कवितेत शब्द सामर्थ्य दिसून येते
यमक जुळवण्यासाठी छान शब्द वापरले आहेत
पण कविता भरकटलेली वाटते. आशयपूर्ण नाही वाटली...
उदा:
शाखेवरच अडल्या जलधारा
फुलला पिसारा !!
या ओळींनंतर
जीवनाचा प्रवास झाला सुरू
लाडके असे ते माझे लेंकरू !
छेडितसे तयां दुष्ट पांखरू
कसे सहन करु?
असे सगळीकडे दिसते आहे. निसर्गकविता आहे की अजून कशावर आहे हे नीटसे कळाले नाही
माफ करा तुमच्यात प्रतिभा दिसली म्हणून स्पष्टपणे प्रतिक्रिया देत आहे. कृपया राग मानू नका...
एक कविता म्हणून छानच आहे तुमची कविता... पण जास्त अर्थपूर्ण नाही वाटली. ""जास्वंद" बद्दल चित्र एकदम स्पष्ट नाही झाले.
त्यात सलगता आली तर अधिक सुंदर होईन...
अवांतरः वडापाव हे नाव आवडले... माझ्या आवडीचा पदार्थ :)
माझे नाव आपल्याला आवडले हे ऐकून बरे वाटले. तसा मी जुना मिपाकर आहे, पण काही महिने मी ब्रेक घेतला होता.
कविता लिहून झाल्यावर प्रकाशित करण्यापूर्वी मलाही अशीच शंका होती, की दोन कडव्यांमध्ये संबंध अशक्त आहे. तुम्ही स्पष्टपणे सांगून टाकल्याने मला माझ्या चूका पूर्णपणे लक्षात येत आहेत.
धन्यवाद !!
आपला नम्र,
वडापाव
शब्द छान वापरले आहेत
सागरा प्राण तळमळला !!
धन्यवाद
आवडली.