त्याच्या अंगावर सतत खडे मारायचे काम विरोधक करत राहिले आहेत. त्यामुळेही सनातनी लोकांचं फावत चाललंय. मला वाटतं या सगळ्याचं खरं विश्लेषण २०-२५ वर्षांनी लोकांच्या समोर येईल. तोपर्यंत हत्ती झोपणार नाही याची काळजी सगळे घेत राहतील. :)
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 11/10/2025 - 22:41

In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत

Permalink

तरीही हरियाणातून बिहारला एका

तरीही हरियाणातून बिहारला एका दिवसात चार स्पेशल ट्रेन सोडाव्या लागल्या सरकारला. निवडणूक जिंकण्याचे सगळे गैरमार्ग वापरले जात आहेत. निवडणूक आयोग झोपा काढतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 11/11/2025 - 04:59

In reply to तरीही हरियाणातून बिहारला एका by आग्या१९९०

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/11/2025 - 10:23

In reply to तरीही हरियाणातून बिहारला एका by आग्या१९९०

Permalink

हरियाणातून बिहारला एका दिवसात

हरियाणातून बिहारला एका दिवसात चार स्पेशल ट्रेन सोडाव्या लागल्या सरकारला लोक तिकिटं काढून गेले ना.इतके प्रवासी असतील तर काय वाईट आहे. रेल्वेला पैसे मिळतील कि . मग रडारड कशाला? अशा असंख्य विशेष गाड्या गणपती दिवाळीच्या मोसमात रेल्वे चालवते. त्यात काय विशेष? उगाच रडारड करायची सवयच लागली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 11/11/2025 - 10:43

In reply to हरियाणातून बिहारला एका दिवसात by सुबोध खरे

Permalink

ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा

ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा करण्याचा दिवस आणि वेळ बघा. त्यातही ह्या गाड्या अनारक्षित होत्या. २ -३ तारखेला बिहारमध्ये कुठला मोठा सण, उत्सव होता? अर्थात ह्याचे उत्तर नसणार ह्याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/11/2025 - 11:26

In reply to ह्या स्पेशल गाड्यांची घोषणा by आग्या१९९०

Permalink

मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला)

मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) जाण्यासाठी रोज चार अनारक्षित गाड्या चालू आहेत. कित्येक वर्षे. जनसाधारण एक्सप्रेस अंत्योदय एक्सप्रेस कर्मभूमी एक्सप्रेस इ कल्पना आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 11/11/2025 - 11:42

In reply to मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) by सुबोध खरे

Permalink

सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या

सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या गाड्यांची घोषणा अगोदरच केली जाते आणि त्यांचे आरक्षण करण्याची सुविधा असते. ह्याचे ह्या स्पेशल ट्रेनची घोषणा कुठल्या कारणाने केली आहे ह्याचे उत्तर द्या. उगाच नसते मुद्दे उपस्थित करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/11/2025 - 12:58

In reply to सणासुदीला सोडल्या जाणाऱ्या by आग्या१९९०

Permalink

जरा गुगलून पहा कि रेल्वे

जरा गुगलून पहा कि रेल्वे गर्दी असली कि खास गाड्या आयत्या वेळेस कशा आणि केंव्हा सोडते.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 11/11/2025 - 13:43

In reply to जरा गुगलून पहा कि रेल्वे by सुबोध खरे

Permalink

म्हणून तर म्हटलं की स्पेशल

म्हणून तर म्हटलं की स्पेशल रेल्वेगाडी सोडण्याची तारीख आणि वेळ बघा. चार गाड्या सोडल्या तेव्हा इतकी गर्दी का झाली ह्याचा cctv footage असेलच रेल्वेकडे. फक्त ३ तारखेलाच बिहारला जाणारी गर्दी कशामुळे वाढली ?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 11/12/2025 - 09:30

In reply to म्हणून तर म्हटलं की स्पेशल by आग्या१९९०

Permalink

उत्तराच्या प्रतीक्षेत. आता

उत्तराच्या प्रतीक्षेत. आता कळेल तुम्हाला तुमचे सवंगडी मिपा का सोडून जातात. अर्धवट बचावाच्या पुढे तुमची गाडी कधीच सरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 11/13/2025 - 09:30

