आज लग्नसंस्थेबद्दल फेसबुकवर एक लेख वाचला
त्या लेखात असे म्हंटले होते की
ज्या गोष्टीबद्दल चोवीस पंचवीस वर्षे कुठल्याही पद्धतीने घरात काहीही चर्चा देखील करत नव्हता ती गोष्ट आज अचानक कर म्हणता.
कोणत्यातरी सहा/सात महिन्याच्या ओळखीच्या कुटुंबाशी नाते जोडता. जीच्या /ज्याच्या स्वभावाची अजून ओळखही नाही त्याच्या सोबत जन्मभर रहायला लावता.
खालील ओळी त्या पोस्ट मधील. आहेत
1) वयाच्या 24- 25 वर्षांपर्यंत कुठल्याही पद्धतीने आणि त्याविषयी घरात काहीही न बोलता आता अचानक लग्न कर म्हणत आहेत. कश्याच्या आधारावर करू लग्न ? मला त्यातलं काहीच माहित नाही. स्वतः शोधायचा कुणीतरी, तर date करायचं म्हणजे त्यात काय करायचं असतं, हे ही मला माहित नाही. 2) 8 वर्षे एकमेकांना ओळखतो आम्ही. 2 वर्षांपासून date करत होतो. मागच्या महिन्यात लग्नही आम्हाला हवं तसं ( संगीत, मेहंदी, कोडकौतुक, खर्चिक) झालं पण हनिमूनच्या तिसर्या दिवशीच कडाक्याचं भांडण झालं आणि आता आम्हाला एकत्र रहायचं नाहीये. 3) अहो मॅडम, लहान मूल बाहुलीकडे कसं हरखून बघतं तसा तो एकेका अवयवाला हात लावून पाहत बसला. मला irritation आलं त्यामुळे. माझं satisfaction काही आहे की नाही? त्याचा अभ्यासच चालू आहे अजून, म्हणून मी त्याला आता अंगाला हात लावू देत नाही. या आणि अश्यांसारख्या अनेक केसेस वारंवार समुपदेशनासाठी येत आहेत. केवळ लग्नाचं वय, भौतिक गोष्टी यापलिकडे जाऊन लग्न किंवा relationship साठी काय आवश्यक असते याचा विचार करण्याची गरज आहे. पूर्वी होत नव्हती का लग्नं पण असे घटस्फोटांचे फॅड नव्हते तेव्हा ! आत्ताच्या मुलामुलींमध्येच प्राॅब्लेम आहे. असं म्हणणार्या आधीच्या पिढ्यांनाही काही गोष्टी स्पष्ट सांगण्याची, आरसा दाखवण्याची वेळ आलेली आहे. एक counsellor आणि psychotherapist म्हणून romantic relationship साठी आणि लग्नासाठी स्वतःची तयारी कशी करावी याचे शिक्षण केवळ तरूण मुले-मुली यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही देण्याची नितांत गरज आहे,असं माझं मत आहे.हे वाचल्यावर मला वाटले की मिपाकरांना यावर मत विचारायला हवे. माझे मत विचारल तर लग्न करणे हा एक मूर्खपणा आहे. कोण्यातरी इसमाची /बाईचा कायमची/चा गुलाम बनुन रहाणे नातेवाईक वगैरे पासार्यामागे उगाचची केसांची गुंतवळ असावी तसे फरफटत जाणे नातेवाईक / मुले / कुटुंब नामक गोतावळ्यामुळे स्वतःची होणारी कुचम्बणा ही त्याग नामक उच्च फोलफटा मागे दडवणे . आणि उतरवयात स्वतःला हाडुत हुडूत करून घेणे हे लग्न संस्थेचे मोठे यश आहे. स्त्रीयाना पुरुषांचे आणि पुरूषाना स्त्रीयांचे लोढणे बनवून त्यांची प्रगती कशी रोखता येईल हे पहान्यात तसेच कोणालाही त्याच्या इच्छेप्रमाणे यश मिळवून न देण्यात लग्न संस्थेचा मोठा हातभार आहे. तुमची जाणून घ्यायला आवडतील.
वाचने
9133
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही फेसबुकावरची पोस्ट वृशली
वृशली प्राजक्त
असू शकेल किंवा नसूही शकेल.
In reply to वृशली प्राजक्त by सुबोध खरे
व्हाट्सएप आणि फेबूच्या
लग्न ही खूप व्यक्तिगत गोष्ट
रील
In reply to लग्न ही खूप व्यक्तिगत गोष्ट by Bhakti
खरे आहे.
In reply to रील by Bhakti
बदल
-१
In reply to बदल by अहिरावण
-१ ला -१
In reply to -१ by Trump
१०० कोटी मध्ये किती?
In reply to -१ ला -१ by अहिरावण
आपल्या बुद्धिमत्तेबद्दल आणि
In reply to १०० कोटी मध्ये किती? by llपुण्याचे पेशवेll
माझे मत!!
लग्न ही कामतृप्ती साठी
In reply to माझे मत!! by राजेंद्र मेहेंदळे
कामतृप्ती हा अत्यंत
In reply to लग्न ही कामतृप्ती साठी by चौथा कोनाडा
लग्न.. नाटक
आपण कोणतीही गोष्ट ( कपडे,
मत नक्की कुठल्या विषयावर
समुपदेशन करणे एक व्यवसाय आहे.
In reply to मत नक्की कुठल्या विषयावर by साहना
लग्न... भग्न
जन्मजात कर्जफेड
रोचक धागा...