Skip to main content

ताज्या घडामोडी - मे-जून २०२३

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी रविवार, 28/05/2023 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good… नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे: sengol म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते. राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-tr… हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल. sengol त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला. sengol sengol हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे? दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

वाचने 34649
प्रतिक्रिया 269

प्रतिक्रिया

In reply to by बावडी बिल्डर

पुरोगामी महाराष्ट्राची वाताहात बघतांना वाईट वाटंतय. समतेचा, आधुनिकतेचा विचार जिथे मांडला गेला तिथे छत्रपती शाहु महाराजांच्या कोल्हापूरात हे घडतंय हे सगळं दु:खदायक आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नावरुन लोकांचे लक्ष अन्य विषयावर कसे राहील हा प्रयत्न होतांना दिसतो. धर्माधर्मात तेढ कशी राहील असा प्रयत्न काही अराजक शक्ती करतात. वातावरण धुसमुसत ठेवणे, निवडणूकीत फ़ायदा मिळावा इतकाच हेतू त्यांचा असतो. सध्याची परिस्थिती आणि येत्या निवडणूकीच्या काळात हे अजून वाढत जाईल पण त्यामुळे देशाच्या एकते-अखंड्तेवर त्याचा परिणाम होतो असतो. आपण विवेववादी लोकांनी हे सगळं भान समाजमनाला देणे इतकंच सध्या आपल्या हातात आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोल्हापूरात ३५० हिंदू तरूणांवर गुन्हे दाखल झालेत. एकही हिंदूत्ववादी नेता त्यांच्या जामीनासाठी फिरताना दिसत नाहीये. ह्या मुर्ख तरूणांना अक्कल हवी होती.

In reply to by बावडी बिल्डर

जातीय तणावाच्या घटनांमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे. अंमळनेर मध्येही दगडफेक झाली. दांगेखोरांना धर्म असतो हे मान्य आहे तर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

औरंगजेबाने महाराष्ट्रात पुनर्जन्म घेतल्यानै व औरंगाजेब सत्तेबाहेर फेकला गेल्याने औरंगजेबाचे भक्त असे राडे करतच राहणार.

भाजपची सत्ता गेल्यानंतर कर्नाटक शांत झालंय असं संजय राऊत बोलले. काही प्रमाणात हे खरं आहे. मागच्या वर्षी हिजाब नी काहीबीही मूद्दे काढून कर्नाटक पेटलेले होते. आज अशीच परिस्थीती महाराष्ट्रात आहे. औरंगजेबावरून महाराष्ट्र पेटलाय की पेटवला गेलाय देव जाणे. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे ती राज्ये अशांत आहेत. तीकडे मनीपूर जळतंय पण कोनालाही सोयरसूतक नाही. महाराष्ट्रातूनही भाजपची सत्ता गेल्यास महाराष्ट्रही शांत होईल असं वाटतंय.

In reply to by आनन्दा

ऊत्तर प्रदेशही धूमसतंय. मागेच बलात्कार पीडीत दलीत मूलीला रात्री जाळून टाकले गेले होते विसरलात का?

In reply to by बावडी बिल्डर

वारक-यांच्या फडातील काहीच लोकांना सोडायच्या नियमामुळे गर्दी झाली. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारक-यांपेक्षा अधिक कोणाला असू शकते ? पुंडलिकाने २८ युगे विटेवर उभं केलेलं, हे सावळे सुंदर ध्यान आपल्या भक्तांसाठीच उभं आहे, ...कालच्या वारक-यांना झालेल्या लाठीमाराने पांडुरंगही कळवळला असेल. पांडुरंगा यांना सुबुद्धी दे रे बाबा...आणि महाराष्ट्रात देशात सुख नांदु दे, दुसरं काही मागणं नाही. जय हरी..! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाठीमार वगैरे झाला या लोणकढी थापा आहेत. असे काहीही झालेले नाही. दरवर्षी प्रत्येक ४७ दिंडीतील प्रत्येकी ७५ वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देतात. इतरांना प्रवेश नसतो. काल इतर अनेक वारकऱ्यांनी सर्व अडथळे ढकलून, पोलिसांना ढकलून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून जाऊध दिले नाही. यापलिकडे काहीही झालेले नाही. लोकमतने टाकलेली स्वत:ची चित्रफीत काढून टाकली आहे. जमलेल्या सर्व लाखो वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला असता तर तेथे चेंगराचेंगरी होऊन मागील महिन्यात जे झाले त्याची पुनरावृत्ती झाली असती.

