Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मंदार कात्रे on Sun, 06/01/2025 - 07:55
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
.. 45 सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता. हा प्रकार बघून मल्लाप्पा बेशुद्ध पडायचा बाकी राहिला. घाई घाईने त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींनी सुपरवायझरला बोलवून आणले. त्यावेळी भालचंद्र तेंडुलकर तथा भाऊ हे सुपरवायझर म्हणून तेथे तैनात होते. त्यांच्या साठी देखील हे खूप मोठे आश्चर्य होते. कारण प्रेत म्हणावं तर तो माणूस जिवंत असल्यासारखा भासत होता जो जमिनीखाली सापडला होता. त्या माणसाचे डोळे मिटलेले होते आणि दाढी केस नखं वगैरे वाढलेले होते. भाऊंनी खाली उतरून त्याची नाडी चेक केली आणि श्वासोच्छ्वास पाहिला तर तो मनुष्य जिवंत होता. आता मात्र भाऊंच्या भीतीची जागा आश्चर्याने घेतली. भालचंद्र भाऊ हे पहिल्यापासून अध्यात्मिक वृत्ती चे असल्याने त्यांनी भारतीय अध्यात्म आणि साधना शास्त्र याबद्दलचे काही पुस्तके वाचलेली होती. त्यामुळे त्यांनी तर्क केला की ही व्यक्ती बहुधा समाधी अवस्थेत असावी. मग भाऊंनी सर्व कामगारांना बाजूला केले आणि कोणालाही काहीही न सांगण्याची तंबी दिली. हातातल्या बाटलीतून थोडेसे पाणी त्यांनी त्या व्यक्तीच्या डोळ्यावर मारले आणि हळूहळू हलवून त्या व्यक्तीला जागे करण्याचा प्रयत्न करू लागले. एव्हाना संध्याकाळ होत आली होती आणि भाऊंना आपल्या रूमवर परतायचे होते.कारण भाऊ मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले परंतु तिलारी प्रकल्पावर नेमणूक झाल्यानंतर ते जवळच्या गावात क्वार्टरमध्ये राहत होते. साधारण पंधरा मिनीटांनी ती व्यक्ती जागी झाली. भाऊंनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला . तो "उदक उदक... जल" असे शब्द बोलू लागला. मग आपल्या जवळचे पाणी त्याला प्यायला दिले. तो मनुष्य संस्कृत आणि प्राकृत याच्या आसपास असलेल्या भाषेत काही शब्द उच्चारत होता जे भाऊंना कळत नव्हतं... अगम्य भाषेत तो जे काही बोलला त्याचा साधारण अर्थ भाऊंना कळला तो इतकाच की तो विचारत होता... " हा कोणता काळ आहे?" मग त्याला काय उत्तर द्यावे या विचारात असताना भाऊ नी जवळच्या डायरीत लिहून दाखवलं की कलियुग... शालिवाहन शके 1904... इसवी सन 1982... ते पाहून तो हसला... आणि हातवारे करून सांगू लागला..." अयोग्य समय... अयोग्य समय! " मग भाऊंना जवळ बोलावून म्हणाला... "मंत्र दीक्षा... मंत्र दीक्षा... " असे म्हणून देवी उपासनेतील एक गूढ मंत्र त्याने भाऊंच्या कानात सांगितला आणि पुन्हा आपल्या समाधीचा काळा पत्थर लावून बंद करण्याचा आदेश हातवारे करून दिला... भाऊंनी त्या समाधीस्त व्यक्तीला नमस्कार केला आणि मलाप्पा आणि इतर कामगारांना समाधी पुन्हा बंद करण्यासाठी सांगितले... काळा पत्थर लावून समाधी बंद केली आणि वर भरपूर माती टाकून कोणाला काही समजणार नाही याची दक्षता घेतली.... घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यावर भाऊनी त्या मंत्राचा जप सुरु केला आणि काही काळातच त्यांचं भान हरपलं... त्यांना दिव्य दृष्य दिसू