Skip to main content

ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 07/05/2025 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय. ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.

वाचने 26558
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

कालच वाटले होते की आज देवभर मॉक ड्रील आयोजित करणे, देशद्रोह्यांनी त्याची टिंगलटवाळी करीत मोदींना शिव्या देणे या गोष्टी सर्वांना अंधारात ठेवण्यासाठी आहेत, भारत इतक्यात हल्ला करणार नाही अश्या समजुतीत पाकिस्तान आणि भारतातील पाकिस्तानप्रेमी रहावे व आज रात्रीच काहीतरी सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

काहीतरी गडबड आहे. ट्विट दाखविता येत नाही. ट्विट वरील चित्रासह खालीलप्रमाणे आहे. ताली थाली बजाओ के बाद पेश है #सायरन बजाओ ! मोदी जगाला अंधारात ठेवण्यासाठी काहीतरी वेगळे करतात आणि जग टिंगल करीत असताना शांतपणे गुपचूप आपल्याला हवे ते करतात. यालाच कात्रजचा घाट दाखविणे म्हणतात. मिपावर व अनेक समाजमाध्यमांवर अशी टिंगल करणारे जन्मजात मूर्ख अतोनात आहेत. मॉक ड्रील घोषणेची यथेच्छ टिंगलटवाळी समाजमाध्यमांवर सुरू असताना हा हल्ला झाला. २६/११/२००८ नंतर भारताने युद्ध करायला हवे होते. परंतु परकीयांच्या हातात सर्व निर्णयाधिकार व अत्यंत दुर्बल नेतृत्व यामुळे भारताने शेपूट घातली होती. परंतु आता परिस्थिती पूर्ण उलट आहे.

पुराव्याची मागणी स्वाभाविकपणे येणार यासाठी माझ्यामते योग्य असे होईल की पाकिस्तानी अधिकृत लष्करी पुरावे दिल्यास हल्ला झाला हे सिद्ध करता येईल. भारतीय पुरावे टाळले पाहिजेत. उदा. हा व्हिडिओ पाकिस्तानिंलासकर अधिकाऱ्याचा बघा. https://www.youtube.com/live/XKi6ORjquNI?si=Me-g_wbAITUTq_Ke यानंतर हल्ला झालाच नाही हा मुद्दा किमान येणार नाही. त्यापुढे जात चर्चा करता येईल

In reply to by मारवा

सीएनएन, बीबीसी या संकेतस्थळावर हल्ल्याच्या चित्रफिती आहेत. बीबीसीची बातमी सीएनएनची चित्रफीत - https://edition.cnn.com/2025/05/06/world/video/india-military-operation…

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी मी नेमके हेच पुरावे द्यावेत असे म्हणतोय. भारतीय बाजूने आलेले पुरावे नकोच. म्हणजे हल्ला झाला की नाही हे निर्णायकरित्या ठरविता येईल. मग किमान चर्चा तिथे रेंगाळणार नाही पुढे सरकेल.

In reply to by मारवा

हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय, परदेशी माध्यमांनी चित्रफिती दिल्यात, चीन व अमेरिका अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिलीये . . . हल्ला केल्याचे अजून कोणते वेगळे पुरावे अपेक्षित आहेत? काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी गाढवे हल्ला झालाच नाही असे बरळताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय, आमचा विश्वास भारतीय सैन्यावर आहे पाकिस्तानवर नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मागच्या वेळेस भारतीय सैन्याच्या प्रवक्त्याने पत्रकार परीषद घेऊन हल्ले केल्याचे जाहीर केले होते तेव्हा तुमच्यासारखे लोक पाकडे कुठे मान्य करत आहेत- तिकडे नुसती झाडंच पडली असे म्हणत होते. याला डबल ढोलकी म्हणायचे की आणखी काही?