In reply to उत्तराच्या प्रतीक्षेत. आता by आग्या१९९०

Permalink

तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय

तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय गुगलून पहा कि. दिलाय स्वच्छपणे का खास गाड्या सोडल्या ते. फुक्कटचा काथ्याकूट
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 11/13/2025 - 12:49

In reply to तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय by सुबोध खरे

Permalink

तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय

तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय गुगलून पहा कि. मी खात्री केली म्हणून तर रेल्वेवर आरोप करतोय. रेल्वेने ३ तारखेच्या गाड्यांबद्दल ( वेळ आणि गर्दीचे कारण ) २ तारखेला रात्री कसे केले ह्याचा अधिकृतपणे खुलासा केला नाही. तुम्हाला सापडले तर द्या. सापडणार नाही ह्याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 11/13/2025 - 19:58

In reply to तुम्हाला सगळं रेडिमेड हवंय by आग्या१९९०

Permalink

बवोर्र्र

बवोर्र्र
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 11/13/2025 - 21:47

In reply to बवोर्र्र by सुबोध खरे

Permalink

बवोर्र्र

बवोर्र्र शहानिशा न करता धर्मेंद्रला श्रद्धांजली वाहताना तुमचे लाडके केंद्रीय मंत्री , बुलडोझरबाबा आणि गोदी मिडियाने जशी घाई केली,तशीच तुम्हीही केली. त्यांनी जशी चूक कबूल केली नाही तशी तुम्हीही केली नाही किंवा करणार नाही. असेच सातत्य ठेवा, गोदी मीडियाची पहिली पात्रता फेरी उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/11/2025 - 18:21

In reply to मुंबई हुन बिहारला (नेपाळ ला) by सुबोध खरे

Permalink

पण आमची एक मुंबई -नाशिक-

पण आमची एक मुंबई -नाशिक- भुसावळ पॅसेंजर चालू ठेवणे जड जातं रेल्वेला. ( आता मुंबईहून सुटणारी एकही अनारक्षित गाडी उरली नाही.) बाकी मतदानासाठी अधिक लोक ( मतदार) आले तर कुणा पक्षाच्या पोटात का दुखावं? ते त्यांच्या विरोधातच मतदान करणार हा न्यूनगंड का आहे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 11/11/2025 - 02:50

In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत

Permalink

शेवटची काडी

सनातन नावाचा हत्ती जागा झालाय. त्याला मजबूत करण्याचे काम सनातन धर्म प्रेमी करतातच आहेत. पण तो परत झोपू नये यासाठी त्याच्या अंगावर सतत खडे मारायचे काम विरोधक करत राहिले आहेत. त्यामुळेही सनातनी लोकांचं फावत चाललंय
. सांभाळून जरा. वनतारा वाले धरून नेतील. धार्मिक हत्ती फार आवडतात त्यांना. सोमनाथ ते अयोध्या करून परत गुजरात रिटर्न ट्रिप व्हायची हत्तीची. . आधीचा एक खरा हत्ती निद्रिस्त होता तो उठत आहे तिकडे लक्ष ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 11/11/2025 - 04:57

In reply to शेवटची काडी by अभ्या..

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 11/16/2025 - 18:46

In reply to :) by शाम भागवत

Permalink

सनातनी प्रो मॅक्स

ते तुमचा सनातनी हत्ती लुडकला बघा. उठवा उठवा Image removed. . २९ वर्षाचा तरणाबांड गडी, पाच दिवसात इनमिन ७०-७५ किमी चालला. लुडकला. आधीही एप्रिलला अनंत अंबानीसोबत यात्रा केलेली म्हणे. आता शिल्पा शेट्टी, शिखर धवन, संजय दत्त सोबत. एकसे एक कट्टर सनातनी. वावावा .
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sun, 11/16/2025 - 21:35

In reply to सनातनी प्रो मॅक्स by अभ्या..

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 11/16/2025 - 21:45

In reply to :) by शाम भागवत

Permalink

थ्यान्क्यू भागवत साहेब

भागवतसाहेब तुम्हाला "आता हसायला या" असा मेसेज साक्षात श्रीगुरुजी देतात कीनै? खरं खरं सांगा. की आमच्याच बंच ऑफ थॉटस मध्ये आहे असं?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Mon, 11/17/2025 - 07:28

In reply to थ्यान्क्यू भागवत साहेब by अभ्या..

