Skip to main content

महाराष्ट्रातलं राजकारण!

लेखक राघव यांनी बुधवार, 21/08/2024 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-) सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही. सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही. काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे. - सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे. - त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे. - मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल. महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय. बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय. मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत. त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल. यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही. त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर! अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल. इत्यलम्

वाचने 16985
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

खरंय. अन् केवळ सातत्यच नाही, प्रामाणिकपणाचा संपूर्ण अभाव आहे. त्यामुळे आहे त्यातनंच चांगल्यात चांगलं बघायचं असंच काहीसं सगळ्यांचं झालंय. म्हणूनच तर म्हणतो. चांगल्या पर्यायासाठी लोकं तयार आहेत. तसं करू शकणारा पुढे येण्याची गरज आहे.

मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती.
मग दिल्ली दरबारी सुलतान-शहांना , नजराणा कसा काय दिला असता .. काहीही .. म्हणे विरोधात बसा आणि कोरडी भाकरी खा ...

बाकी काहीही म्हणा तुंम्ही या पक्षांना, पण राज ठाकरे? या व्यक्तीसाठी शेवटच्या काही ओळी तुंम्ही खर्ची घातल्यात, त्यांनी केंव्हा काय केलं आहे लोकांसाठी? दरवेळी भूमिका बदलत असल्याने व्यक्तीगत लाभासाठी कोणत्याही थराला जातात हे स्पष्ट आहे. हा, फार तर लोकांना काही तास हसवण्याचे पुण्य नक्कीच आहे त्यांच्या नावावर. शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष होता आणि आहे, आणि यांनाही त्या कुटुंबात असल्यानेच बातम्यात जागा मिळते. बाकी सगळे पक्ष संधीसाधू आहेत, याबाबत सहमत.

In reply to by स्वधर्म

शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष होता आणि आहे शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे ना? मग घराणेशाहीवाला पक्ष कसा झाला ब्वा?? उद्धव ठाकरेंनी स्थापलेली शिवसेना हा त्यांचा स्वतःचा पक्ष आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मूळ शिवसेना बाळासाहेब निवृत्त झाल्यावर घराणेशाही पक्ष झालं त्या बद्दल चाललंय,,,, सुरवातीला बाळा साहेबांबवबर चांगले सहकारी होते, मग घराणे आले जर अंतर्गत लोकशाही असति तर शिंदेंना बाहेर पडावे लागलेच नसते जर किँग्रेस मध्ये अंतर्गत लोकशाही असती तर शशी थरूरांन कदाचित अध्यक्ष होता आले असते ( लुटुपुटी ची अध्यक्षीय निवडणूक, किती तरी वर्षे नक्की कोण अध्यक्ष हेच माहित नाही, ) पवार = राष्ट्रवादी काँग्रेस = नेहरू- गांधी हे स्फटीका सारखे स्पष्ट दिसतंय तरीही .. तळी उचलूच धरा अंधगुलाम भारताची लोकशाही सर्वात मोठी आहे याचे कौतुकच आहे पण तीला घराणेशाही ने वेढलेले आहे , हे नाकारता येणार नाही

In reply to by चौकस२१२

सहमत. भाजप मध्ये घरानेशाही नसती तर विनोद तावडे किंवा एकनाथ खडसेंकडे महाराष्ट्राचे नेतृत्व असते.

In reply to by स्वधर्म

तुमचं म्हणणं मान्य आहे. मी देखील हेच लिहिलं आहे की त्यांचा महारष्ट्रभर अजून जम नाही. पण सद्यपरिस्थितीत राजकीयदृष्ट्या त्यांना उत्तम संधी आहे, जर नीट उपयोग केला तर! बाकी घराणेशाही हे पिल्लू भाजपनं पुढे केलंय काँग्रेसला घेरण्यासाठी. मला व्यक्तिगतदृष्ट्या तसा फरक पडत नाही त्यानं. घराणेशाही असली पण काम करणारा माणूस असला, तर हरकत असण्याचं काही कारण नाही खरंतर.

In reply to by स्वधर्म

दरवेळी भूमिका बदलत असल्याने अगदी अगदी.. एकीकडे त्यांचे जुने विडिओ आहेत ज्यात त्यांचा बाबासाहेब पुरंदरेंबद्दल आदर दिसून येतो आणि नंतर बारामतीच्या काकांकडे गाडी वळवल्यावरचे विडिओ ... माणूस हुशार आहे पण "काय होतास तु काय झालास तू , अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू असे काहीसे झालाय "

घराणेशाहीवाला पक्ष -? कॉन्ग्रेसची घराणेशाही, बेळगाव आणि पाकडे हे तीन मुद्दे दसऱ्याच्या सभेत कायम असायचे. ते कायमचे पुरून टाकले आहेत.