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका! खऱ्या बातम्या येऊद्या! गोदी मीडियाच्या बातम्यांवर मला तितकाच विश्वास आहे जितका पॉलिटिकल सायन्सच्या डिग्रीवर! आणी अतिरेकी होते की नव्हते त्या हल्ला केलेल्या ठिकाणांवर? २६ च्या बदल्यात ५२ तरी मारले का? की एस छोटे हल्ले करून दिखावा करायचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे? ( प्रत्यक्ष हल्ला टाळायचा?)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझा अंदाज तुम्ही अचूक ठरवलात. म्हणून मी एकही लिंक भारतीय नेते ,भारतीय माध्यमे, भारतीय लष्कर सुद्धा दिलेली नाही व तशी देऊं सुद्धा नये हेच तर म्हणतोय. एक शरीफ यांचे अधिकृत ट्विट आहे एक त्यांच्या सूचना मंत्र्याचा व्हिडिओ आहे. एक त्यांच्या लष्करी अधिकाऱ्याचा आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हायला .. अबा .. तुम्हाला कसे कळले हो? माझ्या सुत्रांकडुन पक्की बातमी आहे. ईद चे उरलेले फटाके फोडले पाकीस्थानात. उगा भारताला चिथावणी द्यायला. नाहीतरी मोदी मधे ईतकी हिम्मत कुठे आक्रमण करण्याची. काय म्हणतात ते .. ५६ इंच फुकटचे आहेत. (जाता जाता: खरं तर अनुल्लेखाने मारणार होतो पण काय आहे आज आनंद ईतका झाला आहे ना ... म्हणुन हा प्रतिसाद.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला वाटते की तुम्ही पण भाजपचीच बी-टीम आहात. वारंवार इतके मूर्खासारखे बरळत आहात की त्याची किळस येऊन अनेकांच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्या बरोबर उलटा परीणाम होत असेल. ज्याप्रमाणे कन्हैय्या कुमार, मुग्धा कर्णिक, अवधूत परळकर, हेमंत कर्णिक, निखिल वागळे, विश्वंभार चौधरी वगैरे लोक मोठ्या पातळीवर आहेत त्याप्रमाणे मिपाच्या पातळीवर तुम्हीच. अमरेंद्र बाहुबली आगे बढो हम तुम्हारे साथ है :) :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंसुकु, जाउ द्या हो. काही पिपाण्या वाजतातच .. सोडुन द्या. ह्यांच्याकडे जास्त लक्ष देउन आपला आनंद कमी करु नका.

https://x.com/CMShehbaz या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला हे सिद्ध होत आहे. माझ्यामते हा tweet आणि वरील व्हिडिओ सारखे अजून काही "पाकिस्तानी" पुरावे आवश्यक आहेत. त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील. कृपया भारतीय मीडिया, भारतीय नेते ,भारतीय लष्कर यांनी दिलेले पुरावे निःसंदिग्धतेच्या दृष्टिकोनातून देण्यात येऊ नयेत. https://youtu.be/FAwfLd-Iqao?si=6nbzWwo-f_PsEUXh हा एक व्हिडिओ पाकिस्तानच्या सूचना मंत्र्याचा आहे. यात ते हल्ला झालेला आहे हे मान्य करताना दिसत आहेत. तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे. काही काळ अजून वाट बघावयास हवी. कारण हल्ला खरोखर झाला की नाही हा पहिला मुद्दा सोडवल्याशिवाय यापुढे जाण्यात अर्थ नाही.

In reply to by मारवा

कर्नल साहेब प्रणम स्वीकारावा! अगदी मनातले लिहिलेत! या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला हे सिद्ध होत आहे. सहमत! भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य किंवा प्रेसनोट यावी! तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे. बरोबर! गोदी मीडियाच्या बातम्या नी भाजप नेत्यांची वकतव्ये विश्वासरह्या नाहीत! त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील +१ आंतरराष्ट्रीय बातम्या खर्या, कारण त्यांच्यावर भाजप वगैरेंचा दबाव नसतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही चुकत आहात भारतीय पुरावे नकोतच. भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य पण कशाला ग्राह्य धरताय तुम्ही ? भारतीय सैन्याकडून हल्ला झालाच आहे हे मान्य करण्याची इतकी.घाई तुम्ही केली हे योग्य नाही. थोडे शांततेने घ्या अजून पुरावे येऊ द्या संध्याकाळ पर्यंत हल्ला झाला की झालाच नाही हे निर्णायकरित्या सिद्ध होईलच. ही एक CNN या चॅनेल.ची बातमी ज्यात भारतीय हल्ल्याचा उल्लेख आलेला आहे. https://youtu.be/PFsronvNw5I?si=PpejXq8DS_U0oALb

In reply to by मारवा

बरं मग पाकिस्तानच्या dawn चे संकेतस्थळ तपासा. भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य ग्राह्य धरायचे नसेल तर dawn मध्ये पाकिस्थान च्या मिलिटरी अधिकाऱ्याचे स्टेटमेंस्ट आहेत. पण त्यात ते दहधातवादी मेले म्हणतं नाहीत तर सामान्य लोकं मेली म्हणून ओरडत आहेत.

In reply to by मारवा

पाकिस्तान च्या DG ISPR ने स्वतः ८ ठिकाणी हल्ला झाल्याचं केलंय. १० वाजता सेनेची प्रेस कॉन्फरेन्स आहेच.

