Skip to main content

ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 07/05/2025 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय. ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.

वाचने 26558
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

In reply to by सुक्या

भारतीय सेनेला विनंती पाकिस्तानवर हल्ला करताना इथल्या न्यूज चॅनलच्या कार्यालयावरही बॉम्ब टाकून देश वाचवावा

In reply to by Bhakti

भारतीयांची माथी भडकावण्याचं आणि वास्तवतेपासून दूर वार्तांकनाचे त्यांना पैसे मिळतात म्हणून इतका कै च्या कै बातम्या ठोकत असतात त्या पेक्षा वृत्तपत्र वाचलेले बरे आणि युट्यूबवरील सामान्य लोकांनी टाकलेले व्हीडीयो बरे असे वाटायला लागते. मिडिया बदनाम झालं आहे. काही विलाज नाही. -दिलीप बिरुटे

मोदी होते म्हणून प्रतिहल्ला तरी झाला. इतर पक्षाचा दुसरा कोणी नेता असता तर "हमे देखना है, हमे हटाना है! म्हणण्यात ७५ वर्ष तरी नक्कीच गेली असती. असो.

श्रीगुरूजी गेले वाटतं चारिधाम यात्रेला. हे राम...! =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह वाह , ही अशी स्पष्टपणे ध्याग्याच्या लेखनाच्या विषयाशी असंबध्द आणि वैयक्तिक टिप्पण्णी मिसळ्पव संपादक मंडळ खपवुन घेते अन इतरांचे लेखन प्रतिसाद आयडी संपादित करते ह्यावरुनच त्यांचा पक्षपाती पणा सिध्द होतो .

In reply to by रात्रीचे चांदणे

सहमत. अमरेंद्र बाहुबली एकामागोमाग एक अज्ञानमूलक विधाने करत होते आणि ही गोष्ट आजची नाही तर अनेक महिन्यांपासून चालू होती. कितीही दुर्लक्ष करायचे ठरविले तरी तेच तेच शेकडो वेळा व्हायला लागले की मग संयम सुटला असेल हे समजता येते- माझेही तसे झाले होते, कदाचित आयडी उडायच्या थ्रेशोल्ड्पेक्षा कमी म्हणून माझा आयडी वाचला पण श्रीगुरूजींचा आयडी गेला. अनेक जण अमरेंद्र बाहुबलींच्या एकामागोमाग एक अज्ञानमूलक प्रतिसादांवर तक्रार करत असताना आयडी उडविला नाही तरी जर त्यांना निदान समज दिली गेली असती तर आज ही वेळ आली नसती. आता हे लिहून काहीच उपयोग नाही. आता त्यांचा आयडी परत आणला तरी श्रीगुरूजी परत मिपावर एक शब्दही लिहितील असे वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संयमाला पण सीमा असते. श्रीगुरुजी हे मिपा वर मुद्देसुद व माहीतीपुर्ण प्रतिसाद देणार्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. कोरड्यासोबत ओले जळते हे मात्र खरे!

In reply to by सुक्या

असे आभासू ID बाराळणाऱ्या ID मुळे उडाणार असतील तर अवघड आहे. बाहुबली वर योग्य वेळी कारवाई केली असती तर गुरुजींचा ID उडाला नसता.

शरद पवारांनी 'मार्गदर्शन' केले म्हणजे नक्की काय केले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.जून १९९१ ते मार्च १९९३ ह्या काळात पवार संऱक्षणमंत्री होते. म्हणजे त्यालाही आता तीन दशके होउन गेली.ऊस, कापूस्,भुईमुग, साखर कारखाने,शि़क्षणसंस्था, जमीनींचे व्यवहार.. हे समजू शकतो पण युद्धनीती,शस्त्रास्त्रे, राफेल्,मीग हे पण?

"Indian Military Destroys Pakistan's Air Defence System At Lahore: Govt अभिनंदन. ऑपरेशन सिंदूर सुरु होउन ३६ तास उलटले आहेत. एरवी दिवसाला दोन-दोन व्हिडियो यु-ट्युबवर टाकणारे कुठे गायब झाले आहेत? उ.दा. ध्रुव राठी, निरंजन टकले.. हे गेले दोन दिवस गायब आहेत. लोकसत्ता संपादक आले आणि अभिनंदन करण्यापेक्षा पाकिस्तानच्या मूर्खपणांमुळे हे कसे झाले , ह्यावर चर्चा करत बसले. कुमार केतकरही गायबले आहेत. https://www.msn.com/en-in/news/india/indian-military-destroys-pakistan-…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ध्रुव राठी हे वेगळेच पाणी आहे. काय समजलात माई?

1 मला एक नोटीस आलेली आहे वर्तणुकी.संदर्भात अशी नोटीस मला.एकट्याला.आलेली आहे का ? मी सर्वांना अशी सूचना देणारी नोटीस पाठवलेली आहे ? तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली या दोन आय डी वर तुम्ही बंदी घातलेली आहे का ? माझ्या सहित अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे आपण खुलासा करावा ही नम्र विनंती

मला एक नोटीस आलेली आहे वर्तणुकी.संदर्भात अशी नोटीस मला.एकट्याला.आलेली आहे का ? मी सर्वांना अशी सूचना देणारी नोटीस पाठवलेली आहे ? तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली या दोन आय डी वर तुम्ही बंदी घातलेली आहे का ? माझ्या सहित अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे आपण खुलासा करावा ही नम्र विनंती

मी अशी नेमकी कोणती शिवीगाळ किंवा पक्षीय अजेंडा अशी नेमकी कोणती चूक माझ्या प्रतिसादांमध्ये किंवा लेखा मध्ये आहे ? म्हणजे गुन्हा कळणे महत्वाचे आहे नाही तर हे kafka च्या trial सारखं होईल. कारवाई जरूर करा पण नेमकं चुकीचं काय केलं? म्हणजे चुकलेला प्रतिसाद किंवा चुकीचा लेख किंवा चुकलेली ओळ तरी किमान दाखवा तर सुधारणा तरी करता येईल

In reply to by मारवा

ती नोटीस मुख्य पेजवर आहे म्हणजे सगळ्यांनाच दिसत असावी. निदान मला तरी दिसत आहे. तेव्हा ती नोटीस फक्त तुम्हालाच पाठवली आहे असे वाटत नाही. व्यक्तिगत निरोपात अशी नोटीस किंवा इशारा आला असेल तर गोष्ट वेगळी.

In reply to by मारवा

मलाही अशी नोटीस दिसते आहे प्रत्येक पानावर. जर कुठे असे लेखन झाले असेल, तर जरुर दाखवून द्यावे, म्हणजे काय टाळावे ते तरी कळेल असे मला वाटते.

In reply to by स्वधर्म

मिपावर वावरणा-या प्रत्येकास अशी सुचना दिसते. व्यक्तिगत अशी कोणासही ती सूचना नाही. -दिलीप बिरुटे

धन्यवाद माहितीसाठी तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली हे दोन आय डी संपादकांनी कारवाई करून बंद केले आहेत का ? याचा कुठे खुलासा केलेला आहे का ? कृपया माहिती असल्यास द्यावी

नविन आय.डी. घेउन ते अवतरतील. श्रीबाहुबली आणि अमरेंद्र गुरुजी.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आपल्या मिडियाने किंवा युट्यूबवाल्यांनी टीआरपी आणि/किंवा क्लिक्स आणि त्यातून मिळणारे पैसे यासाठी असल्या बातम्या प्रसारीत केल्या आहेत असे दिसते. जोपर्यंत आपल्या सरकार आणि सैन्याकडून अधिकृत काही येत नाही तोपर्यंत असल्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेऊ नये. काल काय काय दाखवत होते- कराची बंदर उध्वस्त, लाहोर, इस्लामाबाद, मुलतान, सरगोधा आणि कुठे कुठे हल्ले वगैरे वगैरे. काल रात्री १ च्या सुमारास असे वाटत होते की आज सकाळी उठल्यावर पाकिस्तान असेल की नाही. तसे काही झालेले वाटत नाही. एकूणच आपल्या माध्यमांची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हो, ही खोटी बातमी होती हे आज सकाळी समजले. काल रात्री इतक्या विविध आश्चर्यकारक बातम्या येत होत्या. कराची बंदर उडवले, शहाबाझ शरीफच्या घराजवळ स्फोट आणि तो बंकरमधे लपलाय, मुनीरला अटक केली आहे. २ जेएफ १७ आणि १ एफ १६ विमान पाडले, जैसलमेरमधे एक पायलट जिवंत पकडला आहे.
एकूणच आपल्या माध्यमांची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली आहे.
अतीतीव्र सहमत त्यातल्या त्यात खर्‍या बातम्या कोठे मिळतील? न्युज चॅनल, एक्स हँडल, ब्लोग काही पण चालेल.