बाकी भाजपने नेतृत्वबदल केलं असतं तर मविआ ला पुढील निवडणूक नक्की जड गेली असती. आता पुढील मामू बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे की जयंत पाटील हे पहावे लागेल. विरोधी पक्षनेता कोण हे सांगायला हवे का? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ओह म्हणजे नेतृवा नकोय हो का आडनाव बोचतंय कि काय तुम्हाला? बाकी पक्ष चालेल ? असो खिचडी सरकार येणार तर परत? त्यापेक्षा सरळ कोइंग्रेस ला १७० मिळोत किंवा भाजप ला

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदी ओबीसी , राजनाथ ? योगी? हे ब्राह्मण नाहीत तरी तुम्ही बॉम्ब मरणार कि भाजप एक जात चालवते ? कधी नव्हे तर एक "बामन" महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ते सुध्धा त्याच्या कामामुळे ,,, तर सतत त्याची जात काढणाऱ्यांनी दुसऱ्यानं बोलू नये पंढरपूरला पूजा करणायचाच मान हा मुख्यमंत्री पदाचा असतो तरी केवळ " फडणवीस" म्हणून त्यांना विरोध,, पूर्रो गामी महाराष्ट्राला हे चांगलं दिसत वाटत ? आणि हे सगळे कोण ओकतं तर "हंम भी जनेउधारी " असे सोयीचे असेल तेव्हा म्हणारे काश्मिरी हिंदू पंडित ! रॉउल बाबा !

In reply to by चौकस२१२

परमपूज्य व्यक्तीमत्व आहे..... पण एक मात्र आहे... ह्यांच्या बाबतीत तुम्ही सध्या तरी सत्य विचार मांडू शकता. ते सध्या तरी हल्ला करत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाळासाहेबांचे भाषण https://www.youtube.com/shorts/WMMRvb1sJ4g शरद पवारांवर सरळ निशाणा " शरद पवारांनी वसंतदादांन्च्या पाठीत खंजीर खुपसला तो वसंतदादा काय बामन होता काय ? "

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रोफेश्वरचे शिष्य शोभता ,, कशी सुचला नाही कि तिथे काय नि हिथे काय हि फालतुगिरी सुरु असो तुमच्या राज्यात काय चाललंय ते बघा,, जातीवाद नष्ट करा म्हणणारेच "जातीवर "आधारित " आरक्षण वाढवता येतंय का बघताहेत ! ( ते सुद्धा ९६% कुळी म्हणवणारे छत्रपती राजवंश वाले क्षत्रिय " असो ऑस्ट्रेल्यात ना ना जात ना धर्म सर्वधर्म समभाव .. कॉमन सिव्हिल कोड हा पण लिब्रँडू पणाचा रोग येथेही चालू आहेच "ऑल आइजऑन राफा " वाला खलिस्तानी समर्थक हिंदू मंदिरांवर हल्ला करता ,, पण तुम्हाला म्हणा काय त्यःचे ... तुम्हाला भारताचे बालकानायझेशन कधी याची घाई झाली असणारं

In reply to by चौकस२१२

वैचारीक मुद्दे संपले की व्यक्तिगत पातळीवर काही व्यक्ती प्रतिसाद देतात... गधा तो गधे के साथ ही रहेगा और शेर शेर के साथ.... मैने तो किसीका नाम नहीं लिया....

महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा वचक आहे. पण महाआघाडीच्या चकलीत तीन शत्रू तात्पुरते एकत्र आहेत. लोकसभा निकालानंतर कॉन्ग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. स्वतंत्र जाण्याकडे कल वाढला आहे.

In reply to by कंजूस

लोकसभा निकालानंतर कॉन्ग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. स्वतंत्र जाण्याकडे कल वाढला आहे.
बरोबर. त्यामुळेच मतविभाजनाचा मुद्दा मांडला होता. कोणाला सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो हा बुद्धीबळाचा मामला आहे. :-)

१९४७ पासून (किंवा त्या आधीदेखील) राजकारण नेहेमी किचकट, विचित्र आणि गलिच्छच राहिलेले आहे. सुरूवातीला राजकीय दृष्ट्या साधनशुचिता वगैरे पाळत बसल्याने सतत पराभूत होत राहिलेले, किंवा राजकीय दृष्ट्या वाळीत टाकले गेलेले पक्ष/ संघटना देखील आता गलिच्छ राजकारणात हिरीरीने सहभागी झाल्याने ज्यांची एकाधिकारशाही समाप्त झाली, ते लोक फार काही आक्रीत घडले आहे असा कांगावा करत आहेत.