लागली ज्यात तो समाधीतला साधू एका मोठ्या कमळावर बसला होता... साधु म्हणाला "तुझं भाग्य थोर म्हणून तुला माझं दर्शन झालं... पण माझी समाधी सोडायचा वेळ अजून आला नाही... कलियुगात माणूस देव धर्म निती शास्त्र सगळं विसरून सत्ता आणि संपत्तीच्या मागे वेडा होईल आणि या सगळ्याचा कडेलोट होईल तेव्हाच माझी समाधी भंग करून मला माझं कार्य करायचं आहे... बाळा तुला या मंत्राच्या जपाने खूप काही मिळेल... पण कुणाचं काही वाईट करू नकोस कधी...." ते स्वप्नं संपलं आणि त्यादिवशी कामावर जायला भाऊंना उशीर झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईवरून फोन आला त्यात त्यांना प्रमोशन मिळाल्या ची आनंदवार्ता मिळाली.... हळूहळू भाऊ त्यांच्या नेहमीच्या कामकाजात व्यस्त झाले पण मंत्रजप मात्र रोज करत होते... 2005 साली ते रिटायर झाले आणि आपल्या रत्नागिरी शेजारच्या लांजा गावी येऊन राहू लागले... 2024 महाभारताच्या युद्धानंतर सर्वत्र शांतता पसरली होती. धर्मयुद्धाची समाप्ती झाली होती, पण धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष अजूनही जगात चालूच होता. या संघर्षातून सुटका मिळवण्यासाठी अनेक साधू आणि ऋषी समाधी लावून ध्यानात मग्न झाले होते. त्यापैकीच एक होता – महर्षी सुमेधानंद. त्याने एक निर्जन गुहेत आपली समाधी लावली होती, जेव्हा जगावर संकट येईल, तेव्हा आपण जागे होऊ, असा त्याचा निश्चय होता. काळ लोटला, शतकं बदलली, सम्राट गेले, राज्ये उठली आणि लयास गेली. पण सुमेधानंद आपल्या समाधीमध्ये शांतपणे स्थित राहिले. त्याला बाहेरच्या जगातील बदलांची कोणतीही कल्पना नव्हती. महाभारताच्या युद्धापासून २१व्या शतकापर्यंतचा काळ भूतकाळातच विलीन झाला होता. आणि एका दिवशी, २०२३ साली , त्या लहानशा तिलारी गावात नवीन रस्त्याचं बांधकाम सुरू होतं. बऱ्याच वर्षांपासून ही जागा जंगलाच्या आत असल्याने इथं कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. परंतु आता आधुनिक जगाने त्याचा विस्तार सुरू केला होता. बांधकामाच्या कामात असणाऱ्या कामगारांनी अचानक एका ठिकाणी खोदकाम करताना एक जुनी गुहा उघडली. त्यांना त्याचं विशेष काही वाटलं नाही, पण आतमध्ये काहीतरी गूढ होतं. गुहेत एक साधू शांतपणे समाधीमध्ये बसलेला होता. सुमेधानंद जेव्हा समाधीमधून जागे झाले, तेव्हा त्यांचं मन शांत होतं, पण बाहेरील वातावरण खूप बदललेलं होतं. कामगार भयभीत झाले, पण साधूने त्यांना शांत केलं आणि विचारलं, "हे कोणतं वर्ष आहे? " कामगारांनाही काही समजत नव्हतं, पण त्यांनी साधूला रस्त्याच्या बाजूला नेलं आणि आसपासच्या आधुनिक वस्तू दाखवल्या. साधू विस्मयाने पाहत होता – गाड्या, मोबाइल, मोठमोठी इमारती, आणि लोकांचं जीवन त्याला परग्रहावरच्या जीवनासारखं वाटत होतं. सुमेधानंद महाराज शहरात आल्यावर गुहेच्या निर्जनतेपासून या आधुनिक जगातील गोंधळ आणि गतीने चकित झाले . त्यानी कधी विचारही केला नव्हता की मानवजात एवढ्या वेगाने प्रगती करेल. त्याला दिसलं की आता लोक वेगवेगळ्या यंत्रांमध्ये बिझी असतात, मनुष्य आपसातील संवाद कमी करून यंत्रांशी जास्त संवाद साधत होता. त्यानी विचार केला, "या यंत्रांच्या जगात लोकांच्या मनात शांती आहे का? धर्म आणि अधर्म यांच्यातला संघर्ष थांबला आहे का?" तो निरखून बघू लागला. तांत्रिक प्रगती झाली होती, पण लोक अजूनही आनंदाच्या आणि शांतीच्या शोधात होते. ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले दिसत होते – पैसा, प्रसिद्धी, आणि तणाव. सुमेधानंद एका उद्यानात बसले होते . त्याला लोकांच्या चेहऱ्यांवरच्या काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. त्याना जाणवलं की या आधुनिक जीवनशैलीत जितकी प्रगती झाली आहे, तितकाच मानसिक ताण आणि असंतोषही वाढला आहे. महाराजांनी काही दिवस या शहरात घालवले. त्याने पाहिलं की लोक बाह्य प्रगतीच्या मागे धावत होते, पण त्याच वेळी त्यांचं अंतरंग रिकामं होतं. त्याला समजलं की या युगातही धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. फक्त त्याचे रूप बदलले होते. "माझी समाधी अशासाठी नव्हती की मी या जगापासून अलिप्त राहून फक्त ध्यान करावं. आजच्या मानवाला माझी गरज आहे. समाधीचं सत्य आणि आत्मिक शांती या जगाला पुन्हा कळायला हवी." आता महाराजांनी ठरवलं की या आधुनिक जगात अध्यात्माची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी भ्रमणयात्रा करायची.लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली, त्यांना ध्यान, योग आणि शांततेचं महत्त्व सांगितलं. हळूहळू, त्याच्या उपदेशामुळे अनेक लोक त्याच्याकडे येऊ लागले. सुमेधानंदाचं ध्येय स्पष्ट होतं – तांत्रिक प्रगतीसह आत्मिक प्रगती देखील आवश्यक आहे. २१व्या शतकातील या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती मिळवण्यासाठी आत्मचिंतन आणि साधनेची गरज आजही तितकीच आहे, जितकी महाभारताच्या काळात होती. समाधीतील साधूने हजारो वर्षांच्या ध्यानातून बाहेर येत नव्या जगाची अनुभूती घेतली. त्याला बाहेरच्या जगात अनेक बदल दिसले, पण अंतरिक संघर्ष अजूनही कायम होता. त्याने ठरवलं की तो या आधुनिक जगात आत्मिक शांतीचा संदेश पसरवेल. आधुनिक युगातील तंत्रज्ञान आणि प्रगती जितकी आवश्यक आहे, तितकंच आवश्यक आहे अंतर्मुख होणं, शांतीची साधना करणं, आणि जीवनात संतुलन निर्माण करणं. ॐ शान्ति!
  • Log in or register to post comments
  • 1786 views

प्रतिक्रिया

Submitted by कानडाऊ योगेशु on Sun, 06/01/2025 - 18:40

Permalink

इंटरेस्टिंग लिहिले आहे..

इंटरेस्टिंग लिहिले आहे.. क्रमशः आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 06/01/2025 - 20:47

Permalink

अगम्य, अनाकलनीय.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 06/02/2025 - 18:56

Permalink

छान

ही कल्पित कथा आहे की काही ऐकीव गोष्टींवर आधारित आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 06/04/2025 - 08:46

Permalink

रोचक कल्पना

रोचक कल्पना
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Wed, 06/04/2025 - 15:56

Permalink

कल्पित आहे

कल्पित आहे पण अशा प्रकारची घटना माझ्या वडिलांच्या तोंडी ऐकली होती सुमारे चाळीस वर्षांपूर्वी...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com