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तराला यशस्वी सुरुवात केल्याबद्धल केल्याबद्धल भारताचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील लढाईसाठी शुभेच्छा. हिंदू स्त्रियांचे कुंकू पुसणाऱ्या ओला-ओ-उबरांना ढगात पाठवणाऱ्या मोहिमेचे "ऑपरेशन सिंदूर" हे नाव अगदी सार्थ आहे! --- अपेक्षेप्रमाणे, पाकी घाणपट्ट्यात वळवळणारी ओला-ओ-उबर-वादी कीड याही धाग्यावर आली आहे. तिच्यावर जंतुनाशक फवारण्यासाठी मिपाखरं समर्थ आहेतच.

फुल ब्लोन युद्ध करण्यासाठी पकिस्तान शेपूट घालेल कारण युद्ध चालवण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक कुवत नाहीयेय. - (देशप्रेमी) सोकाजी

D न्यूयॉर्क टाईम्सने प्रथमच militants शब्दाऐवजी terrorists हा शब्द वापरला. भारतीय सैन्याचा व खंबीर नेतृत्वाचा अभिमान वाटतो!

भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी, हा भारत देश कटीबद्ध आहे, पक्षीय राजकारण आणि मतभेद सोडून देश एकजुट-मजबूत होतो, हे अतिरेकी तळ उद्ध्वस्त करीत भारताने दाखवून दिले. अभिमानास्पद. -दिलीप बिरुटे

आता जर परिस्थिती अनुकूल असेल तर आणखी मोठा हल्ला करून पाकड्यांना पूर्ण नेस्तनाबूत करायला हवे. पाकिस्तानातील धरणे, विमानतळे, उर्जा प्रकल्प, कारखाने वगैरे सगळे काही पूर्ण उध्वस्त करायला हवे. ती जमातच अशी आहे की कोणत्याही प्रकारचा चांगुलपणा दाखवायची त्यांची लायकी नाही. उठता लाथ बसता बुक्की असे सतत करत राहिले आणि थोडीशीही- अगदी एक मिनिटाचीही सूट दिली नाही तरच ते गप्प बसतील. नाहीतर कधीनाकधी ते इतर सगळ्यांवर उलटणारच. जर तसे केले नाही तर १९७१ मध्ये युध्द जिंकले पण सिमला करारात सगळे गमावले त्याची पुनरावृत्ती होईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असेच व्हावे. पाकिस्तान किती प्रमाणात प्रतिकार करेल त्यावर अधिकची कारवाई होईल असं वाटतंय. पाकिस्तानने विमाने पाठवून किंवा सीमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तम.

उठा उठा, हल्याचे पुरावे मागण्याची वेळ आली, मोदींना शिव्या हासडण्याची वेळ आली, पाकिस्तानला मदत करण्याची वेळ आली, मुर्खासारखे बरळण्याची वेळ आली!

In reply to by श्रीगुरुजी

होय होय , ते चालतं मिसळ्पाव वर . तुम्ही जरा काही बोललात तर तुमचा आयडी उडवण्यात येईल हो , तुम्ही म्हणजे काही मराठी विषयातील विद्या वाचस्पती प्राध्यापक नव्हे . जरा जपुन.

अंतरराष्ट्रीय बातम्यात दिसत आहे की भारतीय सैन्याने हल्ला केला आहे, भारतीय सैन्याचे खूप खूप अभिनंदन! चांगले नेतृत्व देशाला असते तर भारतीय सैन्याने २३ एप्रिल रोजी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते ह्याबाबतीत काहीही शंका नाही! जय हिंद जय भारत! भारत माता की जय!

हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात

In reply to by सुबोध खरे

उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतात मंत्रालयात खुर्च्या उबवत बसलेत! :) सौगंध मुझे…. :)

समयोचित हल्ला. अभिनंदन. General Lt Gen Ahmed Sharif Chaudhry said the number of lives had risen to 26 civilians across six localities that India hit, with 46 injured. पण त्याचवेळी- Pakistan downs 5 Indian jets as retaliation for late-night strikes at 6 sites: officials https://www.dawn.com/news/1908824/pakistan-downs-5-indian-jets-as-retal… बाकी सरकारमध्ये हिंम्मत नाही म्हणाणार्या काही नेत्यांचे काय करायचे कळत नाही. सैन्यातील सर्वोच्च अधिकार्यांबरोबर सल्ला मसलत केल्यावरच हे निर्णय घेण्यात येतात. अन्यथा नाही.

आत्ता ह्या पुढची पायरी म्हणजे, पाकिस्तान म्हणणार निरापराध नागरिक आणि लहान मुले मेली. आणि आपलेच काही लोकं ह्याचा निषेध करणार.