In reply to by मूकवाचक

मी सरसकट राजकारणाबद्दल बोलत नाहीये. राजकारण नको ही आपली सगळ्यांची मानसिकताच राहिलेली आहे आणि त्याला कारणही नेतेच आहेत. पण यावेळचं राजकारण म्हणजे अगदी सडलेल्या कचऱ्याच्या राशीसारखं झालंय.. नाक धरून दूर जावंसं वाटतं! राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि निवडणुकीनंतरच्या तडजोडी हे आधीही होते. पण जो निलाजरेपणा आजकाल माजलेला दिसतोय, तेवढा आधी एवढा जाणवला नाही.

जर उद्धव ठाकरेंनी स्वततःसाठी जनतेचा कौल नाकारलं नसता १०५+५६ तर पुढे या सगळ्या कोलांट्या उड्या कोणालाच माराव्या लागल्या नसत्या आता स्वतःची लाचार परिस्थिती करून घेतली आहे मूळ शिवसेना प्रेमी ( ज्यानं राज ठाकरे वेगळे झाले, शिंदे वेगळे झाले याचे दुःख वाटले ती लोक) सहानुभूती म्हणून उदाहव ठाकरेंना मत देतील हि पण त्यांची परिस्थिती आता बघवत नाही .... असो प्रादेशिक पक्ष+ घराणेशाही कमी व्हावी राज्य आणि देश पातळीवर भाजप आणि काँग्रेस (नेहरू गांधीविना ) असे दोन पक्ष मजबूत व्हावेत अशी अल्लाह चरणी प्रार्थना

In reply to by चौकस२१२

भाजपने २.५ वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला हव होतं शिवसेनेला. नाहीतर असा दारुण पराभव झालं नसता लोकसभेला महाराष्ट्रात. ठाकरेंमुळे आपले २३ खासदार निवडून आले होते हे विसरले भाजपेयी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्य खिशातील ५० रु तुझ्य खिस्तातील १०० रु मिळून आणू लाडू ३ पण मी मात्र खाणार त्यातले २! वा रे वा काय डोक्यालिटी तीच डोक्यालिटी चालवयाला दिल्ली ला गेले होते .. सुपडा साफ करून पाठवला "मम्मी" नि

महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. या बाबत सहमत आणि अस्वस्थच वाटेत ( राणे आणि चव्हाण भाजपात ( संगाची चड्डी घालून) हे दृश्य डोळ्यासमोर आले आणि उलटी झाली- कारण त्यांची मूळ विचारसरणी संघ परिवराशी विसंगत आहे म्हणून जातीचा काही संबंध नाही , चंद्रकांत पाटील उदाहरण आधी पासून भाजपशी निगडित आहे ) पण भाजप ला हे सगळं का करावे लागेल याची हि करणे समजून गयायाल पाहिजेत १) सत्ता नाही तर कार्यक्रम राबवता येत नाही २) महाराष्ट्र्रात संघ निर्माण होऊन सुद्धा महाराष्टार्त भाजपाला कधी जनतेचा आधार मिळल नाही आता मिळाल्या लागलाय तर तो टिकवलला पाहिजे असे कुठे तरी वाटणे साहजिक आहे ३) १०५+५६ असे आल्यावर साहजिक सत्ता मिळेल असे वाटेल होते, ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री हे हि साहजिक आहे पण याला उद्धवने काडी लावली ४) पहाटेचा शपथविधी हि खरीच "चड्डी उतरवणाररी " गोष्ट घडली खरे , शरद पवारांनी भाजपला "त्याचू " बनवला आणि अजित पवारांना पण जी लोक भाजपने सेनना आणि राष्ठ्रवादी फोडली असा शिमगा करीत आहेत त्यानना नम्रपणे आठवण करून द्यवीशी वाटते कि स्वतः इंदिरा गांधींनी कांग्रेस फोडली होती आणि पवारांनी वसंतदादा पाटील यांना धोका दिला होता

"चार भिंतींच्या आतमध्ये तरी मुख्यमंत्री ठरवा" अशी कळकळीची विनंती झाली आहे. म्हणजे उद्धवना घाई झाली आहे मी होणार का नाही कळण्याची. पवार काकांचं पारडं जड झालं तर सुप्रिया हे निश्चित. कॉन्ग्रेसचा उमेदवार हा फक्त दिल्लीचं कान देऊन ऐकणारा कुणीही असेल. त्याचं काम निरोप्याचं असेल. पुढे काय होणार? तर दिल्ली जनपथ/मुंबई सिल्वर ओक/मातोश्री येथे सतत बैठका. टेलिफोन क्रांती झाली तरी जाऊन भेटूनच बोलतात. फोनवर conference वर कामं होत नाहीत.

