विंदांच्या कविता वाचकाला केवळ निखळ आनंद देणार्याच नसतात तर अनेकवेळा त्या विचारमग्न करायला लावतात असे मला वाटते. तुम्ही वर उल्लेख केलेल्या कविताही अशाच आहेत. त्या इथे
मांडल्याबद्दल धन्यवाद.
अभ्यासाच्या दृष्टीने केलेला कवितांचा वापर हा कॉपीराइटचा भंग ठरू नये. तसेही मूऴ कविता/ काव्यसंग्रह / प्रकाशक इत्यादी विस्तृत माहिती देऊन आपण त्यावर लेखन करता आहात. यातून व्यवसाय/ उत्पन्न काही नाही तेव्हा पॉपुलरला त्यावर काही आक्षेप नसावा:)
सोनाली
धनंजय, रसग्रहण आवडले. विंदांच्या बालकविता छानच आहेत. (मी सगळ्यास वाचल्या नाहीयेत.) तुम्ही रसग्रहण तर उत्तमच केले आहे. (दरिद्री अजिबात नाही.) आता या सगळ्या कविता वाचाव्याशा वाटत आहेत. परीच्या कविता चटका लावून गेल्या.
बिपिन कार्यकर्ते
सुंदर रसग्रहण/विवेचन. दुसरी नि तिसरी कविता आणि त्यावर तुम्ही आजच्या घडीला केलेला विचार यांवरून लेखनातून तुम्हांला मांडायचा असलेला मुद्दा कळला, पटला.
(आस्वादक)बेसनलाडू
एखादे दु:खी निपुत्रिक जोडपे आपल्या ओळखीतल्या निरागस छोट्या मुलीकडून ही कविता ऐकत आहेत. त्यातून छोटीला जाणवणारी मजा, आणि त्याच वेळी मोठ्यांच्या काळजाला लागणारे चटके - कल्पनेतही काटा येतो.
मग असे का बरे लिहले असावे :?
"परी आणि घर" शेवटच्या* कडव्यामुळे बालकविता वाटतच नाही. :-)
*अजुनही काही कडवी आहेत का त्या कवितेत?
रसग्रहण आवडले ..
कविता कशी वाचली म्हणजे तिचे सौंदर्य अजून खुलते याचे खूप छान विवेचन केले आहे.
पण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे एकदा लहान होउन आणि मग प्रौढ होउन वाचणे बहुदा मला जमले नसावे ( पुन्हा वाचून पाहीन) .
'फूलवेडी' ही कविता फार आवडली .
रसग्रहण आणि कविता दोन्ही आवडले. विंदांच्या कविता, वर सुवर्णमयीने म्हणल्याप्रमाणे विचार करायला लावणार्या देखील असतात. राष्ट्रीय पारीतोषिक मिळालेले अष्टदर्शन हे विविध देशातील नास्तिक विचारवंतांची कवितांतून माहीती करून देणारे पुस्तक पण वाचनीय आहे.
आम्हाला शाळेत असताना त्यांच्या अशाच चारोळी होत्या, त्यातील एक कायमची लक्षात राहीलेली कविता:
रामायण वाचुनीया नंतर,
बोध कोणता घ्यावा आपण?
रामासारखा मिळता नायक
वानर सुद्धा मारीती रावण
अथवा
इतिहासाचे अवघड ओझे
घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक
चढून त्यावर भविष्य वाचा
बाकी फुलवेडी ही कविता लहान मुलांची वाटण्यापेक्षा करूणच आहे असे वाटले. त्याचा शेवट वाचला आणि कानेटकरांच्या "लेकुरे उदंड झाली" मधले गाणे आठवले:
या गोजीरवाण्या घरात,
माणसांना लागलयं खूळ
त्यातली गोम अशी आहे,
आम्हाला नाही मूल...
विंदांच्या कवितांबद्दल, "कधी खिदळून बहिर्मुख करते, तर कधी अलगद अंतर्मुख करते." हे वाक्य एकदम पटले.
विंदां म्हटले की, आम्हाला आठवतात धोंड्या न्हावी, कावेरी डोंगरे, दाताकडून दाताकडे,साठीची गझल, इत्यादी-इत्यादी. पण विंदाची बालकविता कधी आवडीने समजून घेतली नाही. विंदांनी बालगीतांना बहुपदरी नवे स्वरुप देतांना एक स्वतंत्र भाषा त्यांनी दिली असे म्हटल्या जाते, ते आपल्या कवितेच्या रसग्रहणामुळे कळले, त्याचा आस्वाद आपल्यामुळेच घेता आला. धन्यू....!