आतापर्यंत काली आणि दुर्गा पाहिल्या नव्हत्या,आज मी दोन्ही पाहिल्या काली आणि दुर्गा! 1 #ColSofiaQureshi #WingCommanderVyomikaSingh #OperationSindoor भारतीय स्त्रीचे सिंदूर उजाड करणाऱ्या भ्याड हल्ल्याचे प्रत्त्युत्तर भारतीय स्त्री शक्ती देतांना...

In reply to by Bhakti

आज मी दोन्ही पाहिल्या काली आणि दुर्गा!
छे हो. कुठचे काय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे हिंदू पॅट्रिआर्कीचे प्रतीक असलेले नाव दिले ही बोंबाबोंब सुरूही झाली आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काल मी याबद्दल स्त्रीवादी काही मराठी लेख वाचले.त्यानुसार असं म्हणणं आहे की,सिंदूर टिकली अशा नावांनी भावनिकदृष्ट्या मुद्दा कॅच करण्याचा हा डाव आहे.अनेकांना भावनिक करून स्वतःचं महत्व वाढवायचं आहे. मला विचाराल तर '"स्त्रीवादाच्या बाबतीत पहाट झाली असल्यास सिंदूर नाव ठेवा नाहीतर बांगड्या...काही फरक पडणार नाही इतकी तटस्थता येते" थोडं विस्कळीत लिहलंय पण भावना समजून घ्या.

In reply to by Bhakti

आणि इतकं व्यवहारी शहाणंपण काहींमध्ये असतं की.."ऑपरेशन सिंदूर"चे कॉपीराइट ही २४ तासांच्या आत मागतात.यांना हुशार म्हणावे की डम्ब???

यावेळेस भारतीय सैन्याने हल्ला केलेला आहे ही बाब फार म्हणजे फारच उतावळेपणाने मान्य केली जात आहे. किमान संध्याकाळ पर्यंत तरी थांबण्यास हवे होते खातरजमा केली असती कारण एकदा हे मान्य केले की भारतीय सैन्याने खरच हल्ला केलेला आहे ते सुद्धा सीमेपेक्षा इतक्या आत पर्यंत जाऊन तर मग नाईलाजाने मग पुढील मुद्दे सुद्धा चर्चेत घ्यावे लागतील. कारण मग ते अधिकच अडचणीचे आणि क्लिष्ट असे मुद्दे आहेत. ही घाई चुकते असे माझे मत आहे. हे फार भावनिक होत आहे याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. पण ज्यांच्याकडून अपेक्षा आहे तेच इतके भावनिक होत आहेत आणि अभिनंदन करत आहेत की याला आता काय म्हणावे ? किमान संध्याकाळ पर्यंत तरी...

In reply to by मारवा

संध्याकाळपर्यंत थांबणे खूपच घाईचे ठरेल. अजून १० वर्षे थांबावे.

In reply to by मारवा

पाकिस्तान ने पण मान्य केलंय. अजून दहा वीस वर्ष तरी वाट बघायला हवी होती.

१९९९ - भारतीय सैन्याने सीमा न ओलांडता सैन्य, तोफा व विमानातून बॉम्बिंग करून घुसखोरांना हाकलून लावले. २०१६ - भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली. २०१९ - भारतीय विमानदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बॉम्बिंग करून अतिरेकी तळ उद्धव केले. २०२५ - भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये व पाकिस्तानमध्ये जाऊन क्षेपणास्त्रे सोडून इस्लामी अतिरेक्यांचे तळ उद्धव केले. प्रत्येक वेळी भारत एक पाऊल पुढे जातोय.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानमध्ये जाऊन क्षेपणास्त्रे सोडून इस्लामी अतिरेक्यांचे तळ उद्धव केले.
ही चूक चुकून झाली की जाणूनबुजून केली? :) :)
२०१९ - भारतीय विमानदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बॉम्बिंग करून अतिरेकी तळ उद्धव केले.
२०१९ मध्ये बालाकोट येथे खैबर पख्तुनवामध्ये (वायव्य सरहद्द प्रांतात) म्हणजे पाकिस्तानातच जाऊन बॉम्बिंग केले होते. पीओकेमध्ये नाही. महाराजा रणजितसिंगाने खैबरखिंडीच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकला आणि खैबरखिंडही ओलांडून अफगाणिस्तान त्याच्या साम्राज्यात जोडून घेतले होते. त्यानंतर जवळपास २०० वर्षांनंतर खैबरखिंडीच्या प्रदेशात आपल्या बाजूने प्रथमच हल्ला झाला होता.

