Skip to main content

कोण जिंकणार दिल्ली?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/01/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

वाचने 150353
प्रतिक्रिया 452

प्रतिक्रिया

In reply to by गणेशा

>>> मग कॉन्ग्रेस ने पण आप ला मागच्या वेळेस होउन पाठिंबा दिला होता, तुम्ही आप ला तरी का दोष देत बी टीम म्हणता मग. सर्वांचेच एकसारखे माना ना. काय प्रोब्लेम आहे ? आप ने पण कोठे कॉन्ग्रेस चा पाठिंबा मागितला होता. राष्ट्रवादीने भाजपला भाजपने न मागता स्वतःहून दिलेला पाठिंबा आणि मागील वर्षी दिल्लीत काँग्रेसने आआपला दिलेला पाठिंबा यात अजिबात साम्य नाही. राष्ट्रवादीने पाठिंब्याचे अधिकृत पत्र राज्यपालांना किंवा भाजपला दिलेले नव्हते. पाठिंबा देतो असे नुसतेच माध्यमांमध्ये जाहीर केले होते. अशा तोंडी आश्वासनांना अर्थ नसतो. याउलट दिल्लीमध्ये आपले ८ आमदार आआपला पाठिंबा देत आहेत असे अधिकृत पत्र काँग्रेसने राज्यपालांना दिले होते. त्यानंतरच केजरीवालांना सरकारस्थापनेचे निमंत्रण मिळाले होते. >>> समान नागरी कायद्यावर काहीच बोलत नाहीत, गुंडाळुन ठेवला नाही तर कधी पर्यंत आमलात येइन असे आपणास वाटते, का आमलात येणार नाही असेच आमच्या सारखे तुम्हाला वाटते समान नागरी कायद्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. त्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमत लागेल (कदाचित दोन तृतीयांश बहुमत लागेल). सध्या भाजप राज्यसभेत अल्पमतात आहे. सध्याच्या स्थितीनुसार भाजपला राज्यसभेत बहुमतासाठी किमान ३ वर्षे थांबावे लागेल. त्यानंतर नक्कीच समान नागरी कायद्याची प्रक्रिया सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी तुम्ही एका ठिकाणी म्हाणाला होतात की सत्तातूर कॉंग्रेस सत्तेसाठी काश्मीर मध्ये पीडीपी किंवा ओमर यांच्याशी शय्यासोबत करू शकत . मग आता भाजप पीडीपी सोबत करत आहे ते काय ? वन नाईट stand का contract marriage ?हमारा खून खून , तुम्हारा खून पानी ? बाकी कुठल्याही पक्षाचे नुकसान विरोधकांपेक्षा आंधळे समर्थक /भक्त करत असतात हे भक्तांना कधी कळेल ते एक अयोध्येचा रामच जाणे

In reply to by पिंपातला उंदीर

भाजपने पीडीपी बरोबर युती केली तर ती स्वतःच्या अटींवर असेल. अ‍ॅफ्स्पा मागे घ्या अशासारख्या देशविघातक अटी भाजप मान्य करणार नाही. याउलट काँग्रेस सत्तेत सहभागी होण्यासाठी पीडीपीच्या कोणत्याही अटी मान्य करू शकते. हाच फरक आहे भाजप व काँग्रेसमध्ये. आज भाजपएवढ्या जागा काँग्रेसकडे असत्या तर एव्हाना पीडीपी बरोबर लग्न लागून हनीमून सुद्धा पार पडला असता. पण इथे भाजपशी गाठ असल्याने अजून युती होत नाहीय्ये.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपाच्या युती या स्वतःच्या अटींवर ! आणि दुसर्‍याच्या युती म्हणजे सत्तालोलुपता ! आपला म्हणजे बीजेपीचा ( या आपच्या नावाने घोळ घातलाय ;) ) ते प्रेम !! दुसर्‍यांची ती भानगड

In reply to by कपिलमुनी

>>> भाजपाच्या युती या स्वतःच्या अटींवर ! आणि दुसर्‍याच्या युती म्हणजे सत्तालोलुपता ! ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

या आधी तिथे काँग्रेसची सरकारे येऊन गेलीत ना हो (एकदा तर पीडीपीचं पण येऊन गेलंय)? घेतला का अ‍ॅफस्पा मागे?

