हे म्हणजे अगदी मल्लिका शेरावत सारखं झालं. लोकांना बघायला आवडतं म्हणून मी दाखवते. किती दाखवायचं काय दाखवायचं ह्याला काही ताळतंत्र?.
१. रोजगार- नगण्य फरक पडेल. या बद्दल कोणाच्या रोजगारात फरक पडण्याची अपेक्षा आहे? किंवा आधी किती रोजगारनिर्मिती होत होती? क्रिकेटचे मैदान, स्टेडीयम वगैरेची देखभाल करणार्यांना रोजगार मिळेल. चार्टर्ड अकौंटंटना रोजगार मिळेल.
२. मित्रहो जाहीरातींचा हा खर्च आपण सर्व उत्पादनांच्या वाढीव किमती देवून उचलणार आहोत : बरोबर आहे. ही जाणीव आली तर लोक आरोग्याला आणि खिशाला अनावश्यक खर्च टाळण्याच्या मागे लागतील.
३. क्रिकेटची प्रगती ? हे काय असते? क्रिकेटची प्रगती होणे न होणे हे त्या खेळाशी संबंधित संस्था म्हणजे बीसीसीआय बघून घेईल. देश जेव्हा एखादा खेळ पुरस्कृत करतो तेव्हा त्याची चिंता आपण करू उदा कबड्डी, हॉकी. मुळात क्रिकेटर लोक बीसीसीआय साठी खेळतात. उदा: कपिल देव हा वर्ल्ड कप जिंकणार्या संघाचा कर्णधार होता. पण आय्सीएलमध्ये गेल्यावर बीसीसीआयने त्याची पेन्शन बंद केली.
४. तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा: इच्छा नसताना ज्या जनतेला या सर्वाची झळ बसणार आहे त्या बद्दल वाईट वाटते. क्रिकेट आवडणार्यांनी पुन्हा एकदा विचार करावा की हेच ते क्रिकेट आहे का जे आपल्याला बघायला आवडते.
तात्पर्यः सर्वांना कळकळीची विनंती आतातरी शहाणे व्हा. देशबिश मध्ये आणू नका. अनावश्यक खर्चाला आळा घाला. कोक, पेप्सीला कळू द्या की क्रिकेट त्यांचे सेल्स वाढवू शकत नाही.
या विषयावर मागल्यावेळेला म्हणजे जेव्हा इंग्लंडमधे विश्वचषक चालू होता तेंव्हा एक लेख 'सकाळ' मधे छापून आला होता. त्यात क्रिकेटच्या प्रेमाला 'स्वप्निल नशा' असे म्हटले होते. तेव्हा कारगिलचा संघर्ष गाजत होता. तेव्हा त्याच्या अनुषंगाने 'स्वप्निल नशा' हा शब्द वापरण्यात आला होता. त्यात जेवढा मानमरातब क्रिकेट खेळाडूना देतात त्याच्या १/१० तरी आपल्या जवानांच्या वाट्याला येतो का? असा सवाल विचारण्यात आला होता.
ता.क. नक्की कोणत्या विश्वचषकाच्या वेळेला कारगिल संघर्ष झाला हे मला नक्की आठवत नाही पण हा लेख मात्र आठवतो आहे.
तर मित्रहो तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा कारण आपल्या सगळ्यांना मुकेशभाई, शाहरुखभाई, प्रितीताईं ईत्यादींना ( आणि हो शरदभाऊ राहिलेच) क्रिकेट्च भलं करायला मदत करायची आहे.
पूर्ण सहमत..!
सध्या खेळाडूखरेदी, त्यांचा लिलाव, वगैरे जे प्रकार सुरू आहेत ते पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. माझ्या मते या प्रकारांना कायद्यानेच पूर्ण बंदी घालावयास हवी. कारण मध्यम ते दूरच्या भविष्यात सामान्य माणसाच्याच खिशाला या सर्वाची अप्रत्यक्ष झळ बसणार आहे हे निश्चित!
व्यथित व्हायला झाले आहे. उत्तम पैदाशीचे घोडे जसे विकले जातात तसे हे खेळाडू विकले गेले आहेत. सगळ्याच गोष्टींचे व्यावसायीकरण करून शेवटी सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला साधा खेळाचा आनंदही हिरावला जाणार आहे आणि त्याची जागा महागाईचे चटके घेणार आहेत. असा विषय चर्चेला आणल्याबद्दल मोहनरावांचे आभार.
प्रतिक्रिया
उत्तम चर्चा
हे म्हणजे अगदी मल्लिका शेरावत सारखं झालं. लोकांना बघायला आवडतं म्हणून मी दाखवते. किती दाखवायचं काय दाखवायचं ह्याला काही ताळतंत्र?.
१. रोजगार- नगण्य फरक पडेल. या बद्दल कोणाच्या रोजगारात फरक पडण्याची अपेक्षा आहे? किंवा आधी किती रोजगारनिर्मिती होत होती? क्रिकेटचे मैदान, स्टेडीयम वगैरेची देखभाल करणार्यांना रोजगार मिळेल. चार्टर्ड अकौंटंटना रोजगार मिळेल.