In reply to by कंजूस

शिवसेनेचा झाला तर उद्धव फिक्स, राष्ट्रवादीचा जयंत पाटील होईल बहुतेक. काँग्रेसचा बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण. उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडले ते अतियोग्य केले हे काळ ठरवतानाक दिसतोय. नाहीतर शिवसेना संपवली असती भाजपने.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण हुकूमत नसणार. बाहुलं होणार नवा मुख्यमंत्री. तीन ठिकाणी धावल्याशिवाय काही करू शकणार नाही. मग योजनांचं काय? त्याचा पैसा कसा कुठून आणणार? अगोदरच्या सुरू ठेवायच्या तर नवीनसाठी पैसे ?

In reply to by चौकस२१२

चिंता नको. मविआ व्यवस्थित संभाळेल राज्य. एकत्र येऊन. सगळ्या कपट कारस्थानाना पुरून उरेल.

महाराष्टरातील राजकारणात ज्यांना भाजपवर टिक्का करायची असते त्यांचा एक ठरलेलला मुद्दा सतत वाचनात येतो तो म्हणजे "भाजप महाराष्ट्र त गुजराती कीड पसरवत आहे त्याचा काय" काय मूर्ख मुद्दा आहे हा , अनाठायी मुद्दा अर्थात रोख असतो मोदी आणि शहा हे दोन्ही गुजराथी आहेत याचे, पण या टीकाकारानं हे समजत नाही कि भाजप हा काही गुजराथी पक्ष असे नाहीये त्याचा इतिहास बघितला तर ४तले पोर हि सांगेल काय आहे ते केवळ योगायोगाने ते दोघे एकाच प्रदेशातील आहेत आणि तसे बघायला गेले तर भाजपचं मागील संघात मराठी लोकांचे वर्षंस्व / प्रभाव सतत राहिलेलला आहे या आधी वाजपेयी + अडवाणी होते म्हणजे तो कोणता पक्ष ? उत्तरप्रदेशी + सिंधी या पुढे समजा गडकरी + फडणवीस असे दोन पुढे नेतृत्वात आले तर काय शिमगा करणार? मराठी पक्ष झाला की काय लगेच तो ?

In reply to by चौकस२१२

महाराष्ट्रातून गुजरातला किती प्रकल्प पळवले गेले ह्याचा काही अभ्यास??

महाराष्ट्रात खिचडी / भेळ, जे काय गेली काही वर्षे चालू आहे याला जनता पण जबाबदार आहे असे म्हणण्याची काही कारणे १) केवळ व्यक्तीपुजे मुले मतदान क रणे , पक्ष काय आहे , त्याची भूमिका काय या कडे दुर्लक्ष "जिथे दादा / ताई, भाऊ तिथे आम्ही" हि वृत्ती मग उद्या एखादा संघ परिवारातील कम्युनिस्ट झाला तरी त्याला मत देतील ..किंवा एकदा सांजवाडी भाजपात अल्ला तरी त्याला ( एक भाजप समर्थक म्हणून मोदी व्यक्तिपूजेची पण माझ्यसारख्याला शिसारी येते आणि त्यापेक्षा भीती हि वाटत्ते कि केवळ मोदी म्हणून जे लोक भाजपला मत देतात ते उद्या मोदी निवृत्त झाल्यावर काय? करतील किंवा त्याना मोदींचाच आक्रमक पणा आवडत असला तरी पक्षाची धोरणे पटली आहेत का समजली आहेत का ? नसतील तर आंधळेपणाने मत देणे धोक्याचे ,, सुधृढ लोकशाहीत* असे होऊ नये २) भाषिक प्रांत रचणे चा एक थोडा गैरफायदा म्हणजे देशापेक्षा राज्य जास्त महत्वाची ह्या भावनेची झालेली पेरणी * खुलासा : भारतीय लोकशाही हि सर्वात मोठी आहे हे पूर्ण मान्य परंतु त्यातील काही कमतरता असेल तर हि असे वाटते , ( येथे इतर वेस्टमिनिसस्टर पद्धतील लोकशाहीतील उदाहरण देण्याचा मोह होतोय पण टाळावा लागेल कारण मग "तिकडे कस काय पाणी आहे का? कि कसे धुता असेल फालतू प्रश्न विचारले जातील )