In reply to by श्रीगुरुजी

इथे काहीतरी वेगळेच ऐकायला मिळाले (एकट्या) लोकमतने व्हिडिओ काढला ही सबब थोतांड म्हणायला पुरेशी नाही. एबीपी सहित इतर बऱ्याच ठिकाणी ती अजूनही सुरू आहे. दुसरे म्हणजे, लाठीचार्ज झालाच आहे असे काही माझे म्हणणे नाही, पण पूर्ण शहनिशा सुद्धा झालेली नाही, ती होऊन मग थोतांड आहे का सत्यता हे जाहीर झाले तर उत्तम.

In reply to by इपित्तर इतिहासकार

या वारकऱ्याच्या दोन समान चित्रफिती आहेत. एकात दंडावरचा सदरा फाटलेला दाखवतोय, दुसऱ्यात सदरा धड आहे. जखम झाली म्हणून सांगतोय, पण सदरा वर करून जखम दाखवित नाही. कोपऱ्यापाशी एक रूपयाच्या नाण्याच्या आकाराचा फिकट गुलाबी (गुलालाचा असावा) डाग दाखवतोय, पण सदरा वर करून जखम दाखवायला तयार नाही. एकदा सांगतो लोकांनी मारले, एकदा सांगतो २० पोलिसांनी ४ जणांना मारले. बाकीचे तिघे कोठेच नाहीत. एका दिंडीचे महंत चित्रफितीत सांगतात लाठीमार वगैरे काही झाले नाही. हा तथाकथित वारकरी बहुतेक सिल्व्हर ओक दिंडीचा वारकरी असावा.

In reply to by श्रीगुरुजी

खरं म्हणजे, हे सगळे वारकरी नसून, ते सगळे पाकिस्तान पुरस्कृत देशद्रोही टोप्या धोतर घालून आलेले डुप्लीकेट वारकरी असून शिंदेणवीस सरकारला बदनाम करायला आलेत आहेत, अशी मांडणी करायला पाहिजे होती. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारक-यांपेक्षा अधिक कोणाला असू शकते ?
सर, तुमच्या राजकीय धुळवडीत मला रस नाही. गर्दीमुळे काही चेंगराचेंगरी होऊन पुर्ण वारीला गालबोट लागले असते. त्यापेक्षा सौम्य लाठीमार परवडला. तुमच्या कडुन जास्त समंजस भुमिकेची अपेक्षा आहे.

डोनाल्ड ट्रम्पवर दुसरे आरोपपत्र दाखल. आधीचे जे होते, पॉर्न स्टारला गप्प करण्यासाठी पैसे दिले ते फारसे दणकट नव्हते आणि तात्यांचा वकील त्या गुन्ह्यासाठी आधीच आत गेला असला तरी थेट तात्याला हात लावत येत नव्हता. हे आरोपपत्र मात्र बऱ्यापैकी गंभीर आहे. वरकरणी तरी पुरावे दणकट वाटतात. हे त्याने सरकारी गुप्त माहिती स्वतच्या घरी विनासुरक्षा ठेवली, त्याबद्दल वारंवार खोटे बोलला, ती कागदपत्रे लपविण्याचा प्रयत्न केला, तिरहाईत लोकांना त्यातली काही माहिती दिली असे आरोप आहेत. पुरावे म्हणून त्याच्या हॉटेल / क्लब / घरातले अनेक फोटो, तसेच काही ध्वनिमुद्रित संभाषणे आहेत. वर म्हणल्याप्रमाणे, प्रकरण गंभीर आहे. आरोपपत्रात एक गंमत आहे. त्यात तात्या निवडणुकीआधी हिलरी ला सरकारी गुप्त माहिती एका अनाधिकृत ईमेल सर्व्हर वर ठेवली म्हणून आत घालणार असे ओरडून ओरडून सांगत होता. मी अध्यक्ष झाल्यावर गुप्ततेचे कायदे आणखी कडक करणार असे म्हणत होता. ह्या गोष्टींचा आणि वक्तव्याचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे. https://www.politico.com/news/2023/06/09/trump-indictment-takeaways-001…