In reply to by थॉर माणूस

काही जिल्ह्यातून अ‍ॅफस्पा मागे घेण्याची चाचपणी युपीए सरकारने केली होती. लष्कराच्या ठाम विरोधामुळे तो प्रस्ताव पुढे रेटता आला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

भाजप आणि राष्ट्रवादी अभद्र छुप्या युतीचे समर्थन करणार्यांकडून काय अपेक्षा करणार ? बाकी valentine day ला नमोजी बारामतीला आहेत म्हणे ? गैरसमज नको . कार्यक्रमासाठी आहेत कुठल्यातरी

In reply to by श्रीगुरुजी

अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील. गुरुजी, केजरीचे सोडा हो त्याला तुम्ही लोकांनी नालायक, भगोडा, खुज्लीवाल वगैरे वगैरे बोलून सोडून दिले होते (प्रत्यक्षात पब्लिकने काय केले ते दिसत आहेच). आपले प्रधानसेवक त्यांना तुम्ही नक्षली बना असे सांगत फिरत होते त्यावर बोला.बाकी पंतप्रधान पदावरची व्यक्ती असली बेजबाबदार विधाने करते तर त्यांचे अंधभक्त शाहाणपण दाखवतील ही अपेक्षा जरा जास्तच आहे.

In reply to by दुश्यन्त

स्वतबद्दल बोलतानाच केजरीवालांनी अराजकवादी असा शब्द वापरला होता. अराजक माजवायचे असेल तर नक्षली बना हे सांगण्यात काय चूक?

In reply to by गणेशा

>>> लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. कारण मी नेमके हे कधी बघितले / वाचले किंवा ऐकले नाही. मी पुराव्याशिवाय बोलत नसतो किंवा स्पेक्युलेशनही करत नसतो. हे वाचा. होय, मी अराजकतावादी आहे - केजरीवाल

In reply to by श्रीगुरुजी

ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या वेळेस हे बोलले होते का, तरी मी म्हण्तले कधी बोलले होते बरे. असो त्या न्युजमधीलच गोष्टी जश्याच्या तसे येथे कॉपी करुन देतो . मग पोलिस जर काही काम करणार नाही तर काय केले पाहिजे शिवाय ते दिल्ली राह्यसरकारच्या अंडर पण नव्हते. तुम्हाला एखादी गोष्ट उलटी बोलली तरी खुप लागते, तर मग रुलिंग पार्टीचे पोलिस ऐकत नसेन तर ? त्यांना राग येवुच नये का ? असो बाकी त्यावेळेसच्या गोष्टी कोण बरोबर आणिचुक हे पुन्हा काढु नये दिल्लीए जनतेला हे माहीती होते आणि तरीही ५४ % टक्के लोकांनी त्यांना निवडुन दिले आहे. --
--------- They say I am an anarchist. Yes, I am. Today, I will create anarchy for Mr Shinde," he said . He has been requested by the police to move his demonstration to Jantar Mantar, the designated spot for public protests. (Common gripes greet common man party: foreign media on Kejriwal) On Wednesday night, Delhi Law Minister, Somnath Bharti conducted a self-described midnight "raid" in a South Delhi neighbourhood, and asked the police to arrest Ugandan citizens and raid a house where he alleged they were trafficking drugs and sex. The police refused, saying they had no warrant. Four women have since filed a police case alleging that they were beaten up by a mob, and forced to submit urine samples.They tested negative for drugs. In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death

In reply to by गणेशा

>>> ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या वेळेस हे बोलले होते का, तरी मी म्हण्तले कधी बोलले होते बरे. असो त्या न्युजमधीलच गोष्टी जश्याच्या तसे येथे कॉपी करुन देतो . मग पोलिस जर काही काम करणार नाही तर काय केले पाहिजे शिवाय ते दिल्ली राह्यसरकारच्या अंडर पण नव्हते. तुम्हाला एखादी गोष्ट उलटी बोलली तरी खुप लागते, तर मग रुलिंग पार्टीचे पोलिस ऐकत नसेन तर ? त्यांना राग येवुच नये का ? असो बाकी त्यावेळेसच्या गोष्टी कोण बरोबर आणिचुक हे पुन्हा काढु नये दिल्लीए जनतेला हे माहीती होते आणि तरीही ५४ % टक्के लोकांनी त्यांना निवडुन दिले आहे. -- दिल्लीच्या जनतेला तेच बरोबर आहे हे माहिती होते तर लोकसभेला का एकही जागा मिळाली नाही? >>> In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death याच रा़खी बिर्लांची मागील वर्षीची एक गोष्ट आठवली. गाडीवर कोणी तरी दगड मारला म्हणून थेट पोलिस तक्रार दाखल केली होती त्यांनी. चौकशीअंती हे समजले की लहान मुले फुटबॉल खेळताना तो चेंडू बिर्लांच्या गाडीवर आदळला होता. त्यावेळी बिर्लांनी थयथयाट करून एका मुलाच्या वडीलांना माफी मागायला लावली होती. हे प्रकरण तिथेच संपले होते. परंतु नौटंकी करण्याच्या आआपच्या व्यवच्छेदक लक्षणाला अनुसरून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी गाडीवर कोणीतरी दगड मारल्याची थेट पोलिस तक्रार दाखल केली होती.