-दिलीप बिरुटे
खूप छान रसग्र्हण . एखद्या साहित्यकृतीचे रसग्रहण करण्यासाठी विस्लेषणात्मक अशी वेगळी दृष्टी लागते. त्या शिवाय अभ्यास..
या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. वेळोवेळी येथे प्रसिद्ध साहित्यकृतीला आपण देत असलेल्या प्रतिसादांमधुन ते दिसून येतेच. त्यातून अम्हालाही खूप शिकायला मिळते..
धनंजय, रसग्रहण आवडले.
अवांतर : विंदांचे 'पिशी मावशी आणि तिची भुतावळ' हया संग्रहातील कविता मी वाचल्या होत्या. खूप छान आहेत. मूळात पिशी मावशी हे नावच मला खूप आवडले.
~साक्षी.
धनंजय रसग्रहण अतिशय आवडलं. खरं तर विंदांचे दोन काव्यसंग्रह उत्सुकतेने मी मध्यंतरी आणले. पण निगुतीने वेळ काढून वाचले नाहीत. तुमच्या या रसग्रहणाने त्या कवितांविषयीची उत्सुकता आता जागृत झाली आहे. आता वेळ काढून नक्की त्या वाचेन. बाकी. आपण दिलेल्यातल्या शेवटच्या दोन कविता नक्कीच चटका लावणार्या आहेत.
ता.क. लहानपणी आम्हाला तिसरी की चौथीत भाऊबीज नावाची कविता होती. कोणाची होती ते आठवत नाही. पण त्यात भावाला ओवाळायला बहिण नसते असे काहीसे वर्णन होते. मलाही बहिण नसल्याने ती कविता वाचताना फार रडायला येत असे. पुढे पुढे तर मी ती कविता टाळून पुढे जात असे. लहानपणची संवेदनशीलता आता तितकी राहिली नसावी की काय पण आज ती कविता समोर आली तर 'तो'भाव आज जागेल असे वाटत नाही. 'मोठं' झाल्यानंतर विचारशक्ती वाढते? तार्किकता वाढते? की संवेदनशीलता कमी होते? माहित नाही.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
सुंदर रसग्रहण. धनंजयांचा छाप जागोजागी दिसतो.
भाग्लास का वाचून धुकट सकाळ आठवली
त्यातही 'असेल्का विचारुन्शहार्लो मनात्मी' असे होते. ;)
अवांतर: एका बालगीताच्या कॅसेट मध्ये भाग्गलास्स का असेही ऐकले होते.
अतिअवांतरः टीपेत लिहिलेला विचार धनंजयच करू शकतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)
रसग्रहण आवडले. कविता २ याला खरेच बाल कविता म्हणावे काय? मात्र असा प्रश्न बहुदा मोठेपणीच पडत असावा.
बाकी हल्ली कोणी मुलांसाठी म्हणूक कविता लिहितं का? मी ह्ल्लीचा म्हणता येईल असा "अग्गोबाई-ढग्गोबाई" हा अल्बम ऐकला आहे- मी विकतहि घेतला आहे.. मात्र असा बालकवितासंग्रह वगैरे हल्ली निघाल्याचे - प्रकाशित झाल्याचे ऐकीवात नाहि
-(बाल)ऋषिकेश
वाचनीय होतो आहे. मुळात चांगले रसग्रहण, त्यावर तशाच मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करणारे प्रतिसाद. मधूनच एखादी माहिती, मध्येच गंभीर प्रश्न... छान.
वाचनीय देत रहायचे हा तुझा ध्यास वाखाणण्याजोगा आहे! अतिशय मोजक्या शब्दातले रसग्रहण भावले. :)
बालांच्या कविता ह्या यमकात गुंफलेल्या असतातच/हव्यातच याचे कारण अक्षरांच्या पुनुरुक्तीने त्याला एक नाद आणि गेयता येते.
मुलांना भाषा शिकायला आणि मोठ्यांना शिकवायला सोपी जाते.
नेहेमीच्या वापरातल्या साध्या शब्दांबद्दल म्हणाल तर लहान मूल घरात वावरताना ऐकू येणारे शब्द हेच ते चटकन समजू शकणार असते त्यामुळे त्याला पर्याय नाही.
एकूण लहान मुलांसाठी मनोरंजक कविता लिहिणे हे अवघड आहेच शिवाय ती कविता मुलांना म्हणून दाखवणार्या व्यक्तीकडे अभिनयगुण असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
कवितेतले शब्द हे चेहेर्यावर भाव घेऊन आले तरच मुले गुंगून जाणार.
पहिल्या कवितेत लठ्ठ - मठ्ठ आणि शाप - साप ह्या जोडगोळीने मुले खिदळणार!