पालखी प्रस्थानावेळी प्रत्येक दिंडीच्या प्रत्येकी ७५ वारकऱ्यांनाच प्रवेश देणार हे ८ जूनलाच सर्व दिंडीप्रमुखांना कळविले होते. असे असतानाही इतरांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. नशीब पोलिसांनी त्यांना अडविले. अन्यथा प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती.

In reply to by श्रीगुरुजी

>>>> नशीब पोलिसांनी त्यांना अडविले. नाही, नाही,नाही. प्रत्येक वारक-याला गुलाब पुष्प देऊन. ''हे चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या'' असा स्पष्ट आवाज स्पीकर मधून येत आहे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय गंमत आहे. शिस्त लावायचा प्रयत्न केला तर हुकुमशाही, दडपशाही म्हणून दोन्ही हाताच्या तळव्यांना चुना लावून बोंब ठोकायची. शिस्त नाही लावली तर ढिसाळ कारभार, जनतेची पर्वा नाही, शून्य व्यवस्थापन असा कांगावा करायचा. दोन्ही नाही जमलं तर बनावट चित्रफिती तयार करून प्रसिद्ध करून वाटेल ते आरोप करायचे, माध्यमांना हाताशी धरून समाजात आग लावून आपल्या पोळ्या भाजायच्या. सगळंच फसलं की मेलोड्रामा आणि त्रागा करायचा. या प्रकाराला डबल ढोलकी ही संज्ञा सुद्धा सौम्य ठरेल. काल वारकऱ्याना अडविले नसते तर आत प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असती. पोलिसांना याची कल्पना असल्याने त्यांनी दुर्घटना घडू दिली नाही. मग कोणाला तरी वारकऱ्याच्या पोषाखात उभे करून काहीतरी बनावट कथा रंगवून गोंगाट करून सरकारला झोडपत बसायचं. Pathetic.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरे तर दंडुकेच द्यायला पाहिजेत नियम मोडून आत घुसत आलेल्यांना, तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे "नाठाळाचे माथी हाणू काठी", केवळ वारकरी आहेत म्हणून नियम मोडून आत घुसू द्यायला हवे का?