In reply to by श्रीगुरुजी

On Wednesday night, Delhi Law Minister, Somnath Bharti conducted a self-described midnight "raid" in a South Delhi neighbourhood, and asked the police to arrest Ugandan citizens and raid a house where he alleged they were trafficking drugs and sex. The police refused, saying they had no warrant. Four women have since filed a police case alleging that they were beaten up by a mob, and forced to submit urine samples.They tested negative for drugs. वॉरंट नसताना पोलिस कसे काय कोणाला अटक करणार होते? विशेषतः परदेशी नागरिकांच्या बाबतीत तर सर्व कायदेशीर प्रक्रीया काटेकोर पाळायला लागतात. In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death पोलिसांना शिक्षेचे अधिकार नाहीत. ते न्यायालयाला आहेत. एखाद्या कुटंबाला शिक्षा करावी असे आदेश देणार्‍या या मंत्रीबाई धन्य आहेत.

केजरीवाल तर जिंकले . असो ! पण या पराभवाला मोदी जबाबदार आहेत का ? तुमचे मत काय ?

In reply to by कपिलमुनी

अनेक आंतरजालीय आंतरराष्ट्रीय फोरम वर आपल्या सरकारची /देशाची /पक्षाची बाजू मांडण्यासाठी चीनी कम्युनिस्ट सरकारने काही सदस्य पे रोल वर ठेवले आहेत . कितीही मोठ हत्याकांड होऊ दे , कुणालाही फाशी देऊ दे , कितीही मानवी हक्कांची पायमल्ली होऊ दे या सायबर आर्मी च एकाच काम असत . आपल्या सरकारच /पक्षाच समर्थन करायचं . या आर्मी च्या सदस्यांना टु सेंट आर्मी अस हेटाळनिने म्हंटले जात . इथंही असा काही प्रकार सुरु झालाय की काय अस वाटायला लागल आहे .

In reply to by कपिलमुनी

जेव्हा एखाद्या खेळाच्या स्पर्धेमध्ये भारत पराभूत होतो तेव्हा तो संघाचा पराभव असतो, कर्णधाराचा किंवा उपकर्णधाराचा किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडूचा नसतो. संपूर्ण संघच जबाबदार असतो. राजकारणातही हेच तत्व लागू आहे.

बाकी हा वैविध्यपूर्व देश एका संघटनेच्या / पक्षाच्या फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगात पाहणाऱ्या लोकांची मला कीव कम सहानुभूती वाटते . बाकी श्रीगुरुजी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे असे दिसते . त्यामुळे काही एखादा वावगा शब्द गेल्यास क्षमस्व . बाकी मुद्दे आधारित वाद करत जाऊच .

कोण जिंकणार दिल्ली ? हे धाग्याचे शिर्क्षक .. मला वाटते सर्वांचय मतांचा येथे आदर होउन नकी कोण आणि कसे आणि का जिंकेल हे येथे पाहिजे होते, पण धागा कर्ता भाजप्च कसा बरोबर हे येव्हडेच का बोलतो आहे ? कोण जिंकणार दिल्ली अवैजी भाजप च दिल्लीत योग्य आणि तेच सर्वाथाने चांगले असे म्हणुन धागा असता तर समजु शकलो असतो. धाग्याचे नाव येक आणि आपण पाठपुरवठा करतो भाजप ला असे का ? निपक्षपाती पणे कोण जिंकणार दिल्ली धागाकर्ता का माडण्यास असमर्थ ठरतोय ?