Permalink

अभ्याजी,

अभ्याजी, _/\_ मोदींना विरोध करण्याची अयशस्वी पध्दत मोदी विरोधक बदलत नसतील तर मला हसायला येत. नेहमी नाही पण बऱ्याच वेळेस मला उचकावण्यासाठी उत्तरं दिलेली असतात. पण माझं काम झालेलं असतं. त्यामुळे काही करण्यासाठी उरलेलं नसतं. मग स्मायली टाकणं पुरेसं असतं. पण माझ्या स्माईलीमुळे लिहीणाराच जास्त चिडीला येतो असा माझा अनुभव आहे. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा असा की माझ स्मायलीचं काम एका सेकंदात संपतं. पण विरोधकांना मात्र भरपूर कष्ट करायला लागतात. वेळ द्यायला लागतो. खुन्नस काढण्यासाठी योग्य वेळ कधी मिळते आहे यासाठी टपून बसायला लागतं. मी मात्र सगळं विसरू गेलेलो असतो. मन मोकळं झालेलं असतं. :) एवढं सगळं मोकळेपणाने लिहीतोय कारण मी मिपावर कोणालाच शत्रू मानत नाही. मतभेद आहेत एवढंच लक्षात ठेवतो. त्यामुळे माझ्या तोंडी अपशब्द तर कधी येऊच शकत नाही. तसेच सर्व राजकारणी हे माझ्यापेक्षा जास्त व्यवहारी, जगाचा जास्त अनुभव असलेले व जास्त लोकसंग्रह असलेले असणार हे माझे गृहितक आहे. त्यामुळे कोणत्याही राजकारण्याबद्दल माझ्याकडून अपशब्द वापरले जात नाहीत. ही एक साधी मानसिक प्रक्रिया आहे. माझी राजकारणाकडे पाहाण्याची पध्दत वेगळी आहे. मी फक्त मतदान टक्केवारीला महत्व देतो. त्या टक्केवारीचा दिर्घकालीन कल लक्षात घेतो. याचं कारण असं की, लोकशाहीत जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन जाणारा यशस्वी होत असतो. हे तत्व महत्वाचं आहे. यासाठी उदाहरण म्हणून मी एक लिंक देतो. जरूर पहा. पेरे पाटलांची क्लीप आहे. (हा माझा आवडता माणूस) :) https://youtube.com/shorts/hm7fWrtAAu4?si=egiZJegGyb-myrnO पण या तत्वाकडे दुर्लक्ष झालं तर राजकीय नेत्यांच्या खेळीमागची रणनिती लक्षात येऊ शकणार नाही असं माझं मत आहे. तसंच एखादा नेता हे तत्व कशा पध्दतीने साधतो हा माझा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे त्याबाबतच्या वादविवादात मी पडत नाही. मात्र सत्ता मिळाल्यावर तो त्याचा उपयोग स्वत:ची किंवा आपल्या परिवाराची धन करण्यासाठी वापरतो का? आपल्या पश्चात सत्ता आपल्या परिवारातच राहील यासाठी प्रयत्न करतो का? याकडे मात्र लक्ष देतो. आपण कधी भेटलो नाही. पण तुम्ही एक प्रामाणिक व कष्टाळू व्यक्ति आहात असं माझं मत बनलेलं आहे. फक्त पटकन राग येणं हा तुमचा स्वभाव असावा असंही वाटत आलेलं आहे. पण तुम्ही खोलवर विचार करण्याची क्षमता बाळगता असं वाटल्याने हे एवढं सगळं लिहीलं आहे. अन्यथा एक स्मायली पुरेशी होती. :) जाता जाता… मोदी व फडणवीस मला आवडतात कारण सत्तेचा उपयोग ते स्वताची किंवा परिवाराची संपत्ती वाढवण्यासाठी करत नाहीयेत. तसंच सत्ता आपल्या परिवारात राहावी यासाठी प्रयत्न करत नाही आहेत असे मला वाटते. तसेच इतरांच्या अपप्रवृत्तीवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्याची क्षमता ते बाळगतात. वेळ आल्यास उत्तम पध्दतीने यशस्वीरित्या वजाबाकीचेही राजकारण करू शकतात. :) सारांश रूपाने हेच सांगायचे तर पेरे पाटलांनी सांगितलेली पध्दत मोदी वापरतात म्हणून मोदींना यश येते आहे. तोच कित्ता फडणवीस गिरवत आहेत. त्यामुळे त्यांनाही यश मिळतंय. असो. _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Tue, 11/18/2025 - 16:57