श्रीगुरुजी या आय डी वर जर कारवाई झाली असेल तर ते चुकीचे आहे असे माझे मत आहे. आता कारवाई झाली की ते स्वतः हून लिहायचे थांबले हे मला अजून स्पष्टपणे कळलेले नाही. पण मी गेले काही दिवसापासून सक्रीय आहे त्यात तरी मला श्रीगुरुजी यांच्या प्रतिसादात कुठेही पातळी सोडून काही लिहिलेले आढळून आले नाही. आणि त्यांच्या लेखनात जितका आक्षेपार्ह विधानाचा भाग असेल तर त्याहून जास्त आक्षेपार्ह विधान असलेले आय डी अजून सक्रीय आहेत. शेवटी संपादक मंडळाचा कारवाई करण्याचा अधिकार मान्य आहेच मात्र नेमक्या कुठल्या विधानावर कारवाई झाली हे कळले तर इतराना एक आपली वर्तणूक कशी असावी,कशी विधाने वापरू नयेत, कुठल्या गोष्टी संपादकांना मान्य नाहीत हेबुदहरणासहित कळते. हे चूक दाखवून देणे उदाहरणासहीत आवश्यक आहे कोणत्या कारणास्तव नेमकी कारवाई झाली हे कळायला हवे. बाकी असो

In reply to by मारवा

असं काही होणार असं आम्हाला वाटलंच होतं म्हणून आम्ही आधीच दूरदर्शीपणाने त्यांचे प्रतिसाद नोंदवून करून ठेवले होते. बाहुबलीचे प्रतिसाद कितीही मूर्खपणाचे, बालिशपणाचे, अक्कलशून्य, तद्दन फालतू, उचकवणारे, उगाच विरोधाला विरोध करून टीका करणारे, प्रत्येक प्रतिसादावर पचकणारे जरी असले तरी ते कधीही वैयक्तिक नव्हते. श्रीगुरुजींनी मात्र तीव्र वैयक्तिक पातळीवरचे प्रतिसाद देऊनही बाहुबली वैयक्तिक प्रत्युत्तर न देता त्यांचा मोदीविरोधी अजेंडा फक्त राबवत राहिले. दुसऱ्याला मनुवादी म्हणून हिणवत राहिले, त्यामुळे दोघांच्याही समिधा यज्ञकुंडात पडलेल्या दिसत आहेत. नमुन्यादाखल आम्ही नोंदवून ठेवलेले श्रीगुरुजींचे काही वैयक्तिक प्रतिसाद बघा. 7 May 2025 | श्रीगुरुजी या गाढवाच्या मूर्खपणाची किळस येत आहे. प्रतिसाद द्या अमरेंद्र बाहुबली's picture खरं बोलणाऱ्याची किळस येणारच! 7 May 2025 - 9:25 am | अमरेंद्र बाहुबली खरं बोलणाऱ्याची किळस येणारच! आम्हाला गाढव म्हणा, मूर्ख म्हणा, आमची किळस येऊद्या! एक देशभक्त ह्या नात्याने मी सरकारला जाब विचारणारच, मी देशभक्त आहे अंधभक्त नाही! काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी 7 May 2025 - 9:41 am | श्रीगुरुजी काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी गाढवे हल्ला झालाच नाही असे बरळताहेत. विषय कोणताही असो, ही गाढवे तेथे जाऊन पो टाकून त्यात थयाथया नाचतातच. श्रीगुरुजी — 7 May 2025 - 07:37 उर्वरीत गाढवे कोठे आहेत? छे, मिपावरील हिरवे पाकिस्तानी 7 May 2025 - 11:50 am | श्रीगुरुजी छे, मिपावरील हिरवे पाकिस्तानी उंदीर वेगाने बिळातून बाहेर आलेत आणि भारताला शिव्या घालताहेत. श्रीगुरुजी — 7 May 2025 - 07:09 मिपावरील महामुर्खांना पुन्हा एकदा सणसणीत थोबाडीत बसली. कोणतीही अक्कल नाही, शून्य माहिती . . . परंतु गाढवासारखे रेकणे सुरू होते. आता शेपटीला लवंगीचा सर बांधून पेटवलाय