In reply to by गणेशा

एक गोष्ट सआंगायची राहिलीच या धाग्याचे उत्तर एक च आहे ' आप ' तरीही त्यानंतर ही भाजप्च कसा बरोबर हे चालु आहे. धन्य ते गुरुजी.. निदान भाजप म्हणुन दुसरा धागा काढा मग आणि तेथे भाजप ची मते लिहा.. कदाचीत तेथे कोणी येव्हडे विरोध करणार नाही.. धागा पाहुनच रिप्लाय द्य्वा का नाही ते ठरवतील शिर्क्षक द्यायचे एक आणि आत दुसरेच हे बंद करा

In reply to by गणेशा

>>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच या धाग्याचे उत्तर एक च आहे ' आप ' तरीही त्यानंतर ही भाजप्च कसा बरोबर हे चालु आहे. आआपला बहुमत मिळाले म्हणून फक्त आआपच बरोबर आणि भाजप चूक हे कसे काय बुवा?

In reply to by श्रीगुरुजी

कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे बसुन थोडेच ठरवणार आहे, ज्यांनी ठरवायचे त्यांनी ठरवले ? तुम्ही धागा दिल्ली कोण जिंकणार ? हा आहे की. दिल्लीत भाजपच योग्य आहे हा आहे ? कृपया आधी सांगा. बाकी आता या धाग्यावर मी लिहिने थांबवत आहे, कारण खुप लिहिले आहे आणि सारखे सारखे तेच तेच लिहिने योगय वाटत नाही. तरी तेव्हडे समान नागरी कायदा गुंदाळुन ठेवला नाही वगैरे काहि म्हणा पण त्याचे तेव्हडे सांगा मग अमलात कधी पर्यंत येइल, कारण या एका गोष्टी साठी मी भाजप ला मत दिले होते. तुम्ही उत्तर नाही दिले तरी ते मला माहित आहे .. तो होणार नाही या मोदी सरकारच्या काळात आणि पुढेही शक्यता कमी आहे. आणि ती भारतीय लोकांची शोकांतीका पण आहे. ------------------- समाप्त------------------------------------------

In reply to by गणेशा

समान नागरी कायद्यावरून आठवले. बहुपत्नीकत्व हा इस्लामचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलाय.

In reply to by बॅटमॅन

बरोबर. समान नागरी कायद्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात अशाच १-२ न्यायालयीन निर्णयांच्या आधारे समान नागरी कायद्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.

In reply to by गणेशा

>>> तुम्ही धागा दिल्ली कोण जिंकणार ? हा आहे की. दिल्लीत भाजपच योग्य आहे हा आहे ? कृपया आधी सांगा. धागा दिल्ली कोण जिंकणार याच विषयावर आहे आणि १० तारखेला त्याचे उत्तर मिळाले आहे. दिल्लीत भाजपच योग्य आहे का हा त्यातूनच उपविषय निर्माण झाला आणि त्याचे उत्तर माझ्याकडून होय असेच आहे. >>> बाकी आता या धाग्यावर मी लिहिने थांबवत आहे, कारण खुप लिहिले आहे आणि सारखे सारखे तेच तेच लिहिने योगय वाटत नाही. तुमच्या संयमित आणि ठामपणे लिहिलेल्या प्रतिसादांबद्दल आणि मुद्द्यांबद्दल मनापासून आभार! कोठेही कटुता आली नाही हेच महत्त्वाचं.

या लेखात मी खालील वाक्य लिहिले होते.
दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले.
या वाक्याला आक्षेप घेण्यात आला. या प्रतिक्रियेत (http://www.misalpav.com/comment/657619#comment-657619) "इतकी घाण भाषा का बरे?" असे विचारण्यात आले. त्यावर मी असे उत्तर दिले होते की (http://www.misalpav.com/comment/657865#comment-657865) "त्यात घाण काहीही नाही. हा नेहमी वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. " आता जरा खालील अग्रलेख पहा. http://www.loksatta.com/aghralekh-news/central-government-withdraws-dra… गिरीश कुबेरांनी लिहिलेल्या या अग्रलेखाचे शीर्षक आहे 'उंटाच्या बुडख्याचा मुका". यात खालील वाक्य लिहिले आहे. "शहाण्याने उंटाच्या पाश्र्वभागाचा मुका घेण्यास जाऊ नये, अशा अर्थाची म्हण आहे. रविशंकर यांनी नेमके तेच केले. अखेर उंची पुरत नाही हे लक्षात आल्यावर त्यांना तो सोडून द्यावा लागला." एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे.