अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
वाचने
150353
प्रतिक्रिया
452
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> मग कॉन्ग्रेस ने पण आप ला
In reply to मग कॉन्ग्रेस ने पण आप ला by गणेशा
गुर्जी तुम्ही एका ठिकाणी
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
भाजपने पीडीपी बरोबर युती केली
In reply to गुर्जी तुम्ही एका ठिकाणी by पिंपातला उंदीर
बरोबर
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
>>> भाजपाच्या युती या
In reply to बरोबर by कपिलमुनी
नव्हे... अंधश्रद्धा आहे.
In reply to >>> भाजपाच्या युती या by श्रीगुरुजी
तसं समजा.
In reply to नव्हे... अंधश्रद्धा आहे. by थॉर माणूस
या आधी तिथे काँग्रेसची सरकारे
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
काही जिल्ह्यातून अॅफस्पा
In reply to या आधी तिथे काँग्रेसची सरकारे by थॉर माणूस
भाजप आणि राष्ट्रवादी अभद्र
In reply to भाजपने पीडीपी बरोबर युती केली by श्रीगुरुजी
आआपच्या मतांना सूज
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
त्यांची तीच सिस्टीम आहे हो.
In reply to आआपच्या मतांना सूज by कपिलमुनी
अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना
In reply to >>> सुधारतील ते भाजपेयी कसले. by श्रीगुरुजी
स्वतबद्दल बोलतानाच
In reply to अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना by दुश्यन्त
लिंक द्या बरे, एकदा बघुद्या.
In reply to स्वतबद्दल बोलतानाच by श्रीगुरुजी
>>> लिंक द्या बरे, एकदा
In reply to लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. by गणेशा
ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या
In reply to >>> लिंक द्या बरे, एकदा by श्रीगुरुजी
>>> ओके, तेंव्हा त्या
In reply to ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या by गणेशा
On Wednesday night, Delhi Law
In reply to >>> ओके, तेंव्हा त्या by श्रीगुरुजी
गुर्जी
अनेक आंतरजालीय
In reply to गुर्जी by कपिलमुनी
जेव्हा एखाद्या खेळाच्या
In reply to गुर्जी by कपिलमुनी
बाकी हा वैविध्यपूर्व देश
कोण जिंकणार दिल्ली ?
एक गोष्ट सआंगायची राहिलीच या
In reply to कोण जिंकणार दिल्ली ? by गणेशा
>>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच
In reply to एक गोष्ट सआंगायची राहिलीच या by गणेशा
कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे
In reply to >>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच by श्रीगुरुजी
समान नागरी कायद्यावरून आठवले.
In reply to कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे by गणेशा
बरोबर.
In reply to समान नागरी कायद्यावरून आठवले. by बॅटमॅन
>>> तुम्ही धागा दिल्ली कोण
In reply to कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे by गणेशा
या लेखात मी खालील वाक्य
श्रीगुरुजीना बोलवा राव.