In reply to by चौकस२१२

हे माझे वैयक्तिक मत आहे. (विशेषत: बांगलादेश मध्ये सध्या जे काही चालले आहे ते पाहता...) अडवाणी आणि बाजपेई यांनी पाया रचला. सध्या मोदी परराष्ट्रीय धोरण अतिशय उत्तम राबवीत आहेत. ह्याचाच फायदा, योगीचे सरकार घेणार. योगी, हेमंत बिस्वा. सध्या तरी, हेमंत बीस्वा आसाम सोडायला तयार नाहीत.अर्थात, अशा वेळी, अन्नामलाई हा दुसरा पर्याय देखील भाजपा कडे आहे. वैयक्तिक पातळीवर, मला तरी, अन्नामलाई हे जास्त उत्तम वाटतात. इतर पक्षांकडे ना पंतप्रधान पदासाठी चेहरा आहे ना ही देशाच्या प्रगतीसाठी धोरण...इतर पदांसाठी तर, कुठलाच चेहरा नाही. वरील प्रतिसाद, हा फक्त आणि फक्त, चौकस २१२ , ह्यांच्या साठीच आहे. (वादे वादे जायते संवाद:, असे होत असेल तर आणि तरच, वादविवाद करण्यात अर्थ आहे.)

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि तुम्ही देशाबद्दल बोलताय , मला वाटते हा धागा महाराष्ट्र राज्य बद्दल चालू आहे ?

सध्या तरी केवळ महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून चर्चेकडे पहावे म्हणतो. राज्याचा विकास म्हणजे मुंबई - पुण्याचा विकास इतपतच पुर्वी धोरण असायचं. ते किंचित जरा बदलल्यासारखं वाटतंय. पण अजूनही पुरेसं नाही. मुंबईचं स्वतःचं उत्पन्न वेगळं धरलं तर उर्वरित महाराष्ट्राचं उत्पन्न देशभरात कोणत्या क्रमांकावर असेल हे विचारात घेण्यासारखं आहे. मोदी-मोदी करत महाराष्ट्र भाजप मतं मागत फिरतो, पण मोदींचा आदर्श स्वतः वागवत नाही. उदा: - मोदी मुख्यमंत्री असतांना गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय पातळीवरील किती नेत्यांच्या सभा झालेल्या आठवतात? - मोदी स्वतः विकासाच्या मुद्द्यांना पुढे ठेवत गुजरात निवडणुका लढवत होतेत. त्यावेळी केंद्र पातळीवरील योजनांचा कितपत आधार त्यांना होता? - कोणताही अंतर्गत विरोधक मोदींनी गुजरातेत शिल्लक ठेवला नाही आणि विरोधी पक्षाला एका विशिष्ट परीघाबाहेर जाऊ दिले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परिस्थितीवर काय बोलणार? - पर्यटनासाठी म्हणून कितीतरी आकर्षक योजना मोदींनी गुजरात साठी म्हणून पुढे आणल्यात. तिथे उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. इथे असलेले जायची वेळ आलेली आहे. - सोलार रिन्युवेबल एनर्जी साठी एवढा मोठा सेटअप तयार करणे, गुजरातला एनर्जी सरप्लसच्या कॅटेगरीत नेवून बसवणे हे विजन असल्याशिवाय होत नाही. - - - अनेक उदाहरणे देता येतील आणिक. म्हणण्याचे तात्पर्य काय तर मोदींच्या नावावर मते मागण्याचा फार्स आता बंद व्हायला हवा. यांना स्वतःची काही राज्याच्या विकासाची विजन आहे का नाही? असेल तर मांडा म्हणावे पुढे. सध्यातरी केवळ संधीसाधू राजकारण, कुरघोड्या आणि भांडणे यातच यांचे दिवस चाललेत. हेच इतर सर्व पक्षांनाही लागू पडते. कामाच्या विजनवर, ते प्राप्त करण्याच्या कुवतीवर आणि करून दाखवण्याच्या क्रेडिबिलिटीवर मतं मागून दाखवावे. क्रेडिबिलिटी म्हटले तर राज ठाकरेंबद्दल बोलण्याची तशी सोय नाही. तरीही राज ठाकरेंना संधी आहे असे मी म्हणतो याचे कारण त्यांची पाटी इतरांच्या मानानं अजून कोरी आहे. जर नीट वापर केला तर बरेच काही करू शकतील. मोदींना शिव्या घालणे सोपे आहे. पण पुढच्या १०/२०/३० वर्षांची विजन मांडणे, त्यासाठी योजना आखणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी धडपड करणे.. हे सर्व आणि तेही विरोधकांसमवेत राजकारण खेळत-खेळत करणे.. ते येरागबाळ्याचे काम नोहे. दुर्दैवाने सद्यस्थितीत असे करू शकणारा कोणताही नेता/पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही.