In reply to अभ्याजी, by शाम भागवत

Permalink

रोचक

शामराव, तुमची मते रोचक आहेत. विशेषतः सर्वांना बरोबर घेऊन जाण्याबाबत. लोकशाही म्हणजे तेच महत्वाचं. खरं योग्य काय, सत्य काय, यापेक्षा किती डोकी त्या बाजूला आहेत त्यावर लोकशाहीतला जय पराजय ठरत असतो. हा लोकशाहीचा एक मोठाच दोष म्हणावा लागेल. सर्व लोक शहाणे आहेत असे गृहितक लोकशाहीत असते पण तसे सर्वच वेळी नसते, हे कदाचित आपण मान्य कराल. उदा. प्रदूषण कमी करायचे तर सर्वांच्या आवडीचा निर्णय लोकशाही बहुमताने होणे कठीण आहे. >> मोदी व फडणवीस मला आवडतात कारण सत्तेचा उपयोग ते स्वताची किंवा परिवाराची संपत्ती वाढवण्यासाठी करत नाहीयेत. तसंच सत्ता आपल्या परिवारात राहावी यासाठी प्रयत्न करत नाही आहेत असे मला वाटते. आता परिवारात आपले ए२ येतात का, एवढाच बारीकसा प्रश्न आहे. कारण मुंबईतली धारावी पासून ते अगदी पुण्यातला कात्रज ते स्वारगेट बोगद्यापर्यंत आपले आवडते महानेते ए२ च्या पायावर घालत आहेत. सगळे विमानतळ, सगळी बंदरं, सगळी खनिजं, हे केवळ आणि केवळ एका महाउद्योजकांना अर्पण करत आहेत. दुसरे मराठी शाळा धोकादायक ठरवून, मग बंद पाडून, अलगद त्यांच्या डमी विकसकाच्या खिशात घालत आहेत. या सर्वांकडे दुर्लक्ष करून महानेत्यांना आवडून घेण्यासाठी आपण कोणता उपाय करता? आंम्हालाही सांगा ना गडे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 11/18/2025 - 17:46

In reply to रोचक by स्वधर्म

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Tue, 11/18/2025 - 18:26

In reply to :) by शाम भागवत

Permalink

उपाय सांगा

अशी फार तर :-) सहित प्रेमाची विनंती केली होती सर. :-) :-) :-) तीन वेळा बास का?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 11/18/2025 - 19:38

In reply to उपाय सांगा by स्वधर्म

Permalink

तुमच्या प्रश्नाचं उत्तर

तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधल्यामुळे विरोधकांची मतदान टक्केवारी कशी काय वाढणार? त्यामुळे हसायला आलं. ती टक्केवारी वाढवून मग निवडणुका जिंकून त्यानंतर तुमचा ए२ प्रश्न सुटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Wed, 11/19/2025 - 16:58

In reply to तुमच्या प्रश्नाचं उत्तर by शाम भागवत

Permalink

तो प्रश्नच नव्हता

विरोधकांची टक्केवारी आपण काही अ‍ॅनॅलिसिस केला म्हणून वाढत वा कमी होत नसते हे आपले म्हणणे एकदम बरोबरच आहे. भारतातील लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळणार. प्रश्न हा होता: >> ... या सर्वांकडे दुर्लक्ष करून महानेत्यांना आवडून घेण्यासाठी आपण कोणता उपाय करता? ते फक्त सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 11/19/2025 - 20:51

In reply to तो प्रश्नच नव्हता by स्वधर्म

Permalink

मी फक्त मत देतो.

मी फक्त मत देतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 11/20/2025 - 18:05

