अनाहुत सल्ले
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं असतात. काही इच्छा, आकांक्षा असतात. लग्न, करिअर यासंदर्भात प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी काहीतरी विचार करून ठेवलेला असतो. तो/ती व्यक्ती स्वतःच्या भल्यासाठी, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काही निर्णय घेते. काहीवेळेस आपण चुकीचे करिअर निवडले हे समजायला खूप वेळ जातो मग अश्यावेळी ती वाट (करिअर) बदलून दुसऱ्या कंफर्टेबल वाटेने चालायला सुरुवात होते. यासाठी काही जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा, सल्लामसलत सुद्धा होते, गरजेनुसार. हे सर्व वैयक्तिक पातळीवर चालु असतं. यात काही निर्णय चुकीचे सुद्धा असू शकतात पण आपण प्रयत्नपूर्वक ती गोष्ट पूर्णत्वास नेऊ, यश मिळवू असा त्या व्यक्तीला विश्वास असतो..
या सगळ्यात काही जवळचे मित्र, कुटुंबातील व्यक्ती सोडल्या तर इतरांचा तसेच त्या व्यक्तीबद्दल, तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त माहिती नसणाऱ्या नातेवाईकांचा काहीच रोल (भूमिका) नसतो. पण तरीही काही वेळेस नातेवाईक, ओळखीचे लोक त्या व्यक्तीने घेतलेल्या त्या विशिष्ट निर्णयावर आपलं स्वतःचं एक मत देत असतात (त्यांच्याकडे त्याची मागणी केली नसली तरीही ते देतात). काही वेळा अनाहुत सल्ले सुद्धा मिळतात. बहुतेक वेळेस त्यांची ही मतं पूर्वग्रहदूषित असतात. सुरुवातीला ती व्यक्ती अश्या सल्ल्यांना ऐकूण सोडून देते (कारण त्या व्यक्तीचा निर्णय ठाम असतो. विचार करूनच तो घेतला गेलेला असतो). पण पुढे काही काळानंतर ती व्यक्ती स्वतः घेतलेल्या निर्णयाला योग्य तो न्याय देऊ शकली नाही, तिने जे करियर निवडले आहे त्यामधे सुरुवातीच्या काळात अपयश आले तर त्या व्यक्तीला लोकांकडून पुन्हा तेच सल्ले मिळायला सुरुवात होते. जसे की, "बघ मी आधीच सांगितलं होत तुला, तू यात पडू नको, तुझ्याच्याने ते होणार नाही.".. "माझ्या एका मित्राच्या/नातेवाईकांच्या मुलाने/मुलीने असाच तुझ्यासारखा खुळेपणा केला आणि आज तो/ती त्याची शिक्षा भोगत आहे.. अजूनही वेळ गेलेली नाही, तू वेळीच निर्णय बदल." आणि बरच काही ऐकावं लागतं. बरं त्या व्यक्तीने दरम्यानच्या काळात आपली भूमिका, विचार अश्या लोकांना स्पष्ट सांगितलेले असतात.. तरीही हे चालूच असतं. ती व्यक्ती जुमानत नाही, दुर्लक्ष करते तेव्हा ते तिच्या कुटुंबीयांना त्याच गोष्टी पटवून द्यायचा प्रयत्न करतात. मग कुटुंबीय त्यांच्या बोलण्यात येऊन त्या व्यक्तीवर तिचा निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकत राहतात.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे ती जी व्यक्ती असते तिला मानसिक त्रास होतो. ती व्यक्ती आधीच काही अपयशांमुळे निराश झालेली असते. त्यातच काही उपद्रवी लोकांचे टोमणे, तिला जीवनात मिळालेल्या अपयशांमुळे अप्रत्यक्षपणे मिळणारी हीन वागणूक.. या सगळ्यामुळे ती व्यक्ती आपल्या कामावर, अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. मनात सारखे नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. ती व्यक्ती मनातून खचून जाते. तिला लोकांना सामोरं जाणं नकोसं वाटायला लागतं.. कधीकधी यातून त्या व्यक्तीला डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराला सुद्धा सामोरं जावं लागतं...
हे सगळं लिहिण्यामागे, सांगण्यामागे काही हेतू आहे. काही प्रश्न आहेत.. त्यांची उत्तरं हवी आहेत..
मला हे मान्य आहे की मी वरती उल्लेख केलेल्या प्रकारातील ८०-९०% लोकांच्या हेतुमध्ये काहीच गडबड नसते. ते त्यांच्या पातळीवर बरोबर असतात. आणि आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच ते हे सांगत असतात, सल्ला देत असतात. हे सगळं पटतंय मला.
पण तुम्ही जो सल्ला देत आहात, मत मांडत आहात ते पूर्वग्रहदूषित नाही का?? तुमच्या ओळखीतील कुणाला त्या क्षेत्रात अपयश आले म्हणून या व्यक्तीला पण येईल हे तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता? तो निर्णय घेत असताना त्या व्यक्तीने काहीतरी विचार विनिमय करूनच तो निर्णय घेतला असेल ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही? तुमच्या अनाहुत सल्ल्यामुळे त्या व्यक्तीचं खाच्चिकरण होतय हे कळत नाही का तुम्हाला?
बरं कुणी immature, आडाणी व्यक्तींनी असे सल्ले दिले तर समजू शकतो, त्यांचं बोलणं कुणीच जास्त मनावर घेणार नाही. पण शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर असलेले, अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेले लोक असे सल्ले देतात तेव्हा आश्चर्य वाटते. या शिकल्या सवरलेल्या लोकांना त्या व्यक्तीची बाजू कशी काय समजत नसेल? का मुद्दाम त्या व्यक्तीचे अथवा कुटुंबाचे वाईट व्हावे या हेतूने यातील काही मंडळी हे असे उद्योग करत असतात?
हो.. हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत. हे सर्व होऊन काही वर्ष सरली आहेत. अश्या लोकांचा व त्यांच्या त्या पूर्वग्रहदूषित सल्ल्यांचा, मतांचा विचार करणं मी मागेच सोडून दिलेलं आहे. आणि सद्यस्थितीला सगळं काही ठीक आहे. पण या अश्या व्यक्तींबद्दल मनात नकारात्मकता निर्माण झालेली आहे.. कधीकधी हे वरील प्रश्न मनात येतात.. पण समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरय....
जे सांशक असतात ज्यांच्या
माझे एक मत
फाट्यावर मारणे
शब्दाशब्दाशी सहमत.
नकारात्मक सल्ले
सगळ्यात सोपी गोष्ट...
सौंन्दर्य, राजेन्द्र मेहंदळे
खचून जाऊ नका
धन्यवाद..
अश्या व्यक्तींबद्दल मनात
माझा अनुभव
माझ्या मित्राची एकुलती एक
ऐकावे जनाचे करावे मनाचे