In reply to by महिरावण

तुमचे म्हणणे बरोबर आहे मान्य आहे. श्रीगुरुजी यांच्या वरील प्रतिसादातील भाषा निश्चितच मर्यादेबाहेर गेलेली आहे. त्याच बरोबर त्यांना तसे नेमके दाखवून देऊन warning सारखे केले असते.तर बरे आले असते. त्यांना सुधारणा करता आली असती तसेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील warning दिली असती तर त्यांना देखील सुधारणा करता आली असती आता हे सर्व अगोदरच वरील दोघं बाबत करून झालेलं आहे का याची मला माहिती नाही. कारण दीर्घ कालावधीनंतर मी मिपावर सक्रीय झालो असल्याने अर्ध्या सिनेमात येऊन बसलेल्या सारखा मी तितका अपडेटेड नाहीय. आणि मी जिथे थांबलो होतो तेव्हा इतकी विद्वेषजन्य परिस्थिती नवती.एकदम सत्ययुग होते आणि सात्विकांची भरती होती असेही नाही. पण आजच्या एवढी कठीण परीस्थिती नक्कीच नवती. मी स्वतः मध्ये सुद्धा बदल अनुभवत आहे बाकी एकूण असो.

काल सायंकाळी सुरू झालेल भारताच्या पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याने भानावर नसलेल्या मीडियाने तर युद्ध जिंकले. सायरन ते आवाज, ती आरडा-ओरड....भारतापेक्षा भारतीय मिडियाने केलेले हल्ले वार्तांकन भयंकर होते. माध्यमाद्वारे, पाकिस्तानला गर्भगळीत करायचं असेल आणि तसा तो होत असेल तर चांगलं आहे, पण मीडियाने तर हे युद्ध सकाळी सकाळी जिंकू असे चित्र उभे केले. वास्तवात ड्रोन हल्ले, मिसाईल मारा यामुळे पाकिस्तानचं अधिकाधिक नुकसान करणे, त्याची खोड जिरवणे हाच हेतू भारतीय सैन्याचा दिसतो आहे आणि भारतीय सैन्याने तिन्ही दलाच्या एकत्रीत हल्ल्याने तो दबदबा निर्माण केला आहे. एक जागतिक संदेश भारतीय सैन्याने दिला आहे, देत आहे असे दिसते. आजच्या काळात कोणत्याही देशातील एकमेकांचे युद्ध असं एका दिवसात एका रात्रीत संपत नसतं. युद्धात कमी अधिक प्रत्येकाचे नुकसान होत असते, अपरिमित हानी होत असते. पाकिस्तानची तशी आर्थिक आणि इतरही हानी करायची आहे, खोड मोडायची आहे, युद्धामुळे जरब निर्माण होते. भारत सरंक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील सर्व तंत्रात अग्रेसर आणि तेही जगाच्या पुढे आहे, हेही दाखवून द्यायचं आहे. भारतीय सैन्याचा आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय माध्यमांचा धाडसी वार्ताहरांचा जे जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहेत. सर्व पत्रकारांचा जे भारतविरोधी misinformation चा uttam रित्या प्रतिकार करत आहेत. पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची चिरफाड करून त्यातील सत्य बाहेर आणत आहेत. भारतीयांचे सामान्य नागरिकांचे मनोबल जे अशा वेळी अतिशय महत्वाचे असते ते टिकवून ठेवण्यात हातभार लावत आहेत. यावेळेस जेव्हा नागरिकांना आपल्या सैनिकांच्या शौर्याची तसेच आपल्याकडे असलेल्या क्षमतांची जाणीव करून त्यांना आश्वस्त करत आहेत अशा सर्व माध्यम वीरांचे कौतुक आहे. सीमेवरील सैनिक तर लढत आहेच पण त्यांना सहाय्यक अशा त्यांच्या मागे.ठामपणे उभे असलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच घटकांचे योगदान महत्वाचे आहे. मग ते सैन्यासाठी सहाय्यक भूमिका घेणारे डॉक्टर असोत, आचारी असोत की माध्यमातून काम करणारे आपल्या लोकशाहीच्या मूलभूत चार खांबापैकी एक असोत. सोनियांच्या कणखर नेतृत्वाला माझा सलाम ! आज त्यांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळेच हे युद्ध आपण जिंकण्याच्या मार्गावर आहोत.

