आठवली. उत्तम कल्पना आणि शब्दांकन. ध्रुवपदाचे यमक प्रत्येक कडव्यात जोडणे, ही तुमची खासियत आहे.
एक शंका : "अश्वत्थ स्तब्ध झाला" या प्रतिमेचा त्या कडव्यात काय संदर्भ लावायचा? (चंद्रभागा, इंद्रायणी या वाहाण्यात त्यांचे सौंदर्य आणि मांगल्य आहे. त्या आटल्या गोठल्या जीव कसानुसा होतो. पण अश्वत्थ/पिंपळ पुष्कळदा स्तब्ध असूनही शांत-मंगल भासतो, इतकेच काय, रात्री सळसळला तर भीतिदायक वाटतो. त्यामुळे "मांगल्य संपले" विचारचक्रात या स्तब्ध अश्वत्थाचा मला संदर्भ लागत नाही.)
**उगीच मल्लिनाथी - शेवटचे कडवे फारच "कविता समजली नाही त्याला समजावून देणारे" वाटले. "झिजले देवाचे पाय" या शब्दांनी कवितेचा विषण्ण शेवट होऊ दिला असता तरी ही कविता (माझ्यासाठी) खूपच प्रभावी ठरली असती. शेवटची "कधी देव, कधी दैव" ही नवी आणि उत्तम कल्पना आहे, पण ती येण्यासाठी "गहाण त्याग", "लालची स्वार्थ" वगैरे बाळबोध स्पष्टीकरणे देणे टाळले असते, तर बरे झाले असते. ध्रुवपदाचाच असा कल्पक उपयोग शेवटचे कडवे म्हणून केलेला तुम्हाला चालेल काय -
श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय!
जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!**
प्रतिसादाबद्दल सग्ळ्या मित्रमंडळीचे धन्यवाद. मिपामुळे खूप काही नवीन शिकायला मिळते. मी या कवितेत धनंजयजी यांच्या सुचवण्यावरून छोटासा बदल [ अश्वत्थाच्या संदर्भात] केला आहे. असे मोलाचे मार्गदर्शन मिळाले की खूप हुरूप येतो. पुनश्च धन्यवाद.
:) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
सुंदर
मांगल्याच
अप्रतिम
खुपच छान
छान कविता
कमालीची सुंदर!
दिखाऊ श्रीमंत देवालये
जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!
+१
धन्यवाद.
ताई
जिथे माथा