काही दिवसांपुर्वीच "छावा" वाचले...
पहिल्या छत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले .हे खरे पण स्वाभिमानी माणसाने "कसे मरावे" हे शंभुराजेंनी शिकविले..
हजार प्रणाम........
संभाजी राजांच्या पवित्र स्मृतीस शतश: वंदन.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
छत्रपती संभाजीराजांच्या स्मृतीस मानाचा मुजरा.............
आम्हाला माणसे ओळखता येत नाहीत हे महाराष्ट्राचे खुप मोठे दुर्दैव आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
अशा साहसी छाव्याचा एक शतांश जाज्वल्ल्य अभिमान आणि पराक्रम आजच्या समस्त मराठी जनांच्या नसानसातून भिनला
तरी ह्या शूर छाव्याच्या बलिदानाचे सार्थक होईन
उदय मित्रा, छान श्रद्धांजली अर्पिली आहेस शंभू महाराजांना
प्रति शिवाजी अशा शंभूमहाराजांना मानाचा मुजरा
जय भवानी !!! जय शिवाजी
- सागर
मला इथे एक सांगावे वाटते माझी एक खुप जवळची मैत्रिण आहे,तिच्या घरी सभाजी महारांना मरताना खुप हाल सोसावे लागले याची आठवण म्हणुन १ महीना १ वेळाच जेवतात बाकी इतर काही खात ही नाहीत आणि त्या काळात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी पण हाच नियम असतो.
खुप छान लिहील आहेत तुम्ही.
ससमिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
समिधाताई, खरंच तुमची मैत्रिण आणि तिच्या घरचे ग्रेट आहेत.
सिंहाचं काळीज असलेल्या ह्या छत्रपतींच्या छाव्याला आमचाही मानाचा मुजरा.
उदयराव,
खरं आहे आपलं म्हणणं! आज महाराज आणि शंभूराजे नाहीत हेच बरं आहे. त्यांच्या डोळ्यांना सध्या चाललेली मराठी जनतेची विटंबना पहावली नसती आणि जर त्याविरोधात आवाज उठवायचा त्यांनी प्रयत्न केला असता तर आपल्याच मराठी माणसांनी त्यांना ठेचुन काढलं असतं. जाऊ द्या!
आपल्या महाराष्ट्राचे ते सोनियाचे दिन संपले हेच खरं. आता उरलेत ते फक्त 'सोनिया'चे दीन :(
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
धमाल मुला,
तुमचे अभिप्राय आणि प्रतिसाद नेहेमीच मस्त असतात आणि तसे ते मिपा वरील बहुतेक सगळेच लोक चोखंदळपणे वाचतात त्यामुळे त्यांचे प्रतिसाद वाचायला पण मजा येते.
समिधा ताईंची मैत्रीण आणि त्यांच्या घरचे ग्रेट आहेत यात वादच नाही , नुसते वाचून पण डोळ्यात पाणी आले माझ्या !
असाच म्या पामरावर लोभ असो द्यावा मालक !
उदय सप्रेम
क्षणभर साक्षात "शंभुराजे " आपली व्यथा शब्दात मांडतायत असा भास झाला.............आपल्या लिखाणाबद्दल काहीही लिहावयास शब्द कमी पडतायत............
निव्वळ अप्रतिम..............
पण शंभुराजांची व्यथा ही फक्त महाराष्ट्रापुरती व मराठी माणसापुरतीच खचितच नसावी .......... हिंदु धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगणारा व त्या साठी निधड्या छातीने व बेरडपणे पापी औरंग्याचे अनन्वित अत्याचार निडरपणे सोसणार्या थोरल्या महाराजांच्या ह्या सुपुत्रास मानाचा मुजरा.
फंदफितुरीने एका महान योध्याचा केलेला घात इतिहासात नमुद असतानाही आपण त्यावरुन धडा घेत नाही हेच आपल दुर्दैव..........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
अगदी योग्य ...
स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असेल तर स्वराज्याचा दुसर्या छत्रपतींनी म्हणजे आम्ही , स्वाभिमानी माणसाने "कसे मरावे" एह्वढे तरी नकीच दाखवले नाही काय?
--- पण अतिशय दुर्दैवी राजा .. बहूतेक कारकीर्द घरातल्यांच्या कुटील कारस्थानां ना नेस्तनाबूत करण्यात गेली ..
शंभू राजे हे संस्कृत मधे काव्यरचना करित असे ऐकून आहे .. त्यानी "नखशिखा" नावाचे काव्य लिहिले होते .. (ज्या मुळे महाराणी सोयराबाईंच्या हातात एक कोलीतच मिळाले)
त्यांचे संपूर्ण चरित्र वाचल्यावर असे वाट्ते त्यांना सुद्धा शिवछत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असते तर ...