In reply to by प्रचेतस

वारकरी आहेत म्हणून घुसू द्यायला हवे का ? याचं उत्तर नाही असं आहे. पण... एकूण येणा-या दींड्या किंवा महत्वाच्या ज्या पालख्या, किंवा त्या फडातील एकूण केवळ पंच्याहत्तर वारक-यांना सोडणार होते. कोण सोडायचे याचे काही नियोजन नव्हते म्हणून सर्वच वारक-यांनी तिथे गर्दी केली. मुख्य दारावर इतक्या मोठ्या संखेने वारकरी आल्यावर पहिल्या पंच्याहत्तर मधे आपण असावे असे वाटल्यामुळे सर्वच वारक-यांनी मुख्य प्रवेशाच्या ठीकाणी गर्दी केली. प्रवेश तोंडावर असलेल्या पोलिसांना इतकी गर्दी आवरणे शक्य नव्हते. खाली आपण एका प्रतिसादात तुडवणे असा उल्लेख केला ते योग्य नाही. गर्दीने पोलिसांचे कडे तोडले म्हणून पोलीस पडलेला दिसतो, ते काही जाणीव पूर्वक केलेले नाही. ”हसत खेळत बोबडे बोलत ।तुडविले बाळ त्याशी शुद्धी नाही” असे काही झाले नाही. वारक-यांची गर्दी झाली, त्यांचं नियोजन करता आले नाही. आणि म्हणून दर्शनाच्या ओढीने धावणा-या वारक-यांना आवरायला पोलिस बळाचा वापर करावा लागला. काही वारक-यांना त्याची निब्बर झळ बसली. इतर वेळी ’वारक-यांबद्दल” खट जरी वाजलं तरी ’वारकरी संप्रदाय धोक्यात ’ ’अस्मितेवर हल्ला’ वगैरे किती तो गदारोळ करणारे आता वारक-यांनी शिस्त पाळायला पाहिजे होती वगैरे बोलतात तेव्हा गम्मत वाटते. इतकाच मतितार्थ. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या ७५ जणांना सोडायचे याचै नियोजन दिंडीप्रमुखाने करायचे की ते सुद्धा मंदिर व्यवस्थापधाने करायचे? म्हणजे ४७ दिंडीतील एकूण कोणत्या ३५२५ वारकऱ्याना आत सोडायचे ही यादी मंदिर व्यवस्थापनाने करायची.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खाली आपण एका प्रतिसादात तुडवणे असा उल्लेख केला ते योग्य नाही.
आणि आपण मात्र लाठीमार झालाय असे विधान करता ते कशाच्या आधारावर? आपणास तुडवणे हा शब्दप्रयोग अयोग्य वाटला, मात्र प्रत्यक्षात पोलिस खाली पडलेला आणि वारकरी त्याला 'ओलांडून" जाताना स्पष्टपणे दिसत नाही, शिवाय दोन्ही व्हिडिओंमध्ये पोलिस लाठीमार करताना कुथेही दिसत नाहीयेत, फक्त थोपवून दिसत आहे. "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा न्याय" असे म्हणावे वाटते.

In reply to by प्रचेतस

समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या व्हीडीयोमधे विशेषतः आळंदी नावाच्या व्हीडीयोवर त्यात बाराव्या चौदाव्या सेकंदाला एक राखीवदलातील पोलीस तेराव्या सेकंदाला लाठीमार करतोय तर अजून एक पोलीस गप्पकन एका वारक-याला श्रीमूखात प्रसाद देत आहे. आणि इतर व्हीडीयोत वारकरी मारहाण झाल्याचे सांगतो आहे, अजून एक वारकरी लाठीचार्ज झाल्याचे सांगत आहेत, अर्थात हे सगळंच खोटं आहे असे म्हणत असाल तर माझ्याकडून विषय संपला. आपलं जे असेल ते मत मान्य आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजूनही थापेबाजी सुरूच आहे. त्या चित्रफितीत कोणत्याही वारकऱ्याला लाठी मारलेली दिसत नाही. जमाव पांगविण्यासाठी हवेत फिरविलेली दिसते, पण कोणालाही लाठी मारलेली नाही. मारहाण झाल्याचे सांगणारा एक लबाड असून तो वारकरी नसून एक मार्क्सवादी आहे. फेबु पानावर टिपू सुलतानचे गुणवर्णन करणारी पोस्ट आहे. फेबुवर ब्राह्मण, पेशवाई, मोदी, फडणवीस यांना भरपूर शिव्या आहेत. कोणत्या दिंडीत होता त्याचे नाव सांगत नाही. कधी म्हणतो जमावाने मारहाण केली, कधी म्हणतो २० पोलिसांनी एकांतात नेऊन मारले, कधी म्हणतो आम्हा चौघांना मारले पण इतर तिघांचा पत्ता नाही. गुलालाचा सदऱ्यावरचा डाग जखम म्हणून दाखवतोय, पण सदरा वर करून डाग दाखवित नाही. जे संपूर्ण खोटे आहे ते १००% सत्य आहे हे ठासून सांगण्याचा आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

In reply to by बावडी बिल्डर

मग ह्या न्यायाने आव्हाडांनी बंगल्यावर नेऊन करमूसेला चोपला ते ही बरोबरच की. करमूसेने एका नागड्या माणसाच्या चेहर्यावर आव्हाडांचा चेहरा मोर्फ केलेला वीडीओ सोमी वर टाकला होता. चोपला गेल्या नंतर इतर कूठल्याही धारकर्याची असं करण्याची हिंमत झाला नाही.