In reply to by मारवा

भारतीयांचे सामान्य नागरिकांचे मनोबल जे अशा वेळी अतिशय महत्वाचे असते ते टिकवून ठेवण्यात हातभार लावत आहेत. आता काय बोलू ? भारतीय सैन्यदलाच्या क्षमतेवर आणि शौर्यावर तुम्हा आम्हा सर्वांचा विश्वास आहे. पण पाकिस्तान की राजधानी इस्लामाबादपर कबजा. क्वेटा शहराची वाताहात, पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख शाहबाझ शरीफ बंकरमध्ये लपून बसले. वगैरे अशा खोट्या बातम्यांनी भाबड्या माणसाला आंनद वाटतो पण सत्य काय ते माहिती होत नाही, असंख्य भारतीय वास्तव बातम्या लिंक्स कुठे मिळतील याचा शोध घेताना दिसत होते. -दिलीप बिरुटे

In reply to by मारवा

या अभिमानाला काळिमा फासणारे तमाशे रात्रभर अनेक चॅनल्सवर चालू आहेत. अफवांनाच तिखटमीठ लावून, मागे साऊंड इफेक्ट देत आरडत ओरडत बातमी म्हणून पेश करणे हा पत्रकारितेत नवीन ट्रेंड दिसतो.

In reply to by गवि

गोबरयुगात अशा बातम्या मनोबल वाढण्यासाठी आवश्यक असतात. -दिलीप बिरुटे (अवकाळी पावसामुळे गार पडलेला गारवा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदींच्या काळात पाकिस्तानवर यशस्वी हल्ला झाल्यामुळे तुम्हाला काही सुचेनासं झालंय असे दिसते. धड मोदींचे कौतुकही करता येत नाही आणि टीकाही करता येत नाहीये म्हणून तुम्ही खर्गेंप्रमाणेच फक्त सैन्याचे कौतुक करून वेळ मारून नेत आहात.

In reply to by महिरावण

प्रिय छुपे संपादक स.न.वि.वि.
सैन्याचे कौतुक करून वेळ मारून नेत आहात.
सैन्याचं कौतुक नको का करायला ? भक्त आणि परंपरावादी म्हणून तुम्ही प.प्र.मोदीच कौतुक करा आम्ही देशभक्त नागरिक देशाचं रक्षण करणा-या आमच्या बहादूर सैन्यदलाचं कौतुक करू. ;) -दिलीप बिरुटे ( मिपाच्या धोरणात राहणारा ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या म्हणण्याप्रमाणे लीडरला काही स्थानच नाही म्हणजे. उगाचच झाले ते नेपोलियन बोनापार्ट, विन्स्टन चर्चिल, आयसेनहोवर, इंदिरा गांधी. सैन्यांचं श्रेय निर्विवाद असतंच पण त्याला योग्य दिशा, मुक्त हस्त देणाऱ्या जबाबदार नेत्यांचीही तितकीच गरज असते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सैन्याचं कौतुक नको का करायला. In a shocking disclosure, Air Chief Marshal (Retd) Fali Homi Major has revealed that the Indian Air Force was ready to take revenge for the devastating 2008 Mumbai terror attacks but the then United Progressive Alliance (UPA) government 'blocked' any further action on the surgical strike option that was meant to teach terror-sponsor Pakistan a lesson. I think it was the third or fourth day after the attack that we were called into the Prime Minister's office, the three chiefs, and of course, many others who were involved in this. We were asked as to what kind of options we have to launch a retaliatory strike, a precision strike. And, we gave out our options that we will be ready to undertake the strike, if asked, in the next 18 to 24 hours. That's it." He added that there was no response from the then UPA government though. "Once this was done, when we went back, we kept those plans active. Actually, we did it very quietly on a totally need-to-know basis, and only the people and forces which were involved would get involved in this operation were informed. But we maintained this readiness for quite a long period, for almost about 10-15 days," he said.

In reply to by महिरावण

@ महिरावण तुम्ही माझी चांगलीच पंचाईत केली आहेत. माझे परममित्र प्रा डॉ बिरुटे सर आणि तुमच्या प्रतिसादातील परखड सत्य यांपैकी कोणतीही एक बाजू घेणे हे धर्मसंकट.

In reply to by गवि

नाय नाय तुम्ही व्यवस्थेच्या बाजूने राहा. व्यवस्थेच्या बाजूने राहिले की सगळे लाभ घेता येतात.. बाय द वे, 2014 नंतर नुसते पक्षा पक्षात फूट नै पडली, मित्र मित्र राहिलेले नाहीत, हा माझा अनुभव आहे -दिलीप बिरुटे ( आभासी मित्रांवर विश्वास नसलेला )