त्यांनी आपल्या फक्त ९ वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्या साठी जे केले ते अनेकांना आपली संपूर्ण हयात खर्ची टाकून सुद्धा करणे जमले नाही .
हल्ली कोणाच्याही जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्या होत असताना छत्रपती संभाजी महाराजांची आपल्याला (म्हणजेच महाराष्ट्राला) आठवण नसावी हा आपलाच करंटे पणा ...
मनीषा ताई,
आपली कळकळ पोचली.काही स्पष्टीकरण :
--- पण अतिशय दुर्दैवी राजा .. बहूतेक कारकीर्द घरातल्यांच्या कुटील कारस्थानां ना नेस्तनाबूत करण्यात गेली .. : हे मात्र संपूर्णपणे तितकेसे खरे नाही , घरातील कागाळ्या चालू असताना पण त्यांनी गाजवलेले पराक्रम वंदनीय आहेत ! पोर्तुगीजांना तर दे माय धरणी ठाय करून सोडले होते !जे छत्रपती शिवाजी महाराजांना जमले नाही ते त्यांनी केले होते , जंजिरा किल्ल्यावर खाडीत अर्ध्या खाडीत रामाप्रमाणे सेतू बांधला , पण नालायक औरंग्या चालून आल्याने ती मोहीम अर्धीच टाकावी लागली.ज्याच्या हाती समुद्रसत्ता तो राजा - हे महाराजांचे वाक्य त्या छाव्याने लक्षात ठेवून प्रयत्न खूप केला.९ वर्षात एकही किल्ला स्वतःच्या शौर्यबळावर औरंग्याला मिळवता आला नाही ! एक हंबीरराव मोहिते सोडल्यास सगळ्याच अष्टप्रधान मंडळींनी आपापले दात दाखवले ! दुर्दैवानी संभाजी राजे हे शिवाजी महाराजांएव्हढे धूर्त आणि राजकारणी नव्हते त्यामुळे मनातील राग आणि मनातील गोष्ट पोटात ठेवता नाही आली त्यांन आणि त्याचेच परिणाम म्हणून ते पकडले गेले !
शंभू राजे हे संस्कृत मधे काव्यरचना करित असे ऐकून आहे .. : होय , नायिकाभेद, नखशिखा , आणि बुधभूषणम् अशी ३ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत !
त्यांचे संपूर्ण चरित्र वाचल्यावर असे वाट्ते त्यांना सुद्धा शिवछत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असते तर ...ते शिकवले होतेच , फक्त या दिलदार राजांना धूर्तपणा कधीच जमला नाही !
त्यांनी आपल्या फक्त ९ वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्या साठी जे केले ते अनेकांना आपली संपूर्ण हयात खर्ची टाकून सुद्धा करणे जमले नाही . : अगदी बरोबर ("नाकी नऊ येणे" हा वाक्प्रचार औरंगजेबापासूनच सुरु झाला असावा असे मी बर्याच वेळा गमतीने म्हणतो पण !)
माझे मिपा वरील इतर लेख , कविता, स्केचेस पण आपण नजरेखालून घालाव्यात अशी विनंती !
हल्ली कोणाच्याही जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्या होत असताना छत्रपती संभाजी महाराजांची आपल्याला (म्हणजेच महाराष्ट्राला) आठवण नसावी हा आपलाच करंटे पणा ...एक्दम रास्त !
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
या ओळी छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पित्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांवर लिहीलेल्या चरित्रात्मक काव्यातुन घेतलेल्या आहेत. मुळ संस्कृत भाषेत असलेले हे "बुधभुषणम" नावाचे काव्य आहे.
या ओळींचा अर्थ साध्या शब्दात सांगायचा झाला तर ..
"कलिकालरूपी भुजंग घालीतो विळखा
करितो धर्माचा र्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल
त्या शिवप्रभुंची विजयदुंदूभी गर्जूदे खास ! "
छत्रपती संभाजीराजांनी या काव्यासहीत आणखी चार काव्यग्रंथ लिहीले आहेत. ते "नृपशंभू" या नावाने काव्यलेखन करीत. बुधभुषणम आणि नायिकाभेद ही त्यांनी लिहीलेली संस्कृत काव्ये होत. तर त्यांनी वृंदावनी ब्रज भाषेत "नखशिखा" आणि " सातसतक" ही दोन काव्ये ही लिहीली आहेत. ज्या हाताने तलवार चालवुन औरंगजेबाला पळता भुई थोडी केली त्याच हातांनी ही नितांतसुंदर काव्येही केली आहेत. गंमत आहे नाही?