दुसरीत परीचे आणि फुलाचे एक नाते निर्माण करुन दिले आहे. लहान मुलांना पाळण्यात ठेवलेले फूल हे त्यांच्या खेळातले मूल वाटू शकते किंवा थोड्या मोठ्या बालकांना त्यांचे पाळण्यातले भावंड हे फूल वाटू शकते. कल्पनारम्यता हा मुलांचा गुण हळूहळू विरत जातो. अन मोठेपणी स्वत:चे मूल नसलेल्या व्यक्तींबद्दलचे वास्तव समजल्याने अचानक ही कविता कारुण्यपूर्ण होते, इतकी की मनाच्या एखाद्या विशिष्ठ अवस्थेत टचकन डोळ्यात पाणी उभे करु शकेल!
तिसरी कविताही अशीच आहे. कल्पनाशक्तीला इतक्या वाटा फोडणारी.
विंदांच्या विलक्षण प्रतिभेला आणि त्यांची अशी वेगळी ओळख देणार्या धन्याशेठलाही माझा सलाम!
चतुरंग
खरे तर बालकांना फार आधीपासून कळणारी मराठी लय विंदा करंदीकरांनी प्रौढ कवितेतही मोठ्यांना शिकवली,
हे देखील पटले.
पहिली आणि दुसरी कविता छान.. तिसरी कविता मात्र आवडली नाही. कदाचित परी म्हणजे चांगली व्यक्ती जिला बालमन कळते, जिला जादू येते आणि जी आपल्या इच्छा पूर्ण करते अशी लहानपणी आपल्या मनात पक्की झालेली एक कल्पना असते.. त्यामुळेही असेल कदाचित..
'अजबखाना' वाचायला आवडेल.
चतुरंग यांचा प्रतिसादही आवडला.
--शाल्मली.
रसग्रहण आवडले.
खूप लहानपणी मीही वाचला आहे अजबखाना. त्या पुस्तकावरची चंद्र आणि इतर विमजिकल चित्रे अंधुकशी आठवत होती. आणि शोधली तेव्हा निदान कव्हर तरी सापडले. http://www.rasik.com/database/marathi/books/b538/cover.jpg
एटू लोकांचा देश आठवला. लहान असताना काही कवितांचा अर्थ खोल आहे हे नक्की जाणवलेले आठवते. लहानपणी या कविता whimsical, वेगळ्या वाटल्या होत्या, आता वाचल्या तर कदाचित करूण रस अधिक जाणवेल असे वाटते.
विंदांच्या कवितांमध्ये जो हा भाग आहे तसाच (त्याच दर्जाचा नसेल पण) काही इंग्रजी बडबडगीतांमध्येही आहे असे मला मोठेपणी जाणवले.
(अजून एक धक्का म्हणजे मनसे.ऑर्गवर विंदांचा परिचय सापडला.
http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=795)
धन्याशेठ, माझ्या विनंतीला मान देऊन तू हे लिहिलेस याबद्दल मनापासून आभार...
रसग्रहण उत्तमच. म्हातारीलाही दाखवणार आहे. तिची प्रतिक्रियाही कळवेन..
अवांतर - हीच विनंती मी मुक्तरावालाही केली आहे. त्याच्याकडूनही असा एखादा लेख अपेक्षित आहे. अर्थात, त्याच्या सवडीने. त्वरा नाही.
तात्या.
विंदाच्या कविता बालकविता सादर केल्या हाच एक फार मोठा आनंद आहे. आपण केलेले
रसग्रहणही अतिशय मार्मिक आहे. माझ्या मते अशी कविता प्रौढ म्हणून वाचण्यापेक्षा मूल
होऊन वाचण्यात आधिक मौज आहे. अशा वेळी आपण आपोआप पुन्हा त्या वयात आणि काळात
जातो.
धन्यवाद
प्रतिक्रिया
रसग्रहण
वा!!!
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
रसग्रहण
मलापण
मस्त
+१
हेच म्हणते.
रसग्रहण आवडले
मग असे का बरे लिहले असावे???
विंदांच्या कवितांचे --
सुंदर
व्वा !
रसग्र्हण .
आवडले.
रसग्रहण
विंदांचे दोन काव्यसंग्रह
वा..
छान
सुंदर
रसग्रहण
आवडले
रसग्रहण
मस्त!
एकूण धागा
धन्याशेठ, सतत काहीतरी नवीन
चतुरंग
रसग्रहण
रसग्रहण आवडले
वा ! फार
छान झालंय
रसग्रहण
धन्याशेठ,
रसग्रहण आवडले