In reply to by राघव

दुर्दैवाने सद्यस्थितीत असे करू शकणारा कोणताही नेता/पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही.
अगदी!

In reply to by राघव

गुजराथमधे भाजपकडे बहुमत असताना मोदी मुख्यमंत्री झाले व त्यांना काम करायला १२ वर्षे मिळाली. जर भाजपाकडे बहुमत असताना फडणवीस मुख्यमंत्री असते आणि त्यांना सलग १२ वर्षे मिळाली असती तरीही महाराष्ट्रात काही वेगळे घडले नसते असे तुम्हाला वाटते काय?

In reply to by शाम भागवत

नाही नसतं घडलं,मंत्री म्हणून २०१४-२०२४(मधली २ वर्षे वगळता) मोठा काळ आहे.अजून किती वेळ द्यायचा?

महाराष्ट्र सध्या खाऊ गल्ली झालाय व पोटभर्याचीं मांदियाळी आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात हेच कळत नाही. भाषा शिवराळ, माध्यमे , कर्मचारी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेताना दिसतात. सामान्य जनता आणी संविधानाची पायमल्ली,आरक्षण नावाची पुंगी वाजवत सामान्य जन्तेवर गारूड करण्याचा प्रयत्न व आम्हींच कसे खरे प्रजेचे कैवारी हे दाखवण्याची होड लागली आहे. माझ्या दृष्टीकोनातून तर निराशाजनक वातावरण आहे. मर्द?मराठा मावळ्यांची वंग बंधू सारखी परिस्थीती होणार यात मला तरी शंका वाटत नाही. मनसे कडून मला तरी जास्त आपेक्षा नाही. पन्नासेक वर्षापुर्वी उ प्र देशात गेलो होतो तेव्हां माझ्याकडे पुण्यावरून आलो म्हणल्यावर ऐलिस इन वडंरलॅण्ड मधून आल्या सारखे इतर लोक बघत असे. संतोष याचा आहे की माझेतर पाच दहाच राहिलेत पण येणाऱ्या पिढी करता वाईट वाटते. तरी आज कोर्टाने प्रस्तावित बंदला परवानगी नाकारली . बदलापूर च्या आड आपली रा. रो. शिकण्याचा प्रयत्न तर नाही.... दोन वाजेपर्यंत बंद करून गुन्हेगारांना उपरती होणार होती का ? बहुसंख्य जनता रोजंदारीवर त्यांचे काय? उद्या माझ्या मामे बहिणीचा दशक्रिया विधी आहे. ब्कद असल्यास सा जाणार मी पुण्याहून श्री क्षेत्र माहूली येथे? असे अनेक ऐरणीवर प्रश्न....... नेतृत्व उद्घोषणा करते ,भक्त चिपळ्या घेत नाचू गाऊ लागतात पण खरी परवड सामान्य जनतेची होते. Ssssssssssssss,ह्म्म . माझा कुठलाही पक्ष नाही मी पक्षाचा नाही...

In reply to by कर्नलतपस्वी

ग्रामदैवते जास्त त्रासदायक ठरत आहेत. जाऊ द्या.