In reply to अभ्याजी, by शाम भागवत

Permalink

धन्यवाद भागवतसाहेब

मोदींना विरोध करण्याची अयशस्वी पध्दत मोदी विरोधक बदलत नसतील तर मला हसायला येत. विरोध मोदींना नाहिये हे माहीत असतानाही फक्त मोदींनाच पुढे करण्याच्या प्रत्येक पध्दतीचे मला हसू येतं. तुमची ती विश्वप्रसिध्द स्मायलीच वापरावी वाटते. नेहमी नाही पण बऱ्याच वेळेस मला उचकावण्यासाठी उत्तरं दिलेली असतात. पण माझं काम झालेलं असतं. त्यामुळे काही करण्यासाठी उरलेलं नसतं. मग स्मायली टाकणं पुरेसं असतं.पण माझ्या स्माईलीमुळे लिहीणाराच जास्त चिडीला येतो असा माझा अनुभव आहे. हा दुसरा फायदा आहे. काय आहे तुमचं नेमकं काम? लिहिणार्‍यांना चिडीला आणण्यात तुमचा काय फायदा? मग नुसत्या स्मायली टाकणं एवढेच का करत नाही? ;) माझी राजकारणाकडे पाहाण्याची पध्दत वेगळी आहे. मी फक्त मतदान टक्केवारीला महत्व देतो. त्या टक्केवारीचा दिर्घकालीन कल लक्षात घेतो. राजकारणाकडे पाहण्याच्या पध्दतीतल्या हा बदललेल्या ह्या दीर्घकालीन कलाशी मी चांगलाच परिचित आहे. मूळ विरोध साध्यांना नाही, साधनांना आहे. पण या तत्वाकडे दुर्लक्ष झालं तर राजकीय नेत्यांच्या खेळीमागची रणनिती लक्षात येऊ शकणार नाही असं माझं मत आहे. तसंच एखादा नेता हे तत्व कशा पध्दतीने साधतो हा माझा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे त्याबाबतच्या वादविवादात मी पडत नाही. ह्या वादविवादात पडणार नसाल तर छानच. आधीचे उत्तर त्यासाठीच आहे. राहता राहिला पेरे पाटलांबद्दल मुद्दा. भेटलेलो आहे, पाटोद्याशी परिचित आहे सो....तेही तुमच्या अभ्यासाच्या विषयात येत आहेत तर ह्या बदलाबद्दल मनापासून शुभेच्छा. तुम्ही एक प्रामाणिक व कष्टाळू व्यक्ति आहात असं माझं मत बनलेलं आहे. फक्त पटकन राग येणं हा तुमचा स्वभाव असावा असंही वाटत आलेलं आहे. पण तुम्ही खोलवर विचार करण्याची क्षमता बाळगता असं वाटल्याने हे एवढं सगळं लिहीलं आहे. अन्यथा एक स्मायली पुरेशी होती. प्रामाणिकपणे सांगतो, इतके लिहावेसे वाटले तुम्हाला. चांगलेच आहे. माझी बायकोही माझ्या पटकन राग येण्याद्दल बोलते. तुम्ही दुसरे. खोलवर विचार करण्याच्या क्षमतेचा वापर अजून वाढवायला पाहिजे ह्याची पुन्हा जाणीव झाली. तो करावा लागू नये अशीच स्वभावसुलभ इच्छा असते पण काय करणार? संविधानाची इमोजी करायला हवी. वापरायला आणी समजावयाला सोपी अशी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 11/21/2025 - 06:51

In reply to धन्यवाद भागवतसाहेब by अभ्या..

Permalink

धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. मला राजकारणात रस नाही. मी मतदान टक्केवारीनुसार कल शोधण्याचा प्रयत्न करतो. पेरे पाटलांच्या पध्दतीने भाजप व संघ माणसे जोडत चालला आहे तर विरोधक माणसे गमवत चालले आहेत हा मी त्यानुसार काढलेला निष्कर्ष आहे. भाजप वापरत असलेली साधनं योग्य की अयोग्य हा माझा अभ्यासाचा विषय नाही. पण तुम्ही करत असलेल्या प्रयत्नाने व पध्दतीने विरोधकांची मतदान टक्केवारी वाढण्याची सुतराम शक्यता नसूनही तुम्ही तुमची पध्दत बदलत नाही म्हटल्यावर हसायला येतं. मग हसतो व विषय संपवतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 11/21/2025 - 06:56

In reply to धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद. by शाम भागवत

Permalink

एक लिहायचं राहीले. पेरे पाटील

एक लिहायचं राहीले. पेरे पाटील म्हणतात की सरपंच हरामीच पाहिजे. (या हरामी जगात त्याशिवाय चालायचंच नाही.) :) असो.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Fri, 11/21/2025 - 07:11

In reply to धन्यवाद भागवतसाहेब by अभ्या..