In reply to by बावडी बिल्डर

मग ह्या न्यायाने आव्हाडांनी बंगल्यावर नेऊन करमूसेला चोपला ते ही बरोबरच की. करमूसेने एका नागड्या माणसाच्या चेहर्यावर आव्हाडांचा चेहरा मोर्फ केलेला वीडीओ सोमी वर टाकला होता. चोपला गेल्या नंतर इतर कूठल्याही धारकर्याची असं करण्याची हिंमत झाली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मारहाण झाल्याचे सांगणारा एक लबाड असून तो वारकरी नसून एक मार्क्सवादी आहे.
=)) भारी होता बघा. आवडला. चालू ठेवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही सत्य नाकारणार हे सर्वांनाच माहिती आहे. हे वाचा. यावरही विश्वास न ठेवता वारंवार तुम्ही वारंवार खोटे बोलत राहणार आणि थापा पुराव्यासहीत उघडकीस आणल्या की कांगावा, मेलोड्रामा आणि त्रागा करणार हे सुद्धा सर्वजण जाणतात. तेव्हा येऊ देत अजून नवीन थापा.

In reply to by श्रीगुरुजी

सकाळी याचे प्रोफाइल दिसत होते. याची लबाडी समाजमाध्यमांमळे सार्वत्रिक झाल्यानंतर याने काही मिनिटांपूर्वीच खाते लॉक केले. सिल्व्हर ओक दिंडीचा भोंदू!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय राव सर, एव्हढे वारकरी अंगावर धावून येत असताना काय गुलाबपुष्प द्यायला हवे होते का? लाठी फक्त उगारताना दिसत आहे, चोप देताना दिसत नाहीये, बाकी तुम्ही अजूनही वारकरी पोलिसांना तुडवून पुढे जात आहेत ह्याचा सुस्पष्ट व्हिडिओ असूनही ते मान्य करताना दिसत नाहीत. वारकरी जरी असले तरी झुंडीचे मानसशास्त्र वेगळेच असते हे काय मी तुम्हास सांगावयास हवे काय? उलट प्रत्यक्ष दंडुके दिले नसतानाही ते दिले असते तर मला ह्यात काहिही वावगं वाटलं नसतं. राम कृष्ण हरी. बाकी हे खरे वारकरी नसून वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असून त्यांना दर गुरुवारी मंदिरात पालखी सोहळ्याचे दर्शनाचा हक्क असतो असे ऐकिवात आहे, म्हणून ते सर्व झुंडीने वारीच्या सोहळ्याला जायचेच असा हट्ट धरुन नियम मोडून घुसत होते असे कळते. खखो विठ्ठल जाणो.

In reply to by प्रचेतस

वारकर्यांना झालेल्या मारहाणीचेही समर्थन होतेय हे पाहून महाराष्ट्र कूठल्या दिशेने चाललाय याचा अंदाज येतोय. अगदी वारकर्यांना मार्क्सवादी वगैरे ठरवले गेले. ऊद्या हे वारकरी नसून पाकिस्तान पूरस्कृत अतिरेकी होते हे देखील ठरवले जाईल. हा सगळा अट्टहास का? तर शिंदे सरकार आहे म्हणून. मविआ असतं तर ऊलट घडलं असतं. पालघरला साधू मेले तेव्हा गळे काढनारे आता वारकर्यांवरील हल्ल्याला समर्थन देताहेत ते पाहून त्यांच्या कोलांट ऊड्यांची मजा येतेय. हीच शिवसेना राष्ट्रवादीसोबत सत्तेत होती तेव्हा गूंड होती पण भाजपा सोबत आली तर शाव झाली. व्वाह.