४-५ वर्षांचा विचार केला तर खूप गोंधळाची स्थिती आहे हे मान्य करावे लागते आहे. मात्र १९७८ च्या पुलोदच्या प्रयत्नापासून कॉंग्रेस विरोधकांची संख्या कमीकमी होत जाताना दिसते आहे. तसेच हिंदूंहितैषी समजला जाणारा पूर्वीचा जनसंघ किंवा आत्ताचा भाजप मोठा होत जाताना व मतदान टक्केवारी वाढवत जाताना दिसत आहे. या प्रत्येक वेळी कॉंग्रेसविरोधकांपैकी कोणितरी कॉंग्रेस किंवा शरद पवार यांना मदत होईल अशी भूमिका घेतो व स्वत:चे आत्मसमर्पण करून घेत आला आहे. २०१४ नंतर राज ठाकरेंनी असंच काहीतरी करून स्वत:चे महत्व कमी करून घेतले आहे. आता ते चूक दुरूस्त करायचा प्रयत्न करत असले तरी आता फार उशीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हाती देण्याइतपत, ते फारसे विश्वासार्ह समजले जात असतील असे वाटत नाही. मात्र शिंदे + राज ठाकरे यांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला तर मात्र नव्या स्वरूपात भाजप शिवसेना युती अस्तित्वात येऊ शकेल. यावेळेस उध्दव ठाकरे यांनी आपली अनेक दशकांची हिंदूहितैषी भूमिका सोडून कॉंग्रेसला मदत होईल अशी भूमिका घेऊन आपला आत्मसमर्पणासाठी नंबर लावला आहे. मागच्या ५ वर्षात बाकी सगळ्या पक्षात पडझड होत असताना भाजप चांगलाच एकसंध राहिला आहे व मतदान टक्केवारी टिकवून ठेऊ शकला आहे. तसेच फडणवीस यांच्या नेतृत्वाला मागे सारू शकेल असं एखादं नेतृत्व कोणी साकारू शकलेलं नाही. अजूनही त्याना भ्रष्टाचारी म्हटलं जात नाही किंवा त्यांच्यापेक्षा स्वच्छ माणूस मतदारांसमोर उभा करता येत नाही आहे. त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम म्हणून भाजप व कॉंग्रेस आणखी बळकट होतील. किंवा ध्रृविकरण आणखी वाढलेलं दिसून येईल असे वाटते. पण यात भाजपाचा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिम एकगठ्ठा मतांची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंचे मतदान यावेळेस वाढू शकते व त्यामुळे भाजपाची मतदान टक्केवारी वाढू शकते. हिंदू नेहमीच उशिरा जागा होतो व प्रतिक्रिया नोंदवतो. १९७७ नंतर गेल्या अनेक विधानसभा निवडणुकातील मतदान टक्केवारीचा कल पाहता कॉंग्रेस+ राष्ट्रवादी यांची टक्केवारी घसरत आहे व भाजपाची वाढत आहे. तोच कल चालू राहील असे वाटते. (याला अपवाद १९९९ च्या निवडणूकांचा आहे.) पण ४-५ वर्षांपुरता विचार केल्यास या अगोदर आलेल्या सर्वांच्या प्रतिक्रिया यथायोग्य वाटतात.

मागील १० वर्षात महाराष्ट्र भाजपच्या गलीच्छ राजकारणाला महाराष्ट्राची जनता वैतागली आहे. ईडी सोडून पक्षात भरती करणे नंतर सेटलमेंट करुन चौकश्या बंद करणे हे पाहून भाजप भ्रष्टाचार विरोधी आहे हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. हिंदूंच्या मतांवर निवडून येऊन हिंदूंसाठी भाजपने काहीही सकारात्मक केले नाही. वक्फ बोर्डाला भरघोस मदत, मुस्लिमांसाठी प्रचंड योजना ह्यामुळे हिंदू समाज भाजपवर नाराज आहे, ह्याची परिणीती आपण लोकसभा निवडणुकीत पाहिली. गुजरातला महाराष्ट्रातले पळवले जाणारे प्रकल्प पाहून भाजप महाराष्ट्रद्रोही आहे हे जनमानसाला समजले आहे. मराठी लोकांचा पक्ष शिवसेना संपवन्याचा प्रयत्न करने, उद्धव ठाकरेंसोबत केलेली दगाबाजी जनता विसरलेली नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना लोकसभा निवकडनुकीत प्रचंड प्रमाणत यश मिळाले. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचाही फायदा झाला जसा २०१४ नी १९ च्या निवडणुकीत भाजपचा झाला होता. उद्धव ठाकरे शरद पवार अश्या हेवीवेट नेत्यांसमोर टिकू शकेल असा एकही नेता महाराष्ट्र भाजपकडे नाही हे ओळखूनच लोकसभेला राज ठाकरे ह्यांचे भाजपने लांगूलचालन सुरू केले होते, पण ह्याचा काही विशेष फायदा झालेला दिसत नाही. भाजपचा महाराष्ट्रात ऱ्हास सुरू झालेला आहे. आता मोदी, योगी, शहा कुणीही भाजपला वाचवू शकत नाहीत. येत्या विधानसभेला भाजपचा दारुण पराभव होणार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी नेत्याना ईडी च्या त्रासापासून वाचण्यासाठी तसेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले जाऊन मराठी मुलांच्या नोकर्या हिरावल्या न जाण्यासाठी भाजपचा पराभव होणे गरजेचे आहे आणी तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पृथ्वीराज चौहान ते विजयनगर साम्राज्य.... हा इतिहास बघता, भाजपची सत्ता गेली तरी आश्चर्य वाटणार नाही....