Permalink

पेरे पाटलांवा भेटून

पेरे पाटलांवा भेटून त्यांच्याबद्दल तुमचे मत काय झाले माहीत नाही. पण त्यांना न भेटता त्यांचे फक्त व्हिडिओ पाहून माझं असं मत बनलॅय की, पेरे पाटील त्यांच्या कामामुळे मोठे झालेले नाहीत. तर त्यांच्यातला मी व माझं हा भाग लोप पावल्यामुळे किवा विरघळ्यामुळे त्यांच्याकडून एवंढी जबरदस्त कामे होऊ शकली व तीही पूर्णपणे वेगळ्या वाटेने व पध्दतीने. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/11/2025 - 18:23

In reply to शेवटची काडी by अभ्या..

Permalink

हत्तीला सात सोंडा असल्या तर

हत्तीला सात सोंडा असल्या तर तो फारच डिमांडमध्ये असेल. आणि त्यात तो पांढरा असला तर खूपच रस्सीखेच होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 11/11/2025 - 08:28

In reply to नुसत्या टक्केवारीचा विचार by शाम भागवत

Permalink

आकडे

म्हणजे अंदाजे १२.५६% मतदान वाढलेलं आहे.
मागच्या वेळेस म्हणजे २०२० मध्ये असे गृहित धरतो. त्यावेळेस निवडणुक कोरोना काळात झाली होती त्यामुळे गर्दी टाळायच्या उद्देशाने अन्यथा केले असते त्यापेक्षा कमी लोकांनी मतदान केले असेल ही पण एक शक्यता आहे. याविषयीचा कोणताही विदा माझ्याकडे नाही. तो माझा तर्क आहे. दुसरे म्हणजे दरवर्षी किमानपक्षी १% ने लोकसंख्या वाढली तरी पाच वर्षात ५% लोकसंख्या तशीही वाढली असेल. या दोन कारणांमुळे दिसताना १२.५६% ने मतदान वाढले असे दिसत असले तरी प्रत्यक्षात तो आकडा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकन्ट आहे का याविषयी साशंकता आहे. अर्थात हे सिध्द करायला कोणतीही आकडेवारी माझ्याकडे नाही. पण नुसत्या आकड्यांपेक्षा आत काही दडले आहे का हे शोधायला मला आवडते त्यातून असे मला वाटते.
सनातन नावाचा हत्ती जागा झालाय. त्याला मजबूत करण्याचे काम सनातन धर्म प्रेमी करतातच आहेत.
त्यापेक्षा मोठे काम निखिल वागळे, विश्वंभार चौधरी, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक असले लोक करत असतात. आपापल्या परीने मिपावरही ती जबाबदारी उचलणारे लोक आहेतच. या चर्चेतही त्यातील काही आले आहेतच :)
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 11/07/2025 - 17:05

Permalink

मतदानाची टक्केवारी वाढलीय.

याचे अजून एक कारण म्हणजे छटपुजेच्या आसपास आलेली निवडणूकांची तारीख. छटपुजेचे युपी /बिहार मधे फार मोठ्या प्रमाणावर प्रस्थ आहे. बरेच बिहारी या काळात आपल्या गावी जातात. अर्थात वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होईल हे अजून स्पष्ट नाही. सगळेच पक्ष वाढीव मतदानाचा आम्हालाच फायदा होणार म्हणत असले तरी वाढीव टक्क्याने त्यांच्या पोटात गोळा आलेला असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Mon, 11/10/2025 - 08:36

In reply to मतदानाची टक्केवारी वाढलीय. by धर्मराजमुटके

Permalink

वरील अंदाजाला पुष्टी देणारी बातमी

वरील अंदाजाला पुष्टी देणारी ही बातमी
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 11/10/2025 - 09:17

In reply to वरील अंदाजाला पुष्टी देणारी बातमी by धर्मराजमुटके

Permalink

लिंक चालत नाही.

लिंक चालत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Mon, 11/10/2025 - 17:46

In reply to लिंक चालत नाही. by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बातमीचा दुवा

https://www.jansatta.com/national/if-i-go-now-my-employers-will-cut-my-daily-wage-workers-in-west-bengal-are-worried-about-sir/4226691/
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 11/07/2025 - 18:47

Permalink

अकरा तारखेला रात्री अंदाज

अकरा तारखेला रात्री अंदाज वर्तवायला सुरुवात होईल. त्याचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत होईल का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com