In reply to by आग्या१९९०

मारहाण म्हणून जे व्हिडिओ खाली आहे त्यात पण पोलीस एका बाजूला जाण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत आहेत पण लोक न जुमानता जाताना दिसत आहेत. उगाच धरले आणि लाठीमार केला असे बिलकुल दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनेकांना धक्काबूक्की होताना स्पष्ठ दिसतेय. गरीब वारकर्यांना मारहाण ना कोल्हापूर बंद पाडनार्या आयोजकांवर कोणताही गून्हा नाही. वारे सरकार. साॅरी वारे “हिंदूत्ववादी“ सरकार.

पालखी प्रस्थान होण्यापूर्वी २ दिवस आधी, संकष्टी चतुर्थीला मटण चेपून अभिमानाने समाजमाध्यमांवर चित्र प्रसिद्ध करणाऱ्या एक नेत्या आळंदीत जाऊन बऱ्याच जणांना भेटल्या होत्या. लगेच २ दिवसांनी हा प्रकार घडला. वारकऱ्याचा वेष परिधान करून लाठीमार झाल्याचा खोटा आरोप करणारा एक मार्क्सवादी प्रत्यक्षात ब्रिगेडी विचारांचा आहे. हे सर्व बिंदू जोडा.

In reply to by श्रीगुरुजी

आणखी बिंदू जोडा पार पाकिस्तान, सिरीया, राक्का, बगदादी, अलकायदा, तालीबान पर्यंत जाऊद्या. आजकाल एआयने फोटो मोर्फ करता येतात. त्या वारकर्याचा इसीस बरोबर फोटो ही येईल.

आजच्या शिंदेंच्या जाहीरातीतून फडणवीसांना गायब करण्यात आलंय. सरळ मोदी नी शिंदे. ह्यावर बावनकूळेंनी सावध प्रतिक्रीया दिलीय. (तिकीट मिळण्यासाठीचा खटाटोप) कोल्हापूरचा संयूक्त दौरा रद्द झालाय म्हणे फडणवीस शिंदेंचा. एकंदरीत सर्व बेबनाव दिसतोय.

महाराष्ट्राच्या सर्व पेपर मध्ये कुठल्यातरी टुकार सर्वेचा आधार घेऊन जाहिराती छापण्यात आल्या आहेत. त्यात मामू म्हणून चिंधेना प्रमोट करण्यात आले आहे. एकंदरीत सुंदोपसंदी (शिंदोपशिंदी ) चालू झालेली आहे.

--- 'तुअर दाल' व 'ब्रांडेड अरहर दाल' या दोन्ही डाळीत नक्की काय फरक असतो ?

In reply to by विजय_आंग्रे

एकाच डाळीची दोन नावे होत, उत्तरेत अरहर जास्त वापरले जाते, दक्षिणेत तुर. थोडक्यात त्यांना तूर डाळ आणि ब्रँडेड तूर डाळ हा फरक म्हणायचं असेल पण नावे दोन वापरली एकाच गोष्टीची. का ? ते मात्र मला माहिती नाही, तेच सांगू शकतील.

In reply to by इपित्तर इतिहासकार

नावे दोन वापरली एकाच गोष्टीची. का ? ते मात्र मला माहिती नाही, तेच सांगू शकतील. हातच्या काकणाला आरसा कशाला?

In reply to by सुबोध खरे

हातच्या काकणाला आरसा कशाला?
स्वतःचा गोळीबार स्वतः करा, आमचा खांदा वापरू नका. आम्ही मिसळपाव धोरण तितके फॉलो करणार.

In reply to by विजय_आंग्रे

चणे फोडून डाळ करणे हे value added product धरून vat लागू होतो. बारा ते अठरा टक्के लागतो. छोटे उत्पादक देत नसतील. पण मोठ्या कंपन्यांना tax चुकविता येत नाही. शिवाय चोख वस्तूंची हमी म्हणूनही गिऱ्हाईक येते. अधिक जाहिराती खर्च. उदाहरणार्थ ब्रुकबॉन्ड कंपनी हळद पावडर विकते ती ब्रॅण्डेड.