In reply to by कॉमी

+१ मनोरंजक प्रतिसाद. रच्याकने एक दीड महिन्याआधी माझ्या प्रतिसादांवर टीका करणारे सुबोध खरे नी इतर महानुभाव मुविकाकांच्या प्रत्येक प्रतिसादाखालील “मनोरंजक प्रतिसाद” वेळी बरोबर गायब होतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उद्धव ठाकरे शरद पवार अश्या हेवीवेट नेत्यांसमोर टिकू शकेल असा एकही नेता महाराष्ट्र भाजपकडे नाही हे कोणीच नाही??? लाईट वेट F20 ने दोन्ही पक्षातील लोक बाहेर पडण्यात यशस्वी रिटाय काम केलं ना! म्हणजे तसा आरोप तुम्ही लोकांच करता म्हणून म्हणलं गुजरातला महाराष्ट्रातले पळवले जाणारे प्रकल्प प्रत्येक राज्य आपलै परीने खाजगी उद्योगांना निमंत्रण देते ,, मागे मला आठवतंय एक जर्मन कंपनी मुंबईतील मोक्याच्या जागेतुन कारखाना हलवून मुंबईचं बाहेर सहज पणे पुण्याच्या आसपास नेऊ शकली असतो पण त्यांनी गोव्याला नेली ... कारण? गोवा सरकारने खास काही जास्त फायदे दिले होते बंगाल मध्ये उद्योगाना प्रोतसहन मिळत नाही म्हणून महाराष्ट्रात येतात तेव्हा बंगली लोक असेच ओरडतात पण कोण लक्ष देणार ... भाजप म्हणजे गुजराथी हा बेअक्कल प्रचार आहे मग द्या गडकरी आणि फडणवीस ना पाठवून तिकडे मग येतील महाराष्ट्रात सगळे प्रकल्प .. खुश मग किंवा समजा उद्या काँग्रेस आली सत्तेवर महाराष्ट्रात आणि दिल्लीत पण ( स्व बळावर) मग ती महाराष्ट्रवादी होईल? हाय कमांड दिल्लीलाच ना हा केंद्र / राजय ओरडा करीत बसण्यापेक्षा मग शिंदे -प्रमुख असलेलया शिवसेनेला निवडून द्या !

महिला म्हणून मला ५०% प्रवास सवलत, मुलींना उच्च शिक्षण १००% मोफत, लाडकी बहिण योजना आवश्यक, उपयोगी वाटल्या.बघूया पुढे येणारे सरकार या योजना कायमस्वरूपी करताय का?

मी शक्यतो महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडताना नोटा चा पर्याय वापरतो असतात कारण तिथे एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा असे एकसे एक नग असतात मात्र विधानसभेला देखील तोही पर्याय वापरावा लागेल असे दिसते. त्यापेक्षा टेंडर काढून ५ वर्ष एखाद्या कंपनीला शहरांचा कारभार चालवायला द्यावा. राज ठाकरेंची भाषणे सेन्सीबल असतात पण त्यांना मते पडत नाही हे एक दु:खच आहे. कदाचित कथनी आणि करणी वेगळी असावी. फडणवीस तांत्रिकदुष्ट्या तर्कसंगत बोलतात मात्र भाजपाने कचर्‍यातून मोती शोधायचे काम चालवले आहे त्यातून सध्या फक्त हात घाण होताना दिसतात. अजित पवार पोलीटीकली करेक्ट नसतील मात्र मला वैयक्तीक रित्या ते आवडतात. कामात धडाडी आहे. संख्याबळ पाठीशी नाही नाहीतर आतापर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यापेक्षा तडफेने काम करु शकतील याबद्द्ल शंका नाही. शरद पवार साहेबांबद्दल सुरुवातीच्या काळात खूप आदर होता मात्र आता फक्त पुस्तकी आदर राहिला(म्हणजे मोठ्या माणसांना आदर द्यावा अशी आपली पद्धत आहे त्याप्रमाणे.) उद्धव ठाकरे शांत म्हणून सुरुवातीला कौतूक होते आता टोमणे ऐकायचा कंटाळा आला. काँग्रेस बद्द्ल न बोललेले बरे. आंबेडकरी पक्ष १७६० मात्र फायदा शुन्य ! एकंदरीतच बहुजन पक्षांचा कार्यक्रम मनुस्मृती जाळणे आणि ब्राह्नंणांना शिव्या घालणे इतपत मर्यादित आहे. आपले एक मत आपले भविष्य बदलू शकते यासारखी भंपक घोषणा आख्या जगात नसेल. त्यापेक्षा सरळ पैसे घेऊन मतदान करणे किंवा नोटा ला मत देणे हा उत्तम पर्याय आहे. पैसे घेऊन किंवा दारुच्या बाटलीवर मत देणार्‍यांना आपल्यापेक्षा जास्त अक्कल असते (निदान एक दिवस खरोखरचे राजे तरी होतात) या निष्कर्षापर्यंत आता येऊन पोहोचलो आहे.