२. मित्रहो जाहीरातींचा हा खर्च आपण सर्व उत्पादनांच्या वाढीव किमती देवून उचलणार आहोत : बरोबर आहे. ही जाणीव आली तर लोक आरोग्याला आणि खिशाला अनावश्यक खर्च टाळण्याच्या मागे लागतील.
३. क्रिकेटची प्रगती ? हे काय असते? क्रिकेटची प्रगती होणे न होणे हे त्या खेळाशी संबंधित संस्था म्हणजे बीसीसीआय बघून घेईल. देश जेव्हा एखादा खेळ पुरस्कृत करतो तेव्हा त्याची चिंता आपण करू उदा कबड्डी, हॉकी. मुळात क्रिकेटर लोक बीसीसीआय साठी खेळतात. उदा: कपिल देव हा वर्ल्ड कप जिंकणार्या संघाचा कर्णधार होता. पण आय्सीएलमध्ये गेल्यावर बीसीसीआयने त्याची पेन्शन बंद केली.
४. तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा: इच्छा नसताना ज्या जनतेला या सर्वाची झळ बसणार आहे त्या बद्दल वाईट वाटते. क्रिकेट आवडणार्यांनी पुन्हा एकदा विचार करावा की हेच ते क्रिकेट आहे का जे आपल्याला बघायला आवडते.
तात्पर्यः सर्वांना कळकळीची विनंती आतातरी शहाणे व्हा. देशबिश मध्ये आणू नका. अनावश्यक खर्चाला आळा घाला. कोक, पेप्सीला कळू द्या की क्रिकेट त्यांचे सेल्स वाढवू शकत नाही.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
स्वप्निल नशा!!!
या विषयावर मागल्यावेळेला म्हणजे जेव्हा इंग्लंडमधे विश्वचषक चालू होता तेंव्हा एक लेख 'सकाळ' मधे छापून आला होता. त्यात क्रिकेटच्या प्रेमाला 'स्वप्निल नशा' असे म्हटले होते. तेव्हा कारगिलचा संघर्ष गाजत होता. तेव्हा त्याच्या अनुषंगाने 'स्वप्निल नशा' हा शब्द वापरण्यात आला होता. त्यात जेवढा मानमरातब क्रिकेट खेळाडूना देतात त्याच्या १/१० तरी आपल्या जवानांच्या वाट्याला येतो का? असा सवाल विचारण्यात आला होता.
ता.क. नक्की कोणत्या विश्वचषकाच्या वेळेला कारगिल संघर्ष झाला हे मला नक्की आठवत नाही पण हा लेख मात्र आठवतो आहे.
पुण्याचे पेशवे
कायद्यानेच बंदी..
तर मित्रहो तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा कारण आपल्या सगळ्यांना मुकेशभाई, शाहरुखभाई, प्रितीताईं ईत्यादींना ( आणि हो शरदभाऊ राहिलेच) क्रिकेट्च भलं करायला मदत करायची आहे.
पूर्ण सहमत..!
सध्या खेळाडूखरेदी, त्यांचा लिलाव, वगैरे जे प्रकार सुरू आहेत ते पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. माझ्या मते या प्रकारांना कायद्यानेच पूर्ण बंदी घालावयास हवी. कारण मध्यम ते दूरच्या भविष्यात सामान्य माणसाच्याच खिशाला या सर्वाची अप्रत्यक्ष झळ बसणार आहे हे निश्चित!
मोहनरावांनी अतिशय चांगला विषय चर्चेस घेतला आहे!
तात्या.
एका खेळाचा हा खेळखंडोबा झालेला पाहून
व्यथित व्हायला झाले आहे. उत्तम पैदाशीचे घोडे जसे विकले जातात तसे हे खेळाडू विकले गेले आहेत. सगळ्याच गोष्टींचे व्यावसायीकरण करून शेवटी सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला साधा खेळाचा आनंदही हिरावला जाणार आहे आणि त्याची जागा महागाईचे चटके घेणार आहेत. असा विषय चर्चेला आणल्याबद्दल मोहनरावांचे आभार.
चतुरंग
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
अभिजीत,धनंजय,तात्या,चतुरंग प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे माझे मराठीतले पहिलेच लिखाण होते.
मोहन
जुन्या
जुन्या काळी गुलाम विकले जायचे......
केरि पेकर ने खेळाडुम्ची सर्कस काढली होती...
बाकी आपले क्रुषी मंत्रि ह धन्द छान करतात.....
मला वाटते की त्याना त्या पैशातुन शेतकर्यांचे काही तरी भले करायचे असेल
मला वाटते कि त्याना.........
मला वाटते कि त्याना त्या पैशतून शेतकर्यांचे काही तरी भले करायचे असेल.
विजूभाऊ, एकदम त्यांच्या मनातले ओळखलेस. कमाल आहे तुझी.
-------- केशवराव.