In reply to by गवि

गवि तुमचे तिहेरी कौतुक महिरावण यांच्या वरील प्रतिसादात नेतृत्वाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले ते तुमच्या मते परखड असे सत्य आहे हे तुम्ही मान्य केले यासाठी पहिले कौतुक त्याच बरोबर आपल्या परम मित्राला ते सत्य मान्य नाही दिसत नाही किंवा पचत नाही हे कळते तरीही कसा का असेना शेवटी आपला मित्र आहे त्याची मैत्री सोडवत नाही या मैत्री भावने साठी दुसरे कौतुक आणि मी असा कात्रीत सापडलेलो आहे हे प्रांजळपणे मान्य करणे यासाठी तुमचे तिसरे कौतुक गेल्या काहीं दिवसात मी फार व्यक्तिगत होत चाललेलो आहे फार उथळ आणि इन्स्टंट अशी प्रतिक्रिया माझ्याकडून येणे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहे. उपहासाचे प्रमाण जास्त होत आहे हे मी सुद्धा तुमच्या सोबत मान्य करून घेतो तुम्हीही माझ्या प्रांजळपणा चे एकदा कौतुक करून टाका मग मी थोडा वरती बिरुटे यांना व्यक्तिगत मारला तसा टोला मारणे बंद करतो आणि थोडा सरळ मुद्दे मांडतो

खोट्या बातम्या देऊन फार फार तर क्षणिक आनंद मिळेल. भारतीय माधमे बघायच्या लायकीची नाहीत. सेनेच्या प्रेस ब्रिफींग ची वाट बघावी लागेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

आता युद्ध चालु झाले आहे म्हणून पाकिस्तानी चॅनेल्स बंद झाली आहेत. अन्यथा भारतिय चॅनेल्सच्या तुलनेत पाकिस्तानी चॅनेल्सवर बरीच चांगली चर्चा चालु असते(भारत-पाक मुद्दा वगळता) दुसरा बोलत असताना अडवणे, उथळ शब्द वापरणे, आकांडतांडव करणे. हे प्रकार तिकडे खूप कमी.

युध्दात पहिला बळी सत्याचा पडतो असे म्हटले जाते. ते किती खरे आहे ते आपल्या आणि पाकिस्तानी चनेलच्या बातम्या पाहून समजते. या सर्व गडबडीत दोन संयमित चर्चा देत आहे. पाकिस्तानी मंत्री व भारताचे निवृत्त सैन्य अधिकारी समोरासमोरः https://youtu.be/anthGq572rE?si=g6kui-zxMnsNw4Vb भारताचे युकेमधील राजदूत विक्रम दोराईस्वामी यांच्याशी झालेली चर्चा: यात पाकिस्तानी सैन्याधिकार्याशी पण चर्चा आहे. https://www.youtube.com/live/BW4k8dB0oL0?si=vhrBNOTVNF0hchgU दोन्ही चर्चा अत्यंत संयमित व सत्य काय आहे याकडे नेणार्‍या वाटल्या.

PM Modi meets former service chiefs, veterans amid tension with Pakistan PM Narendra Modi met a group of armed forces veterans today. PM had an extensive interaction with veterans on various issues on the current situation This included former Air Force Chiefs, Army Chiefs, Navy Chiefs and other veterans who have extensively served the country.

दोन्ही देशांकडुन शस्त्रसंधीची घोषणा.! पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. दोन्ही बाजुनी होणारे हल्ले तात्काळ बंद. India Pakistan Tensions Live Updates: Pakistan initiated call; both nations agreed to stop military action after direct talks, says India https://timesofindia.indiatimes.com/india/india-pakistan-tensions-live-…

युद्धबंदी करण्याची घोषणा परवा झाल्यानंतर आज आता दोन्ही देशांचे DGMO भेटत आहेत. यावर तज्ञ मिपाखरांनी लिहावे ही अपेक्षा.

सगळी माहिती सार्वजनिक न्यासावर उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्त माहिती लिहिण्यात/ त्या माहितीचे सोप्या शब्दात विश्लेषण करण्यात आपले कष्ट कशाला कोण वाया घालवेल? असे लिहिल्यावर येथे मूर्ख लोक अशा तर्हेचे प्रतिसाद टाकतात कि आपण लिहिले नसते तर बरे बहुतांश अभ्यासू लोकांना वाटते. एखाद्या उत्तम गायकाने "किरवाणी रागातील एखादी उत्तम चीज" सादर केल्यावर एखादा मूर्ख यापेक्षा "भीमण्णांनी आसावरी जास्त सुंदर सादर केला होता" अशी टिप्पणी करतो. पुढच्या वेळेस अशा मुर्खाला मैफिलीत येण्यास मनाई करावी असे व्यवस्थापनाला वाटत नसेल तर अशा स्थितीत त्या मॆफिलीत त्या गायकाला परत गावेसे वाटेल का?