चला ठीक आहे आता सर्वांनीच मान्य केलेले आहे की भारताने खरोखर हल्ला केलेला आहे तर पुढचा मुद्दा घ्या आपल्या मते पुढील कोणते प्रश्न आता उपस्थिती झालेले आहेत ? उदा. या हल्ल्याचे श्रेय कोणाचे आहे ?

In reply to by मारवा

यशस्वीपणे (म्हणजे, आपल्या सैनिकांची जीवितहानी न होऊ देता) ऑपरेशन झाले. सरकारी व्यवस्था, सैन्यदल अधिकारी, इंटेंलीजन्स जाळे ह्यांच्यात समन्वय असल्यामुळे झाले. सर्वांचेच अभिनंदन.

या हल्ल्याचे श्रेय आता कुणाला द्यावे ? मोदी यांच्या political will ला आणि नेतृत्वाला ? डोभाल यांच्या strategy ला ? जयशंकर यांच्या परराष्ट्र नीतीला ? की शरद पवार यांनी दिलेल्या अनुभवी मार्गदर्शनाला ? की विरोधकांनी केलेल्या सहकार्याला ? आपणं याचे श्रेय देऊ शकतो का ? कारण मी अगोदरच म्हणालो की हल्ला केला हे जर मान्य केले तर पुढील प्रश्न अधिक क्लिष्ट आहेत.

In reply to by मारवा

सोप्पे आहे. हल्ला होत नाही तोपर्यंत मोदींना शिव्या द्यायच्या आणि हल्ला झाला की लष्कराचे अभिनंदन करायचे.

कालच स्काय न्यूजच्या याल्दा हकीम यांनी पाकिस्तानचे संपर्क मंत्री तरार यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी वारंवार पाकिस्तान दहशतवादाला थारा देत नसल्याचा दावा केला. परंतु हकीम यांनी तरार यांचा दावा फेटाळून लावला. तसेच आठ दिवसांपूर्वी पाकच्या संरक्षण मंत्र्याने दहशतवादाला थारा दिला होता असे मान्य केला असल्याचेही सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वार्तांकनात, भारताची बाजू मजबूत असल्याचे दिसत आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. https://youtu.be/FAwfLd-Iqao?si=Ubn2b-UAPKaR93u_

In reply to by स्वधर्म

पाक संरक्षण मंत्री दहशतवादाला पाठींबा दिल्याची कबुली देताना: https://www.youtube.com/shorts/lkO8fR4vlgA

In reply to by स्वधर्म

स्काय न्युज जर्नलिस्ट कडुन भारतातील तमाम न्युज चॅनल च्या आक्रस्ताळ्या अ‍ॅंकर ना खुप काही शिकण्यासारखे आहे. गळ्यात माईक चे बोंडुक असताना उच्च आवाजात बोलण्यात तसेच कुत्रा मागे लागल्याप्रमाणे बातम्या देण्यात काय हशील आहे? एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलुन समोरच्याला डोकेदुखी होते. तसेच प्रत्येक न्युज ही ब्रेकिंग न्युज असते. शांतपणे बोलुन आपल्याला हवा तो मुद्दा कसा मांडावा हे भारतातल्या अ‍ॅंकर ला शिकवायची नितांत गरज आहे.

In reply to by सौन्दर्य

काल मी जवळपास ५ वर्षांनी हिंदी न्यूज चॅनल दिवसभर पाहिला.अस्स डोकं दुखायला लागलं संध्याकाळी,की डोकेदुखीची गोळी घेऊन आठ वाजताच निद्रिस्त झाले.कसं काय लोकं दिवसभर‌ न्यूज चॅनेल पाहतात??मी पाच वर्षांपासून टीव्ही पाहणेच सोडून दिलं आहे.खरोखर टीव्ही म्हणजे इडियट बॉक्सच आहे...

In reply to by सुक्या

स्काय न्यूजच्या बातम्या व चर्चा ऐकल्या की आपल्या चनेलवरील चर्चांचा दर्जा किती कमी आहे याची जाणीव होते. मला तर या निवेदकांच्या ओरडण्यामुळे दूरदर्शनच्या बातम्या पहायला आवडायचे. पण त्या अगदीच सरकारी जी आर वाचून दाखवल्याप्रमाणे असतात.

In reply to by स्वधर्म

फक्त निवेदकच ओरडत नाहीत तर आपल्या चॅनेल्स चे गेस्ट पण असेच ओरडणारे असतात. किंवा ओरडणाऱ्या लोकांनाच ते बोलवत असावेत.