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
शंभू राजे विस्मरणात गेले असतील तर ते नालायक राजकारण्यां मुळे, ज्या राजकारण्यांनी मराठी स्वराज्य तर बुडवलेच आणि आता महाराष्ट्र बुडवत आहेत.
आमच्या सारख्या कैक मराठी जणां साठी ते आज पण छत्रपती आहेत.
कल्पना करवत नाही जेव्हा भूपाळगडा वरच्या शिबंदी चे हाल दिलेरखान ने केले तेव्हा शंभू राजांना काय यातना झाल्या असतील.
पण त्यांनी ज्या तयारीने स्वराज्य लढविले त्याची तुलना केवळ थोरल्या महाराजांच्या डावपेचाशी होऊ शकते.
सुमीत जी,
अगदी खरे आहे !ज्यांना राजे लक्षात आहेत त्यांच्यासाठी हा लेख नाहीच मुळी , ज्यांना लक्षात ठेवण्याची गरज आहे पण तरी लक्षात नाही त्यांच्यासाठी हे "जोडे" मारले आहेत !
शिव-शंभू आमच्या मनाच्या देव्हार्यात कित्येक युगे रहातील याची खात्री बाळगावी ! माझे इतर ऐतिहासिक लेख पण मिपा वर आहेत ते वाचावेत अशी आग्रहाची विनंती !
उदय सप्रेम
शंभू राजे विस्मरणात गेले असतील तर ते नालायक राजकारण्यां मुळे, ज्या राजकारण्यांनी मराठी स्वराज्य तर बुडवलेच आणि आता महाराष्ट्र बुडवत आहेत.
अरे बाबा, शंभूराजांच्या नावावर वातावरण तापवून पोळी भाजणं शक्य असतं तर कशाला कोणी सोडलं असतं रे? जेव्हा जमेल तेव्हा हे शित पाहून येतीलच की भुतं !!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
शंभू राजे हे संस्कृत मधे काव्यरचना करित असे ऐकून आहे .. : होय , नायिकाभेद, नखशिखा , आणि बुधभूषणम् अशी ३ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत !
महान पराक्रमी संस्कृत पन्डीत प्रोढ प्रताप धुरन्धर श्री सम्भाजीराजे भोसले यान्ना मानाचा मुजरा.
शम्भुराजे यान्नी लिहिलेल्या ग्रन्थ सम्पदा : बुधभुषणम (संस्कृत), सात सतक्,नायिकाभेद्,नखशिखा( तिन्ही हिन्दी). दुर्दैव आपले की त्यान्नी लिहिलेल्या ग्रन्थ सम्पदा आपल्याला माहीत नाहीत. सौ. शैलजा मोळक(पुणे) यान्नी महत्प्रयासाने बुधभषणम चे मराठी रुपान्तर आपल्या साठी उपलब्ध करुन दिले आहे.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
सईबाई म्हणजे संभाजीची सख्खी आई. ती बाळंतपणातच स्वर्गवासी झाल्यामुळे ह्या मुलाच्या नशिबी असे भोग आले. जर आपले वैद्यकशास्त्र प्रगत असते तर सईबाई वाचली असती तर संभाजीराजांची नीट देखभाल झाली असती आणि नंतरचा इतिहास वेगळाच घडला असता. दैवयोग दुसरे काय?
पण औरंगजेबाचा धर्मपिसाटपणा आणि संभाजीराजांची धर्मावरील धगधगती निष्ठा ह्या दोन गोष्टी त्यांच्या मृत्युमुळे सगळ्या महाराष्ट्राला नीट कळल्या.
माझी त्यांना आदरांजली.
प्रतिक्रिया
सलाम !!!!!!!!!!!!!!!!!!
शंभुराजां
नतमस्तक
मुजरा...
छत्रपती
शंभूमहाराजांना मानाचा मुजरा
माझाही मानाचा मुजरा
वा! काय हे प्रेम!!
उत्तर
क्षणभर
देव निष्क्रिय दुर्बळ्यांची नाही तर प्रयत्न करणारांचीच साथ करतो
उत्तर
कविमनाचा राजा
असा हा आमचा राजा
उत्तर
सागर असं बोलु नये!
+१ हेच
महान पराक्रमी संस्कृत पन्डीत प्रोढ प्रताप धुरन्धर
शंभुराजां
इथे ओशाळला मृत्यू
सईबाई